❤🚩शिवभक्त🚩❤
2K views 11 hours ago
*महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल* *इतिहास शिवरायांचा* ********************************** *शिव दिनविशेष* 🚩🚩🚩⛳⛳⛳⛳🚩🚩🚩 *१६ ते २३ जुलै इ.स.१६७७* *(आषाढ वद्य एकादशी, शके १५९९, संवत्सर पिंगळ, वार सोमवार)* *महाराजांची व बंधू राजे व्यंकोजीराजे यांची प्रत्यक्ष भेट!* *राजे व्यंकोजीराजे भेटीस येत असल्याचे कळताच स्वतःचे वडीलपण विसरून महाराज खासे त्यांना "तिरुपन्नृती" गावापर्यंत सामोरे गेले. (तिरुमल्लपाडी पासून कोल्लिडम व कावेरी ओलांडून आल्यास तिरुपनृती ५, कोस पडेल.) तिरुपन्नृती हे गाव कुडमुरुत्ती नदीवर वसलेले असून नदीच्या दक्षिण तीरावर पुष्पवनेश्वराचे प्राचीन शिवमंदिर आहे. याच मंदिरात राजे व्यंकोजीराजे व महाराज प्रथम भेटले व तेथून महाराजांनी राजे व्यंकोजीराजे यांना सन्मानपूर्वक आपल्या तिरुमल्लपाडी मुक्कामावर नेले. परस्परांचे आगत-स्वागत, नजराणे, भेटी वगैरे अतिशय आनंदात पार पडल्या. ८ दिवस तिरुमल्लपाडीला राजे व्यंकोजीराजे मुक्कामास होते. या काळात शहाण्या मुत्सद्यांच्या समवेत एकांती बंधूंच्या अनेक बैठकी झाल्या.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *१६ जुलै इ.स.१६७७* *(आषाढ वद्य एकादशी, शके १५९९, संवत्सर पिंगळ, वार सोमवार)* *महाराजांचा जिंजीवर हल्ला!* *महाराज १६ हजार घोडदळ आणि १५ हजार पायदळ घेऊन जिंजीवर चाल करून गेले. याच वेळी विजापुरी सरदार नासीर मोहम्मदखानाने सुमारे ७ ते ८ हजार सैन्यानिशी हल्ला परतवण्याचा प्रयत्न केला. मात्र महाराजांच्या सैनिकांनी नासीरखानाचा हा प्रयत्न मोडून काढला. महाराज कर्नाटक मोहिमेत दिग्विजयाच्या दुष्टीने एकेक पाऊल पुढेच जात होते.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *१६ जुलै इ.स.१६८१* *मुंबईकर इंग्रजांनी सुरतकर इंग्रजांना लिहीलेल्या पत्राची नोंद!* *"शहजादा अकबराचे सैन्य दिवसेंदिवस वाढत असून त्याच्याजवळ १५०० स्वार असून त्र्यंबकहून आणखी पाच सहा हजार घोडेस्वार मिळणार आहेत. छत्रपती संभाजी महाराज त्याच्या भेटीस येण्याची रोज शक्यता वाटते. आणि असे बोलले जाते की, बुऱ्हाणपुर मोहिमेसाठी त्यास ते बरोबर घेऊन जातील. तेथे त्यांना आणखी काही हिंदुराजे व त्यांचे मित्र मिळतील. तेथून त्यांना तडख दिल्लीला धडक मारण्याचा बेत असावा.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *१६ जुलै इ.स.१७२९* *मराठे व छत्रसाल यांचा समाचार घेण्यासाठी अलाहाबादचा सुभेदार महंमद बंगश यास हुकूम दिला. सन १७२८ च्या डिसेंबरात जैतपूरनजीक बंगशाने छत्रसालावर हल्ला करून त्यास शरण आणिले. बंगशाचा पराभव करण्याकरिता छत्रसालाने अंतस्थ रीतीने पेशवे बाजीराव यांची मदत मागितली. त्यानुसार बाजीराव पेशवे पंचवीस हजार सैन्यानिशी छत्रसालाचे मुलुखात मार्च १७२९ त पोहचले. मराठे-बंगश युद्धास तोंड लागले. बंगशजवळ वीस हजार फौज व तोफखाना होता. मराठ्यांनी त्यास जेर करून कोंडले, गोट लुटून फन्ना केला. सहा हजार फौज बुडविली. सरदार मृत्यू पावला. एकोणीस हत्ती पाडाव झाले. मेपर्यंत जैतपुरावर बंगशाने श्रीमंत बाजीराव पेशव्यांस करार लिहून दिला की, “आम्ही