❤🚩शिवभक्त🚩❤
586 views • 5 hours ago
*महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल*
*इतिहास शिवरायांचा*
**********************************
*शिव दिनविशेष*
🚩🚩🚩⛳⛳⛳⛳🚩🚩🚩
*७ जुलै इ.स.१६७७*
*नबाब बहादुरखानाने गुलबर्गाचा किल्ला विजापुरकरांकडून जिंकून घेतला. मोगली सुभेदार बहादुरखान पठाणी पक्षाच्या दडपणाखाली आला असता महाराज भागानगरी आले. कुतुबशहाने कर्नाटक मोहिमेसाठी त्यांना सर्वतोपरी मदत केली. यामुळे औरंगजेब बादशहा विलक्षण संतापला. त्याने नबाब बहादुरखानाची कानउघाडणी केली. औरंगजेब बादशहाची नाराजी दूर करण्यासाठी बहादुरखानाने १४ मे इ.स.१६७७ नळदुर्ग व ७ जुलै इ.स.१६७७ गुलबर्गाचा किल्ला विजापुरकरांकडून जिंकून घेतला व ही विजयवार्ता औरंगजेब बादशहाला कळविली.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*७ जुलै इ.स.१६८१*
*सिद्दीविरुद्ध संघर्ष - उंदेरीवरील हल्ला*
*शिवछत्रपतींच्या निधनानंतर ज्या परिस्थितीत संभाजी राजांनी मराठी सत्तेची सूत्रे हाती घेतली, त्या परिस्थितीत त्यांना बाह्य आणि अंतर्गत धोके निर्माण होणे हि गोष्ट अटळ होती. १६८० च्या उत्तरार्धात पश्चिम किनार्यावर असणाऱ्या शिद्दीने विरुद्ध आक्रमक हालचाली करण्यास प्रारंभ केला. त्यामुळे या शत्रूला प्रथम आवर घालणे आवश्यक होते. शिद्दीवरील स्वारीची पूर्वतयारी म्हणून उंदेरी या छोट्या बेटावर प्रथम हल्ला करण्याचे संभाजीराजांनी ठरवले. त्याप्रमाणे नागोठाणे येथे असलेल्या जवळजवळ तीन हजार सैनिक व २२ गलबते यांच्या एका मराठी काफिल्याने ऑगस्ट १६८० मध्ये उंदेरीवर हला चढवला, परंतु सिद्दीने हा हल्ला परतवून लावला. या अपयशाने खचून न जाता ७ जुलै १६८१ च्या पाहटे मराठी आरमाराने उंदेरीवर दुसरा हल्ला चढविला. हा हल्लाही अयशस्वी झाला.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*७ जुलै इ.स.१७३३*
*छत्रपती शाहूराजे ह्यांनी उमाबाई दाभाडे हिस पत्र लिहून कळवले कि, दंडाराजपुरीच्या सिद्दीने अमर्यादाने वागून कोकणात उत्पाद आरंभिला; म्हणून फत्तेसिंह भोसले प्रतिनिधी व पंतप्रधान ह्यांस पाठवून आम्ही मोहीम आरंभ केली. रायगड आदी करून कोकणातील गडकोट हबशाकडून घेतले, मुलुख काबीज केला, दंडाराजपुरी व दोन-चार स्थळे फक्त राहिली आहे.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*७ जुलै इ.स.१७९९*
*तिमूरशहाला एकूण ६३ मुलंमुली होते - त्यातले २४ मुलगे. त्यापैकी शाह झमान इतरांचे खून वगैरे करून १७९५ मध्ये गादीवर आला. तेव्हा त्याला कळालं की तिजोरीत खडखडाट आहे. मग त्यानेही त्याच्या आजोबाने केलेला उपाय अवलंबायचा ठरवला. कोणता - तर खैबरखिंडीतून जाऊन उत्तर भारतावर हल्ला करून लुटालूट करायचा हा तो उपाय. मग काय तयारीला लागला तो. १७९९ मध्ये खैबरखिंड उतरून लाहोरला येऊन थांबला. आता पुढे उत्तर भारत मोकळाच होता.*
*पण खरंच होता का उत्तर भारत मोकळा? नाही! त्यावेळी इंग्रज भारताच्या राजकारणात शिरकाव करू लागलेले होते आणि त्यांचे लागेबांधे दूरदूरच्या राजांशी होते. त्यावेळी बंगालचा गव्हर्नर जनरल होता लॉर्ड वेलस्ली. शाह झमान लाहोरला आलेला आहे आणि तो कधीही लूट करायला हल्ला करू शकतो हे समजताच वेलस्लीने एक खेळी खेळली. त्याने इराणच्या शहाशी संधान साधलं आणि त्याला कळवलं की शाह झमान लाहोरला आलेला आहे. ही चांगली संधी आहे मागून जाऊन अफगाणांचं राज्य जिंकायची. त्याप्रमाणे इराणच्या शहाने शाह झमानच्या हेरात प्रांतावर हल्ला केला. ह्यामुळे शाह झमान गडबडून गेला आणि त्याने परत जायची तयारी केली. पण मग लाहोरात कोणाला ठेवायचे? शाह झमानवर लाहोरातही शीख टोळ्यांचे हल्ले होतच होते. ह्यात १९ वर्षांचा रणजितसिंग अग्रेसर होता. शाह झमानने कसाबसा रणजितसिंगाबरोबर शांततेचा तह केला आणि तो झेलम ओलांडून जायला निघाला. त्यावेळी आलेल्या पावसाने त्याच्या तोफा तिथे चिखलात रुतून अडकल्या. ह्यावेळी रणजितसिंग आणि त्याचे ५००० घोडेस्वार मदतीला आले. त्याने त्यातल्या बऱ्याच तोफा वाचवून बाहेर काढून दिल्या. शाह झमान खूष झाला. ह्याबद्दल बक्षिस म्हणून शाह झमानने रणजितसिंगाला लाहोरचा कारभार पहायला सांगितला. ती तारीख होती ७ जुलै १७९९.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*७ जुलै इ.स.१९१०*
*इतिहासाचार्य विश्वनाथ काशिनाथ राजवाडे आणि खंडेराव चिंतामण मेहेंदळे यांनी पुणे येथे भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना केली.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*जय जगदंब जय जिजाऊ*
*जय शिवराय जय शंभूराजे*
⛳ *जय गडकोट*⛳
*!! हर हर महादेव !!*
🚩आम्ही_शिवपाईक_बारा_मावळचे🚩
*श्री मंगेश चंद्रकांत वीर*
( भोर तालुका गड किल्ले संवर्धन सेल सोशल मीडिया प्रमुख )
मा श्री महेंद्र तानाजी देवघरे*
( अध्यक्ष पुणे जिल्हा )
मा श्री योगेशजी सुदामराव शेलार
(प्रदेशाध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल)
महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल #🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🙏 शिवराय स्टेटस #🚩जय भवानी जय शिवाजी🚩
13 likes
16 shares