ShareChatUser
661 views • 5 days ago
वृक्षांचे महत्त्व लक्षात ठेवून वृक्षांचे जतन करणे काळाजी गरज-एन.आर.पाटील
चाकुरः-वृक्षांची संख्या दिवसेंदिवस घटत आहे.त्यामुळे तापमानात वाढ,दुष्काळ आणि अनिश्चित स्वरूपात पाऊस या सारख्या समस्या निर्माण होतात.पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी वृक्ष लागवड करणे व संगोपन करणे काळाजी गरज असल्याचे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक एन.आर.पाटील यांनी सांगितले.लातुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.लातुर यांच्या वतीने सहकार सप्ताह निमित्त चाकुर शाखेत वृक्षरोपण कार्यक्रम संपन्न झाले.कॉग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा नगरसेवक विलासराव पाटील चाकुरकर,एन.आर.पाटील,पप्पुभाई शेख,अशोक नागीमे,शिवाजी पाटील,गंगाधर केराळे,सलीमभाई तांबोळी,बेग,यांच्या शुभहस्ते बँकेच्या परिसरात वृक्ष लागवड करण्यात आली.यावेळी एन.आर.पाटील म्हणाले,मानवाच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यात वृक्षांचे मोठे योगदान आहे. तसेच वृक्षांचे सामाजिक, धार्मिक व आर्थिक महत्त्व सुद्धा आहे. वाढत्या शहरीकरणामुळे, यांत्रिकीकरणा मुळे आणि मानवाच्या हव्यासापायी आज मोठ्या प्रमाणावर जंगल तोड होत आहे. वृक्षांची संख्या दिवसें दिवस घटत आहे. त्यामुळे तापमानात वाढ, दुष्काळ आणि अनिश्चित स्वरूपात पाऊस या सारख्या समस्या निर्माण होतात. अलीकडे विकासाच्या नावावर जंगले भकास होत आहेत. परिणामी पर्यावरणाचे संतुलन बिघडणे आणि सजीव सृष्टीला धोका निर्माण होणे यांसारख्ये गंभीर प्रश्न निर्माण होत आहे. यावर उपाय म्हणजे केवळ वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन हाच आहे. वृक्ष म्हणजे आपल्या पृथ्वीच्या आयुष्याचे पर्यायाने आपल्या जीवनाचे आधारस्तंभ आहे. त्यांचे रक्षण करूनच आपण आपले आणि आपल्या पुढच्या पिढ्यांचे जीवन सुखी व समृद्ध करू शकतो. म्हणूनच वृक्षांचे महत्त्व जाणा आणि वृक्ष संवर्धन करावे असे आहवान त्यांनी केले. #📝मराठवाडा अपडेट्स
12 likes
14 shares