⛳आजचे शिवकालीन ऐतिहासिक दिनविशेष⛳ 📜 २० जून इ.स.१६७७ विजापुरचा सुरमा म्हणून, अब्दुल्लाखानाची ओळख होती . हा किल्ले वेल्लोरचा किल्लेदार. राजांनी हा किल्ला घेण्यासाठी जोराची तयारी केली होती. पुढे मराठ्यांनी किल्ल्याला वेढा घातला. अब्दुल्लाखान किल्ला शर्थीने लढवत होता. तेव्हा किल्ल्यावर तोफांचा मारा करण्यासाठी महाराजांनी नजीकच्या २ टेकड्यांवर २ किल्ले बांधले, त्यांची नावे साजरा आणि गोजरा. तोफांचा मारा सुरु झाला. वेल्लोरचा किल्ला रेंगळणार असे दिसताच राजांनी नरहरी रुद्र या सरदारास २ हजार स्वार आणि ५ हजार पायदळ देऊन वेढ्याजवल ठेवले. त्यातच, दि. २० जूनला शेरखान मराठ्यांवर चालून आला, त्याला अडवायला राजे स्वतः गेले. खानाला पळता भुई थोडी झाली. पुढे त्याचा पाठलाग ही केला. शेरखान राजांना शरण आला. त्याची व्हालौर, टेजपठण, भवनगिरीपठण ही ठाणी मराठयांनी ताब्यात घेतली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर #🚩महाराष्ट्रातील गडकिल्ले🛕 #🙏शिवदिनविशेष📜 #🚩 छत्रपती शिवाजी महाराज गाणी🎶 #🚩शिवराय https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1 शिव दिनविशेष Video Link🔗 https://youtube.com/shorts/a2UAPOZKemM?feature=share 📜 २० जुन इ.स.१६८० छत्रपती संभाजी महाराजांना व्हिसेरेईने पाठविलेल्या पत्राची नोंद ! "आपल्या दुताने आणलेली प्रमाणपत्रे आम्हाला विश्वासार्ह वाटली नाहीत. दुसरी गोष्ट म्हणजे त्याला तहाच्या करारावर सही करण्याचे अधिकार तुम्ही दिले नव्हते. त्यामुळे तुमच्याकडून नवीन हुकुम येईतोवर तहाचा करार तहकूब ठेवावा लागत आहे". 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 २० जून इ.स.१६८० छत्रपती संभाजी महाराज रायगडावर छत्रपतींच्या मृत्यूनंतर दिनांक २१ एप्रिल १६८० रोजी आनाजी दत्तो यांनी पुढाकार घेऊन रायगडावर राजाराम महाराजांचे मंचकारोहण करविले व संभाजी राज्यांना अटक करण्यास पन्हाळ्याकडे कूच केली, पण त्वरेने हालचाल करून संभाजी राज्यांनी अटकचे फर्मान घेऊन आलेल्या सेनापती हंबीररावांना बरोबर घेतले, याची माहिती पत्ता कटात सामील असलेल्या सूत्रधारांना न्हवता, संभाजी राज्यांना कैद करण्यास गेलेले अनाजी दत्तो यांना हंबीररावांनीच कैद केले आणि सगळी फितुरी मोडीत काढली. संभाजी राज्यांनी पन्हाळ्याहून रायगडाकडे वीस हजार सैन्यानिशी कूच केली, स्वराज्याचे सेनापती संभाजीराज्यांना मिळाल्याने त्यांचे पारडे जड झाले होते, दिनांक २० जून १६८० रोजी रायगड सहजपणे शंभू राज्यांच्या ताब्यात आला, संभाजी राज्यांनी कटात सामील असणाऱ्यांना मोठ्या मनाने आणि मानाने स्वराज्यात सामील करून घेतले, अनाजी दत्तो याना अमात्य पद देण्यात आले, तरीही अनाजीनी आपल्या महत्वकांक्षेवर आवर घालता आला नाही. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 २० जून इ.स.