꧁◉❥❤️SONA PATIL❤️❥◉꧂
ShareChat
click to see wallet page
@1097273866
1097273866
꧁◉❥❤️SONA PATIL❤️❥◉꧂
@1097273866
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
#माझा कट्टा प्रवचने २२ नोव्हेंबर देव अत्यंत दयाळू आहे. तुम्ही फार कष्ट करून इथे येता. किती दगदग, किती त्रास तुम्हाला सोसावा लागतो ! बरे, इथे आल्यावर हाल काय कमी होतात ? परंतु इथे कशासाठी आपण येतो, आपल्याला काय हवे आहे, हे आपल्याला कळते का ? आपल्याला देव खरोखरच हवासा वाटतो का ? याचा विचारच आपण फारसा करीत नाही. आपल्यावर काही संकट आले, किंबहुना आपले काही वाईट झाले, की आपण म्हणतो, देवाने असे कसे केले ? असे म्हणणे यासारखे दुसरे पाप नाही. देवावर विश्वास न ठेवणारा माणूस यापेक्षा एकवेळ परवडला, कारण तो ‘ देवाने वाईट केले ’ असे तरी म्हणणार नाही. देव खरोखर अत्यंत मायाळू आहे. त्याला कुणाचेही दु:ख सहन होत नाही. कोणत्या आईला आपल्या मुलाला दु:ख, कष्ट झालेले आवडेल ? म्हणून, देवाने माझे वाईट केले ही खोटी समजूत प्रथम मनातून काढून टाका. द्रौपदीला जेव्हा वस्त्रहरणासाठी दु:शासनाने भरसभेत खेचले, तेव्हा तिला वाटत होते की पांडवांना हे सहन होणार नाही, ते माझी विटंबना होऊ देणार नाहीत, ते दु:शासनाची खांडोळी करतील. तिला पांडवांबद्दल विश्वास वाटत होता. दु:शासनाने जेव्हा तिच्या पदराला हात घातला, तेव्हा तिने आशेने धर्माकडे पाहिले. धर्माला वाटले, आता विरोध केला तर आपले सत्याचे व्रत उघडे पडेल, म्हणून त्याने लाजेने मान खाली घातली. हे कसले अहंपणाने लडबडलेले सत्य ! तीच स्थिती इतर पांडवांची झाली. पुढे तिने भीष्माचार्यांकडे पाहिले, परंतु त्यांनीही मान खाली घातली. तेव्हा मात्र तिने जगाची आशा सोडली, आणि कळकळीने परमात्मा श्रीकृष्णाला हाक मारली; आणि त्याने अनेक वस्त्रे पुरवून तिची अब्रू रक्षण केली. पुढे तिला एकदा श्रीकृष्ण भेटला असताना तिने त्याला विचारले की, “ आधीच तू माझ्या बचावासाठी का नाही धावलास ? तो दुष्ट, केस धरून मला खेचून नेत असतानाच का नाही धावलास ? ” तेव्हा श्रीकृष्ण म्हणाला, “ त्यात माझा काय दोष ? मी तुझ्या रक्षणासाठी आतुर होतो, परंतु तुला पांडवांची आणि इतरांची आशा होती, ते रक्षण करतील असे तुला वाटत होते. मला दरवाजा खुला नव्हता, मग मी कसा येऊ ? तू जगताची आशा सोडलीस आणि मला बोलावलेस, त्याबरोबर मी तुझ्या भेटीला धावलो. ” जगाची आशा, आसक्ति, सोडल्याशिवाय परमेश्वराला आपली हाक कशी पोहोचेल ? ज्या गोष्टीवर आपले प्रेम असते त्याच गोष्टीची आपल्याला नड लागते. आपल्याला देवाची नड लागली आहे का ? देवाचे प्रेम लागायला त्याच्या अखंड सहवासात राहण्याची अत्यंत जरूरी आहे; आणि हा सहवास जर कशाने साधत असेल तर तो एक त्याचे नाम घेतल्यानेच साधेल. भगवंताचे नाम घेऊन त्याचे प्रेम मिळवा, हेच माझे सांगणे. ३२७. सर्व विसरून भगवंताला आळवले की तो कृपा करतो.
