सचिन दादा पानसरे शिरवळ शहर
1K views • 1 days ago
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳
📜 २० जुलै इ.स.१६७२
( श्रावण शुद्ध षष्टी, शके १५९४, संवत्सर परिघावी, शनिवार )
श्रीक्षेत्र नाशिक स्वराज्यात दाखल :-
मोरोपंतांनी आजच्या दिवशी श्रीक्षेत्र नाशिक, आपल्या अतुलनीय पराक्रमाने स्वराज्यात सामील करून घेतले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर #🚩 छत्रपती शिवाजी महाराज गाणी🎶 #🚩महाराष्ट्रातील गडकिल्ले🛕 #🙏शिवदिनविशेष📜 #🙏 प्रेरणादायक बॅनर
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1
शिव दिनविशेष Video Link🔗
https://youtu.be/GTjTsge1JfA
📜 २० जुलै इ.स.१६८०
छत्रपती संभाजी महाराज यांचे मंचकारोहण ( ता.20 जुलै 1680 )
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांचे क्रियाकर्म साबाजी भोसले यांचे कडून करून घेण्यात आले होते .ही गोष्ट संभाजीराजांचे पासून लपून राहणे शक्य नव्हते. संभाजी राजांनी पन्हाळ्याचा बंदोबस्त करून रायगडाकडे कूच केले. सोयराबाई राणीसरकार अष्टप्रधान यांनी राजकारण करून संभाजी राजांना राज्य देण्याचे नाकारले होते. आपण स्वतः ज्येष्ठ पुत्र जिवंत असताना साबाजी भोसले यांचे कडून क्रियाकर्म केले याचे अतीव दुःख संभाजीराजांच्या मनात होते. राजाराम महाराजांना गादीवर बसवून राज्यकारभार हाती घेण्याचा प्रयत्न केला असला तरी सर्व सैन्य आणि प्रजा संभाजी राजांच्या बाजुने असल्यामुळे ,स्वराज्यावरील आपला हक्क मिळवण्यासाठी संभाजी राजांनी हालचाली सुरू केल्या. मोरोपंत आणि अण्णाजी दत्तो संभाजीराजांना पकडण्यासाठी निघाले असताना सरसेनापती हंबीरराव मोहिते यांना पत्र लिहून आपल्या पक्षात सामील होण्यास संभाजी राजे यांनी सांगितले .राज्यावर माझा अधिकार असून राजारामा सारख्या दुबळ्या व लहान मुलाला गादीवर बसवले तर शत्रुपक्षाला महाराष्ट्र सहज जिंकून घेता येईल असे त्यांनी पत्रात लिहिले होते .
१९ एप्रिल इ.स.१६८० च्या सुमारास संभाजीराजे पन्हाळ्याला असताना असंख्य सैन्य त्यांना जाऊन मिळत होते. संभाजी राजांनी आपला हक्क प्रस्थापित करण्यासाठी योग्य ती पावले टाकण्यास सुरुवात केली होती. सरसेनापती हंबीरराव मोहिते हे सोयराबाईं राणीसाहेब यांचे बंधू होते, तरीही त्यांचे सहकार्य छत्रपती संभाजी राजांना होते .हे स्वराज्यासाठी पर्यायाने संभाजीराजांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण होते.
संपूर्ण कटाचा पूर्णपणे बंदोबस्त केल्यानंतर संभाजी राजांचे राजपद निर्वेध झाले.कटकारस्थानात सहभागी झालेल्या अण्णाजी दत्तो आणि मोरोपंत पिंगळे या प्रमुख मंत्र्यांना संभाजी राजांनी कैदेत टाकले, तर राजाराम महाराजांनाही नजरकैदेत ठेवले गेले. राजाराम महाराजांना नजरकैदेत ठेवले याचा हेतू पुन्हा त्यांना हाताशी धरून मंत्र्यांनी कारस्थाने करू नये हाच होता. अशा परिस्थितीत कोणताही शासनकर्ता जे करील तेच संभाजी राजांनी केले. संभाजीराजे रायगडावर येऊन आठ दिवस झाले नाहीत तोच दिनांक २७ मे इ.स.१६८० या दिवशी त्यांच्या सावत्र आई पुतळाबाई राणी साहेब सती गेल्या.
