Dhamnashrya yuwa vichar mnach nanded
654 views • 3 days ago
चला बाबासाहेब समजून घेऊ
आपण आंबेडकरी विचारधारा जोपासणारी माणसे आहोत.
"ही विचारधारा अनंतकाळापर्यंत पिढ्यांन पिढ्या पुढे जात राहील.
"सर्वात आधी आपण बाबासाहेब समजून घेतले पाहिजे खरंतर विचारधारा जोपासणाऱ्या प्रत्येक माणसाने त्या व्यक्तीसंदर्भात वाचन केले पाहिजे.
"बऱ्याच लोकांना बाबासाहेब हे केवळ संविधानाचे शिल्पकार होते एवढीच जुजबी माहिती आहे.
-आपण बाबासाहेबांचा जीवन परिचय पाहिला तर लक्षात येत की बाबासाहेब हे अर्थशास्त्रात पदवी घेणारे हे प्रथम भारतीय आहे.
बाबासाहेबांचा अर्थशास्त्रातील एक प्रबंध आहे,रुपयांचा प्रश्न हा ब्रिटिश कालीन दस्तावेज आहे..ह्या प्रबंधाने भारतात राज्य करण्यासाठी आलेलं इंग्रज हे हादरले होते.
"खरंतर हा प्रबंध भारतातील रुपयांच्या समस्येचा एक लेखाजोखा होता.
-ब्रिटिशांचे भारतातले आर्थिक धोरण हे भारतासाठी किती नुकसानदायी आहेत बाबासाहेबांनी आपल्या प्रबंधातून स्पष्ट केले.
"हे बाबासाहेबांचं देशावर असलेलं प्रेम होतं.
बाबासाहेब निस्सीम देशभक्त होते.
स्त्रीसुधारणेची चळवळ बाबासाहेबांनी इतक्या प्रकारे चांगली हाताळली की,आज जे भारतातील स्त्रियांचं स्थान त्यांना मिळालेलं जे स्वातंत्र्य आहे.त्यासाठी बाबासाहेबांनी केलेल्या संघर्षानंतर कोणत्याही नेत्याला किंवा कोणाला स्त्री चळवळ साठी संघर्ष करावा लागला नाही.
-बाबासाहेबांनी काही काळ मजूरमंत्री म्हणून काम केले तेव्हा बाबासाहेबांनी कामगारांसाठी अनेक सुविधा निर्माण केल्या.
जसे,विमा(ESIC) भविष्य निर्वाह निधी(PF) प्रसूती रजा (MATERNITY LIVE),आठवड्यातील सुट्टीची सक्ती(WEEKLY OFF)..
बोनस खरंतर कामगारांना संपाचा अधिकार सुद्धा बाबासाहेबांनी उपलब्ध करून दिला.
बाबासाहेबांनी सबस्टेशन(वीज पुरवठा) याची संकल्पना मांडून त्या संदर्भात कटिबद्ध राहिले आहेत.
त्यानंतर नद्याजोड प्रकल्प भाक्रा नागल सारखी धरणे हिराकुंड या सर्वांची संकल्पना बाबासाहेबांनी आणली.
"या देशात पाण्यासाठी संघर्ष करावा लागलेल्या माणसाने देशाची तहान भागवली आणि शेतकऱ्यांची शेती समृद्ध केली यापेक्षा कोणतं देशप्रेम हवं.
बाबासाहेबांनी हा देशाचा पाया उभारला आहे,
वीजनिर्मिती क्षेत्र, कामगार क्षेत्र,जलक्षेत्र,स्त्रियांना समान अधिकार,अर्थशास्त्र यामध्ये बाबासाहेबांचं भरीव योगदान आहे.
जे या देशातल्या त्या काळी असलेल्या कुठल्याही नेत्यापेक्षा प्रभावी आणि दुप्पट योगदान आहे.
-बाबासाहेबांनी जे शिक्षणाच महत्व आपणाला पटवून दिले आहे अगदी साध्या भाषेत ते त्यांचौकडून सर्वप्रथम घेण्यासारखं आहे.
-तुम्ही त्यांना जितक वाचत जा ते तितकेच अथांग आहे सागरासारखे आणि तो सागर ज्ञानाचा आहे.
तुम्ही कुठल्याही समूहातले असो किंवा धर्मातले बाबासाहेब वाचले पाहिजे.
"तेव्हा कळेल ते प्रथमतः भारतीय होत आणि अंतिमतः भारतीयच आहे.
#drbabasahebambedkar
#ambedkar #viral #reach #facebookpost #🙂Positive Thought #bhimsenik #✍️सुविचार #🪷बुद्धांची तत्वे📜 #💙 भीमसैनिक 💙
17 likes
9 shares