आज अक्षय्य तृतीया अर्थात परशुराम जन्म दिवस. परशुरामांची एक अत्यंत ज्वलंत कथा आहे जी सर्वांनाच अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देते.
थोडक्यात ती कथा अशी आहे. एकदा पृथ्वीवर अधर्म वाढला होता. सत्ता हातात असलेल्या अनेक राजांनी धर्माची मर्यादा ओलांडली होती. प्रजेवर अन्याय, अहंकार, दडपशाही ह्यांनी परिसीमा गाठली होती. न्याय जणू हरवून गेला होता.
अशाच काळात, जमदग्नी ऋषींच्या आश्रमात एक घटना घडली…
कार्तवीर्य अर्जुन नावाच्या अत्यंत अहंकारी राजाने, आपल्या शक्तीच्या गर्वात, जमदग्नी ऋषींच्या आश्रमावर हल्ला केला. कामधेनूचा लोभ आणि त्या लोभातून केलेला अत्याचार.
ऋषींचा अपमान! आणि शेवटी त्यातच जमदग्नी ऋषींची हत्या करण्यात आली. जमदग्नी ऋषी हे परशुरामाचे वडील होते.
परशुरामांनी जेव्हा आपल्या वडिलांचा मृतदेह पाहिला, तेव्हा त्यांनी शपथ घेतली की “या पृथ्वीवरून अधर्म नष्ट करेपर्यंत मी शांत बसणार नाही.”
आणि मग सुरू झाली एक अद्भुत, भयावह पण आवश्यक अशी मोहीम! परशुरामांनी एकदा नव्हे, तर एकवीस वेळा पृथ्वी “निक्षत्रिय” केली! म्हणजेच अधर्मी क्षत्रियांचा पूर्ण नाश केला.
ही केवळ युद्ध नव्हती तर हा धर्म आणि अधर्म यांच्यातला निर्णायक संघर्ष होता. पण इथेही परशुरामांची महानता दिसते! कारण प्रत्येक वेळी जिंकल्यावर त्यांनी सत्ता स्वतःकडे ठेवली नाही.
जिंकलेली भूमी त्यांनी ऋषींना दान केली आणि पुन्हा तपश्चर्येत लीन झाले.
म्हणूनच शौर्य, संयम, त्याग आणि ज्ञान, या चारही गुणांचा संगम म्हणजे परशुराम! ते विष्णूचा सहावा अवतार होते! आहेत! ते फक्त योद्धा नव्हते, तर महान गुरू होते. त्यांनीच भीष्म, द्रोण, कर्ण यांसारख्या योद्ध्यांना त्यांनी शस्त्रविद्या दिली. ह्यातून हेच लक्षात येतं की त्यांनी केवळ अधर्माचा नाशच केला नाही… तर धर्माची परंपराही पुढे नेली आणि आजही ते त्याच कार्यासाठी जिवंत आहेत! म्हणूनच त्यांना “चिरंजीव” म्हटलं जातं. चिरंजीव म्हणजे अमर! ज्यांना मृत्यू नाही अशा अष्टचिरंजीवींच्यापैकी एक!
असं म्हणतात की परशुराम आजही पृथ्वीवर आहेत. कुठेतरी शांत… तपश्चर्या करत… योग्य क्षणाची वाट पाहत. जगात जेव्हा जेव्हा पाप पुन्हा वाढतं… अधर्म पुन्हा डोकं वर काढतो तेव्हा तेव्हा परशुराम पुन्हा उभे राहतात. यदा यदाही धर्मस्य....ह्या उक्तीला सत्यता आणायला. अधर्मी आणि अधर्माचा नाश करून पृथ्वी परत एकदा सुजलाम् सुफलाम् बनवायला! धर्माच राज्य परत वसवायला! विष्णूच्या शेवटच्या कल्की अवतरला युद्धविद्या शिकवायला!
आज त्यांचा जन्मदिन म्हणजेच अक्षय्य तृतीया. अक्षय्य म्हणजे ज्याचा कधीच क्षय होत नाही. जे कधीच नष्ट होत नाही किंवा संपत नाही. म्हणूनच अमर, चिरंजीव, अक्षय्य असेलल्या परशुरांचा जन्म दिवस देखील अक्षय्य तृतीया आहे. आज त्यांना मनःपूर्वक नमन करूया आणि युगानुयुगे अधर्मापासून ह्या पृथ्वीच रक्षण केल्याबद्दल त्यांचे आभार मानूया! जय परशुराम!
परशुराम जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏
टीप - पोस्ट आवडल्यास आपल्या वॉल वर अवश्य कॉपीपेस्ट नाही तर शेयर करा. #अक्षय तृतीया #अक्षय तृतीया #अक्षय तृतीया #अक्षय तृतीया 🙏🚩 #हँप्पी अक्षय तृतीया
![अक्षय तृतीया - % I *56il ]79% 10:33 Z 9 अक्षय सुख तुम्हास मिळो अक्षय प्रेम तुम्हाला लाभो अक्षय आनंद पदरी पडो अक्षय भरभरात होवो Gक्षय्य तृर्तीया निमित्त सर्वाना मंगलमय शुमेच्या. 3 % I *56il ]79% 10:33 Z 9 अक्षय सुख तुम्हास मिळो अक्षय प्रेम तुम्हाला लाभो अक्षय आनंद पदरी पडो अक्षय भरभरात होवो Gक्षय्य तृर्तीया निमित्त सर्वाना मंगलमय शुमेच्या. 3 - ShareChat अक्षय तृतीया - % I *56il ]79% 10:33 Z 9 अक्षय सुख तुम्हास मिळो अक्षय प्रेम तुम्हाला लाभो अक्षय आनंद पदरी पडो अक्षय भरभरात होवो Gक्षय्य तृर्तीया निमित्त सर्वाना मंगलमय शुमेच्या. 3 % I *56il ]79% 10:33 Z 9 अक्षय सुख तुम्हास मिळो अक्षय प्रेम तुम्हाला लाभो अक्षय आनंद पदरी पडो अक्षय भरभरात होवो Gक्षय्य तृर्तीया निमित्त सर्वाना मंगलमय शुमेच्या. 3 - ShareChat](https://cdn4.sharechat.com/bd5223f_s1w/compressed_gm_40_img_823168_18a5c8e0_1776582820900_sc.jpg?tenant=sc&referrer=pwa-sharechat-service&f=900_sc.jpg)

