सचिन दादा पानसरे शिरवळ शहर
2K views • 2 days ago
⛳आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष⛳
📜 ६ ऑगस्ट इ.स.१६४८
(श्रावण वद्य १२, द्वादशी, शके १५७०, संवत्सर सर्वधारी, वार रविवार)
महाराजांची किल्ले पुरंदर " मोहीम!
किल्ले पुरंदर आदिलशाहीच्या ताब्यात होता आणि किल्ले पुरंदरचे किल्लेदार होते महादजी नीळकंठराव सरनाईक पिढ्यानपिढ्या सरनाईक घराणे किल्ले पुरंदरची किल्लेदारी करत होते. त्यात राजे शहाजीराजे यांचा आणि महादजींचा दाट स्नेह वयोवृद्ध महादजी आता थकले होते. त्यामुळे त्यांच्या निळोपंत, शंकराजीपंत, विसाजीपंत व त्रिंबकपंत या ४ मुलांत वतनासाठी कटकटी सुरू होत्या. चाणाक्ष शंकराजीपंत महाराजांच्या सहाय्याने मदत मिळवू पहात होते. महाराजांनीही मग शंकराजीपंतांना हाताशी धरून भेदनीतीने किल्ले पुरंदरचे राजकारण केले आणि किल्ला हाती घेतला. किल्ले पुरंदर निश्चित कधी हाती आला व कसा आला यात, निरनिराळ्या अभ्यासकांच्या मतभिन्नता आहे. मात्र फत्तेखानाच्या स्वारीची शक्यता पहाता हा किल्ला महाराजांनी आगस्ट इ.स.१६४८ ते आक्टोबर महिन्याच्या इ.स.१६४८ आधी स्वराज्यात निष्चितच दाखल केला आहे.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩
https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🚩महाराष्ट्रातील गडकिल्ले🛕 #🚩 छत्रपती शिवाजी महाराज गाणी🎶 #🙏शिवदिनविशेष📜 #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर #छत्रपती संभाजी महाराज
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1
शिव दिनविशेष Video Link🔗
https://youtube.com/shorts/Scs3J1XNvns?feature=share
📜 ६ ऑगस्ट इ.स.१६५७
(श्रावण शुद्ध ७, सप्तमी, शके १५७९, संवत्सर हेमलंबी, वार गुरुवार)
महाराजांचा अहमदनगर येथे मुघल छावणीत हल्ला!
छत्रपती शिवाजी महाराजांनी अहमदनगर येथे मुघल छावणीत हल्ला केला.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇
📜 ६ ऑगस्ट इ.स.१६५९
ठाण्याच्या पोर्तुगिझ गवर्नरने गोवा येथील
प्रमुख गवर्नरला 'मराठ्यांच्या आरमाराबद्दल सावधान' असण्याबद्दलचे पत्र लिहिले. शिवरायांनी १६५७ पासून कल्याण-भिवंडी परिसरात आरमार बनवण्याचा उद्योग सुरु केला होता. यात लढाउ तसेच व्यापारी जहाजे सुद्धा होती. त्यामुळे सतर्क होवून पोर्तुगिझ गवर्नरने हे पत्र लिहिले. सदर पत्राचा मराठी अनुवाद- "शहाजीचा मुलगा (शिवाजी) याने आदिलशाहीच्या ताब्यामधील वसई ते चेउल मधला बराच भूभाग जिंकला असून त्याने स्वतःची लढण्याची ताकद वाढवली आहे. त्याने कल्याण, भिवंडी, पनवेल ह्या वसईच्या आसपासच्या बंदरांमध्ये काही लढाउ जहाजे बनवली आहेत.
आम्हाला आता सतर्क रहायला हवे. ही जहाजे बंदरामधून खुल्या समुद्रात बाहेर येणार नाहीत यासाठी योग्य ती पावले उचलण्याचे आदेश आम्ही पोर्तुगिझ कप्तानाला दिले आहेत."
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇
📜६ ऑगस्ट इ.स.१६७७
दक्षिण दिग्विजय मोहिमेत छत्रपती शिवाजी महाराज तुंदुमगुर्ती ला आले.
