ShareChatUser
914 views 1 months ago
*शेतकऱ्यांनी कमी पाण्यात शेती करणे गरजेचे: सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील* चाकूर: शेतकऱ्यांनी कमी पाण्यात शेती करणे गरजेचे आहे ,असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांनी बोथी तालुका चाकूर येथे केले. बोथी तालुका चाकूर येथे गाळमुक्त धरण गाळमुक्त शिवार अभियानांतर्गत नदी खोलीकरण व रुंदीकरण कामाचा शुभारंभ तसेच जलतारा प्रकल्पाच्या पाहणी दौऱ्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर लातूरचे जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, सिद्धी शुगर अलाईड इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक अविनाश जाधव ,जिल्हा परिषद उपाध्यक्ष दयानंद सुरवसे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष शिवाजीराव काळे, संजय गांधी निराधार कमिटीचे अध्यक्ष सिद्धेश्वर अंकलकोटे, उपसभापती भुजंग शिंदे, , जिल्हा परिषद सदस्य भानुदास पोटे, नगरसेवक भागवत फुले, शिवदर्शन स्वामी, राम कसबे, भालचंद्र चाटे, धनंजय चाटे, मधुकर मुंडे, नरेंद्र हाके, विष्णू तीकटे, अनिल वाडकर, संदीप शेटे, सचिन तोरे, जावेद पटेल कार्यकारी अभियंता जलसंपदा विभाग , गटविकास अधिकारी संतोष वंगवाडे, नायब तहसीलदार दिगंबर स्वामी सह विविध मान्यवर उपस्थित होते. यापुढे बोलताना सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील म्हणाले की, जलतारा प्रकल्प हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प असून , बोथी गावातील शेतकऱ्यांनी या उपक्रम ला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद द्यावा. आपल्या गावातले पाणी आपल्याच गावात जिरवले पाहिजे . यामुळे पाण्याचे स्त्रोत अधिक उपलब्ध होतील. शेतकऱ्यांनी चांगल्या शेतीच्या उत्पन्नासाठी माती परीक्षण केलं पाहिजे असेही सहकार मंत्री ना . पाटील म्हणाले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाचे आयोजक बळी पाटील यांनी केले. यावेळी सिद्धी शुगर अलाईड इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक अविनाश जाधव यांनीही जलतारा विषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मधुकर कांबळे यांनी केले. *चौकट* जलतारा प्रकल्पांतर्गत प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या एका एकर शेतात ५ फूट बाय ५ फूट आकाराचा एक खड्डा खोदायचा आहे. यामुळे पावसाचे लाखो लीटर पाणी थेट जमिनीत मुरते आणि भूजल पातळी वाढून हेच पाणी पुन्हा विहिरींच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उपलब्ध होते. यंदा एल निनोचे संकट येण्याची शक्यता असल्याने पाणी टंचाई भासू शकते. अशा परिस्थितीत प्रत्येकाने पाणी जमिनीत जिरविण्यासाठी आणि पाण्याचा अत्यंत काटकसरीने वापर करण्यासाठी पुढे आले पाहिजे. प्रत्येक गावात किमान १ हजार जलतारा खड्डे तयार करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी यावेळी केले. #📝मराठवाडा अपडेट्स
13 likes
12 shares

More like this