#🌞 Good Morning🌞
https://whatsapp.com/channel/0029Vb64N5p9sBI16v1P001d/433
#JKK_Weekly_News_Bulletin
माझंही मत;
काँग्रेस पक्ष आता नवे प्रवक्ते नेमणार...?;
ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!;
जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार - नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.
साधारणपणे प्रत्येक राजकीय पक्षाचा प्रवक्त हा त्या पक्षाचा चेहरा असतो असे म्हटले तरी वावगे ठरू नये. त्यामुळे प्रत्येक पक्षाचे अगदी विभाग स्तरावर प्रवक्ते हे असतातच. त्यातले अनेक प्रवक्ते हे आपल्याला सातत्याने वृत्तवाहिन्यांवर दिसत असतात.
काँग्रेस पक्षाचे अतुल लोंढे, अनंत गाडगीळ, सचिन सावंत, हनुमंत जगताप असे प्रवक्ते आपण नेहमी बघतो. मात्र पक्षाला ते सध्या पुरेसे वाटत नाहीत अशी माहिती कानावर आली आहे. त्यामुळेच पक्षाने आता पक्षाबाहेरचे पत्रकार आणि अभ्यासक प्रवक्ते म्हणून नेमायचा निर्णय घेतला असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे, नव्हे अशी कुजबुज कानावर आली आहे. त्यासाठी पक्ष लवकरच समाजमाध्यमांवर जाहिरातही देणार असल्याची माहिती कानावर आली आहे.
काँग्रेस पक्ष हा देशातला सर्वात जुना पक्ष म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या पक्षाला अतिशय समृद्ध अशी परंपरा आहे. या पक्षाचे अनेक नेते हे देशाला नेतृत्व देणारे असे नेते होते. ते अभ्यासू होते बहुश्रुत आणि हजरजबाबी देखील होते. त्यामुळे पक्षाची बरेच वर्ष एकहाती सत्ता राहिली.
मात्र गेल्या काही वर्षांपासून पक्ष घसरणीला लागलेला दिसतो आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत तर महाराष्ट्रात पक्षाला जेमतेम १६ जागा मिळाल्या. तिथे वाचकांना आठवण करून द्यायची आहे की १९७२ मध्ये वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना याच काँग्रेस पक्षाला विधानसभा निवडणुकीत २२३ जागा मिळाल्या होत्या. म्हणजे पक्षाची किती दयनीय अवस्था झाली आहे बघा.
म्हणूनच पक्षाने असे बाहेरून प्रवक्ते उधार घ्यायचे असे ठरवले असल्याचे कानावर आले आहे. खरे खोटे हर्षवर्धन सपकाळच जाणोत. मात्र हे खरे असेल तर पक्षाचे काही खरे नाही असेच म्हणावे लागेल.
याबाबतीत पक्षातीलच काही ज्येष्ठांना विचारले तेव्हा खाजगीत त्यांनी सांगितले की आजकाल आमच्या प्रवक्त्यांना काही बोलायला कामच राहिले नाही. कारण जे काही बोलायचे ते रोजच आमचे प्रदेशाध्यक्षच बोलून मोकळे होतात. मग आम्ही पत्रके तरी का काढायची आणि माध्यमांसमोर बोलायला तरी का जायचे असा प्रश्न प्रवक्ते खाजगीत विचारतात.
प्रस्तुत हा कोणत्याही संघटनेचा किंवा संस्थेचा प्रवक्ता हा माध्यमांशी संवाद साधण्यासाठीच असतो. कारण इतर मान्यवरांना वारंवार माध्यमांसमोर यायचे नसते. म्हणून मग ते काम प्रवक्तेच करत असतात. मात्र इथे हर्षवर्धन सपकाळच प्रवक्ते झालेले आहेत. त्यामुळे बाकी प्रवक्त्यांना काही कामच उरले नाही.
तरीही हर्षवर्धन सपकाळ यांना वाटते की नवी प्रवक्त्यांची फौज उभी केली पाहिजे. त्यासाठी पक्षात वर्षानुवर्ष झिजलेली जुनी खोडे काही कामाची नाहीत. आता नवीनच रक्त आणले पाहिजे. म्हणूनच त्यांनी असे नवे पत्रकार आणि अभ्यासक प्रवक्ते म्हणून आणायचा निर्णय घेतला असावा असा निष्कर्ष काढायला हरकत नाही.
