⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳ 📜 २४ जुलै इ.स.१२०६ मोहम्मद घोरीचा गुलाम म्हणून प्रसिद्ध असलेला कुतुबुद्दीन ऐबकाने दिल्लीची सत्ता हस्तगत केली. कुतुबुद्दीन ऐबक हा मूळचा मुसलमान असूनही त्याच्या घरावर मुसलमानांनी दरोडा घालून त्याला पळवून नेले होते. नंतर कुतुबुद्दीन मोहम्मद घोरीच्या घोडदळाचा एक प्रमुख म्हणून काम करत होता. शत्रू प्रांतावर दरोडे घालून लूटमार करण्याचे काम त्याच्याकडे होते.११९१ साली तो त्याच्या सेनेसह भारतात शिरला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🙏 प्रेरणादायक बॅनर #🚩 छत्रपती शिवाजी महाराज गाणी🎶 #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर #🙏शिवदिनविशेष📜 #🚩महाराष्ट्रातील गडकिल्ले🛕 https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1 शिव दिनविशेष Video Link🔗 https://youtu.be/5NRMotO-8Yw 📜 २४ जुलै इ.स.१६२९ (श्रावण पोर्णिमा, शके १५५१, संवत्सर शुक्ल, वार शुक्रवार) राजे लखुजीराजे जाधवराव व त्यांचे ३ पुत्र यांची निजामशहाच्या दरबारी भीषण कत्तल! राजे शहाजीराजे यांचे सासरे व जिजाऊसाहेब यांचे वडील राजे लखुजीराजे जाधवराव व जिजाऊसाहेब यांचे तीन बंधुंची 'भर दरबारात निजिमशहाची ऐतराजी झाल्यामुळे हत्या करण्यात आली. मराठ्यांच्या इमानदारीचे असे मोल राजे लखुजीराजे जाधवराव यांना मिळाले. गर्भवती असलेल्या जिजाऊसाहेब पुरत्या खचल्या होत्या. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 २४ जुलै इ.स.१६६६ (श्रावण शुद्ध ३, नृतीया, शके १५८८, संवत्सर पराभव, वार मंगळवार) छत्रपती शिवाजीराजांबद्दल गौरवोद्गार या घटनेची नेमकी तारीख उपलब्ध नाही मात्र ती २४ ते २७ जुलै १६६६ दरम्यानची आहे. शिवाजीराजे आग्र्याच्या कैदेतुन कसे सुटावे याचा विचार करत होते. २४ जुलै रोजी रामसिंग बादशहा औरंगजेबसोबत तीन दिवसांसाठी शिकारीला गेला. त्याच्या माघारी एक दिवस त्याचीच चार माणसे शिवाजीराजांबद्दल चर्चा करत होती. त्यांची नावे होती: महासिंग शेखावत, बल्लुशाह, तेजसिंग व रणसिंग महासिंग म्हणाला 'शिवाजी खरोखरच खुप शहाणा व समंजस आहे. तो जे बोलतो ते उचितच बोलतो. त्यावर कोणी अधिक काही बोलण्याची आवश्यकताच पडत नाही. भला, सच्चा राजपुत आहे. जसे त्याच्याबद्दल पुर्वी ऐकले होते तसाच आहे. राजपुती बाण्याविषयी तो इतक्या गोष्टी सांगतो की, त्या जर आपण स्मरणात ठेवल्या तर एक दिवस निश्चीतच कामी येतील.' मुळ राजस्थानी पत्रातील वाक्ये खालीलप्रमाणे आहेत *'सेवोजी स्याणो बहोत, जु बात कहे सू ठीकही कहो, जू फेर कहू का कबहा की हाजत नही। खरोही भलो राजपूत, जिसो सुणो थो तिसो ही देखो। असी राजपूतपणा की बात कहे थो सू याद रहे तो समयउपर काम आवे'* एवढ बोलुन महासिंग तेजसिंगाकडे वळून म्हणाला 'इथे तर शिवाजीला त्याच्या दैवानेच आणले. पण तुझ्यासारखे चार शहाणे, उच्च दर्जाचे अधिकारी मिर्झाराजांजवळ असताना तुम्ही कसे त्याला इथे येऊ दिले? तुम्ही मिर्झाराजाला का समजावले नाही?' त्यावर तेजसिंग म्हणाला 'मिर्झाराजे केवळ उदयराज मुन्शीचेच ऐकतात. दुसरा कोणी त्यांना काय सल्ला देणार? मोठ्यामोठ्या ठाकुरांचेही ते ऐकून घेत नाहीत!' या वरच्या संभाषणावरून दिसुन येते की, परंपरेने जयपूरचे राजपुत राजे मुघलांशी एकनिष्ठ होते, शिवाजीराजांना मुख्यत्वे मिर्झाराजानेच आग्रयाला म्रुत्युच्या मगरमिठीत आणले, भले अजाणतेपणी का असेना. मात्र, या राजपूत लोकांचेच नोकर शिवाजीराजांचे कौतुक करत होते, त्यांच्याबद्दल हळहळ व्यक्त करत होते. हा शिवाजीराजांच्या व्यक्तिमत्वाचा, कर्तुत्वाचा प्रभाव होता असे वाटते. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 https://youtu.be/5NRMotO-8Yw 📜 २४ जुलै इ.स.