:::::-----::::::-----:::::-----::::: ।।सार्थ श्रीसंत तुकाराम महाराज गाथा पारायण।। :::::----::::::------:,:::::-----:::: ::- अभंग क्र.२५२७ -: **************************** या अभंगामध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात- माझी विठाई ही शकुनवंती आहे जो जी इच्छा करेल ते त्याला तात्काळ देते. राजहंस पक्षी जसा दूध आणि पाणी वेगवेगळे करतो तसेच माझी विठाई खरा आणि खोटा यांचा निवडा करते. जर भाग्यच चांगले नसेल तर चांगले फळ तरी कसे मिळेल आणि अंतकरणात जर काम क्रोधाचे मलमूत्र असेल तरीदेखील चांगले फळ कसे प्राप्त होईल. तुकाराम महाराज म्हणतात ज्याचे पूर्वसंचितच वाईट आहेत ते संचितच त्यांना दरिद्र करून ठेवते. :::::::::::::::::::::::::::::::::: आपला दास:- ह.भ.प श्री संजयजी महाराज ढाकणे आळंदी देवाची दि.२८/०७/२०२६ वार-मंगळवार :::::---::::::------:::::::-----::::: ::::::::::- -:::::::::::::::: #✍ज्ञानेश्वरी📖 #🌸संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली🙏 #🌻आध्यात्म 🙏 #😇भक्तांचा शनिदेव #🙏भक्ती सुविचार📝
9 likes
6 shares

More like this