मात्र काहीही झाले तरी हे असे प्रवक्ते काही पक्षाशी एकरूप झालेले राहणार नाहीत. ते आज इथे तर उद्या तिथे असेच राहतील, आणि ते कितपत इमानदारीने तुमच्या पक्षाचे प्रतिमा संवर्धन करतील हा देखील संशोधनाचाच विषय असेल.
तरीही हर्षवर्धन सपकाळ असे नवे प्रवक्ते आणून त्यांना प्रशिक्षण देऊन माध्यमांसमोर सोडण्याच्या विचारात आहेत. त्यासाठी त्यांना शुभेच्छा तर द्यायलाच हव्यात ना.. त्याने तरी पक्षाची प्रतिमा सुधारावी आणि २०२९ मध्ये पक्षाच्या जागा सोळा वरून किमान ३२ वर तरी जाव्या अशी आशा करायला काही हरकत नाही..
अर्थात हे माझे मत झाले...
तुमचे मतही तुम्ही मांडू शकता....
#JKK_Weekly_News_Bulletin
बॉम्बे अडल्ट एज्युकेशन असोसिएशनच्या सरचिटणीसपदी श्री. राजन चाचड यांची नियुक्ती
जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार - नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.
मुंबई : फोर्ट, मुंबई येथील बॉम्बे अडल्ट एज्युकेशन असोसिएशन (BAEA) या ९२ वर्षांहून अधिक परंपरा असलेल्या प्रतिष्ठित संस्थेच्या सरचिटणीसपदी श्री. राजन चाचड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सन १९३६ मध्ये (नोंदणी क्र. F-153 BOM) ब्रिटिश काळात स्थापन झालेली ही संस्था प्रौढ शिक्षण व कौशल्य विकास क्षेत्रात अग्रणी राहिली आहे. गेल्या अनेक दशकांपासून या संस्थेने जर्मन, फ्रेंच, स्पॅनिश व मराठी अशा विविध परदेशी व भारतीय भाषांचे दर्जेदार अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले असून, उत्कृष्ट अध्यापन व विद्यार्थी-केंद्रित वातावरणामुळे संस्थेला विशेष प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे.
संस्थेचे मुख्यालय काळा घोडा, फोर्ट, मुंबई येथील के. आर. कामा हॉल या वारसाहक्काच्या इमारतीत स्थित आहे. तसेच, भायखळा येथील जेरबाई बाग येथे दोन मजली ग्रंथालय व वाचनालय कार्यरत असून, येथे २०व्या शतकापासूनचे विविध पुस्तके, कादंबऱ्या व संशोधनपर साहित्याचा समृद्ध संग्रह उपलब्ध आहे.
नवीन नेतृत्वाखाली संस्थेच्या शैक्षणिक उपक्रमांचा विस्तार करण्याचे नियोजन करण्यात आले असून, त्याअंतर्गत लवकरच मराठी संभाषण (स्पोकन) भाषा अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत.
प्रवेश व अधिक माहितीसाठी इच्छुकांनी संपर्क साधावा : ९८९२७३५६२२
#🌞 Good Morning🌞
https://youtube.com/shorts/XEMVkjgGoyI?si=nWHn-ghR83HdQe5u
#🇮🇳 देशभक्ति
संस्थात्मक आठवणी : सचिन तेंडुलकर आणि लोकभवन
उमेश काशीकर यांचे मनोगत !!
जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार - नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.
सचिन तेंडुलकर आणि मलबार हिल येथील महाराष्ट्र लोकभवनाच्या आठवणींचा धांडोळा घेऊ गेल्यास त्या स्वातंत्र्यपूर्व काळात घेऊन जातात. आता त्या कश्या?
तर सन १९८८ साली मुंबईत झालेल्या हॅरिस शिल्ड आंतर शालेय स्पर्धेत सचिन तेंडुलकर व विनोद कांबळी यांनी ६६४ धावांची ऐतिहासिक भागीदारी केली होती.
ज्या लॉर्ड हॅरिस यांच्या नावाने 'हॅरिस शिल्ड' स्पर्धा खेळली जाते, ते मुंबई प्रांताचे ब्रिटिश गव्हर्नर जॉर्ज हॅरिस हे १८९० -१८९५ ही पाच वर्षे आज लोकभवन उभे असलेल्या 'गव्हर्नमेंट हाऊस' येथे वास्तव्यास होते !