रायगडावरील परिस्थिती आटोक्यात आल्यावर आणि राज्यात स्थिरता प्राप्त झाल्यावर संभाजी राजांनी स्वतःला राजा झाल्याचे जाहीर केले. संभाजी राजांना सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्याप्रमाणेच महाराणी येसूबाई यांचे पिता पिलाजी राजेशिर्के यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे साथ दिली.पिलाजी राजेशिर्के त्यांनी 10 हजार मावळ्यांनिशी संभाजीराजे रायगडावर जाण्याआधीच रायगडाचा बंदोबस्त केला होता.सर्व चौक्या-पहारे उठवून त्यांच्या लोकांच्या मदतीने सर्व ठिकाणांची व्यवस्था केली.संभाजी राजांच्या सुरुवातीच्या काळात पिलाजी राजेशिर्के हयात असेपर्यंत राजेशिर्के घराणे संभाजी राजांच्या भक्कमपणे पाठीशी ऊभे होते. स्वराज्य प्राप्तीसाठी संभाजी महाराजांना पिलाजीराजे शिर्के यांनी पुरेपूर साथ दिली.
कटाचा पूर्णपणे बंदोबस्त केल्यानंतर २० जुलै इ.स.१६८० ला संभाजीराजांचा मंचकारोहन विधी पार पडला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २० जुलै सन १७६१
(आषाढ वद्य तृतीया शके १६८३, वृषनाम संवत्सरी, सोमवार)
वयस्कर मुत्सद्दी असे म्हणावे तर महादजीपंतनाना पुरंदरे होते. त्यांच्या सल्ल्यानुसार नानासाहेब पेशव्यांचे दिवस वगैरे आटोपून ते माधवराव, रघुनाथराव, आपले पुत्र निळकंठराव पुरंदरे, नाना फडणवीस, सखाराम बापू बोकील वगैरे प्रभृतींसह साताऱ्यात आले. यावेळेपर्यंत राघोबादादांना 'आता आपल्यालाच पेशवाई मिळणार' असे वाटत होते. परंतु नानासाहेबांचे दोन पुत्र हयात असता त्यांच्यातील थोरल्या पुत्रासच पेशवाई मिळावी या हेतूने महादजीपंतांनी सातारकर राजाराम महाराजांकडून आषाढ वद्य तृतीया शके १६८३, वृषनाम संवत्सरी, सोमवारी म्हणजेच दि. २० जुलै सन १७६१ रोजी माधवरावांना पेशवाईची वस्त्रे देववली. त्याचबरोबर निळकंठपंत महादजी उर्फ आबासाहेब पुरंदरे यांना मुतालकी आणि सखारामबापू बोकील यांना दिवाणगिरीची वस्त्रे देण्यात आली. यावेळेस माधवरावांचे वय अवघे सोळा वर्षांचे होते. हा सारा समारंभ होतानाच रघुनाथरावांच्या मनात मात्र तिरस्काराची एक झालर उठली होती.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २० जुलै इ.स.१८१५
गायकवाड यांचे वकिल गंगाधरशास्त्री पटवर्धन यांचा खुन झाला. बडोद्यावरून इंग्रजांना अनुकूल असलेले गायकवाड यांचे वकिल गंगाधरशास्त्री पटवर्धन हे पेशव्यांशी बोलणी करण्याकरिता पंढरपूर येथे गेले असता त्यांचा खुन झाला. त्याचा आळ मात्र भामट्या इंग्रजांनी त्रिंबकजी डेंगळे यांच्यावर घातला. आणि त्यांस आपल्या ताब्यात देण्याबद्दल दुसरे बाजीराव यांच्याकडे निकड लावली. तेव्हा बाजीरावांनी त्यांस पकडून इंग्रजांच्या स्वाधीन केले. सुमारे १ वर्षानंतर ते इंग्रजांच्या तुरूंगातून निसटले आणि थोडे दिवस स्वस्थ राहून नंतर मात्र त्यांनी आपल्या हालचाली सुरू केल्या.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 २० जुलै इ.स.१९४२
बाबासाहेबांना मजूर मंत्री करण्यात आले
