अविनाश पाठक २०१३ बॅचचा IAS (प्रमोटेड) जिल्हाधिकारी झालेला माणूस आहे.याने बीडमध्ये असताना इतका गोंधळ घातलेला होता की साध्या साध्या कामांसाठी याला अंगठेबहाद्दर गुंडाचा फोन गेल्याशिवाय हा सही करत नसे. पाठकने आपल्या अधिकाराचा वापर करून २५० कोटी रुपये राज्य शासनाकडून लाटले आहेत.यात जमीन अधिग्रहण झालेला शेतकऱ्यांना मावेजा म्हणून रक्कम दाखवण्यात आली. क्लास ३ पासून ते पाठकपर्यंत सगळेच पाठकने या कामात वापरून घेतले. जेव्हा नवीन जिल्हाधिकाऱ्यांनी हे गौडबंगाल बघितले तेव्हा आधी खोट्या सह्यांचा वापर करून आदेश काढले अशा बातम्या बाहेर आल्या पण त्या सह्यांचा वापर करून किती रुपयांचा घोटाळा केला हा आकडा बाहेर आला नव्हता. जेव्हा घोटाळ्याचा आकडा बाहेर आला तेव्हा स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अवाक झाले आणि त्यांनी नेहमीप्रमी SIT लावली. पाठकला लातुरातील त्याच्या घरातून उचलण्यात आले.इतका वरिष्ठ अधिकारी होता पण अंगठेबहाद्दर गुंडांच्या आदेशावर काम करत होता. या घोटाळ्यात सरकारी पैसे वसूल केले जातील पण पाठकच्या वरची आणि खालची साखळी जेलमध्ये टाकून त्यांना शिक्षा होणं गरजेचं आहे. पाठकला जेलमध्ये टाकल्या टाकल्या छातीत कळ आली आणि दवाखान्यात न्यावे लागले.अशा लोकांना जेलमध्ये अचानक छातीत कळ येते आणि अस्वस्थ व्हायला लागता तेव्हा यांच्या आरोग्याची चौकशी न्यायालये का करत नाहीत हे कळायला मार्ग नाही.सगळी व्यवस्था इतकी बरबटली आहे की पाठक बडतर्फ होण्याऐवजी ६ महिन्यांत पुन्हा सचीव पदावर दिसू शकतो. #🏛️राजकारण #👌प्रेरणादायी स्टेट्स #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #👌हृदयस्पर्शी फोटो
11 likes
15 shares

More like this