Goldenhistory of maratha
523 views • 9 hours ago
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳
📜 १ ऑगस्ट इ.स.१६४४
आदिलशहाचे एक फर्मान!
"ज्याअर्थी राजे शहाजीराजे दरबारातून निर्वासित व अपमानित झाले व त्यांचा मुतालिक दादाजी कोंडदेव कोंडाण्याच्या बाजूस आहे (त्याअर्थी त्यांस) दफे करण्यासाठी व ती विलायत ताब्यात आणण्यासाठी खंडोजी व बाजी घोरपडे यांस तुमच्यासह नेमले आहे. तरी तुम्ही आपल्या हशमांसह मशारनिल्हे जवळ जाऊन त्यांच्या संमतीने दादाजी कोंडदेव व त्यांच्या संबंधिंना शिक्षा देऊन नेस्तनाबूत करा व ती विलायत ताब्यात आणा. ते तुमच्या उत्कर्षाचे कारण आहे.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🀊
https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🙏शिवदिनविशेष📜
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1
📜 १ ऑगस्ट इ.स.१६७८
छत्रपती शिवरायांनी "पनवेल" प्रांत जिंकला.
छत्रपती शिवाजीराजांनी राजांनी कल्याण, भिवंडी, पनवेल जिंकल्यावर कल्याणच्या खाडीत समुहुर्ताने आपल्या आरमाराची पहिली पठाने तरती केली, तसेच वसई व चौल कडील प्रदेश काबीज केला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 १ ऑगस्ट इ.स.१६९४
संताजी घोरपडे, धनाजी जाधव, रामचंद्रपंत यांनी अनेक संयुक्त मोहिमा काढल्या एक मोगली बातमीपत्रात यांच्या एकत्रीत असणाऱ्या एका मोहिमेची बातमी कळते २२ जुलै १६९४ चे बातमीपत्रात तळबीडचा ठाणेदार अडाणी याने धनाजी जाधव व हणमंतराव (निंबाळकर) ससैन्य तळबीड जवळ आले असून धामधूम माजविली आहे हे कळते सोबत संताजी घोरपडे आहेत आणि रामचंद्रपंत येऊन सामील होणार असल्याचे देखील समजते यावर बादशहाने आज्ञा केली की हिंमतखानाने जाऊन गानिमांवर हल्ला चढवावा..,
याच्याच नंतर रामचंद्र अमात्य येऊन मिळाल्याने मराठ्यांची कुमक वाढली असून ते साताऱ्याच्या आग्नेयस असणाऱ्या वारूगड काबीज करण्याचा त्यांना इरादा असावा यासाठी महिमानगडाच्या किल्लेदाराने बादशहास अधिक कुमकीसाठीच अर्ज केला याची तारीख होती १ ऑगस्ट १६९४
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 १ ऑगस्ट इ.स.१७३४
(श्रावण शुद्ध त्रयोदशी, आनंदनाम संवत्सरी श्री शालिवाहन शके १५५६ रोजी गुरुवार)
श्रीमंत बाजीराव (पहिले) पेशव्यांचे पहिले दोन पुत्र दीर्घकाळ जगू शकले नाही. यावेळेस काही अनुचित व अभद्र घडू नये म्हणून राधाबाईंनी(बाजीराव पेशव्यांच्या मातोश्री) सप्ताहास आणि अनुष्ठानास ब्राह्मण बसविले. पवित्रस्थानी अपत्य जन्मास यावे म्हणून काशिबाई साताऱ्यास माहुलीक्षेत्री राहायला आले. माहुलीला पेशव्यांचा एक लहानसा वाडा होता. आणि दि. १ ऑगस्ट १७३४, श्रावण शुद्ध त्रयोदशी, आनंदनाम संवत्सरी श्री शालिवाहन शके १५५६ रोजी गुरुवारी माहुलीच्या वाड्यात पुत्र जन्माला आला. बाळाचे बारसेही माहुलीलाच झाले. पेशव्यांच्या या