१९३८ साली काँग्रेसने आद्योगिक कलहाचे विधायक मुंबई विधिमंडळात विचारासाठी मांडले. कामगारांच्या हक्कावर गदा येणारे विधायक मांडण्यात येणार होते. या विधायकात कामगारांचा संप बेकायदेशीर ठरविण्याच्या तरतुदी बरोबरच मालकांनी जर टाळेबंदी जाहीर केली आणि कारखाना बंद झाला तर मालकांवर काहीही कारवाई करता येणार नव्हती. हा कायदा कामगारांच्या हक्काच्या विरोधात असल्यामुळे बाबासाहेबांनी या कायद्यांवर कडाडून हल्ला चढविला. "हा कायदा काळा आहे" असे म्हणत बाबासाहेबांनी आणि जमनादास मेहता यांनी या कायद्याला विरोध केला. मात्र विधिमंडळात बहुमताच्या जोरावर हा कायदा संमत झाला. बाबासाहेबांच्या स्वतंत्र मजूर पक्षाने आणि गिरणी कामगार यांनी संयुक्तरित्या संपाचे हत्यार उपसले. संपूर्ण मुंबई प्रांत या संपात सहभागी झाला. या संपाचे पडसाद भारतभर उमटले व हा कायदा रदबद्दल करण्यात आला. या यशामुळे बाबासाहेबांवर सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात आले. पुढे २० जुलै १९४२ साली बाबासाहेबांना मजूर मंत्री करण्यात आले. सर्व कामगार वर्गात आनंदाचे वातावरण पसरले होते. मजूर मंत्री झाल्यानंतर बाबासाहेबांनी एक खूप महत्त्वाचा निर्णय घेतला जो अतिशय दूरगामी ठरला. या निर्णयानुसार जे अनुभवी मात्र अर्धशिक्षित तंत्रज्ञ तयार होत होते त्यांना नोकरीसाठी भटकंती करावी लागू नये म्हणून बाबासाहेबांनी Employment Exchange स्थापन केले. त्यामुळे अनेक तरुण तरुणींना नोकरीसाठी अनेक ठिकाणांवरून बोलावणे येऊ लागले. त्यांच्या नोकरीचा प्रश्न सुकर झाला. मंत्रिपदाच्या काळात बाबासाहेबांनी काही क्रांतिकारक निर्णय घेतले ज्याच्या फायदा समाजातील सर्व जाती धर्माच्या लोकांना झाला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २० जुलै इ.स.१९६५
क्रांतिकारक बटुकेश्वर दत्त ह्यांचा आज स्मृतिदिन !
बटुकेश्वर दत्त यांचा जन्म १८ नोव्हेंबर १९१० मध्ये बंगाल मधील ओरी गावात झाला होता. कानपूरच्या पी.पी.एन. महाविद्यालयात शिकत असताना त्यांची ओळख भगतसिंहांशी झाली व त्यांच्या विचारांनी प्रभावित होऊन ते ‘हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन‘ या क्रांतिकारी संघटनेत कार्य करू लागले.याच दरम्यान त्यांनी बॉम्ब बनवण्याचे तंत्र शिकून घेतले व त्यांच्या पुढाकाराने आग्रा येथे एक गुप्त बॉम्ब बनवण्याचा कारखाना चालू केला होता.
१९६४ साली कसल्याश्या आजाराने त्रस्त हा क्रांतिवीर पाटण्याच्या सरकारी दवाखान्यात खितपत पडला होता,शेवटी त्यांचे आझाद नावाचे मित्र यांनी वर्तमानपत्रात लेख लिहून या उपेक्षेविरुद्ध आवाज उठावाला, तेव्हा कुठे सरकारला जाग आली,पण तोवर वेळ निघून गेली होती.त्यांना कर्करोग झाल्याचे निदान केले गेले, म्हणून दिल्लीच्या सफदरजंग इस्पितळात हलवण्यात आले, याही क्षणी “ज्या दिल्लीत मी बॉम्बस्फोट करून आवाज उठावाला त्या दिल्लीत पुन्हा स्ट्रेचर वरून असे आणले जावे” हि खंत त्यांनी बोलून दाखवली.
पण सरते शेवटी मृत्यूपश्चात आपले अंतिम संस्कार हे भगतसिंह, सुखदेव, राजगुरू या आपल्या मित्रांच्या शेजारी हुसैनीवाला येथेच करावेत हि इच्छा बटुकेश्वर दत्तांनी व्यक्त केली अन २० जुलै १९६५ साली त्यांनी आपले प्राण त्यागले.
ह्या महान क्रांतिकारकास विनम्र आदरांजली !!!!
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇
☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम ||
|| जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
15 likes
16 shares