⛳आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष⛳ 📜 १९ जुलै इ.स.१२९५ संत सावता माळी यांना पुण्यतिथि निमित्त विनम्र अभिवादन सावता माळी हे संत ज्ञानदेवांच्या काळातील एक प्रसिद्ध संत होते. त्यांचा जन्म इ. स. १२५० भेंड .ता.माढा. जि.सोलापूर हे सावतोबांचे गाव होय. सावता माळी यांच्या आजोबांचे नाव देवु माळी होते, ते पंढरीचे वारकरी होते. त्यांचे वडील पूरसोबा आणि आई हे धार्मिक वळणाचे होते, पूरसोबा शेतीचा व्यवसाय सांभाळून भजन-पूजन करीत व पंढरीची वारी करीत असत. कर्म करीत रहाणे हीच खरी ईश्वर सेवा आहे अशी शिकवण सावता माळी यांनी दिली. वारकरी संप्रदायातील एक जेष्ठ संत म्हणुन त्यांचा लौकिक आहे. ते विठ्ठलाचे परम भक्त होते. ते कधिही पंढरपूरला गेले नाहीत असे म्हटले जाते की खुद्द्द विठ्ठलच त्यांना भेटायला त्यांच्या घरी जात असे. प्रत्यक्ष ते कर्ममार्गी संत होते.त्यांनी अध्यात्म आणि भक्ती,आत्मबोध आणि लोकसंग्रह, कर्तव्य आणि सदाचार याची बेमालूम सांगड घातली. ईश्वराला प्रसन्न करून घ्यावयाचे असेल तर जप, तप यांची आवश्यकता नाही तसेच कुठे दूर तीर्थयात्रेला जाण्याचीही गरज नाही; केवळ ईश्वराचे अंत:करणपूर्वक चिंतन केल्यास आणि श्रद्धा असल्यास ईश्वर प्रसन्न होतो आणि दर्शन देतो असा सावता माळी यांनी विचार मांडला ईश्वराच्या नामजपावर जास्त भर दिला. ईश्वरप्राप्तीसाठी संन्यास घेण्याची किंवा सर्वसंगपरित्याग करण्याची गरज नाही. प्रपंच करतानाच ईश्वर प्राप्ती होऊ शकते, असे म्हणणार्‍या सावता महाराजांनी त्यांच्या मळ्यातच ईश्वर पाहिला. ”कांदा मुळा भाजी l अवघी विठाबाई माझी ll लसूण मिरची कोथिंबिर l अवघा झाला माझा हरी ll ” सावता महाराज म्हणतात – भक्तीमध्येच खरे सुख आणि आनंद आहे. तीच विश्रांती आहे. सावता म्हणे ऐसा भक्तिमार्ग धरा l सावता माळी यांनी नरहरी सोनार आणि सेना न्हावी यांच्याप्रमाणेच आपल्या व्यवसायातील वाक्यप्रचार, शब्द अभंगात वापरले.तत्कालीन मराठी अभंगाच्या भाषेत नव्या शब्दांची ,नव्या उपक्रमांची त्यामुळे भर पडली. कर्म करीत राहणे हीच खरी ईश्वर सेवा आहे.अशी शिकवण वारकरी सावता माळी यांनी दिली.वारकरी संप्रदायातील एक जेष्ठ संत म्हणून त्यांचा लौकिक आहे.आजही पंढरपूरच्या श्री.विठ्ठलाची पालखी वर्षातून एकदा खास त्यांना भेटावयाला येत असते. सावता माळी हे कर्तव्य आणि कर्म करीत राहणे हीच खरी ईश्वर सेवा अशी प्रवृत्ती मार्ग शिकवण देणारे संत आहेत .श्री विठ्ठल हेच त्यांचे परमदैवत होते. अध्यात्म ,भक्ती, आत्मबोध आणि लोकसंग्रह, कर्तव्य, सदाचार याची बेमालूम सांगड त्यांनी घातली. धर्माचरणातील अंधश्रद्धा, कर्मठपणा, दांभिकता व बाह्य अवडंबर याबाबत त्यांनी कोणाचीही भीडभाड ठेवली नाही. त्यावर सतत कोरडे ओढले.