ᴍᴀʀᴏᴛɪsʜɪʀᴀʟᴇ45
719 views • 5 hours ago
कॉमेन्ट्री करताना हर्षा भोगले नेहमी म्हणायचे, "आमच्या मराठी भाषेत अजिंक्य रहाणे म्हणजे अपराजित. ज्याला कोणीही जिंकू शकत नाही" हे वाक्य अजिंक्य रहाणे खेळत असताना हर्षा कडून बोलले जायचे. एक क्लास खेळाडू म्हणून अजिंक्य रहाणेची कायम ओळख झाली आहे. डोंबिवली येथे लहानाचा मोठा झालेल्या अजिंक्य रहाणेने क्रिकेट प्रेमींना अनेक आठवणी दिल्या आहेत.
2020-21 मधील बॉर्डर गावस्कर ट्रॉफी क्वचितच कोणी क्रिकेट फॅन विसरू शकेल. पहिला टेस्ट ॲडिलेड येथे खेळला गेला. जिथे भारत दुसऱ्या इनिंग मध्ये 36 वर ऑल आऊट झाला होता आणि भारताने तो सामना 8 विकेट्स ने गमावला होता. रोहित शर्मा जखमी असल्याने पहिल्या 2 टेस्ट साठी उपलब्ध नव्हता, विराट कोहली पहिल्या टेस्ट नंतर मुलीच्या जन्माच्या कारणाने भारतात परतला होता. नंतर अजिंक्य रहाणेला भारताचे कॅप्टन बनविण्याचा निर्णय घेतला आणि त्याने असा चमत्कार करून दाखवला की ऑस्ट्रेलियाच्या सर्व माजी खेळाडूंनी केलेली भविष्यवाणी खोटी ठरली.
दुसऱ्या टेस्ट सामन्यात स्वतः अजिंक्य रहाणेने मेलबर्न येथे शतक झळकावले. पहिल्या सामन्यात 8 विकेट्सने हरलेल्या भारताने दुसऱ्या सामन्यात 8 विकेटसनेच जिंकून बदला घेतला. या सामन्यात पृथ्वी शॉ आणि रिद्धिमान साहला काढून शुभमन गिल आणि ऋषभ पंतला घेण्याचा निर्णय अजिंक्य रहाणेने घेतला होता. तिसऱ्या टेस्ट मध्ये रोहित परतला होता. या सामन्यात सर्वांनीच चांगले प्रदर्शन करून दाखवले होते. भारत हा सामना हरत असताना हनुमा विहारी आणि आर अश्विन या दोघांनी 258 बॉल मध्ये 62 धावांची अभेद पार्टनरशिप करून सामना ड्रॉ केला.
मालिका 1-1 ने बरोबरीत असल्याने सर्वांना ओढ लागली होती ती शेवटच्या टेस्ट सामन्याची. पहिल्या इनिंग मध्ये ऑस्ट्रेलियाने 369 धावा केल्या. त्याला उत्तर देताना भारताने वॉशिंग्टन सुंदर(62) आणि शार्दुल ठाकूर(67) यांनी गरजेच्या वेळी केलेल्या फिफ्टी मुळे भारत 336 धावांपर्यंत पोहचू शकला. 33 धावांची लीड घेऊन मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या इनिंग मध्ये 294 धावा केल्या. शेवटच्या दिवशी अवघड पीच वर भारताला 324 धावा काढायच्या असताना गिल, पुजारा, रहाणे, पंत, सुंदर यांनी खेळलेल्या दमदार खेळी मुळे भारताने गाबाच्या मैदानावर ऐतिहासिक विजय मिळवला होता आणि त्या संघाचा कर्णधार होता अजिंक्य रहाणे. 36 ऑल आऊट वरून मालिका जिंकण्याचा भीम पराक्रम अजिंक्य रहाणेने करून दाखवला होता. यासाठी भारतीय क्रिकेट फॅन्स कायम ऋणी राहील. खूप खूप धन्यवाद अजिंक्य रहाणे सर 🙏🙏 #🙆♂️अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती💔 #😎अजिंक्य रहाणे #🇮🇳टीम इंडिया🤩 #🏏क्रिकेट
12 likes
21 shares