राहुल बोराडे
655 views • 12 days ago
कारगिल विजय दिवस हा प्रत्येक भारतीयासाठी एक महत्वाचा दिवस आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये १९९९ साली लडाखमधील कारगिल येथे ६० दिवस हे युद्ध चालले. २६ जुलै रोजी या युद्धाचा शेवट होऊन यावेळी भारतीय लष्कराने पाकिस्तानी घुसखोरांना हाकलवून लावलं. ऑपरेशन विजयचा भाग म्हणून टायगर हिलसह लष्कराच्या इतर सर्व चौक्यांवर कब्जा मिळवला. या युद्धात भारताचा विजय झाला. त्यामुळेच २६ जुलै हा दिवस भारतीय जवानांच्या अदम्य शौर्याचा सन्मान करण्यासाठी, युद्धात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी साजरा केला जातो.
भारत माता की जय !! #कारगिल विजय दिवस 🇮🇳
8 likes
13 shares