अंत्यशुद्धी ,तत्त्वचिंतन, सदाचार, निर्भयता ,सहिष्णुता इत्यादी गुणांची त्यांनी भलावण केली. ईश्वराला प्रसन्न करून घ्यावयाचे असेल तर योग ,होम, जप ,किर्तन, व्रतवैकल्ये या साधनांची बिलकूल आवश्यकता नाही. केवळ ईश्वराचे अंतःकरणपूर्वक चिंतन हवे आहे .सावता माळी शेत सोडून कधीही पंढरपूरला आले नाहीत, असे मानले जाते. आजही संत सावता महाराजांची पालखी आषाढी वारीला पंढरपूरला येत नाही तर, आषाढी वारी झाल्यावर पांडुरंगाची पालखी संत सावता महाराज यांना भेटायला येते. आषाढ वद्य चतुर्दशी हा सावता महाराजांचा समाधी दिन .तर अमावस्या हा काल्याचा दिवस. काल्याच्या दिवशी पंढरपूर वरून निघालेली पांडुरंगाची पालखी अरण येथे आल्यावर दहीहंडी फोडून उत्सवाची सांगता होते. दिनांक 19 जुलै इ.स.१२९५ रोजी संत सावता महाराज अनंतात विलीन झाले. एकाच जागी स्थीर राहून अंधार्‍या रात्री लोकांना अचूक मार्गदर्शन करणारे, धैर्याने वाटचाल करण्याचे प्रोत्साहन देणारे, एका जागी स्थीर राहून विठ्ठल भक्तीचा दीप लावूण उजळणारे , सावता महाराजांचे पावन चरित्र, प्रेरक व्यक्तिमत्व आणि प्रभावी कर्तृत्व यांची उज्वल यशोगाथा लाख-मोलाची ठेव आहे . 🙏अशा या संत सावता माळी यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇 https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🙏 प्रेरणादायक बॅनर #🙏शिवदिनविशेष📜 https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1 शिव दिनविशेष Video Link🔗 https://youtube.com/shorts/VnvhhDrkjyk?feature=share 📜 १९ जुलै इ.स‌.१६४७ महादभट मुद्गल पुरंदरे यांनी शिवाजीमहाराजांकडे येऊन सांगितले की, मला पर्वती, पिंपळे सौदागर आणि पिंपरी या प्रत्येक गावात एक एक चावर जमीन याप्रमाणे तीन चावर जमीन आणि पुणे परगण्याच्या जकातखात्यातून दिवाबत्तीकरिता रोज तीन रुके असे इनाम आहे. हे इनाम निजामशाही फर्माने, मलिकअंबराचे खुर्द्खत, वाजीरांनी दिलेली भोगवट्याची पत्रे आणि शहाजीराजांनी दिलेले खुर्दखत यांच्याप्रमाणे शुहूर सन १०४७ पर्यंत चालले आहे. यावर्षी सुभेदार दादाजी कोंडदेव यांना देवाज्ञा झाली म्हणून महालीचे कारकून नवीन खुर्दखत आणा असा आक्षेप घेतात. तरी कृपा करून हे इनाम चालू ठेवण्याची आज्ञा व्हावी. हि सर्व विनंती शिवाजीमहाराजांना या पत्रात उद्धृत केली आहे आणि गतवर्षीपर्यंत ज्याप्रमाणे हे इनाम चालत आले आहे, त्याप्रमाणे पुढे हि चालू ठेवावे असा हुकुम केला आहे. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇 📜 १९ जुलै इ.स.१६५९ (श्रावण शुद्ध दशमी, शके १५८१, संवत्सर विकारी, वार मंगळवार) महाराजांचे राजकारण! औरंगजेबाने शिवरायांना पाठवलेले पत्र व पोशाख शिवरायांना प्राप्त झाला. विजापुरात मोहीमेच्या तयारीची लगबग सुरु झाली होती, अगणित संप्पत्ती अंदाजे चाळीस हजारांवर फौजफाटा अशा तयारीनिशी खान आपला मुलगा फाजलखानासह निघाला. "तेजस्वी ओजस्वी प्रखर सुर्याचं "शिवाजी महाराजांच" अस्तित्व मिटवायला". स्वराज्याच्या गुप्तहेरांनी विजापुरची खडानखडा माहिती महाराजांपर्यत पोहचवण्याची कामगिरी चोख पार पाडली होती. