mahesh m. shirkar
871 views 7 days ago
*#शिवविचार_प्रतिष्ठान* *#भक्ती_शक्ती_चा_संगम* भक्ती कशी असावी हे आपल्याला संत तुकाराम महाराज सांगतात शक्ती कशी असावी हे आपल्याला शिवराय शिकवतात आणि भक्ती व शक्तीचा संगम कसा असतो हे आपल्याला स्वतः ब्रम्हांडाने तुकोबा आणि शिवबांच्या भेटीतून दाखवून दिल भक्ती आणि शक्ती जिथे एकत्र येते तो सोहळा बघण्यासाठी जणू संसर्व गंधर्व सर्व देव स्वतःच कोणत्या ना कोणत्या रूपात आले असतील असा प्रसन्न अनुभव त्याक्षणी आला असेल हे नक्की तुकाराम महाराज त्यावेळी फक्त देहूचे कीर्तनकार तुकोबा अंबिले होते. आपल्या कीर्तनांमधून कित्येक तरुणांना, तुकोबांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये सामील होण्यासाठी प्रवृत्त केले होते. कित्येक तरुण आपल्या राजांच्या पाठीशी, त्यांचे मावळे म्हणून उभे राहून आपल्या राजेंचे बळ वाढवत होते. छत्रपती शिवाजी महाराजांना, तुकोबांच्या ह्या कार्याला आभार व्यक्त करण्यासाठी त्यांची भेट घ्यायची होती संत तुकाराम महाराजांची भेट घेण्यासाठी स्वतः छत्रपती शिवाजी महाराज वेषांतर करुन त्यांच्या घरी गेले खरे, मात्र तुकोबांनी एकाच नजरेत छत्रपती शिवाजी महाराजांना ओळखले. डोळ्यांमधे आदर आणि अभिमान ह्या दोन्ही एकाच वेळी केवळ एका तेजस्वी आणि महान व्यक्तीमध्येच असू शकते… असे वर्णन करत आपल्या घरी आलेल्या सावळ्या वैकुंठाच अगदी प्रेमाने तुकोबांनी स्वागत केले… तुकोबांच्या काहीच क्षणांच्या सहवासात शिवरायांना अनन्य अशी अध्यात्मिक शांतीची अनुभूती मिळाली. तुकोबांचे कीर्तन ऐकल्याशिवाय देहू मधून जायचेच नाही, असे म्हणत अगदी हक्काने तुकोबांच्या घरी आपण मुक्काम करणार असल्याचे शिवरायांनी आपल्या मावळयांना सांगून त्यांना परत पाठवले.त्यावेळी, तुकोबांची मुले छोटीच होती. म्हणून त्यांनी शिवरायांकडे म्हणेजच त्यांच्या महाराज काकांकडे गोष्ट सांगा असा हट्ट धरला. त्यावेळी शिवरायांनी त्यांना तीन प्रश्ने विचारली आणि त्या प्रश्नांची उत्तरे त्यांनी दिली तर त्यांना एक छान गोष्ट सांगू असे वचन दिले. शिवरायांनी विचारलेला पहिला प्रश्न, “ईश्वराची सर्वात सुंदर रचना कोणती ?” दुसरा प्रश्न होता की, “सर्वात ऊत्तम दूध कोणाचे ?” तर “मायेचा सागर, दयेचा पाझर…. ” म्हणजे कोण असा तिसरा प्रश्न शिवरायांनी विचारला. बऱ्याच वेळ तुकोबांच्या छोटाल्या मुलांनी विचार केला आणि आपल्या परीने उत्तरे देताना सांगितले, “सर्वात ऊत्तम दूध असते गाईचे, तर मायेचा सागर म्हणजे आहे बाळकृष्ण… आता ईश्वराची सर्वात सुंदर रचना कोणती, ह्याबद्दल एकमत होत नव्हते. छोट्या मुलीला सोनचाफा सर्वात सुंदर वाटत होता तर, भोळ्या महादेवाला खाण्याची आवड असल्यामुळे गूळ सर्वात सुंदर वाटत होता. ” तेव्हा, तुकोबा आणि शिवराय दोघांनीही मंद स्मितहास्य केले आणि तुकोबांनी आपल्या मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. छत्रपती शिवाजी महाराजांनी विचारलेल्या तीनही प्रश्नांचे एकच उत्तर आहे. ईश्वराची सर्वात सुंदर रचना म्हणजे “आई “, सर्वात ऊत्तम दूध तेदेखील आईचेच आणि मायेचा सागर, दूरच पाझर म्हणजे देखील आईच… छत्रपती शिवाजी महाराज ह्यांचे आपल्या आऊसाहेबांसाठीचे प्रेम आपल्याला काय नवे नाही, मात्र छोट्या कोवळ्या मनाच्या मुलांना आई नक्की काय असते हे समजून सांगण्यासाठीची ही अगदी सोपीच पद्धत शिवरायांनी आपल्याला सांगितली #🗿शिवकालीन पुराणवस्तू #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩 #🚩शिवराय #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपति शिवाजी महाराज
7 likes
10 shares

More like this