आजपासून खाद्यतेलाचा मोह कायमचा त्यागून खऱ्या अर्थाने 'तेलमुक्त भारता'कडे वाटचाल सुरू केली आहे. ही बिनतेलाची पोळी आणि जवसाची कोरडी चटणी म्हणजे देशाला महासत्ता बनवण्यासाठी मी दिलेली सर्वोच्च 'आहुती'च समजा!😇 ​कोरडा घास गळ्याखाली उतरवताना थोडा 'टेक्निकल' अडथळा येतोय खरा, पण देशाच्या तिजोरीचा आणि परकीय चलनाचा विचार केला की, याच कोरड्या घासात मला 'छप्पन भोगा'ची चव जाणवू लागली आहे. शेवटी देशहितासाठी एवढा त्रास तर सहन करायलाच हवा!😉 ​आता फक्त प्रतीक्षा आहे ती कुणीतरी आध्यात्मिक आणि शास्त्रीय पद्धतीने 'कंदमुळांचे' महत्त्व पटवून देण्याची. एकदा का ती महान क्रांती झाली की गॅस, महागाई आणि किराणा मालाच्या कटकटीतून कायमची सुटका होईल. मग आपण थेट त्या 'अश्मयुगीन' जीवनशैलीकडे झेप घेऊ शकू. शेवटी महासत्तेकडे जाणारा रस्ता हा असाच 'कोरडा' आणि खडतर असतो, हे आता पूर्णपणे समजलंय!🫣 🤣😂🤣😂😊 #👌हृदयस्पर्शी फोटो #👌प्रेरणादायी स्टेट्स #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #🏛️राजकारण
18 likes
11 shares

More like this