Suraj Chavan
591 views 20 hours ago
*•།आजचे_ऐतिहासिक_शिवदिनविशेष།•* १ ऑगस्ट इ.स.१६४४ आदिलशहाचे एक फर्मान! "ज्याअर्थी राजे शहाजीराजे दरबारातून निर्वासित व अपमानित झाले व त्यांचा मुतालिक दादाजी कोंडदेव कोंडाण्याच्या बाजूस आहे (त्याअर्थी त्यांस) दफे करण्यासाठी व ती विलायत ताब्यात आणण्यासाठी खंडोजी व बाजी घोरपडे यांस तुमच्यासह नेमले आहे. तरी तुम्ही आपल्या हशमांसह मशारनिल्हे जवळ जाऊन त्यांच्या संमतीने दादाजी कोंडदेव व त्यांच्या संबंधिंना शिक्षा देऊन नेस्तनाबूत करा व ती विलायत ताब्यात आणा. ते तुमच्या उत्कर्षाचे कारण आहे. 📜 १ ऑगस्ट इ.स.१६७८ छत्रपती शिवरायांनी "पनवेल" प्रांत जिंकला. छत्रपती शिवाजीराजांनी कल्याण, भिवंडी, पनवेल जिंकल्यावर कल्याणच्या खाडीत समुहुर्ताने आपल्या आरमाराची पहिली पठाने तरती केली, तसेच वसई व चौल कडील प्रदेश काबीज केला. 📜 १ ऑगस्ट इ.स.१६९४ संताजी घोरपडे, धनाजी जाधव, रामचंद्रपंत यांनी अनेक संयुक्त मोहिमा काढल्या एक मोगली बातमीपत्रात यांच्या एकत्रीत असणाऱ्या एका मोहिमेची बातमी कळते २२ जुलै १६९४ चे बातमीपत्रात तळबीडचा ठाणेदार अडाणी याने धनाजी जाधव व हणमंतराव (निंबाळकर) ससैन्य तळबीड जवळ आले असून धामधूम माजविली आहे हे कळते सोबत संताजी घोरपडे आहेत आणि रामचंद्रपंत येऊन सामील होणार असल्याचे देखील समजते यावर बादशहाने आज्ञा केली की हिंमतखानाने जाऊन गानिमांवर हल्ला चढवावा.., याच्याच नंतर रामचंद्र अमात्य येऊन मिळाल्याने मराठ्यांची कुमक वाढली असून ते साताऱ्याच्या आग्नेयस असणाऱ्या वारूगड काबीज करण्याचा त्यांना इरादा असावा यासाठी महिमानगडाच्या किल्लेदाराने बादशहास अधिक कुमकीसाठीच अर्ज केला याची तारीख होती १ ऑगस्ट १६९४ 📜 १ ऑगस्ट इ.स.१७३४ (श्रावण शुद्ध त्रयोदशी, आनंदनाम संवत्सरी श्री शालिवाहन शके १५५६ रोजी गुरुवार) श्रीमंत बाजीराव (पहिले) पेशव्यांचे पहिले दोन पुत्र दीर्घकाळ जगू शकले नाही. यावेळेस काही अनुचित व अभद्र घडू नये म्हणून राधाबाईंनी(बाजीराव पेशव्यांच्या मातोश्री) सप्ताहास आणि अनुष्ठानास ब्राह्मण बसविले. पवित्रस्थानी अपत्य जन्मास यावे म्हणून काशिबाई साताऱ्यास माहुलीक्षेत्री राहायला आले. माहुलीला पेशव्यांचा एक लहानसा वाडा होता. आणि दि. १ ऑगस्ट १७३४, श्रावण शुद्ध त्रयोदशी, आनंदनाम संवत्सरी श्री शालिवाहन शके १५५६ रोजी गुरुवारी माहुलीच्या वाड्यात पुत्र जन्माला आला. बाळाचे बारसेही माहुलीलाच झाले. पेशव्यांच्या या नव्या पुत्राचे नाव ठेवण्यात आले 'रघुनाथ'. (हेच पुढे रघुनाथराव उर्फ राघोबादादा म्हणून प्रसिद्ध) साधारणतः त्याच सुमारास मस्तानीबाईंनाही पुत्रप्राप्ती झाली. या पुत्राचे नाव मस्तानीने 'कृष्णसिंह' ठेवले. रघुनाथपंतांच्या जन्मानंतर पुण्यात साखरा वाटण्याचा आणि चौघडा वाजविण्यासाठी चिमाजीआप्पांनी हुकूम सोडले. इकडे कृष्णसिंहाचा जन्म झाल्यानंतर त्या आनंदाप्रीत्यर्थ मस्तानीने खैरात वाटली. या दोन्ही पुत्रांच्या जन्माच्या वेळेस बाजीराव कुठे होते? बाजीराव होते कोकणात! छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून कोकणात पोर्तुगीज, इंग्रज, सिद्दी या परकीय सत्ता जम बसवत होत्या. महाराजांनी इंग्रज व पोर्तुगीजांना धाकात ठेवले होते. परंतु, सिद्दी मात्र उपद्रव देतच होता. *≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈* *आपल्या राजा शिवछत्रपती Whatsapp समुहामध्ये सामील होण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपले नाव आणि पत्ता सांगा आपल्याला समुहामध्ये सामील केले जाईल..*👇👇 *♠️ अजय सोनवणे* https://wa.me//918605494249 #☘️हर हर महादेव🙏🏼 #🙏शिवदिनविशेष📜 #🙏आई एकविरा 🙏 #🙏श्री गुरुदेव दत्त💐 #🙏श्री स्वामी समर्थ📿 *≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈* *WhatsApp ग्रुप लिंक* *།། राजा शिवछत्रपती །། इतिहास माझ्या राज्याचा समुह क्र.०१* https://chat.whatsapp.com/EBOf3f2DDie3q5GrvcKYNA *།། राजा शिवछत्रपती །། इतिहास माझ्या राज्याचा समुह क्र.०२* https://chat.whatsapp.com/F0OcXttE6x1LrWYF9eqWdb *≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈* *-----------☆★۩۞۩★☆-----------* *राजा शिवछत्रपती, इतिहास माझ्या राज्याचा* *महाराष्ट्र राज्य* *-----------☆★۩۞۩★☆-----------* *जय जगदंब जय जिजाऊ* *जय शिवराय जय शंभूराजे* *जय गडकोट* *!! हर हर महादेव !!*
14 shares

More like this