mahesh m. shirkar
1K views • 17 days ago
*#शिवविचार_प्रतिष्ठान*
*#शिवरायांचे_अपरिचित_मावळे_⛳*
*⛳️🚩★प्रतितानाजी--पदाती सप्तसहस्त्री नावजी लखमाजी बलकवडे★⛳️*
"गड आला पण सिंह गेला" ही म्हण शालेय पाठ्यपुस्तकात वाचल्यापासुन आपल्या सगळ्यांची पाठ आहे. इ. सन १६७० मध्ये तानाजी मालुसरेंनी आपल्या प्राणांची बाजी लावून कोंढाणा गड जिंकला होता आणि नंतर त्याचे नामकरण करून "सिंहगड" ठेवण्यात आले. बस् एवढाच काय तो या गडाचा इतिहास लोकांना माहीत आहे. पण प्रत्यक्षात या गडाचा इतिहास हा दोन दशकांहून अधिक आहे. इ. सन १६७० ते १६९३ दरम्यान सिंहगडावर मराठे-मोगल यांची ८ वेळा सत्तापालट झाली होती.
छत्रपती संभाजी महाराजांना कैद केल्यावर ३वर्षांनीच म्हणजे १६८२ मध्ये कुठलाच संघर्ष न करता मोगलांनी सिंहगड परत आपल्या ताब्यात घेतला. औरंगजेब संपूर्ण स्वराज्य गिळंकृत करण्यास चवताळून उठला होता. त्या काळात राजाराम महाराज स्वराज्याची तिसरी राजधानी असलेल्या तमिळनाडूमधील जिंजी गडावर होते.
तर इकडे संताजी घोरपडे, धनाजी जाधव आणि शंकराजी नारायण सचिव हे स्वराज्य टिकून ठेवण्यासाठी औरंगजेबाला झुंज देत होते. अशातच १६९३ मध्ये शंकराजी नारायण सचिन यांनी सिंहगडावर कब्जा मिळवण्यासाठी बेत आखला.
छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराजांच्या एका शब्दावर प्राणाची बाजी लावणारे वीर होऊन गेले होते. तसेच अनेक शूरवीर राजाराम महाराजांच्याही पाठीशी होते.त्यातले एक म्हणजे "सरदार नावजी बलकवडे."
♦️ *लढाई-*
नावजी हे शंकराजींच्या पायदळातील पंचसहस्त्री होते. त्यांनी सिंहगड जिंकून देण्याचे कबूल केले. त्याबदल्यात शंकराजींनी पवन मावळातील सावरगाव इनाम द्यायचे असे ठरले.
नावजींबरोबर सरदार विठोजी कारके यांना मदतनीस म्हणून दिले. नावजी व विठोजी दोघांनी मिळुन सिंहगडाच्या घेराची तपासणी केली.त्यांना असे आढळले की, सिंहगड आधीच कठीण, त्यात मोगलांनी सावध होऊन काही ठिकाणी किल्ल्याची पुनर्बांधणी आणि दुरुस्ती करून तेथे चौक्या, पहारे आणि रात्रीच्या गस्ती वाढवल्या होत्या. शिवाय जास्तीचे सैन्य देखील या काळात किल्ल्यावर तैनात होते. दगाफटका करून किल्ला घेण्याची सोय राहिली नव्हती.
दि.२५ जून १६९३ रोजी नावजी बलकवडे व विठोजी कारके यांनी निवडक माणसे घेतली आणि ते राजमाचीवरुन निघाले. पावसाळ्याचे दिवस त्यात अंधार अशा स्थितीत मराठे रान तुडवत सिंहगड नजीकच्या जंगलात येऊन पोहोचले आणि योग्य संधीची वाट बघत ५ दिवस दबा धरून बसले.
दि.३०जुनच्या मध्यरात्री नावजी बलकवडे शिड्या व दोर बरोबर घेऊन चढू लागले. अवघड मार्गांनी खाचा-खळग्यांतून ते खाली आले परंतु किल्ल्यावर मोगलांची गस्त सुरू होती आणि पहारेकरी सावध होते.त्यामुळे मराठ्यांना तटाला शिड्या लावता आल्या नाहीत. सुर्योदय झाला तेव्हा किल्ल्यावरच्या गस्तवाल्यांची वेळ संपुन नवे लोक गस्तीसाठी येत होते. पावसाळातल्या धुक्यामुळे लांबवरुन काय चालले आहे हे दिसून येत नव्हते. या लवचिक संधीचा फायदा घेऊन नावजींनी शिड्या तटाला लावल्या आणि ते मावळ्यांसह गुपचूप कापून काढले.अकस्मात हल्ला झाल्याने मोगलांची फार हानी झाली होती. मराठे किल्ल्यावर आले आहेत अशी चाहूल जर किल्लेदाराला लागली असती तर तो सावध झाला असता आणि मोगल सैन्याने एकवटून नावजींच्या सैन्यावर हल्ला चढवला असता.पण नावजींनी त्यांचे काम चोख बजावले होते. नावजींचे धैर्य बघून विठोजी कारकेंना हुरूप आला. ते यावेळी योग्य संधीची वाट बघत थांबले होते.तेही शिड्या लावून वर आले. आता मराठ्यांचे सर्व सैन्य गडावर पोहोचले होते.
हर हर महादेवाच्या गजरात सिंहगडाने परत एकदा स्वराज्याचा उंबरठा ओलांडला.अवघ्या तीनशे मावळ्यांनी दीडहजारांच्या मोगली फौजेचा पराभव केला. या कामगिरीवर बेहद खुश होऊन छत्रपती राजाराम महाराज यांनी जिंजीहून ३एप्रिल१६९४ ला पाठवलेल्या अभिनंदनपर पत्रात लिहितात,
"तुम्ही कार्यसिद्धीसमयी धारेस चढोन तलवारीची शर्थ केली. पुर्वी तानाजी मालुसऱ्यांनी जीव देऊन किल्ला संपादिला. त्याचप्रमाणे तुम्हीही प्राणाची बाजी लावून किल्ला सर केलात." याचबरोबर नावजींना "पदाती सप्तसहस्त्री" हा किताब देऊन सात हजार पायदळांचे सेनापती पद बहाल करण्यात आले.अशा प्रकारे "गड घेऊनी सिंह आला." सर्व मावळ्यांच्या पराक्रमामुळे सिंहगड पुन्हा स्वराज्याचा भाग बनला व "१ जुलै" हा दिवस "सिंहगड विजय दिवस" म्हणून इतिहासात कोरला गेला.
शंकराजी नारायण पंत सचिव यांच्या मार्गदर्शनाखाली नावजींनी इ. सन १६९२ च्या श्रावण महिन्यात ऐन पावसात लोहगड जिंकून घेतला. तसेच सचिवांनी कुवारीगड परत मिळवण्याची कामगिरी नावजींवर सोपवली. नावजींनी किल्ल्याच्या घेऱ्यात आपली माणसं पसरवून किल्ल्याचा राबतातोडला. नावजी आणि बाळोजी नाईक ढमाले यांनी जुन्नरवरुन येणारी रसद मारली. जुन्नरचा किल्लेदार मन्सुरखानच्या सैन्यात घोडदळ होते आणि जड तोफाही होत्या. #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🗿शिवकालीन पुराणवस्तू #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩 #🙏शिवदिनविशेष📜
10 likes
1 comment • 12 shares