-Kalpana K
595 views • 12 hours ago
#🌻आध्यात्म 🙏 #💐संत महंत🙏 #✍️भक्ती संदेश मित्रांनो, तुमच्या मते धर्म म्हणजे काय...?
तुम्ही म्हणाल, हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई हे धर्म आहेत. तुमचे उत्तर चुकीचे नाही. पण भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण ज्या धर्माच्या रक्षणासाठी अवतार घेतात, तो हा धर्म नाही.
मग तो धर्म कोणता...?
भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये म्हणतात
"यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत।
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्॥" (गीता ४.७)
याचा अर्थ – हे अर्जुना! जेव्हा जेव्हा धर्माची हानी होते आणि अधर्माचा प्रभाव वाढतो, तेव्हा तेव्हा मी अवतार धारण करतो.
आता प्रश्न असा आहे की, येथे भगवान कोणत्या धर्माबद्दल बोलत आहेत?
येथे धर्म म्हणजे कोणताही पंथ, जात, भाषा किंवा संप्रदाय नाही. धर्म म्हणजे परमेश्वराने निर्माण केलेला शाश्वत नियम आहे.या सृष्टी वरील मानवी जीवन जीवन प्रवास व्यवस्थित सुरु राहावा या साठी भगवंताने काही नियम आणि गोष्टी सांगितल्या त्यालाच धर्म असें म्हणतात, आणि धर्म म्हणजे सत्य बोलणे, न्यायाने वागणे, दया करणे, कर्तव्य पार पाडणे, दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होणे आणि प्रत्येक जीवामध्ये परमेश्वराचे दर्शन घेणे, हाच खरा धर्म आहे.
पुढे भगवान श्रीकृष्ण म्हणतात –
"परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्।
धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे॥" (गीता ४.८)
याचा अर्थ – सज्जनांचे रक्षण करण्यासाठी, दुष्टांचा नाश करण्यासाठी आणि धर्माची पुन्हा स्थापना करण्यासाठी मी प्रत्येक युगात अवतार घेतो.
याचा अर्थ परमेश्वर कोणत्याही एका समाजाचा किंवा एका पंथाचा नाही. तो संपूर्ण सृष्टीचा आहे. त्यामुळे तो ज्या धर्माचे रक्षण करतो, तो सर्वांना समान असणारा सनातन धर्म आहे.आज धर्माची ग्लानी म्हणजे मंदिरे कमी झाली म्हणून नाही, तर माणसाच्या मनातून सत्य, प्रामाणिकपणा, करुणा, संयम आणि ईश्वरभक्ती कमी होत चालली आहे.
महाभारतात एक सुंदर वचन आहे
"धर्मो रक्षति रक्षितः.
याचा अर्थ – जो धर्माचे रक्षण करतो, धर्म त्याचे रक्षण करतो.
म्हणून मित्रांनो, धर्म हा कपड्यांवरून, नावावरून किंवा जन्मावरून ठरत नाही. तो आपल्या विचारातून, आचरणातून आणि कर्मातून दिसला पाहिजे.
मित्रानो परमेश्वराच्या नजरेतला धर्म वेगळा आहे आणि आपल्या मनुष्याच्या नजरेत धर्म वेगळा आहे,
आपण कोणत्या धर्मात जन्मलो हे आपल्या हातात नव्हते, पण धर्माने कसे जगायचे हे मात्र आपल्या हातात आहे.परमेश्वराला तुमचा पंथ महत्त्वाचा नाही, तर तुमचे कर्म महत्त्वाचे आहे. कारण सत्य, प्रेम, दया, सेवा आणि न्याय या गुणांमध्येच परमेश्वराचे खरे स्वरूप वास करते.म्हणूनच, धर्माची सुरुवात मंदिरात नाही, तर आपल्या अंतःकरणात होते. आणि ज्या दिवशी आपल्या जीवनात हा धर्म जागृत होईल, त्या दिवशी परमेश्वराचा अवतार आपल्या हृदयातच प्रकट झाल्याचा अनुभव येईल.
मित्रानो धर्म म्हणजे नेमक काय हे खाली लिहीत आहेत
सत्य बोलणे.
असत्याचा त्याग करणे.
कोणाचीही निंदा न करणे.
कोणालाही धोका न देणे.
सर्वांशी प्रामाणिक राहणे.
दयाभाव ठेवणे.
प्रत्येक जीवावर प्रेम करणे.
अहिंसेचे पालन करणे.
क्षमा करण्याची वृत्ती ठेवणे.
क्रोधावर नियंत्रण ठेवणे.
लोभाचा त्याग करणे.
मत्सर न करणे.
अहंकार सोडणे.
नम्रतेने वागणे.
आई-वडिलांचा आदर करणे.
गुरुचा सन्मान करणे.
वडीलधाऱ्यांचा मान राखणे.
लहानांवर प्रेम करणे.
कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडणे.
न्यायाने वागणे.
अन्यायाला विरोध करणे.
परोपकार करणे.
गरजूंना मदत करणे.
दान करताना अहंकार न ठेवणे.
दिलेले वचन पाळणे.
विश्वासघात न करणे.
इंद्रियांवर संयम ठेवणे.
मन शुद्ध ठेवणे.
वाणी मधुर ठेवणे.
कटू शब्दांचा त्याग करणे.
ईर्ष्या न करणे.
दुसऱ्याच्या सुखात आनंद मानणे.
दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होणे.
सर्वांशी समान भाव ठेवणे.
स्वार्थापेक्षा परमार्थाला महत्त्व देणे.
कष्टाने उपजीविका करणे.
दुसऱ्याच्या हक्कावर डोळा न ठेवणे.
चोरी न करणे.
व्यसनांपासून दूर राहणे.
मन, वचन आणि कर्म यांची शुद्धता राखणे.
निसर्गाचे संरक्षण करणे.
प्राणिमात्रांवर करुणा ठेवणे.
अन्नाचा आदर करणे.
कृतज्ञ राहणे.
संतोषी वृत्ती ठेवणे.
नियमित ईश्वरस्मरण करणे.
सद्गुरूंच्या आज्ञेचे पालन करणे.
सत्संगाची आवड ठेवणे.
आत्मपरीक्षण करणे.
प्रत्येक कर्म परमेश्वराला अर्पण केल्याच्या भावनेने करणे.
सर्व जीवांमध्ये परमेश्वराचे दर्शन घेणे.
श्रीपाद श्री वल्लभ प्रसन्न
13 shares