१६८२ औरंगजेबपुत्र अकबराने छत्रपती संभाजी महाराजांकडे आश्रय घेतल्यापासून त्या दोघाविरुध्द हालचाली सुरु झाल्या होत्या, औरंगजेब स्वतः अकबराला पकडण्यासाठी व हिंदवी स्वराज्य संपवण्यासाठी दक्षिणेत बुर्हानपूर येथे सैन्यानिशी आल्यापासून त्याने दक्षिणेतील इतर सत्ताधीशांचे छत्रपती संभाजी महाराजांविरुध्द सहाय्य मिळवण्याचे प्रयत्न सुरु केले. त्या दृष्टीने त्याने पोर्तुगीज विजरईला आजच्या दिवशी पत्र पाठवले, पुढे सहा महिन्यांनी ते पत्र विजरईला मिळाले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 २० जून इ.स.१७३३ छत्रपती शाहुंचे रायगड संरक्षणासाठीचे पत्र रायगड हा मराठ्यांचा तख्ताचा गड ता.८ जून १७३३ ला मराठ्यांना हस्तगत झाला...... पुन्हा रायगड राजधानी हस्तगत झाल्याचे वर्तमान ऐकून शाहूने ता. २० जून १७३३ स्वहस्ताने पत्र लिहिले त्यात हा मजकूर आहे, घेतल्या स्थळाचे संरक्षण होय ते करणे. आम्ही ईश्वरी इच्छा आहे तर श्रावणात रायरी व बाजे किल्ला पहावयास येऊ. रा. शिवाजीमहाराज व रा. आबासाहेब संभाजीमहाराज व काकासाहेब (राजाराम महाराज) व मातुश्री ताराबाई साहेब यास कोणास न जाहले ते कार्य चि. फत्तेसिंगबाबा व रा. प्रधान यांनी केले ही कीर्त जगत्रयी व निजाम उल मुल्क व दिल्ली पावेतो जाहली. हा लौकिक जेणेकरून कायम राहील ते करणे. अनारम्भो हि कार्याणां प्रथमं बुद्धिलक्षणम् । जे सांगणे ते जाते समयी सांगितलेच आहे..... 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 २० जून इ.स.१७९० महादजी शिंदे याचा युरोपिअन सेनापती - डी बॉईन सन १७९० च्या आरंभीं डी बॉइनेच्या हाताखाली सात सातशें शिपायांची एक पलटण अशा आठ पलटणींचें एक ब्रिगेड होतें. त्यांत महादजीनें हळू हळू भर घालून शेवटीं त्या तीन ब्रिगेड केल्या. त्याचा तोफखानाहि वाढतां वाढतां शेवटीं एकंदर दोनशेंवर तोफा झाल्या होत्या. यांतील ६० तोफा सँग्स्टरनें आपल्या कारखान्यांतच ओंतून तयार केल्या होत्या. डी बॉइनेच्या प्रत्येक पलटणीबरोबर सहा पौंड वजनाचा गोळा फेंकणार्‍या दोन, तीन पौंड वजनाचा गोळा फेंकणार्‍या दोन व एक हॉविट्झर एवढा सरंजाम असून प्रत्येक ब्रिगेडला ५०० घोडस्वारांचें एक एक पथक जोडलेलें होतें. डी बॉइनेचा पगार शेवटी दरमहा १०,००० रुपयांपर्यंत वाढविण्यांत आला होता. याशिवाय त्याच्या पायदळाच्या व तोफखान्याच्या खर्चाकरितां कांहीं जमिनी लावून दिल्या असून त्यांच्या ऐन वसुलावर शेंकडा दोन टक्के नफा घेण्याची परवानगी देण्यांत आली होती. खड्या सैन्याशिवाय डी बॉइनेजवळ कांही निवडक हंगामी पायदळहि असें. यांतील शिपायांजवळ तोड्याच्या बंदुका असत; पण डी बॉइनेनें त्यांनां संगीनी लावण्याची युक्ति काढून या पायदळाची उपयुक्तता बरींच वाढविली होती. इस्मायलबेगशीं झालेल्या पाटणच्या लढाईंत (२० जून १७९०) महादजी शिंद्याचा जो विजय झाला तो मुख्यत: डी बॉइनच्या पलटणीमुळेंच. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇 https://youtube.com/c/thegreatmarathawarriors . . . 👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील. शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇 ☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम || || जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
125 likes
74 shares

More like this