*पाठराखीण.....* जगबुडी नदीच्या काठावर आईचं गाव....मोजून २३ घरं....फार वस्ती नाहीच... आई वय ८३, एकटीच राहते आणि तिच्यापुरता स्वयंपाक करते, एखादी भाजी तीही नावाला, आमटी भात, कुळीथ पिठलं भात, अगदी कंटाळा आला तर ताकभात.....लेक येणार असेल तर पोळी आणि साग्रसंगीत भाजी, काळ्या वाटाण्याची उसळ, कोबी खोबरं घालून.....आईचं घर आतल्या रस्त्याला, त्याच गावात मुलीचं घर....जेमतेम २०० मीटर अंतर.... घर जवळ असलं तरी लेकीचं सारखं सारखं जाणं होत नसे....तिचं कुटुंब तसं मोठं, त्यामुळे तिची कामं दिवसभर सुरू असायची....कामं करणं आणि करून घेणं, अव्याहत सुरू....सुपारी, नारळ, आंबा, काजू यांची व्यवस्था बघणं.... तिच्याकडे गुरं होती.....एक बैलजोडी शेतावर असायची आणि घरच्या गोठ्यात, एक म्हैस, तीही आईने लग्नात सोबत पाठवलेली पाठराखीण....सकाळी आणि संध्याकाळी त्यांचे कासरे सोडले की सरळ नाकासमोर नदीवर जायची....वाटेत कोणी पोळी दिली तरच तोंड लावणार....उगीच उकिरडे हुंगायची नाही.... अगदी ठरलेल्या वेळी जाणार, आपणहून येणार, रोजचा रिवाज.... जरी लेकीचं आईकडे जाणं दुर्मीळ असलं तरी तिची सगुणा मात्र न चुकता, आईच्या दारात उभी राहून हक्काने भाताचा घास मागायची.....माहेरच ना तीचं...... घास खाऊन झाल्यावर घरी.....लेकीला तिच्या गळ्यातल्या घंटेचा आवाज यायचा आणि म्हणायची....आलीस का ग? बरी आहे ना ग आई?.....पुन्हा एकदा मान डोलवून घंटेचा आवाज यायचा.....बर केलंस हो, तू चौकशी केलीस ते....असे ठरलेले डायलॉग असायचे, रिवाज सुरू होता..... गावात देवीचा उत्सव होता, लेकीला पहाटे लवकर उठून नैवेद्यासाठी सोवळ्याचा स्वयंपाक करायचा होता, त्यासाठी आदल्यादिवशी पासून तयारी सुरू होती....भाज्या निवडायच्या होत्या, कुयरी चिरायची होती....त्याची आमसूल, गुळातली भाजी... सतराशे साठ गोष्टी.... दुपारी नैवेद्य दाखवून, प्रसादाचे वाटप झालं....धावपळीत लेकीच्या पायाचे तुकडे पडले होते... सगुणा नेहमीप्रमाणे संध्याकाळी नदीवर गेली....आज तिला आल्यावर कुयरीची पाठ मिळणार होती.... ठरल्या वेळेनुसार घरी येणं अपेक्षित होतं.... पण आज उशीर झाला होता, लेकीला फार स्वयंपाक नव्हताच, पण ठरलेली वेळ निघून गेल्यावर काळजी वाटायला लागली, सगुणाचा पत्ता नव्हता, काय झालं असेल? नदीवर काही झालं नसेल ना? चिखलात काही चावले की काय..... की आईने अजून खायला दिलं म्हणून ठोकला मुक्काम..... अजून दहा मिनिटं गेली तरी येईना, तुळशीला दिवा लावून झाला....शेवटी दुखऱ्या पायाने ही निघाली....टॉर्च घेऊन, नदीकडे जाताना वाटेत आईचं घर लागतं..... अंधारात टॉर्च मारल्यावर डोळे चमकले.....जवळ गेल्यावर समोर सगुणा, आईच्या घराच्या दारात उभी होती......दार उघडं दिसलं... हिने सगुणाच्या पाठीवर हात फिरवला, ती शहारली.... काय ग गधडे, मी तुझी वाट बघत्ये आणि तू इकडे मुक्काम.....तुला आईने भाताचा घास दिला नाही का?.... घास खाल्ल्याशिवाय दारातून निघायचं नाही हा रिवाज... लेकीने बाहेरून हाक मारली...