🥭*हापूस आख्यान*🥭 ✅ओरिजिनल देवगड हापूस कसा ओळखवा?? ✴️जर तुम्ही या वर्षी देवगड हापूस अगदी काल पर्यंत ८००/- रू.डझन पेक्षा कमी भावाने घेतला असेल तर तो देवगड हापूस नव्हे हे मी छातीठोकपणे न बघता सांगतो.कारण रमझान व गुढी पाडव्या मुळे जाग्यावर ही या पेक्षा कमी भाव नव्हता.असे नाराज होऊ नका बुवा!एकदा फसलात म्हणून नाराज नका होऊ.अजून दीड महिना सिझन आहे. व भाव ही आता बऱ्यपैकी आटोक्यात येतील.मग काय काय काळजी घ्याल खरेदी करताना? 🔸देवगड हापूस घरात असेल तर त्याचा वास लपून राहत नाही.बाजारातून आंबा खरेदी करताना तो नाकाला लावण्याची गरज नाही.नुसता हातात घेतला तरी त्याचा वास आला पाहिजे. 🔸संपूर्ण फळ एकसारखे पिवळे असेल तर तो आंबा चुकूनही घेऊ नका.तो नैसर्गिक रित्या जून होऊन पिकलेला नाही.तो कृत्रिमरीत्या पिकविलेला आहे.तो वरून पिवळा धम्मक दिसला तरी कापल्यावर आतून पांढरा व चवीला आंबट निघतो.त्या मुळे हिरवट पिवळट थोडासा केशरी शेड असलेला आंबा घ्या. 🔸हे सगळं बघण्या पेक्षा आंबा देठा कडून आत खेचला गेला आहे ना ते अवश्य बघा. 🔸देवगड हापूस आतून केशरीच निघतो.रत्नागिरीचा पिवळा.त्या ही पेक्षा कातळा वराचा केशरी,मातीतला पिवळा.देवगड आकाराने जास्त गोलाकार तर रत्नागिरी लांबट मोठा! कातळा वरचा आंबा चवीला ही खूपच उजवा असतो. 🔸जास्त मोठं फळ घेण्याच्या भानगडीत अजिबात पडू नका.चवीला कमी गोड,भाव जास्त,खराब निघण्याची शक्यता जास्त आणि चांगलं मोठं फळ खराब निघाल्याचे दुःख ही जास्त!अनुभव घेऊनच माझ्या सांगण्यावर विश्वास ठेवा. 🔸देवगड हापूस ची साल एकदम पातळ व गरात दोरे दोरे जवळ जवळ नसतातच.कर्नाटकी आंब्याच्या गरात दोरे जास्त असतात.रत्नागिरी ची साल देवगड पेक्षा जाड असते. ✴️आंब्याचे फायदे आणि तोटे ✴️ 🔸आंब्या मुळे हिमोग्लोबिन चांगलेच वाढते. इतरही पोषक द्रव्ये विपुल प्रमाणात मिळतात. रोज एक सफरचंद खा आणि डॉकटर दूर ठेवा! मी म्हणेन फक्त दोन महिने आंबे भरपूर खा आणि वर्षभर डॉकटर ला दूर ठेवा.आंब्यामुळे उत्पादन क्षमता वाढते.आता हा तुमच्यासाठी गुण की दोष हे तुमच तुम्हीच ठरवा. 🔸आंब्यां मुळे वजन वाढते ही गोष्ट खरी आहे. 🔸आंब्या मुळे डायबेटिस वाढतो हा अजून एक गोड गैरसमज.उलट आंब्या मुळे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते.आंब्यातील शुगर पाचविण्यास इंशुलिन नव्हे तर पित्त रस लागतो.आंबे सेवनाने इतर खाणे की जे पचण्यास इंशुलीन ची गरज असते ते आपोआपच कमी खाल्ले जाऊन शुगर लेवल आपसूकच कमी होते. ✴️आंब्याचे byproducts ✴️ 🔸आंबा साठ, आटवलेला रस,पॅक आमरस या स्वरूपात वर्षभर खाता येतो हे तर तुम्हाला माहीतच आहे,चांगला पिकलेला पण मऊ न झालेल्या आंब्याची साल व बाठा काढून फोडी घट्ट झाकणाच्या डब्यात भरून डिफ्रिझर मधे ठेवल्या तर सिझन संपल्यावर सुद्धा पुढे ३/४महिने त्या फोडी खाण्याचा आनंद घेता येतो.पण एकदा का फोडी बाहेर काढल्या की त्याच दिवशी संपवून टाकाव्यात.त्या साठी मग एकच मोठा डबा घेण्या पेक्षा अधिक छोटे डबे वापरा. आंब्याच्या शेकडो जाती आहेत .पण देवगड हापूस तो देवगड हापूस!गोड!नेहमीच हवा हवासा वाटणारा!अती प्रिय! रोज खाल्ला तरी कंटाळा न येणारा! 🔆🙏🔆 #🔎लेटेस्ट आंतरराष्ट्रीय अपडेट्स✌ #👌हृदयस्पर्शी फोटो #👌प्रेरणादायी स्टेट्स #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स
15 likes
10 shares

More like this