❤🚩शिवभक्त🚩❤
969 views 10 days ago
*महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल* *इतिहास शिवरायांचा* ********************************** *शिव दिनविशेष* 🚩🚩🚩⛳⛳⛳⛳🚩🚩🚩 *३० जुलै इ.स.१६७७* *"दक्षिण दीग्विजय मोहीम"* *छत्रपती शिवरायांनी "नागोजी भोसले" यांस सालाना १२५ होन मंजूर करून "उटकुर" चा हवालदार नेमले.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *३० जुलै इ.स.१६८२* *कारवारकर इंग्रजांनी सुरतकर इंग्रजांना पाठविलेल्या पत्राची नोंद!* *"मोगल बादशहा औरंगजेब छत्रपती संभाजी महाराजांविरुद्ध इतका चिडला आहे की, त्याने आपल्या डोक्याची पगडी (किमॉश) खाली उतरली आणि शपथ घेतली की, छत्रपती संभाजी महाराजांना मारल्याशिवाय किंवा राज्यांतून हाकलून दिल्याशिवाय मी ती डोक्यावर घालणार नाही. अशी प्रतिज्ञा केली आहे. औरंगजेब बादशहाला दक्षिणेत येऊन एक ते दीड वर्ष झाले. प्रचंड सेनादल, भक्कम दारुगोळा, कसलेले सेनानी, अमाप पैसा पणाला लावणाऱ्या औरंगजेब बादशहाला डोक्यावरचे "किमॉश " खाली टाकावयास लावून बोडके व्हावे लागले. यातच छत्रपती संभाजी महाराजांच्या, मराठा सेनेच्या औरंगी अजस्त्र आक्रमणास तोंड देणाऱ्या विजिगीषू वृत्तीची कल्पना आल्यावाचुन रहात नाही.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *३० जुलै इ.स.१६८२* *कारवारकर इंग्रजांनी सुरतकर इंग्रजांना पाठविलेल्या पत्राची नोंद !* *"छत्रपती संभाजी महाराजांना जोराचा हल्ला करून दंडाराजपुरी घेईन अशी फार आशा होती. दादाजी प्रभू व इतर सेनापती व आपले निधड्या छातीचे ४ हजार लोक घेऊन, त्यांच्याकडे वेढा घालविला. या दुर्घट कामासाठी उत्तेजित व्हावे म्हणून त्यांस अर्धा शेर सोने किंवा चांदीची कडी बक्षिस दिली. परंतु यश आले नाही. बरेच लोक मारले गेले अवघे ५०० लोक वाचले.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *३० जुलै इ.स.१७३३* *अंजनवेलच्या गोपालगड मोहीमेदरम्यान रघूनाथ हरींनी बाजीराव पेशव्यांना पत्र पाठवले त्या पत्रात रघूनाथ हरींनी लिहलं होतं कि प्रतिनिधी मला मोहीमेतून बाजूला खेचण्याचा प्रयत्न करत आहे.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *३० जुलै इ.स.१७८७.* *महादजी शिंद्यांना इ.स.१७८४ मध्ये मोगल बादशाहने आपला वकील-इ-मुतालिक नेमले व बादशाहीचे अतर्गत तसेच बाह्य शत्रूंपासून संरक्षण करण्याची जबाबदारी पण मराठ्यांवर आली. तसेच बादशहाचे वसुलीचे अधिकार पण मराठ्यांना मिळाले. राजपूत संस्थानिक मोगल बादशहाचे मांडलिक असल्याने ते त्याला खंडणी देत. त्याशिवाय मराठ्यांना चौथ व सरदेशमुखी पण ध्यावी लागायची. दिल्लीच्या बादशहाची स्थिती-खमक्या वा ढिला, सुस्त बघून राजपूत खंडणी देत किंवा थकवित असत. ज्या वेळी महाद्जीनची मुतालिक म्हणून नेमणूक झाली त्या वेळी स्वतः बादशाह व महादजी ह्या दोघांची आर्थिक स्थिती फारच गंभीर होती. एकादशीच्या घरी द्वादशी अशी दोघांची परिस्थिती होती. मग महाद्जीने आपला मोर्चा जुनी थकबाकी वसूल करण्यासाठी राजपुतांकडे वळविला.जयपूर संस्थांन चा राजा पृथ्वीसिंग १७७८ मध्ये मेला व त्याचा भाऊ प्रतापसिंग जो अत्यंत बेजबाबदार होता, राज्यपदी आला. पण त्यावेळी जयपूर दरबारचा मांडलिक असलेला राव राजा प्रतापसिंग जयपूरच्या राजकारणात महत्वपूर्ण स्थान मिळविण्यासाठी प्रयत्नशील होता. त्यासाठी त्याने पृथ्विसिग चा मुलगा मानसिंग ला जयपूरच्या गादीवर बसविण्यासाठी महाद्जींची मदत मागितली.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *जय जगदंब जय जिजाऊ* *जय शिवराय जय शंभूराजे* ⛳ *जय गडकोट*⛳ *!! हर हर महादेव !!* 🚩आम्ही_शिवपाईक_बारा_मावळचे🚩 *श्री मंगेश चंद्रकांत वीर* ( भोर तालुका गड किल्ले संवर्धन सेल सोशल मीडिया प्रमुख ) मा श्री महेंद्र तानाजी देवघरे* ( अध्यक्ष पुणे जिल्हा ) मा श्री योगेशजी सुदामराव शेलार (प्रदेशाध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल) महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🙏 शिवराय स्टेटस
18 likes
14 shares

More like this