आई.....अग सगुणा वाट बघत्ये तुझी.....आई काहीच बोलेना, दारात चप्पल काढून आत गेली....सगळे दिवे चालू....स्वयंपाकघर रिकामं, चूल थंड, माजघरात नाही, शेवटी परसात गेली..... बघून पायाखालची जमीन सरकली.....आई जमिनीवर बेशुद्ध होऊन पडली होती, हिने पटकन तांब्यातून पाणी शिंपडलं..... आई भानावर आली....अग काय झालं तुला....काही नाही ग, परसात जाऊन आले आणि चक्कर आली....कळायच्या आत जमिनीवर... देवा, असं कसं ग करून चालेल? तू खाल्लं नव्हतं का काही, धाप लागत्ये का? काय होतंय? मला मेलीला काय होणार ८३ व्या वर्षी....साधी चक्कर आली ग, बराच वेळ पाणी नव्हतं प्यायलं..... आज निर्जळा एकादशी आहे ना.....माझी अर्धी लाकडं गेली....लेकीने तिच्या तोंडावर हात ठेवून पुढचे शब्द बोलू दिले नाहीत, तिन्ही सांजेला वाईट बोलू नये हे तूच शिकवलं ना मला....तिला खुर्चीवर बसवलं, गुळाचा खडा आणि पाणी दिलं....आईला बरं वाटलं... आई म्हणाली, हे सगळं ठिके पण तू का आलीस?..... लेकीने कपाळावर हात ठेवला....सगुणा घरी आली नाही, तुझ्या दारात घास घ्यायची वाट बघत उभी होती, तू आली नाहीस, ती इथेच ठिय्या देऊन उभी.... ती घरी आली नाही, म्हणून मी बघायला आले....तर उभी तुझी दुसरी लेक.... आईच्या डोळ्यात पाणी आलं...हातात घास घेऊन, दोघी बाहेर आल्या....घास भरवला, सगुणाला चक्क मिठी मारली...तू थांबलीस म्हणून माझी लेक आली आणि मी वाचले हो.... सगुणाने गळयातल्या घंटेचा आवाज केला... #माझा कट्टा
संजीवन समाधी म्हणजे योगमार्गाच्या द्वारे स्वेच्छेने, जाणीवपूर्वक आणि ध्यानधारणेच्या गहन अवस्थेतून आपले नश्वर शरीर सोडण्याची एक प्राचीन प्रथा आहे. ही एक उच्च दर्जाची योगिक क्रिया आहे जिथे योगी आपल्या प्राणशक्तीवर पूर्ण ताबा मिळवून, देहातून बाहेर पडतो आणि मृत्यूच्या पारंपरिक मार्गांपेक्षा वेगळ्या मार्गाने आपल्या अस्तित्वाला विराम देतो. संत ज्ञानेश्वर महाराज यांनी आळंदी येथे संजीवन समाधी घेतली होती, हे याचे सर्वात प्रसिद्ध उदाहरण आहे. संजीवन समाधीची वैशिष्ट्ये: जाणीवपूर्वक देहत्याग: संजीवन समाधी ही एक जाणीवपूर्वक घेतलेली क्रिया आहे, जो मृत्यू नाही. योगी आपल्या इच्छेने देह सोडतो. योगमार्गाचा सर्वोच्च बिंदू: या अवस्थेपर्यंत पोहोचण्यासाठी योगाच्या मार्गावर पूर्ण प्रभुत्व मिळवणे आवश्यक असते, जिथे प्राणशक्तीवर पूर्ण नियंत्रण मिळवता येते. ध्यानावस्था: ही प्रक्रिया सखोल ध्यानधारणेच्या अवस्थेतून होते, जिथे योगी स्वतःला ईश्वराशी एकरूप करतो. अलौकिक क्रिया: ही एक अत्यंत दुर्मिळ आणि अलौकिक क्रिया मानली जाते, जी केवळ काही निवडक योग्यांनाच शक्य होते. उदाहरणे: संत ज्ञानेश्वर महाराजांची आळंदी येथील संजीवन समाधी ही या क्रियेचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे, #श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा
श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा - शरदिंदुमनोद्यांगम् कमलायतलोचनं!पद्मासन स्थितं वंदे ज्ञानदेवं पुनःपुनः! ! शरदिंदुमनोद्यांगम् कमलायतलोचनं!पद्मासन स्थितं वंदे ज्ञानदेवं पुनःपुनः! ! - ShareChat
