Suraj Chavan
1K views • 26 days ago
*•།आजचे_ऐतिहासिक_शिवदिनविशेष།•*
*------------☆★☆★☆-------------*
*📜 ९ जुलै इ.स.१५८३*
पोर्तुगीज सैन्य कुकल्ली गावच्या हद्दीत शिरले. इ.स.१५८२ कॅप्टन फिगेरे दों हा पोर्तुगीज आधिकारी तहाचा प्रस्ताव घेऊन कुकल्लीकरांकडे आला. ते एकून ५ जण होते आणि निःशस्त्र होते. कॅप्टन फिगेरेदला मोडकीतोडकी कोकणी भाषा अवगत होती. आपल्या लाघवी बोलण्याने कुकल्लीकर हिंदू पुढाऱ्यांची मने काबीज करण्यात तो यशस्वी झाला. ठरलेल्या दिवशी कुकल्लीकर हिंदुंचे १६ पुढारी पोर्तुगिजांशी सलोख्याच्या पुढील वाटाघाटी असोळण्याच्या कोटांत करण्याचे ठरवून, मात्र पोर्तुगिजांनी विश्वासघाताने या सर्वांना हालहाल करून ठार मारले. त्यातील कानू नाईक या पुढाऱ्याच्या अंगात विरश्री संचारून त्याने तटावर चढून साळ नदीत उडी टाकून अदृश्य झाला. काळू नायकाने असोळणेच्या कोटात घडलेला प्रसंग आपल्या भाऊबंधूंना विदीत केला. पाद्री यांची तुकडी आणि पोर्तुगीज सैन्य कुकल्ली गावच्या हद्दीत शिरले. त्यांनी "भिवसा" येथील शंभु महादेवाचे मंदिर भ्रष्ट करून, "असणी कट्टा" येथील श्रीरामाच्या देवळा समोरील तलावात गाईच्या आतड्या टाकून ते तीर्थ भ्रष्ट केले. नंतर दोन्ही मंदिरांना त्यांनी आग लाऊन दिली. नंतर दोन्ही मंदिराना त्यानी आग लावून दिली. या अत्याचाराची वार्ता गावात पसरताच सर्व लोक मिळेल ते हत्यार घेऊन आक्रमकांच्या प्रतिकारासाठी धावले. 'झुंजागाळ' या नावाचे ठिकाणी उभयपक्षांत तुंबळ लढाई झाली. तीत पोर्तुगीजांकडील २०० ठार होऊन अनेक जखमी झाले. हिंदूचे १५० ठार झाले. पोर्तुगीजानी माघार घेऊन पांजरखण येथे तळ ठोकला. 'झुंजागाळ' हे रण मैदान शत्रूच्या रक्ताने न्हावून निघाल्याने कुकल्लीच्या इतिहासात अमर झाला.
*📜 ९ जुलै इ.स.१६७७*
(आषाढ वद्य ५, पंचमी, शके १५९९, संवत्सर पिंगळ, वार सोमवार)
किल्ले वालदूर स्वराज्यात दाखल!
महाराजांच्या स्वारी दरम्यान वालदूर किल्ल्यातील लोक घाबरून पळून गेल्याने मराठ्यांनी वालदूर किल्ल्याला घेराव टाकून वालदूर किल्ला ताब्यात घेतला. किल्ले वालदूर स्वराज्यात दाखल झाला.
*📜 ९ जुलै इ.स.१६९२*
मिरज प्रांतातील मराठा सुभेदार खंडोबा येदेव (यादव) यास ९ जुलै १६९२ रामचंद्र पंत आमत्याने संताजी घोरपडे यांच्या सरदेशमुखी संबंधीत पत्र पाठवलेले. संभाजी माहाराजांच्य नंतर संकट कालात संताजी घोरपडे यांनी स्वराज्याचे रक्षन करुन औरंगजेबास दहशत कशी लावली याचे वर्णन पंताने केले आहे.
