Savita Pisal Konde Deshmukh.(H.S.C.D.ed)🎷🚩📚🛵
510 views • 1 days ago
स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब यांचे अकाली निधन झाल्यानंतर जनआक्रोश इतका होता की त्यांच्या कुटूंबियांना चौकशीची मागणी करायची गरज पडली नाही.त्यांच्या अपघाताची CBI चौकशी झाली आणि त्यात अपघात असल्याचाच निर्वाळा दिला गेला.आता या चौकशीच्या तथ्यांवर आक्षेप घेतले जाऊ शकतात कारण मोदी शहांच्या काळात हरेन पांड्यासारख्या मोठ्या नेत्याची हत्या गुजरातमध्ये घडवून आणण्यात आली होती आणि त्यांच्या वडिलांनी नरेंद्र मोदींवर आरोप केले होते.पण गुजरातमध्ये सगळी यंत्रणाच या दोघांच्या हातात असल्याने हरेन पांड्यांना न्याय मिळाला नाही.त्यामुळे मोदींच्या सीबीआयने गोपीनाथ मुंडे साहेबांच्या मृत्यूची चौकशी तरी केली यात थोडे समाधान त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांना असू शकते.पण त्याचवेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अपघाती मृत्यूबाबत आपल्याला घडलेल्या घडामोडींची दखल घ्यावी लागेल.
तर आता आपण येऊ, आमच्या काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनजी सकपाळ यांनी सुनेत्रा पवार यांना गुंगी गुडिया का म्हटलं याच्याकडे...तर अजित पवारांच्या विमान अपघातातील मृत्यूनंतर कसलीही अधिकृत चौकशी झाली नाही.कुठलाही FIR नोंदवला गेला नाही. विमान कंपनीच्या मालकाची किंवा संबंधित अधिकाऱ्यांची साधी चौकशीही झाली नाही.एवढा मोठा नेता गेला पण त्यांच्या कुटूंबातील त्यांच्या पत्नीने म्हणजेच सुनेत्रा पवार यांनी आपल्या पतीच्या जागी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.राष्ट्रवादी पक्षाच्या अध्यक्षपदाची सूत्रे हातात घेतली.पार्थ पवार यांना राज्यसभा खासदार बनवले. त्यांच्यासोबतच जय पवारला पक्षातही पद दिले.या सगळ्यात त्यांच्या कुटुंबियांनी मुख्यमंत्र्यांना चौकशीचे निवेदन देण्यापलीकडे काय केलं? मंत्रिमंडळातील एवढा मोठा मंत्री अपघातात गेला तरी त्यांनी हा मुद्दा मंत्रीमंडळ बैठकीत चर्चिला नाही.एवढेच काय पक्षाच्या कुठल्याही कार्यक्रमात या कुटुंबियांनी चौकशीची मागणीही केली नाही.स्वतः सुनेत्रा पवार यावर कधीही बोलल्या नाहीत. त्यांचा पक्षही याबाबतीत सुस्त दिसला. याउलट चौकशीची मागणी रोहित पवार यांनी केली. राज्य सरकारवर दबाव आणला. कर्नाटकात FIR नोंदवली. जे सुनेत्रा पवारांच्या पक्षाचे माजी आमदार अमोल मिटकरी त्यांच्या अजित दादांवरील प्रेमामुळे कायम चौकशीची मागणी करत होते ते अडगळीत पडले आणि त्यांना पक्षाने एकटे पाडले.
सुनेत्रा पवार यांनी भाजपवर दबाव न आणण्याचे एक कारण हेही असू शकते की, पार्थ पवारांनी केलेला मुंढवा जमीन घोटाळा...कारण या घोटाळ्याची चौकशी इतक्या संथगतीने चालू आहे की आता तिला कासवगतीही म्हणता येणार नाही.त्याचबरोबर सुनेत्रा पवारांना अर्थमंत्रीपद हवे आहे जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांना द्यायला तयार नाहीत.आता सुनेत्रा पवार यांच्याकडे गप्प बसण्यापलीकडे कसलाही पर्याय नाही.त्यांचा पक्ष फुटू नये म्हणून त्यांना पक्षातील छोट्या मोठ्या आमदारांचेही ऐकावे लागत आहे नाहीतर भाजप कधीही त्यांचा पक्ष शरद पवारांच्या ताब्यात देऊ शकते किंवा तृणमूलसारखा गेम करू शकते. त्याचबरोबर सुनेत्रा पवार यांच्यावर विलीनीकरण करण्याचा दबावही आहे पण त्या शरद पवारांच्या नियंत्रणात काम करायला तयार नाहीत.
हे सगळं होत असताना सुनेत्रा पवारांनी मौनव्रत धारण केलं आहे.त्यांची कसलीही वेगळी प्रतिक्रिया आलेली नाही.मग अशा गप्प व्यक्तीला काय म्हणावे? सुरज चव्हाण सारखे चमचे पुढं करून काँग्रेसच्या कार्यालयात धुडगूस घालून सुनेत्रा पवार बोलायला लागणार आहेत का? काँग्रेस पक्ष अहिंसेला मानणारा आहे त्यामुळे मनसे, शिवसेना पक्षासारखी गुंडगिरी काँग्रेस कार्यकर्ते करणारही नाहीत.पण हर्षवर्धनजींच्या एका वक्तव्याने राष्ट्रवादीपेक्षा जास्त मिरची भाजपच्या भक्तांना लागली आहे हे त्यांच्या प्रतिक्रिया बघून नाकारता येत नाही.तसेच महिला कार्ड खेळून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जे बोलत आहेत त्याला प्रतिवाद करता येत नाही.म्हणून तूर्तास गुंगी गुडिया शेरा पुसण्यासाठी सुनेत्रा पवारांना भविष्यात खूप मेहनत घ्यावी लागणार
#👉शरद पवार #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #👌प्रेरणादायी स्टेट्स #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स #🏛️राजकारण
16 likes
14 shares