⛳आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳ 📜२१ जून इ.स.१६६० (ज्येष्ठ वद्य नवमी, शके १५८२, शार्वरी, वार गुरुवार) #संग्रामदुर्ग_म्हणजेच_चाकणच्या_भुईकोट_किल्ल्याला #शाहिस्तेखानाचा_वेढा_पडला. शिवाजीराजे पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकले होते आणि नेमका याच गोष्टीचा फायदा घेत पुण्यात आलेल्या मुघल सरदार शाहिस्तेखान याने महाराजांचा मुलुख जिंकण्यासाठी मोहिमा काढल्या. पुणे - नाशिक वाटेवर चाकणचा भुईकोट किल्ला होता, हि गडी जिंकल्या शिवाय नाशिक पुणे मार्ग निर्धास्त होऊच शकत नाही याची जाणीव शाहिस्तेखानाला होती आणि म्हणूनच त्याने चाकणच्या दिशेने कूच केली. चाकणचे मराठी किल्लेदार होते फिरंगोजी नरसाळा. फिरंगोजींना खानाच्या या मोहिमेची आधीच माहिती मिळाली होती. त्यांनी चाकणच्या आसमंतातील शेतकऱ्यांना आधीच सावध केले आणि जमेल तेवढे धान्य घेऊन त्यांना सुरक्षित जागी हालविले. उरलेले धान्य मराठ्यांनी जाळून टाकले, जेणेकरून मोघली सैन्याला धान्याची चण-चण भासेल. २१ जून १६६० रोजी मुघल फौज चाकणला पोहोचली. मुघल सैन्याने पहिलाच जोरदार हल्ला किल्ल्यावर केला पण तो हल्ला मराठ्यांनी लीलया परतवून लावला, तेव्हा खानाला कळून चुकले कि हा किल्ला जिंकणे तितके सोपे नाही. त्याने किल्ल्याला वेढा घातला जेणेकरून किल्ल्यातील दाणा - गोटा संपला कि किल्ला आपसूक ताब्यात येईल. फिरंगोजींनी अचूक जागी बंदुकधारी आणि तिरंदाज बसविले होते, ज्यामुळे मुघली सैनिकांना किल्ल्याच्या जवळ येणेच कठीण होऊन बसले. खानाने धमधामे रचले त्यावर तोफा चढविल्या आणि किल्ल्यावर मारा केला पण त्याचा काही विशेष परिणाम झाला नाही. रात्री मराठे किल्ल्यातून बाहेर पडीत आणि झोपलेल्या मोगल छावणीवर हल्ला करून जमेल तेवढे नुकसान करून पुन्हा किल्ल्यात पसार होत. असे कित्येक दिवस चालू राहिले. हा वेढा तब्बल ५६ दिवस चालला. ३००-३५० लोकांनीशी फिरंगोजी नरसाळा यांनी चाकण झुंजवत ठेवला होता. १४ ऑगस्ट १६६० रोजी मुघलांनी सुरुंगाला बत्ती दिली. पूर्वेच्या कोपरयाचा बुरुज अस्मानात उडाला. आरोळ्या ठोकत मुघल त्या खिंडाराकडे धावले. फिरांगोजीनीही वाट न पाहता ते खिंडार लढवण्याची तयारी केली तो पूर्ण दिवस मराठ्यांनी जोमाने लढाई केली. दुसऱ्या दिवशी राव भावसिन्हामार्फत मराठे किल्ल्याबाहेर आले आणि मुघलांनी चाकणचा संग्रामदुर्ग जिंकला. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🚩शिवराय #🙏शिवदिनविशेष📜 #🚩 छत्रपती शिवाजी महाराज गाणी🎶 #🚩महाराष्ट्रातील गडकिल्ले🛕 #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1 📜२१ जून इ.स.१६७४ भारतातील तेजस्वी पुरुषांचे शौर्य काव्य नमूद करणारे पहिलेच कवि भूषण यांनी छत्रपती शिवरायां वर लिहिलेले " शिवराज भूषण " हे काव्य शके १५९६ जेष्ठ व.त्रयोदशी फिरंगी दि.२१ जून इ.स. १६७४ रोजी काव्य पूर्ण केले तसेच त्यांनी 'शिवराज-भूषण' व 'शिवबावनी' यांतून छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे गौरवपूर्ण स्तोत्र गायले आहे. व 'छत्रसाल-दशक' हे नामक काव्यांत छत्रसाल बुंदेलखंड राजा यांचा पराक्रम वर्णिला आहे. श्रीशिवराजभूषण काव्य पूर्ण. इन्द्र जिमि जंभ पर, वाडव सुअंभ पर । रावन सदंभ पर, रघुकुल राज है ॥१॥ पौन बरिबाह पर, संभु रतिनाह पर । ज्यों सहसबाह पर, राम व्दि‍जराज है ॥२॥ दावा द्रुमदंड पर, चीता मृगझुंड पर । भूषण वितुण्ड पर, जैसे मृगराज है ॥३॥ तेजतम अंस पर, कान्ह जिमि कंस पर । त्यों म्लेच्छ बंस पर, शेर सिवराज है ॥४॥ 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜२१ जून इ.स.१६९४ हमीदुद्दीनखान हा ठाणी बसविणे आणि कही (घासदाणा, रसद) आणणे या उद्देशाने गढीसंख (जत तालुका) च्या दिशेने गेला होता. ठाणी बसवून व कही बरोबर घेऊन तो परत आला. त्याने आपले पथक मोतीगाव येथील फौजेच्या तळावर ठेवले.. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜२१ जून इ.स.१७०० परळीपासून बादशहाला सैन्यासह भूषणगडाकडे जावयाचे होते. भूषणगड परळीपासून रस्त्याने ४५ मैल अंतरावर. परळीहून बादशहाने भूषणगडाकडे जाण्यासाठी भर पावसाळ्यात २१ जून १७०० ला कूच केले. ज्या जनावरांवर सामानाची ओझी लावली होती ती जनावरे पटापट मरू लागली. कृष्णा नदीला पूर होता. त्यातून सैन्य मोठ्या मुष्किलीने पैलतीरी पोहोचले. शेकडो उपासमारीने मेले, पुढे हळूहळू मार्ग आक्रमत मोगली लष्कर २५ जुलै रोजी भूषणगडास पोहोचले व गडाचा ताबा मिळवला. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜 २१ जून इ.स.१७३५ श्रीमंत बाजीराव (पहिले) पेशव्यांच्या मातोश्री राधाबाई ह्या १४ फेब्रुवारी १७३५ रोजी काशी यात्रेसाठी पुण्याहून निघाल्या. २१ जूनला जयपूरला पाहुणचार घेऊन त्यांनी काशीकडे कूच केले. वाटेत फर्रुखाबाद, इटा, कानपूर, मैनपुरी, बदाउन, शहजाहानाबाद वगैरे जिल्ह्यांचा मुलुख होता. हा सर्व प्रदेश महम्मदखान बंगश याचा होता. होय, हा तोच बंगश, ज्याने श्रीमंत बाजीरावांच्या समशेरीचे तेज बुंदेलखंडात चाखले होते. राधाबाईंना ओलीस ठेऊन राऊंना पर्यायाने मराठी साम्राज्याला जेरीस आणण्याची सुवर्णसंधी खरेतर बंगशाकडे चालून आली होती. पण तसा विचारही त्याच्या मनाला शिवला नाही किंवा असा विचार मनात आला असेल, तरी तो प्रत्यक्षात उतरवण्याची हिम्मत बंगशात नव्हती. कारण तो चांगलाच जाणून होता, असा कोणताही प्रकार घडला तर गाठ थेट बाजीराव पेशव्यांशी आहे. विस्तवाशी खेळल्याने इजा आपल्यालाच होते, हे त्याला माहित होते. म्हणून त्याने सर्वात सोप्पा आणि सुरक्षित मार्ग निवडला. "बाजीरावांची आई ती आमची आई" असा पवित्रा घेऊन राधाबाईंच्या सुरक्षिततेची सर्व जबाबदारी स्वतःवर घेतली आणि स्वखर्चाने त्यांना यात्रा करून दिली. हा मुद्दा नक्की लक्षात घेण्यासारखा आहे. पुढे बुंदेलखंडात जाऊन छत्रसाल बुंदेले यांचे पुत्र (जे बाजीरावांना त्यांचे भाऊ मानीत) जगतराज व हिर्दोसा यांचा पाहुणचार घेऊन राधाबाई २६ मे १७३६ ला सव्वावर्षाने सुखरूप पुणे प्रांती परतल्या. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜 २१ जून इ.स.१८५८ इंग्रजांनी झांशीला २२ मार्च १८५८ रोजी वेढा दिला. तात्या टोपे झांशीच्या लक्ष्मीबाईच्या मदतीस धावून गेले; परंतु ह्यू रोझ पुढे त्याचा निभाव लागला नाही. त्यांना माघार घ्यावी लागली. पुढे ते सर्व ग्वाल्हेरला गेले. तात्या, लक्ष्मीबाई व रावसाहेब यांनी एकत्र होऊन ग्वाल्हेरवर हल्ला केला. ग्वाल्हेर काबीज केले; पण सर ह्यू रोझने ते पचू दिले नाही. या युद्धात लक्ष्मीबाई मरण पावली. तात्याने यापुढे गनिमी काव्याने इंग्रजांना हैराण करण्याचे ठरविले. त्याला पकडण्यासाठी इंग्रजांनी त्याचा एक वर्षभर पाठलाग केला. या पळापळीत २१ जून १८५८ ते ९ ऑक्टोबर १८५८ पर्यंत जावरा, अलीपूर, राजगढ, इसागढ, चंदेरी, मंग्रौली इ. ठिकाणी तात्याने लढाया जिंकल्या. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 २१ जून २०१० महाराष्ट्र सरकारने २१ जून रोजी सिंधुदुर्ग किल्ल्यास महाराष्ट्रातील संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले. महाराजांनी २५ नोव्हेंबर इ.स.१६६४ रोजी या किल्ल्याच्या बांधकामाला सुरुवात केली होती… 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇 https://youtube.com/c/thegreatmarathawarriors . . . 👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील. शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇 ☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम || || जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
32 likes
48 shares

More like this