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇 📜 १९ जूलै इ.स.१६५९ गोव्याच्या किल्ल्यातील दालनात वाचले गेलेले शिवाजी महाराजांचे पत्र- शिवाजीराजांचे दंडयाच्या सिद्दी व त्या बंदरातील हबशी (सिद्दीची प्रजा) यांच्याशी वितुष्ट आहे. शिवाजीराजांनी आपल्या सरहद्दीवर (सिद्दी विरुद्ध) काही घोडेस्वार व प्यादे पाठवले होते. तेव्हा चौल व वसई येथील कॅप्टन सिद्दीला रसद पुरवीत होते आणि सर्व प्रकारची मदत करीत होत. ह्या (गोवा पोर्तुगीज) राज्यासी असलेल्या शिवाजीराजांच्या मैत्रीला हि गोष्ट अत्यंत बाधक आहे. चर्च नंतर सल्लागार मंडळातील सभासदांनी एकमताने निर्णय घेतला की, त्यांनी (चौल व वसई येथील कॅप्टन) दंडयाच्या हबस्याला मदत करू नये, परंतु गुप्त पणे व कोणालाही समजणार नाही आणि शिवाजीराजांना सुगावा लागणार नाही अश्या प्रकारे मदत केल्यास हरकत नाही, असे पत्र लिहावे. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇 📜 १९ जुलै इ.स.१६९४ परंड्याचा किल्ला म्हणजे दारूगोळ्याचे भांडार प्राचीन काळापासून परंडा किल्ला परगणा म्हणजे जिल्ह्याचे ठिकाण असून बहामनी काळात ख्वाजा जहान तर आदिलशाहीत गालीब खान हे किल्लेदार राहिले आहेत. पुढे १६५७ साली मोगलांनी परंडा जिंकून घेतल्यानंतर मीर महंमदखान आणि इज्जतखान हे किल्लेदार होते. पैकी १९ जुलै १६९४ च्या एका पत्रानुसार किल्लेदार इज्जतखानाने किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ इज्जतपुरा नावाने नवीच वस्ती वसविली होती. त्याच्याच काळात परंडा किल्ल्यात रोगाची साथ पसरल्याची नोंद आहे. मध्ययुगीन कालखंडात परंड्याप्रमाणे नळदुर्ग हा जिल्हा असला तरी नळदुर्गमधील किल्ल्यातल्या एका बुरुजाला परंडा बुरूज हे नाव आहे. परंड्याच्या किल्ल्यात भरपूर युद्धसामग्री साठवून ठेवलेली होती. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १९ जुलै इ.स.१७३९ वसईच्या पाडावानंतर पोर्तुगीज सैन्याला आणि त्यांच्या बायकामुलाना मराठ्यानी गोव्यास जाऊ दिले. परंतु गोव्यातील मराठा सैन्य अजून तिकडे रेंगाळत मागे राहिले होते. ते १७३९ सालच्या मे अखेर माघारा परतू लागले. व्यंकटराव घोरपडे यानी साष्टी प्रांतातून सैन्य २१ मेस काढून घेतले. तत्पूर्वी रायतूरचा वेढा त्यानी १२ मेस उठविला होता. साष्टी प्रांतातील मराठा सैन्य माघारा परतले, तरी व्यंकटराव घोरपडे त्या सैन्याबरोबर गेले नाहीत. ते सांगे येथे जाऊन राहिले. दाजीराव भावे नरगुंदकर कुकळ्ळीला ठाण मांडून राहिले होते. पोर्तुगीजांकडून ते आणखी काही उपटण्याची अपेक्षा करीत होते. ती रक्कम मिळाल्याखेरीज ते मडगावहून सैन्य हलविणार नाहीत ह्याची जाणीव होताच पोर्तुगीजानी त्यांच्या हातावर देऊ केलेली रक्कम ठेवून त्याना मडगावचा कोट खाली करावयास लावला. दि. १९ जुलै १७३९ या दिवशी