*हात बँडेज मध्ये*
सन १९९४ साली सुनील गावस्कर यांना मुंबईचे नगरपाल (Sheriff of Bombay) म्हणून नियुक्त करण्यात आले होते. त्यावेळी राजभवनातील दरबार हॉल येथे झालेल्या शपथविधी सोहळ्यामध्ये सुनील गावस्कर यांना राज्यपाल डॉ पी सी अलेक्झांडर यांनी पदाची शपथ दिली होती.
या शपथविधीला मुख्यमंत्री शरद पवार उपस्थित होते तसेच निमंत्रितांमध्ये आंतरराष्ट्रीय पटलावर उदयाला आलेले सचिन तेंडुलकर हे देखील होते. अलेक्झांडर यांचे मागे उभे असलेले पोलीस एडीसी म्हणजे अलीकडेच निवृत्त झालेले पोलीस महासंचालक विवेक फणसाळकर !
सचिन तेंडुलकर यांच्या हाताला त्यावेळी इजा झाली होती व हात बँडेजमध्ये होता. या कार्यक्रमानंतर सचिनने बँडेजवर इतर उपस्थित खेळाडूंच्या सह्या घेतल्या होत्या, असे जुने लोक सांगतात.
*राष्ट्रपतींचे चहापान*
दिनांक २ एप्रिल २०११ रोजी वानखेडे स्टेडियमवर भारताने श्रीलंकेला हरवून विश्वचषकावर आपले नाव कोरले होते. त्याच्या दुसऱ्या दिवशी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी संपूर्ण भारतीय क्रिकेट संघाला चहापानासाठी राजभवन येथे निमंत्रित केले होते.
या कौतुक सोहळ्याला राज्यपाल के शंकरनारायणन, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, केंद्रीय मंत्री शरद पवार, केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. अर्थात सोहळ्याचा केंद्रबिंदू होते सचिन तेंडुलकर !
*संस्मरणीय छायाचित्र* !
दिनांक १९ डिसेंबर २०१४ रोजी राज्यपाल सी विद्यासागर राव व सचिन तेंडुलकर यांच्या उपस्थितीत 'मिड-डे'चे छायाचित्रकार अतुल कांबळे यांना 'यस बँक - पिक्चर ऑफ द इयर' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. वानखेडे स्टेडियमवर खेळलेल्या आपल्या शेवटच्या सामन्यामध्ये खेळ संपवून पॅव्हिलियनमध्ये परत जात असताना अतुल कांबळे यांनी हे प्रसिद्ध छायाचित्र काढले होते.
*पर्यावरण प्रेमी सचिन*
दिनांक १७ सप्टेंबर २०१७ रोजी राजभवन येथे 'नद्या वाचवा' या विषयावर 'रॅली फॉर रिव्हर्स' व वृक्ष लागवड परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेला राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांसह सचिन तेंडुलकर देखील उपस्थित होते.
*एक्झाम वॉरियर सचिन*
दिनांक २७ जानेवारी २०१८ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांनी परीक्षांना धैर्याने कसे तोंड द्यावे या दृष्टीने लिहिलेल्या 'एक्झाम वॉरियर्स' या पुस्तकाच्या मराठी आवृत्तीचे प्रकाशन राजभवन येथे झाले होते. या कार्यक्रमाला राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जैन इरिगेशनचे अनिल जैन व सचिन तेंडुलकर उपस्थित होते.
*रिलॅक्स मूड मधील सचिन*
सचिन तेंडुलकर यांनी राज्यपाल विद्यासागर राव यांची व करोना काळात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची देखील राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली होती.
*राष्ट्रपती कोविंद व सचिन*
दिनांक ११ फेब्रुवारी २०२२ रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नव्याने बांधण्यात आलेल्या दरबार हॉलचे उदघाटन करण्यात आले. या दिवशीच सचिन तेंडुलकर यांनी राष्ट्रपती कोविंद यांची राजभवन येथील अतिथीगृहात भेट घेतली होती.
*लोकप्रिय सचिन*
सचिन तेंडुलकर राजभवन - आता लोकभवन - येथे येणार समजले की येथील कर्मचारी - अधिकारी सचिन सरांसोबत एक तरी फोटो मिळावा यासाठी उत्सुक असतात. येथील अनेकांकडे सचिन सोबतचे फोटो आहेत. सर्वांकडून सचिन सरांना हार्दिक शुभेच्छा !!
#🌞 Good Morning🌞
माझंही मत....;
हर्षवर्धन सपकाळांनी अभ्यास करून बोलणेच उचित ठरेल...;
ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार - नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.
