⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳ 📜 ६ जुलै इ.स.१६७७ "दक्षिण दिग्विजय मोहीम" "फ्रेंच मुत्सद्दी मंडळ" आणि "छत्रपती शिवाजी महाराज " यांची दक्षिणेत भेट झाली. यावेळी "मदुरै" चा नायक "चौकनाथ" उपस्थित होता. महत्वाच्या वाटाघाटी, तह आणि चर्चा यावेळी झाल्या.‌इ सया बैठकीनंतर छत्रपती शिवरायांना दक्षिणेतील "दरबारी वकील" म्हणून "रघुनाथराव हनमंते" यांची नेमणूक केली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🚩महाराष्ट्रातील गडकिल्ले🛕 #🙏शिवदिनविशेष📜 #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर #🚩 छत्रपती शिवाजी महाराज गाणी🎶 https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1 शिव दिनविशेष Video Link🔗 https://youtu.be/a45Emo-o8vQ 📜 ६ जुलै इ.स.१६९० सातारा प्रांत काबीज करण्यासाठी लुतुफुल्लाखान यास मराठी फौज देवून बादशहाने रवाना केले, मजल दरमजल करीत खान साताऱ्यातील “खटाव” येथे पोहचला व त्याने आपला तळ ठोकला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ६ जुलै इ.स.१७३५ मल्हारराव होळकर, राणोजी शिंदे राजपुतान्यात विजयी होऊन पुण्यास आले, तेव्हा पेशवे बाजीराव थोरले त्यांना भेटण्यास घोरपडी पावेतो सामोरे गेले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ६ जुलै इ.स.१९०२ राजर्षी शाहू महाराज यांनी छत्रपती शिवरायांच्या विचारांचा व कार्याचा वारसा समर्थपणे चालवणारा राजा म्हणून आपली ओळख निर्माण केली. सामाजिक बंधुभाव, समता, दलित व उपेक्षित बांधवांचा उध्दार, शिक्षण, शेती, उद्योगधंदे, कला, क्रिडा व आरोग्य इत्यादी महत्वपूर्ण क्षेत्रामध्ये अद्वितीय स्वरूपाचे कार्य केले. मागासलेल्या लोकांना प्रगतीच्या प्रवाहात आणावयाचे असेल तर त्यांच्यासाठी राखीव जागांची तरतूद केली पाहिजे. हा व्यापक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून ६ जुलै १९०२ रोजी कोल्हापूर संस्थानात मागास जातींना ५० टक्के जागा राखीव राहतील अशी घोषणा केली व तिची त्वरित अंमलबजावणी करुन संबंधत अधिकाऱ्याकडून अहवाल मागविले. शाहूंच्या या निर्णयाला तेंव्हा अनेक उच्चवर्णीय पुढाऱ्यांनी विरोध केला. त्या काळात अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातीच्या लोकांसाठी नोकरीमध्ये राखीव जागांची तरतूद करून सरकारी नोकऱ्या मिळवून दिल्या. शाळा, दवाखाने, पाणवठे, सार्वजनिक विहिरी, सार्वजनिक इमारती इत्यादी ठिकाणी (तत्कालीन) अस्पृश्यांना समानतेने वागवावे असा आदेश त्यांनी कोल्हापूर संस्थानात काढला. तसेच त्यांनी देवदासी प्रथा बंद करण्यासाठीही कायद्याची निर्मिती केली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ६ जुलै इ.स.१९४४ जुलै ६, १९४४ रोजी आजाद हिंद रेडिओवरचे आपले भाषण नेताजींनी गांधीजींना उद्देशून केले. ह्या भाषणाच्या माध्यामातून नेताजींनी गांधीजींना, जपानकडून मदत मागण्याचे आपले कारण व 'अर्जी-हुकुमत-ए-आजाद-हिंद' तथा आझाद हिंद फौज ह्यांची स्थापना करण्यामागचे उद्दिष्ट स्पष्ट केले. ह्या भाषणात, नेताजींनी गांधीजींचा राष्ट्रपिता असा उल्लेख करत, आपल्या युद्धासाठी त्यांचा आशिर्वाद मागितला. अशा प्रकारे, नेताजींनी गांधीजींना सर्वप्रथम राष्ट्रपिता असे संबोधले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇 https://youtube.com/c/thegreatmarathawarriors . . . 👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील. शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇 ☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम || || जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀ #🙏 प्रेरणादायक बॅनर
10 likes
10 shares

More like this