१६६७ औरंगजेब बादशहाने मुहम्मद कुलीखान (नेतोजी पालकर) यांचा विवाह लावला. तुरुंगातील असह्य जाचापायी अखेर नेतोजी पालकर हे मुसलमान होण्याचे कबूल केले. त्यांनी फिदाईखानामार्फत औरंगजेब बादशहास अर्जी केली की "आपले प्राण वाचत असतील तर, आपण मुस्लिम धर्म स्विकारण्यास तयार आहोत. औरंगजेब बादशहाने या अर्जाला आनंदाने मान्यता दिली. १५ फेब्रुवारी इ.स.१६६७ नेतोजीरावांची सुंता करण्यात येऊन त्यांना मुसलमान करण्यात आले. १७ मार्च इ.स.१६६७ मुसलमान झालेल्या नेतोजीरावांना ३ हजारी जात व २ हजार स्वारांची मनसबदारी तसेच मुहम्मद कुलीखान हा किताब देण्यात आला. नेतोजीरावांना एकूण ३ पत्नी होत्या. त्यांनाही दिल्लीला आणण्याची औरंगजेब बादशहाने आज्ञा सोडली. त्याप्रमाणे ६ मे इ.स.१६६७ २ बायका दिल्लीस पोहोचल्या. १ पत्नी मात्र दक्षिणेतच राहिली. औरंगजेब बादशहाने त्यांनाही मुसलमान होण्याची आज्ञा केली. पण त्यांनी धर्मांतरास नकार दिला. तेव्हा औरंगजेब बादशहाने नेतोजीरावांना त्यांच्याकडे पाठविले. आणि जर त्या धर्मांतरास तयार झाल्या नाहीत तर मुहम्मद कुलीखानाने दुसऱ्या मुसलमान स्रीबरोबर निकाह लावावा असेही बादशहाने बजावले. त्याप्रमाणे नेतोजीराव त्यांना भेटले. सर्व परिस्थिती समजावून सांगितल्यानंतर त्या तयार झाल्या. औरंगजेबाने आता नव्या धर्माप्रमाणे त्यांच्याशी पुन्हा निकाह लावण्याची नेतोजीरावांना आज्ञा केली. या विवाहप्रसंगी बादशहाने या बायकांना ५० हजार रुपयांचे दागिने भेट दिले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 २४ जुलै इ.स.१६७१ सरनौबत प्रतापराव गुजर यांना महाराजांनी १०००० रुपये ऐवज पाठविल्याचा उल्लेख! स्वराज्याच्या खजिन्याला काडीमात्रही नुकसान पोहोचू नये म्हणून एवढे डोळ्यात तेल घालून महाराज प्रत्येक गोष्टीकडे पहात. पण त्याचवेळी संत-सत्पुरुष, देव-देवालये, अन्नछत्र यांसारख्या ठिकाणीही ते मुक्तहस्ते दाने-इनामे देत. श्री ज्ञानेश्वर माऊलींची आळंदी व सोपानदेवांचे सासवड नुकतेच मोगलाईतून पुन्हा स्वराज्यात आले होते. महाराजांनी दोन्ही क्षेत्रांच्या दिप-नैवेद्यांची व्यवस्था करण्यासाठी खुर्दखते दिली. महाराजांचे लक्ष असे चौफेर होते. त्यामुळेच शत्रुंकडून अनेकदा भरडली गेली असली तरी गोरगरीब प्रजा स्वराज्यार्थ वाटेल ते बलिदान करायला सदैव सिद्ध असे. सरनौबत प्रतापराव गुजर पावसाळ्यातही मोगलाईत स्वराज्याच्या तोंडावर सैन्यासह सज्ज होते. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 २४ जुलै इ.स.१६९५ छत्रपती राजाराम महाराजांनी राज श.२० वैशाख शुद्ध नवमीला(इ.१६९४ एप्रिल २३) काढलेले एक अभयपत्र व एक आज्ञापत्र आहे. त्यांवरून असे दिसते की, तांब्राचा(मुघलांचा) ज्या ज्या वेळी पंढरपुरास त्रास होई तेव्हा विठ्ठलाची मूर्ती पंढरपूरच्या जवळ देगावं या खेड्यात लपवून ठेवीत, पण या खेड्यास मराठा लष्कराच्या वर्दळीच्यामुळे वारंवार उपद्रव होई. तेथे मूर्ती ठेविल्या असतांना उपद्रव झाला तर देवाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने बरे नव्हे म्हणून ही पत्रे आहेत. या पत्रांच्या अनुरोधाने सेनापती संताजीराव घोरपडे यांनी इ. १६९५ जुलै २४ रोजी वरील गावास कोणत्याही प्रकारे उपद्रव न देण्याबाबत आणि कोणी दिलाच तर त्याचे पारिपत्य करण्याची पागेस आज्ञा केलेली आहे. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇 https://youtube.com/c/thegreatmarathawarriors . . . 👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील. शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇 ☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम || || जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
25 likes
27 shares

More like this