राजश्री खंडोबा येदव यादव देशाधिकारी व देशलेखक वर्तमान व भावी पास माहाल मिरज प्रांत गोसावी. अखंडीत लक्ष्मी अलंकृत राजमान्य सेवक रामचंद्र निळकंठ आमत्या नमस्कार सु ।। सुलास तीनसेन आलफ राजश्री संताजी बिन म्हाळोजी घोरपडे सेनापती लष्कर यांसी राजश्री छत्रपती स्वामी कर्नाटकात जाते समई ईकडे गनिमाची धामधूम बहुत होऊन कुल दूर्गे हस्तगत केली होती राज्यामध्ये काही अर्थ उरला नव्हता कुल मराठे यांही ईमानास खाता करुन गनिमाकडे गेले याही राजश्रीच्या पायासी बहूतच एकनिष्ठ धरुन ईमानास खाता करुन गनिमाकडे गेले याही राजश्रीच्या पायासी बहुतच एकनिष्ठ धरुन ईमानास न खाता करता जमाव करुन सेख निजाम व सर्जाखान व रणमस्तानखान व जानसारखान येस उमदे वजीर बुडविले. जागा जागा गनिमास कोटगा घालुन नेस्तनाबुद केला आणि देश सोडविला राज्य रक्षणतेच्या प्रसंगास असाधरन श्रम केले औरंगजेबास दहशत लाविली. पुढे कितेक स्वमी कार्याचे ठायी हिमंत धरिताती. या करिता यावरी संतोशी होउन मामले मिरज कार्यात सत्ताविस येथील देशमुख होते नेस्तनाबुद झाले त्यांचे वंशी कोनी ना त्याचें मुतालिक होते तेबळाउन देशमुखी वतन खात होते तेहडी बुध्दी धरून गनिमास मिलोन फिसात केली एकनिष्ठ धरुन ईकडे भेटले नाहीत म्हणून त्यांची देशमुखी दुर करून मशार जिल्हेस राजारामला देशमुखी आपले मजकुराचे आवलाद व अफलादपुत्रपौत्र दिल्हि असे तरी मामले मजकुराची देशमुखी यांचे दुमला करणे जानिजे. निदेश समक्ष.
📜 ९ जुलै इ.स.१६९७*
संताजी घोरपडे व धनाजी जाधव यांच्यात वाद होण्यास जरी औरंगजेब कारण नसता तरी त्याचा खून मात्र बादशहाच्याच कारवाईने घडून आला, हे खालील पत्रावरून सिद्ध होते. हे पत्र औरंग्याचा सरदार लुत्फुल्लाखान याने संताजी घोरपडेंच्या मृत्यूनंतर लगेच ता. ९ जुलै इ.स.१६९७ रोजी नागोजीस लिहिले. “तुम्ही निश्चयें करून आमचे दौलतीचा आश्रय करून हुजूर येऊन रुजू जाहला व दुस्मानासही दूर केला. संताजीचा पळावयाचा रस्ता तुम्ही बंद केला. त्यास पळून जाऊ दिले नाही. येणेकरून तुम्ही सरकारची नोकरी एक निष्ठेने बहुत चांगली बजावली. तुमची विनंती मान्य झाली आहे. तुमचे अपराध क्षमा होऊन पातशहाची मेहरबानी व इनायत होऊन येईल.” इ. स. १६९० मध्ये नागोजी माने औरंग्यास सोडून स्वराज्यात आला परंतु त्याचे चित्त इकडे स्थिर झाले नाही. संताजी घोरपडे पळू लागल्यावर नागोजी लुत्फुल्लाखानाला भेटला आणि त्याच्यामार्फत पुन्हा औरंग्याची कृपा संपादण्याकरिता त्याने संताजी घोरपडेंचे शीर कापून ते औरंग्याला नजर केले.
*≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈*
*आपल्या राजा शिवछत्रपती Whatsapp समुहामध्ये सामील होण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपले नाव आणि पत्ता सांगा आपल्याला समुहामध्ये सामील केले जाईल..*👇👇
*♠️ अजय सोनवणे*
https://wa.me//918605494249 #🚩शिवराय #🙏आई एकविरा 🙏 #☘️हर हर महादेव🙏🏼 #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏
*≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈*
*WhatsApp ग्रुप लिंक*
*།། राजा शिवछत्रपती །། इतिहास माझ्या राज्याचा समुह क्र.०१*
https://chat.whatsapp.com/EBOf3f2DDie3q5GrvcKYNA
*།། राजा शिवछत्रपती །། इतिहास माझ्या राज्याचा समुह क्र.०२*
https://chat.whatsapp.com/F0OcXttE6x1LrWYF9eqWdb
*≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈*
*-----------☆★۩۞۩★☆-----------*
*राजा शिवछत्रपती, इतिहास माझ्या राज्याचा*
*महाराष्ट्र राज्य*
*-----------☆★۩۞۩★☆-----------*
*जय जगदंब जय जिजाऊ*
*जय शिवराय जय शंभूराजे*
*जय गडकोट*
*!! हर हर महादेव !!*
15 likes
14 shares