Dhamnashrya yuwa vichar mnach nanded
958 views 3 months ago
मी माझे आयुष्याचे शेवटचे दिवस बुद्ध धर्माच्या प्रचारातच व्यतीत करण्याचे ठरविले आहे... दिनांक २७ मे, १९५३ रोजी बुद्ध जयंती निमित्त सकाळी ८ वाजता वरळी, आंबेडकर मैदानावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामुदायिक प्रार्थना कशी करावी याचे मार्गदर्शन करणार आहेत आणि सायंकाळी ५ वाजता नरेपार्क, परेल (जी.आय.पी. रेल्वे वर्क शॉप समोरील मैदान) येथे त्यांचे जाहीर व्याख्यान होईल असे दि. २३ मे १९५३ च्या जनतेत श्री. आर. डी. भंडारे, सेक्रेटरी, बौद्ध धर्म प्रचार समिती यांनी जाहीर केले होते. त्यानुसार मुंबई नरेपार्क येथे दिनांक २७ मे १९५३ रोजी सायंकाळी या कार्यक्रमाला प्रचंड जनसमुदाय होता. प्रथम श्री.आर.डी. भंडारे यांनी भ. बुद्धाच्या फोटोला हार अर्पण केला. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या भाषणात म्हणाले, भगिनींनो आणि बंधुजनहो, आपण आज सर्वजण बुद्ध जयंती निमित्ताने एकत्र आलो आहोत. आज या ठिकाणी जी बुद्ध जयंती साजरी होत आहे तशी ती अनेक ठिकाणी साजरी होत असेल तरी येथील जयंतीला विशेष महत्त्व आहे. बुद्ध जयंतीचा दिवस हा सुट्टीचा दिवस मानला जावा म्हणून मी सन १९४२ सालापासून सरकारकडे मागणी करीत होतो. मध्यंतरीच्या काळात मंत्रीमंडळात असतानाही मी बुद्ध जयंतीची सुट्टी मिळावी म्हणून प्रयत्न करीत होतो. परंतु माझे मनोरथ पूर्ण होऊ शकले नाही. त्यावेळचे गृहमंत्री श्री. मॅक्सवेल यांचीही बुद्ध जयंतीची सुट्टी असावी अशी मनीषा होती. परंतु लढाईच्या काळामुळे ती सफल होऊ शकली नाही. बुद्ध जन्मदिनाची सुट्टी जर जाहीर केली तर आपणास युद्धासाठी मुसलमानांपासून मिळत असलेली मदत मिळणार नाही. या विवंचनेत ते होते. त्यानंतर मला पुन्हा काँग्रेस मंत्रीमंडळात घेतले गेले. मंत्रीमंडळात गेल्यानंतर ही माझी जी मागणी होती ती श्री. पंडित जवाहरलाल नेहरूंनी तरी मान्य करावी म्हणून मी त्यांच्या खूप पाठिशी लागलो. माझ्या या मागणीला महाबोधी सोसायटीचे अध्यक्ष डॉ. शामाप्रसाद मुखर्जी यांनीही सहाय्य केले. तेहतीस कोटी हिंदुंच्या जन्म दिवसास सुट्टी, मुसलमान, पारसी, जैन खिस्ती या धर्मातील देवांच्या जन्म दिवसात सुट्टी मिळते. मग बुद्ध जयंतीस का नको? एकतर या सर्व सुट्यातून एखादी कमी करून ती आम्हास द्या अगर एक सुट्टी जास्त वाढवा. अशी मागणी मी श्री. नेहरूंकडे केली. पं. नेहरूंना बुद्धाबद्दल बराच आदर आहे. सुदैवाने नेहरू सरकारने बुद्ध जयंतीची सुट्टी चालू वर्षापासून जाहीर केली. परंतु आपल्या मुंबई सरकारने तिला हरताळ फासला. आपले मुंबई सरकार खूप सुसंस्कृत आहे. मुंबई सरकार कल्चरच कल्चर आहे. वाटल्यास तुम्ही त्यास 'अॅग्रीकल्चर' म्हणा. अशा या सरकारने सुट्टी न दिल्यामुळे पाच वाजता होणारी ही सभा साडेसात वाजता होत आहे. बुद्धाचे नाव काढले की ज्या हिंदू लोकांना एक प्रकारची भीती वाटत होती व आपणावर कोणी बाँच तर टाकीत नाही असे वाटत होते; त्यांच्यामधील कैक लोकात सुज्ञानपणा येऊन ते आज बुद्धाचा गौरव करू लागले आहेत. मी काही एखादा भविष्यवादी नाही व पुढे काय होईल हे सांगू शकत नाही. पण एक गोष्ट मात्र निश्चित सांगू शकतो की, बुद्धाचा धर्म या पृथ्वीतलावर पुन्हा अवतीर्ण होईल. तो कोणत्या मागनि येईल हे आज सांगता येत नाही. मी एक बौद्ध धर्माचा उपासक आहे. मी नुसताच बोध घेतलेला नाही व नुसते बोलतो असे नाही तर