पोर्तुगीजानी मडगावच्या कोटाचा ताबा घेतला. परंतु त्यानी तो लगेच पाडून जमीनदोस्त करून टाकला. कुकल्ली गाव, तेथील कोट आणि असोळणे गाव श्रीमंत बाजीराव पेशव्यांच्याच्या आज्ञेवरून पुढे आणखी काही दिवस मराठ्यांच्या ताब्यात होते. बाजीराव आणि पोर्तुगीज यांच्यामध्ये तहाच्या वाटाघाटी चालू असता इ. स. १७४० च्या मार्च महिन्यात फोंड्याच्या मराठा सुभेदाराने साष्टी प्रांताच्या महसुलापैकी चाळीस टक्के महसूल वसूल करण्यासाठी पाचशे घोडेस्वार आणि सहाशे पायदळ पाठवून तिकडे लुटालूट केली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १९ जुलै इ.स.१७४५ शिंदे घराण्यांचे संस्थापक राणोजी शिंदेची पुण्यतिथी मराठ्याच्या इतिहासात शिंदे घराणे पराक्रमी व एकनिष्ठ म्हणून प्रसिद्ध होते. साता-याजवळ २० कि.मी. अंतरावरचे कोरेगाव तालुक्यातील कण्हेर - खेड हे शिंदे पाटलांचे मूळ गाव होय. याच घराण्यातील राणोजी शिंदे हे पेशवे बाळाजी विश्वनाथ भट यांच्या पदरी नोकरी करीत होते. मात्र राणोजीचा उत्कर्ष हा थोरले बाजीराव पेशव्यांच्या काळात झाला. जुने जाणते लोक आपल्या गणितात बसणार नाही. त्यामुळे आपल्या बरोबर तरुण कर्तबगार शूर लोकांचा भरणा असावा. हा बाजीरावांचा विचार होता. त्यामुळे अगदी सामान्य कुटुंबातील शिंदे व होळकर यांना बाजीरावांनी आपल्या बरोबर घेतले. बाजीरावांची निवड सार्थ ठरवून शिंदे व होळकरांनी उत्तरेत अनेक पराक्रम गाजवले. त्यांतील शिंदे घराण्यातील राणोजींनी आपल्या पराक्रमाने उत्तरेतील माळव्याची सुभेदारी मिळवली. बाजीरावांशी राणोजी नेहमी एकनिष्ठ व प्रामाणिक राहिले. त्यांनी मध्यप्रदेशातील उज्जनी येथे आपले बस्तान बसवले. पुढे शिंदेनी ग्वाल्हेर हे आपले वास्तव्य स्थान मिळवले. थोरले बाजीरावाच्या कर्नाटक मोहिमेपासून राणोजी सदैव बरोबर असत. थोरल्या बाजीरावांनी १७३७ मध्ये निजामाचा भोपाळ येथे दारुण पराभव केला. त्या युद्धात राणोजी शिंदे यांनी अतुल पराक्रम गाजवला. माळव्यांची मोहिम तसेच राजपुतांनात चौथाई - सरदेशमुखी वसूल करण्याचे काम राणोजींनी मल्हारराव होळकरांबरोबर धडाडीने केले. १७३५ मुघल बादशहा महमंद रंगीला याने खानदुरान आणि वजीर कमरुद्दीन यांच्या नेतृत्वाखाली दोन लाख सैन्यानिशी दोन मोहिमा मराठ्यांविरुध्द पाठविल्या. त्याप्रसंगी मुघलांची रसद तोडण्याचे महत्त्वाचे काम राणोजींनी केले. त्यामुळे मुघलांच्या दोन्ही मोहिमा अयशस्वी ठरल्या . थोरले बाजीरावांच्या उत्तरेच्या राजकारणात राणोजी शिंदे यांनी नेहामी सहकार्य केले. एवढेच नव्हे चिमाजी आप्पा यांच्या वसईच्या मोहिमेत सुध्दा राणोंजी शिंदेनी पराक्रम गाजवला होता. २८ एप्रिल १७४० मध्ये थोरले बाजीरावांचे मध्यप्रदेशातील रावरखेडी येथे निधन झाले. त्यावेळी राणोजी शिंदे यांनी थोरले बाजीरावांची समाधी बांधण्याचे काम पेशवे नानासाहेब पेशव्यांच्या इच्छेनूसार हाती घेतले. रावरखेडी येथील