नव्या पुत्राचे नाव ठेवण्यात आले 'रघुनाथ'. (हेच पुढे रघुनाथराव उर्फ राघोबादादा म्हणून प्रसिद्ध) साधारणतः त्याच सुमारास मस्तानीबाईंनाही पुत्रप्राप्ती झाली. या पुत्राचे नाव मस्तानीने 'कृष्णसिंह' ठेवले. रघुनाथपंतांच्या जन्मानंतर पुण्यात साखरा वाटण्याचा आणि चौघडा वाजविण्यासाठी चिमाजीआप्पांनी हुकूम सोडले. इकडे कृष्णसिंहाचा जन्म झाल्यानंतर त्या आनंदाप्रीत्यर्थ मस्तानीने खैरात वाटली. या दोन्ही पुत्रांच्या जन्माच्या वेळेस बाजीराव कुठे होते? बाजीराव होते कोकणात! छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून कोकणात पोर्तुगीज, इंग्रज, सिद्दी या परकीय सत्ता जम बसवत होत्या. महाराजांनी इंग्रज व पोर्तुगीजांना धाकात ठेवले होते. परंतु, सिद्दी मात्र उपद्रव देतच होता.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 १ ऑगस्ट इ.स.१७५६
दि. १३ फेब्रुवारी रोजी कॅप्टन फोर्ड (फोर्ब्स?) हा साठ माणसांसह जमिनीवर उतरला. पण पेशव्यांची फौजही किल्ल्यात शिरायला तयार आहे, असे पाहून इंग्रजी आरमाराने मुद्दाम किल्ल्यावर तोफांचा मारा सुरूच ठेवला. संध्याकाळी फोर्ड गुपचूप किल्ल्यात शिरला आणि त्याने निशाण लावले. परंतु, त्याआधीच तुळाजी आंग्रे खंडोजी माणकरांच्या स्वाधीन झाले होते. तुळाजी अत्यंत शूर होते, यात शंकाच नाही. क्लाईव्ह आणि वॉटसनला ग. बर्शियरने स्पष्ट बजावले होते, "तुळाजी आंग्रे सापडल्यास मुंबईस आणावा. पेशव्यांचे हाती देऊ नये. कारण ते कदाचित त्यास पुनरपि मोकळा सोडतील आणि तो पुन्हा पहिल्यासारखा आपणास त्रास देऊ लागेल." बर्शियरच्या उपदेशावरूनच कल्पना येते. शिवाय विजयदुर्ग घेण्याचा त्यांचा मनसुबा होताच. त्यामुळे तुळाजी पेशव्यांच्या स्वाधीन झाले हे पाहताच पेशव्यांचे सैन्य विजयदुर्गात शिरण्याआधीच इंग्रजांनी शिताफीने किल्ल्याचा ताबा घेतला. इंग्रजांचे सैन्य प्रथम मराठे आणि किल्ल्याच्या मध्ये उतरले आणि बाहेरून इंग्रजी तोफांचा भडिमार सुरू असल्याने किल्ल्यातील उरलेल्या माणसांनी किल्ला इंग्रजांच्या स्वाधीन केला. दुसऱ्या दिवशी रामाजीपंत अॅडेमिरल वॉटसनच्या भेटीला गेले असता, वॉटसनने विजयदुर्गच्या हस्तांतरणासाठी गव्हर्नरच्या परवानगीची गरज असून त्याबदल्यात पेशव्यांनी तुळाजीला इंग्रजांच्या हाती सोपवावे, ही अट घातली. तहनाम्यात ठरल्याप्रमाणे पेशव्यांच्या संमतीने कलमे ठरविण्यात येण्याचे ठरले असल्याने रामाजीपंतांना अचानक विजयदुर्गच्या बदल्यात तुळाजींना हस्तांतरित करता येईना. रामाजीपंत स्पष्टपणे पेशव्यांना तसे कलवितात, “कजिया करावा तरी पातशाही सरदार... दरम्यान जनरल व तहनामा आहे म्हणोन उतावळी न करता आहो..." अखेरीस विजयदुर्गसाठी वॉटसनने अडवून धरले तसेच रामाजीपंतांनीही तुळाजींचा ताबा शेवटपर्यंत इंग्रजांना दिला नाही. पेशव्यांनी दि. २० जुलै रोजी पुण्यात आल्यानंतर मुंबईचा गव्हर्नर बर्शियरला अत्यंत कडक शब्दात 'आज्ञापत्र' पाठविले आणि विजयदुर्ग पुन्हा मागितला. यावर १ ऑगस्ट रोजी बर्शियरने अत्यंत नरमाईचे धोरण स्वीकारून पावसाळा संपताच विजयदुर्ग पुन्हा देण्याचे मान्य केले आणि आपले दोन वकील (टॉमस वायफिल्ड आणि जॉन स्पेन्सर) पुणे दरबारात पाठविले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 १ ऑगस्ट इ.स.१७६०