बुंदेलखंड सोडून जातो, पुन्हा छत्रसालावर चढाई करणार नाही.” मराठ्यांना विजय मिळाला. छत्रसालाची सुटका श्रीमंत बाजीरावांनी केली म्हणून छत्रसाल खूष होऊन त्यांनी बाजीरावांस आपल्या राज्याचा तिसरा हिस्सा तोडून दिला. याच स्वारीत बाजीरावास मस्तानीची प्राप्ती झाली. बाजीराव व चिमाजी आप्पा हे विजय संपादून १६ जुलै १७२९ ला पुण्यास आले आणि तिथून छत्रपतींच्या बोलावण्यावरून पावसाळ्यात दोघे बंधू महाराजांच्या दर्शनास साताऱ्यास गेले. बुंदेलखंड हाती आल्यामुळे मराठ्यांस या स्वतःच्या मालकीच्या मुलुखात मुख्य ठाणे ठेवून आग्रा, दिल्ली, दुआबकडे स्वाऱ्या करणे सोपे झाले.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *१६ जुलै इ.स.१७३३* *साताऱ्याचे पंतप्रतिनिधी हे सुरुवातीपासूनच बाजीराव पेशव्यांचे अंतस्थ विरोधक. ते कायम बाजीरावांच्या मोहिमांमध्ये अडता घालण्याचा प्रयत्न करत असत. दि. १६ जुलै १७३३ मध्ये बालाजी नाईक महाडिक पेशव्यांना लिहितात, “जंजिरे सुवर्णदुर्गीहून अंजनवेलीचे कार्यभागास निघालो ते श्रीभार्गवस्थलावरून (चिपळूण) येता गोवलकोटची स्वारी (सिद्दी) श्रीस्थळी येऊन अनाचार करणार व ब्राह्मणाचे घरचा गला (पैसे) व घरे दग्ध करावयास स्वारी आली. हे वर्तमान मार्गी कलल्यानंतर श्रीस्थळी येऊनु गनिमाचे स्वारीचा दाखला घेऊनु युद्ध प्रसंग केला. त्याचा मोड करून सेपनास माणूस त्याचे मारले…”. पुढे प्रतिनिधींनी तर थेट सिद्दीसाताशी बोलणी करून महाडिकांनाही ‘एक किल्ला तुम्हाला देतो’ म्हणून वश करण्याचा प्रयत्न केला.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *१६ जुलै इ.स.१८५७* *रोजी तात्या टोपे, रावसाहेब, ज्वालाप्रसाद यांचा पराभव होताच, तात्या व इतर मंडळी अयोध्येला गेली. त्यांनी कानपूरवर हल्ला करण्यासाठी विठूरला मुक्काम ठोकला.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *१६ जुलै इ.स.१९८६* *इतिहास संशोधकाचा पिंड असणार्या बेंद्रे यांनी तुकाराम महाराजांचा कालखंड व जीवन यावरही प्रकाश टाकला. दंतकथांवर आधारित तुकारामांच्या परंपरागत चरित्रापेक्षा वेगळे चरित्र लेखन करून तुकारामाविषयीच्या अभ्यासाला त्यांनी शास्त्रशुद्ध बैठक दिली आहे. तुकारामांचे संतसांगाती, तुकाराम महाराजांची गुरु परंपरा, संत तुकाराम हे त्यांचे विशेष ग्रंथ.* *असे या इतिहाचासे भीष्माचार्य यांचे दि. १६ जुलै १९८६ रोजी निधन झाले.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *जय जगदंब जय जिजाऊ* *जय शिवराय जय शंभूराजे* ⛳ *जय गडकोट*⛳ *!! हर हर महादेव !!* 🚩आम्ही_शिवपाईक_बारा_मावळचे🚩 *श्री मंगेश चंद्रकांत वीर* ( भोर तालुका गड किल्ले संवर्धन सेल सोशल मीडिया प्रमुख ) मा श्री महेंद्र तानाजी देवघरे* ( अध्यक्ष पुणे जिल्हा ) मा श्री योगेशजी सुदामराव शेलार (प्रदेशाध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल) महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल #🙏 शिवराय स्टेटस #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🙏शिवदिनविशेष📜 #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा
31 likes
61 shares

More like this