mahesh m. shirkar
559 views • 14 days ago
*शिवविचार प्रतिष्ठान*
*२ जुलै इ.स.१६४९*
फत्तेखान पराभूत होऊन पळाला, त्या बेलसरच्या छावणीपासून जवळच असलेल्या मोरगावच्या मोरेश्वराला पुजेसाठी फुलझाडे लावण्यास शिवरायांनी ६ बिघे जमीन अर्पण केली. पहिल्या विजयानंतर श्रींना वाहिलेल्या श्रींच्या राज्यातील या पुष्पदूर्वा !
*२ जुलै इ.स.१६८२*
छत्रपती संभाजीराजांकडील असणार्या अंजदीव बेटावर गोव्याचा पोर्तुगीज कॅप्टन ' आमारू सिम्मोइस पेरेर' याने तेथील किल्ल्याचा पहिला दगड बसवला. पुढे ६ महिन्यात किल्ला बांधून पूर्ण झाला. #🚩महाराष्ट्रातील गडकिल्ले🛕 #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩
16 likes
13 shares