या मुक्कामात महाराजाना भेटण्यासाठी तेवेनापट्टणमचे डच अधिकारी आले होते. डच मंडळींना पायदळाचे सैनिक महाराजांच्या नाजूक अल्कटिव्ह असणाऱ्या तोरणपट्टानी सजवलेल्या महाराजांच्या तंबूत घेऊन गेले.डच मंडळी तंबूत बसल्यावर शिवराय तंबूत आले. त्यांच्यासोबत जनार्दन व रघुनाथ पंडित होते. शिवराय आपल्या आसनावर बसल्यावर जनार्दन पंडित त्यांच्यासमोर तर रघुनाथ पंडित महाराजांच्या जवळ उजवीकडे बसले. शिवराय जेंव्हा तंबूत आले तेंव्हा तंबूत असणारे सारे उठून उभे राहिले. महाराजानी यावेळी सोनेरी नक्षीकाम केलेली वस्त्रे परिधान केली होती. त्यांच्या उजव्या हातात मुठीला सोन्याचा वर्ख लावलेला पट्टा होता. भेटीत महाराजांनी डचाना कौल दिला व त्यांचा अधिकारी निकोलस क्लेमेंट यांच्याशी मैत्रीपूर्ण बोलनी केली. यावेळी डचानी महाराजाना चंदेरी कपडा, ८ रुंद तलवारी, ३३ पौंड चंदन, २ पेट्या गुलाबपाणी, ३ हरणाची कातडी, ४८ पौंड लवंग, जायफळ, १ चांदीचा पानपुडा, ३ छोट्या सोनसाखळ्या या भेटवस्तू दिल्या. महाराजांनी डचानाही भेटवस्तू देऊन निरोप दिला.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇
📜 ६ ऑगस्ट इ.स.१८०३
इंग्रज आणि शिंदे-भोसले !
शके १७२५ च्या श्रावण व ३ रोजी इंग्रज अधिकारी जनरल वेलस्ली
यानें शिंदे व भोसले यांच्याविरुद्ध लढाई पुकारली. अठराव्या शतकाच्या अखेरीस मार्किस ऑफ वेलस्ली हा हिंदुस्थानचा गव्हर्नर जनरल म्हणून आला तेव्हां राजकीय परिस्थिति मोठी गंभ होती. हिंदुस्थानांत फ्रेंचांची सत्ता बळावत होतीच; परंतु युरोपमध्यें नेपोलियनचा उदय झाल्यामुळे इंग्रजांना फार धास्ती वाटत होती. इंग्रजांच्या विरुद्ध टिपूनें सर्व मुसलमानांचा एक संघ निर्माण केला होता. आणि मराठ्यांच्यामध्येंहि अशीच एकजूट निर्माण झालेली होती. पेशवे, शिंदे, गायकवाड, भोसले, वगैरे अनेकांच्या मदतीने 'मराठा कॉन्फीडर 2 निर्माण झाली होती. या बिकट परिस्थितीतून धूर्त इंग्रजांनी वाट काढली आणि या सर्वांवर विजय मिळविला. निजाम आणि मराठे यांच्या साह्याने . इंग्रजांनी टिपूचा पराभव केला आणि त्याचें श्रीरंगपट्टणचें राज्य काबीज केलें, आणि त्यानंतर कांहीं कुरापत काढून निजामासहि हतवीर्य करून त्याच्या जवळील फ्रेंच सैन्य घालवून दिलें. व आपली तैनाती फौज ठेवून दिली. आणि आतां इंग्रजांचें सारे लक्ष ' मराठा कॉन्फिडरसी' कडे लागले. मराठी राज्याचे दुर्दैव याच वेळी आपली संधि साधीत होते. यशवंतराव होळकरांच्या भीतीनें बाजीराव सिंहगडाहून महाडास आणि तेथून वसईस गेला. आणि त्याने इंग्रजाश लाजिरवाणा तह केला ! बाजीराव इंग्रजी कृपेमुळे परत गादीवर येणार होता. त्याच्या पदरीं इंग्रजी तैनाती फौज राहणार होती, त्यामुळे बाजीराव इंग्रजांच्या हातचें बाहु बनला. या वेळी पुण्याच्या दरचारीं महादजींचे दत्तक पुत्र दौलतराव शिंदे यांचें वर्चस्व होते. त्यांच्या पदरीं फ्रेंच फौज चांगलीच तयार झालेली होती. तेव्हां आतां शिंद्यांकडे लक्ष देणें इंग्रजांचे कर्तव्य होते. सर्वत्र फंदफितुरी करून इंग्रजांनी मोठींच कृष्णकारस्थानें रचलीं. त्यांनीं बाजीरावास गादीवर बसविलें. आणि दौलतराव शिंदे यांचे अजिंक्य लष्कर आणि जय्यत तोफा यांचा नाश करण्यास ते प्रवृत्त झाले. त्याप्रमाणें जनरल वेलस्ली यानें श्रावण व. ३ रोजी लढाई पुकारली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇
☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम ||
|| जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
25 likes
19 shares