प्रत्यक्ष कृती करून दाखवीन, माड़ो शेवटचे आयुष्याचे दिवस आता बुद्ध धर्माच्या प्रचारातच खर्च करण्याचे मी निश्चित ठरविले आहे. मी हे बुद्ध धर्म प्रचाराचे शेत पेरणार आहे व त्यात कोणते पीक येते हे पाहाणार आहे. बुद्ध धर्माबद्दल आपणास विशेष आस्था का वाटते, असे मला अनेक लोक विचारतात. डॉ. राधाकृष्णन् सारखे तत्त्ववेत्ते म्हणतात की, बौद्ध धर्मात विशेष असे काय आहे? त्यात व हिंदू धर्मात काय फरक आहे? उपनिषदातून बुद्धाने सारे काही घेतले, असे हिंदू तत्त्ववेत्ते म्हणतात. मला अशा लोकांबद्दल फारच आश्चर्य वाटते. ज्यांनी कोणी ब्राह्मणांच्या १३८ उपनिषदांचा अभ्यास केला असेल व ती पूर्णपणे वाचली असतील तर त्यात ब्रह्म व आत्मा या दोन गोष्टी शिवाय काय आहे, असेच त्यांना वाटेल. उपनिषदांच्या या कारखान्यातील ब्रह्म व आत्मा या दोन गोष्टीकडे पाहिले तर बुद्धाने त्यापैकी एकही गोष्ट मान्य केली नाही. बुद्धाने स्पष्ट सांगितले की, मला ईश्वर नको, परमेश्वर नको तर या पृथ्वीतलावर जन्मास आलेल्या प्रत्येक माणसास सुख व शांती मिळाली पाहिजे व सर्वांनी सुखाने राहिले पाहिजे. बुद्धाने नुसती शांतताच सांगितली नाही. बुद्ध हा खरा विचारवंत होता. त्याच्यासारखा विचारवंत अजूनपर्यंत जगात झालाच नाही. बुद्धाला वेद मुळीच मान्य नव्हते. हे त्यांनी स्पष्टपणे जाहीर केले होते. वर्णव्यवस्थाही बुद्धाला मान्य नव्हती. बुद्ध वाङ्मयात बुद्धाने चातुर्वर्ण्यवर पदोपदी प्रहार केलेले आहेत आणि त्यामुळेच त्याला कट्टर हिंदू धर्माचा कडवा विरोध झाला. या देशात तीन महत्त्वाचे पंथ आहेत. एक हिंदू, दोन जैन व तीन बुद्ध. जैनाबद्दल मला काहीच सांगावयाचे नाही. बुद्धाने जातीभेदावर कठोर प्रहार केले. मी ब्राह्मणांचा द्वेष करीत नाही. परंतु 'जरी ब्राह्मण झाला भ्रष्ट। तरी तो तिन्ही लोकी श्रेष्ठ' हे मी मान्य करणार नाही, अशी त्याची विचारसरणी होती. जातीभेदाचे मूळ कायमचे उपटून टाकण्यासाठी आपण हिंदू धर्माचा त्याग करणे आवश्यक आहे. चैनीत असलेल्यांना पायाखाली काय कुजत जाहे, याची जाणीव येणार नाही. ही जातीभेदाची समाजरचनाच जर उलथून पाडावयाची असेल तर आपणास बौद्धधर्माचीच शिकवण अंमलात आणली पाहिजे. ही गोष्ट मी निव्वळ गळ्यापासून बोलत नसून बेंबीच्या देठापासून बोलत आहे. ज्याप्रमाणे पांडव हे वनवासात गेले असताना त्यांनी आपली शस्त्रास्त्रे एका शमीच्या झाडावर ठेवून गुप्तपणे वनवास पत्करला व नंतर तीच धनुष्ये घेऊन त्यांनी पराक्रम गाजविला त्याचप्रमाणे आम्हीही आमची आयुधे बाहेर काढणार आहोत. मी माझा प्रचार तुमच्यापुरताच मर्यादित न ठेवता साऱ्या हिंदू धर्माला या नव्या क्षेत्रात आणण्याचा प्रयत्न करीन. यश कितपत येते ते पाहू. मानवतेचे संरक्षण होण्यासाठी हिंदुस्थानलाच काय पण साऱ्या जगाला शेवटी बौद्ध धर्माची कास धरावी लागेल. यासाठी मी बौद्ध धर्माचे बायबल लिहीले आहे. ते लवकरच प्रसिद्ध होईल व ते वाचल्यावर बौद्ध धर्म स्वीकारावयाचा की नाही, हे तुमच्या हाती राहील. एकदा तुम्ही जो मार्ग चोखाळला तो तुमच्या लक्षात राहिला पाहिजे. बुद्धाचे एक देऊळ मी मुंबईत बांधणार आहे. बुद्ध धर्माचे पुनरूज्जीवन करण्यासाठी आपण प्रत्येकजण या मंगलप्रसंगी प्रतिज्ञा करू या... मुक्तीदाता बुद्ध पौर्णिमा विशेषांक संदर्भ जनता, दि. ३० मे, १९५३. #bhimsenik #🙏 प्रेरणादायक बॅनर #🪷बुद्धांची तत्वे📜 #🙂Positive Thought #💙 भीमसैनिक 💙
15 likes
10 shares

More like this