बाजीरावांची खणखणीत समाधी राणोंजीनी आपलेपणाने केली. आज त्या समाधीनी अवस्था बिकट झाली आहे. त्यांची दुरुस्थी झाली पाहिजेत . मात्र त्यात पक्ष कोणताही असो त्यांची राजकीय इच्छा शक्ती कमी पडते. राणोंजी शिंदे यांनी अगदी कण्हेर खेडच्या पाटीलकीपासून उज्जनी व माळव्याचे अधिकारापर्यत आपला उत्कर्ष पराक्रम व प्रामाणिकपणामुळे केला. राणोजी हे शूर शिंदे घराण्यांचे संस्थापक होते. त्यांना जयप्पा, दत्ताजी, ज्योतिबा, तुकोजी व महादजी असे शूर पुत्र होते. त्यांनी आपल्या शौर्याने मराठ्यांच्या इतिहासात आपले नाव सुवर्ण अक्षरात कोरले. अशा या पराक्रमी राणोजींचे निधन १९ जुलै १७४५ मध्ये झाले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १९ जुलै इ.स.१८१२ एलफिन्स्टनच्या अहवालाला कंपनी सरकारने हिरवा कंदिल दाखवला. मुळातच हा अहवाल पेशवे आणि सरदार यांच्यात मैत्रीचे संबंध प्रस्थापित करणारा नसून जास्तच फूट पाडणारा होता हे मात्र त्यावेळेस कोणाच्याही लक्षात आले नाही. यातही एलफिन्स्टनने एक धूर्तपणा असा केला की, जर हा करार सरदारांनी अमान्य केला तर पेशव्यांच्या मदतीने त्यांच्यावर कारवाई होणार होती. परंतु, 'पेशव्यांच्या मागण्या' सरदारांनी अमान्य केल्या आणि पेशव्यांनी कारवाई केली तर मात्र इंग्रज त्यांना अजिबात मदत करणार नव्हते. जुलै १८१२ मध्ये बाजीराव पेशवे 'आषाढीच्या वारी' निमित्त पंढरपूरला गेले. त्यांच्या पाठोपाठ माऊंट स्टुअर्ट एलफिन्स्टन पेशव्यांचे कारभारी सदाशिव माणकेश्वर आणि इतर प्रमुख सरदारांसह पंढरपुरात दाखल झाला. दि. १९ जुलै १८१२ या दिवशी उभय पक्षांनी एलफिन्स्टनच्या या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. हाच तो प्रसिद्ध 'पंढरपूरचा करार'. पंढरपूरच्या करारानंतर लगेचच बेळगाव प्रांतातील चिकोडी निपाणीच्या प्रदेशावरून कोल्हापूरकर आणि पेशव्यांमध्ये वाद सुरू झाला. सरदार पटवर्धन आणि बाजीरावांचे कारभारी सदाशिवभाऊ माणकेश्वर हे आतून कोल्हापूरकरांना सामील होते. अखेरीस कोल्हापूरकरांनी निपाणी जिंकले आणि भाऊंच्या या फितुरीचा बाजीरावांना पत्ता लागला. बाजीरावांनी त्यांना तात्काळ कारभारी पदावरून दूर केले आणि त्यांच्या जागी एक जबरदस्त महत्त्वाकांक्षी असा माणूस कारभारी म्हणून नेमला- त्रिंबकजी डेंगळे पाटील!! 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇 https://youtube.com/c/thegreatmarathawarriors . . . 👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील. शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇 ☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम || || जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀ #🚩 छत्रपती शिवाजी महाराज गाणी🎶 #🚩महाराष्ट्रातील गडकिल्ले🛕 #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर
15 likes
11 shares

More like this