राहुल बोराडे
529 views 16 hours ago
*मंगल पांडे एक असे विर योध्दा होते ज्यांनी स्वातंत्र्यसंग्रामाची ज्योत पेटवली आणि ब्रिटिशांना आपल्या निर्भय व्यक्तिमत्वाच्या जोरावर भारती यांच्या ताकदीची जाणीव करून दिली. त्यांनी जन्माला घातलेल्या विद्रोहामुळेच प्रत्येक भारतीयाच्या मनात स्वातंत्र्य प्राप्ती ची ईच्छा प्रबळ झाली आणि पुढे कित्येक वर्षांच्या संघर्षानंतर आपल्या भारताला इंग्रजांच्या गुलामगिरीतुन मुक्तता मिळाली. मंगल पांडे एक महान स्वातंत्र्य सैनिक होते देशाच्या रक्षणाकरता आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या असंख्य स्वातंत्र्य सैनिकांमध्ये आजही मंगल पांडेचे नाव अभिमानाने आणि आदराने घेतले जाते. १८५७ च्या उठावातील पहिला क्रांतिकारक व पहिला हुतात्मा होण्याचा बहुमान प्राप्त झालेल्या आद्य क्रांतिवीर मंगल पांडे यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन....!* #महान क्रांतिकारक मंगल पांडे जयंती💐
7 likes
14 shares

More like this