#श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा
श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा - । जय जय राम कृष्ण हरी || சPி संतश्रष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा माऊलींना त्रिवार वंदन! । जय जय राम कृष्ण हरी || சPி संतश्रष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा माऊलींना त्रिवार वंदन! - ShareChat
#श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा
श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा - ज्ञानश्वर माऊला 0 0 0 0 ೫ 0 =1^8 संजीवन समाधी सोहळा ज्ञानश्वर माऊला 0 0 0 0 ೫ 0 =1^8 संजीवन समाधी सोहळा - ShareChat
#श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा
श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा - सतशष्ठ ज्ञनिश्वर रहरज् रागाधी रोहळा च्या शुभेच्छा सतशष्ठ ज्ञनिश्वर रहरज् रागाधी रोहळा च्या शुभेच्छा - ShareChat
#श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा
श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा - जगदगुरूश्री संत ज्ञानेश्वर माऊली महाराज यांच्या ७२९ व्या संजीवन समाधी सोहळ्यानि सर्वं वारकरी भक्तांना मंगलमय शुभेच्छ। जगदगुरूश्री संत ज्ञानेश्वर माऊली महाराज यांच्या ७२९ व्या संजीवन समाधी सोहळ्यानि सर्वं वारकरी भक्तांना मंगलमय शुभेच्छ। - ShareChat
जागतिक दयाळूपणा दिन दरवर्षी १३ नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. या दिवशी जगभरातील लोक दयाळूपणाचे महत्त्व अधोरेखित करतात आणि इतरांशी प्रेमाने वागतात. या दिवसाची सुरुवात १९९८ मध्ये जागतिक दयाळूपणा चळवळीने केली होती, ज्यात अनेक देशांतील स्वयंसेवी संस्थांचा समावेश आहे. जागतिक दयाळूपणा दिनाबद्दल अधिक माहिती: सुरुवात: १९९८ मध्ये टोकियो येथे झालेल्या परिषदेत जागतिक दयाळूपणा चळवळीने या दिवसाची सुरुवात केली. उद्दिष्ट: सकारात्मक शक्ती आणि दयाळूपणाद्वारे लोकांना एकत्र आणणे आणि एक दयाळू जग निर्माण करणे हे या चळवळीचे उद्दिष्ट आहे. साजरे करणारे देश: अमेरिका, कॅनडा, जपान, इटली, ऑस्ट्रेलिया, नायजेरिया आणि संयुक्त अरब अमिराती यांसारख्या अनेक देशांमध्ये हा दिवस साजरा केला जातो. जागतिक दयाळूपणा सप्ताह: हा दिवस जागतिक दयाळूपणा सप्ताहाची सुरुवात करतो, जो १३ नोव्हेंबरपासून सुरू होऊन १८ नोव्हेंबरपर्यंत चालतो. #माझा कट्टा
माझा कट्टा - १३ नोव्हेंबर दयाळूपणा आरोग्यसंपन्न आयुष्य जगण्यासाठी मदत करतो , जागतिक दयाळू दिन १३ नोव्हेंबर दयाळूपणा आरोग्यसंपन्न आयुष्य जगण्यासाठी मदत करतो , जागतिक दयाळू दिन - ShareChat
*🌷‼️दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त प्रसन्न प्रभात समयी श्री गुरु दत्तात्रय दर्शनाने दिवसाची सुरुवात करुयात सुप्रभातम् 🌹 #भक्ती 🌹‼️🌷*
भक्ती - ShareChat