Marathi Social Media
7K views 3 days ago
भयंकर पाऊस पडणार ; 24 तास धोक्याचे ! #मुंबई ;महाराष्ट्रातील विदर्भ विभागात पुढील २४ तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली असून, भारतीय हवामान विभागाने (IMD) अनेक जिल्ह्यांसाठी रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. विशेषतः अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला असून नागरिकांनी अत्यंत सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार अकोला, चंद्रपूर आणि नागपूर जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांमध्ये काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता असून, काही भागांत २०० मिमीपर्यंत पावसाची नोंद होऊ शकते. त्यामुळे नदी-नाले, ओढे आणि सखल भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. याशिवाय राज्यातील पालघर आणि रायगड जिल्ह्यांनाही ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, रत्नागिरी, पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, वाशीम, वर्धा, हिंगोली, परभणी, नांदेड आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्येही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, देशभरातही पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असून महाराष्ट्रासह दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, आसाम, ओडिशा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, तामिळनाडूसह एकूण २२ राज्यांसाठी भारतीय हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. हवामान विभागाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचा, पूरग्रस्त किंवा पाण्याखाली गेलेल्या रस्त्यांवरून प्रवास टाळण्याचा तसेच स्थानिक प्रशासन आणि हवामान विभागाच्या अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. संभाव्य अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन यंत्रणांनाही सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. #rain #⛈️राज्यात 4 दिवस मुसळधार पावसाचा अलर्ट!⚠️
41 likes
78 shares

More like this