मराठा सेना पेशवे सदाशिवराव भाऊसाहेब यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत पोहोचली.
दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा
अडीचशे वर्षांपूर्वी म्हणजे १ ऑगस्ट १७६० रोजी सदाशिवराव भाऊ यांनी दिल्लीचे तख्त पालटून टाकले. सुमारे ५०० वर्षे राज्य करणाऱ्या मुघलांना धूळ चारली आणि दिल्लीच्या तख्तावर मराठ्यांचे नाव काढले, त्या मर्द मरहट्ट्याला मानाचा मुजरा.
म्हणूनच म्हंटले जाते. दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 १ ऑगस्ट इ.स.१९२०
लोकमान्य टिळक पुण्यतिथी
स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. ज्या प्रमाणे चिखलात कमळ उगवते, त्या प्रमाणे लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी २३ जुलै १८५६ रोजी झाला. टिळक हे बालपणापासूनच हुशार आणि स्वाभिमानी होते. टिळकांचे शिक्षण फर्गुसन कॉलेज मध्ये झाले पुढे टिळकांनी स्वताला देशकार्यास वाहून घेतले. त्यांनी न्यू इंग्लिश स्कूल, हि शाळा स्थापन केली. लोकांमध्ये जागृती होण्यासाठी केसरी व मराठा ही दोन वर्तमानपत्रे सुरू केली. टिळकाच्या कार्याने धास्तावून इंग्रजांनी त्यांना अटक करून त्यांच्यावर खटला चालवला. न्यायालयात टिळकांनी "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच" अशी सिंहगर्जना केली. इंग्रजांनी टिळकांना ६ वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावून त्यांची रवानगी ब्रह्मदेशातल्या मंडाले तुरुंगात केली. तेथे टिळकांनी गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला. स्वातंत्र्यपूर्व काळात, लोकांची एकी व्हावी म्हणून टिळकांनी गणेश चतुर्थी आणि शिवजयंती हे दोन उत्सव सुरू केले. जनतेने त्यांना प्रेमाने लोकमान्य ही पदवी दिली. असं हे बहुमूल्य रत्न मधुमेह व्याधीच्या निमित्ताने १ ऑगस्ट १९२० रोजी काळाने आपल्यापासून हिरावून घेतले. त्यांना शतशः प्रणाम.
#जय_हिंद !
#जय_महाराष्ट्र !
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 १ ऑगस्ट इ.स.१९२०
मराठी साहीत्य क्षेत्रात सर्वोच्च योगदान असलेले आणि मराठी साहीत्य तसेच छत्रपती शिवरायांचे चरीत्र पोवाड्यातून सातासमुद्रापार पोचवणारे "लोकशाहीर आण्णा भाऊ साठे" यांची आज जयंती.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇
☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम ||
|| जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
5 shares