-Kalpana K
#🌻आध्यात्म 🙏 #✍️भक्ती संदेश #🙏श्री गुरुदेव दत्त💐 अनेकांना प्रश्न पडतो की, दत्त महाराजांच्या भक्तीत वैराग्य इतके सहज कसे येते? याचे उत्तर ग्रंथांमध्ये जितके आहे, त्याहून अधिक ते दत्त महाराज आपल्या भक्तांच्या जीवनातून देत असतात. ज्याच्या हृदयात दत्तांचा वास होतो, त्याच्या मनातील आसक्ती आपोआप कमी होत जाते आणि त्या जागी शांतता, समाधान व ईश्वरनिष्ठा निर्माण होते. अशी विरक्ती ही संसाराचा तिरस्कार नसून, संसारात राहूनही मनाने श्रीगुरूंच्या चरणी स्थिर होण्याची अवस्था असते.
दत्त भक्ती आणि वैराग्य यांचा घनिष्ठ संबंध आहे . असे का होत असावे ? हा अनेकांना पडलेला प्रश्न असला तरी याचे उत्तर दत्त महाराज त्यांच्या सहवासातच देत असतात . दत्त महात्म्याच्या शेवटी थोरले महाराज म्हणतात ,विहार तुझा स्वभक्त हृदयात l तू भक्ताधीन सतत ll सन्यस्त अशा या दैवताचा आपल्या हृदयात निवास असणे हे या वैराग्याचे मूळ आहे .खेरीज संगती संग दोषेण या उक्तीप्रमाणे जशी संगत आपल्याला लाभेल तसे स्वभाव परिवर्तन होत असते . इथे दत्त महाराज स्मर्तृगामी आहेत त्यामुळे स्मरण करताच ते सन्निध असतात . नित्य सन्निध असणाऱ्या या उपास्य दैवताच्या संगतीचा आपल्यावर प्रभाव पडणार नाही काय ??
काही नको वाटणे ,सात्विक भाव कायम मनात असणे ,दत्त भक्तांच्या भेटी होणे ,दत्त महाराजांच्या गुणसंकीर्तनात कायम वेळ जाणे ,दत्त क्षेत्रांच्या यात्रा घडणे ,उत्तरोत्तर दत्त महाराजांच्या नामस्मरणात तल्लीन होणे हे सर्व अनुक्रमे दत्त भक्तीत दिसून येते .विरक्ती येणे हे आप्तस्वकीयांसाठी एक मोठे संकट वाटत असले तरी ती एका प्रकारे झालेली दत्त महाराजांची कृपाच आहे. जडमूढ अशी अवस्था नसली तरी सर्व उपभोगाबाबत उदासीनता हि या विरक्तीची खूण असते .
हि विरक्ती किंवा वैराग्य म्हणजे नेमके काय तर प्रत्येक गोष्ट हि दत्त महाराज घडवून आणत आहेत तेव्हा त्या त्या गोष्टीचा आनंद अथवा खेद मनाला न शिवू देणे म्हणजे विरक्ती असे म्हणायला हरकत नाही ,यांच्या पुष्ट्यर्थ एक छोटीशी गोष्ट सांगतो .
एका आश्रमात एका साधू महाराजांना एका माणसाने एक दुभती गाय दिली . शिष्याने हि गोष्ट साधू महाराजांना सांगताच ते म्हणाले ,उत्तम आपल्या पूजेला दूध मिळू शकेल . दुसऱ्या दिवशी ज्याने गाय दिली त्याच्या मनात विकल्प आला आणि त्याने गाय परत नेली ,हि गोष्ट शिष्याने साधू महाराजांना सांगितली . साधू महाराज म्हणाले ,छान झाले !!शेण गोठा करायचा त्रास वाचला .तात्पर्य काय तर गाय दिली म्हणून आनंद नाही आणि परत नेली म्हणून विषाद नाही . होणारे प्रत्येक कर्म हे त्याच्या इच्छेने आणि आज्ञेने होत आहे हे लक्षात ठेऊन आपल्या वर्तनात केलेली सुधारणा म्हणजेच विरक्ती .
आयुष्याचा बहुतांशी वेळ हा लोक काय म्हणतील ? या प्रश्नावर विचार करण्यात जात असतो .आपल्या कृतीने दत्त महाराज काय म्हणतील हा प्रश्न मनात येऊ लागला कि आयुष्याचा कायापालट झालाच म्हणून समजावे . श्री गुरुदेव दत्त l अभय आचार्य
ll अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ll
ll दत्तरुप ll