एक काळ असा होता की काँग्रेसमध्ये नेते सुद्धा अभ्यास करून बोलायचे. कोणतेही हवेत विधान करणारे नेते काँग्रेसमध्ये नव्हते. मला आठवते स्वर्गीय वसंतराव नाईक, वसंतराव साठे, शंकरराव चव्हाण, वसंत दादा पाटील, डॉ. श्रीकांत जिचकार, यशवंतराव चव्हाण, विठ्ठलराव गाडगीळ या नेत्यांची भाषणे ऐकणे ही एक पर्वणी असायची. कोणत्याही विषयाचा साद्यंत अभ्यास करून ते बोलायचे. ना बुडखा ना शेंडा असे निराधार वक्तव्य हे करायचे नाहीत.
मात्र आज परिस्थिती बदलली आहे. आज काँग्रेसचे नेते तोंडाला येईल ते बोलतात. मग त्यात तथ्य आहे की नाही हे ते कधीही बघत नाहीत. बोलण्यापूर्वी अभ्यास करून यावे हे तर त्यांच्या गावीही नसते.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काल महिला आरक्षण विधेयक संदर्भात एक पत्र परिषद घेतली. त्यात बोलताना त्यांनी टीका केली की नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाला महिलांना संसदेत आरक्षण द्यावे असे वाटते, तर त्यांची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर्वोच्च पद असलेल्या सरसंघचालकपदावर महिलेला का नेमले जात नाही? आणि त्यासाठी भाजप का आग्रह धरत नाही?
हर्षवर्धन सपकाळ यांनी अशाच आशयाचे विधान वर्षभरापूर्वी देखील केले होते. त्यावेळी मी माझ्या "घ्या समजून राजेहो" या स्तंभातून त्यांना उत्तर देखील दिले होते. अर्थात त्यांना वाचन करण्याची सवय नसावी. अभ्यासाची तर त्याहून नसावी. त्यामुळे ते त्या भानगडीत पडले नाहीत आणि पुन्हा त्यांनी तेच विधान केले आहे.
इथे एक बाब स्पष्ट करायची आहे की मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कोणताही पदाधिकारी नाही, किंवा प्रवक्ता तर बिलकुलच नाही. मात्र संघाचा एक अभ्यासक आणि पत्रकार या नात्याने मी माझे मत इथे मांडतो आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना १९२५ साली झाली. ही सुरुवात तरुणांनी आणि बालांनी दररोज एक तास येऊन विविध खेळ खेळावे आणि त्या माध्यमातून त्यांच्यात सौहार्द निर्माण व्हावे, तसेच चर्चांमधून देशभक्तीचे बीज पेरले जावे, या अपेक्षेतून करण्यात आली होती. त्या काळात थोड्याही वयात आलेल्या मुली मुलांबरोबर मैदानावर खेळायला जाणे हे कौटुंबिक आणि सामाजिक दृष्ट्या सुद्धा निषिद्ध मानले जात होते. त्यामुळे महिलांना संघात येऊ देणे शक्य नव्हते. तसे केले असते तर नवा सामाजिक वाद निर्माण झाला असता. म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही फक्त बाल तरुण आणि ज्येष्ठांचीच संघटना राहिली.
मात्र त्याचवेळी संघ त्यांच्या स्वयंसेवकांच्या माध्यमातून कौटुंबिक संबंध प्रस्थापित करत होताच. त्यातूनच अनेक कुटुंबातील मातृशक्तींना असे वाटू लागले की ज्याप्रमाणे बाल आणि तरुणांसाठी अशी संघटना आहे, त्याचप्रमाणे बालिका, तरुणी आणि महिलांसाठी देखील संघटना व्हावी. त्यासाठी वर्धेच्या मावशी केळकर पुढे आल्या आणि त्यांनी संघ संस्थापक डॉक्टर हेडगेवार यांच्याशी चर्चा करून संघाच्याच धर्तीवर महिलांसाठी राष्ट्र सेविका समितीची स्थापना केली. मावशी केळकर यांचे चरित्र आणि समकालीन संघ साहित्य याच्या नोंदी सापडतात. ही संघटना देखील हळूहळू वाढली आणि आज ती देखील संघासारखीच देशव्यापी झालेली आहे. आज संघाचे स्वयंसेवक ज्या हिरीरीने सामाजिक कार्यात अग्रेसर असतात, त्याच हिरीरीने राष्ट्रसेविका समितीच्या सेविका देखील सक्रिय असतात. देशाची फाळणी झाली तेव्हा हजारो हिंदू महिलांना अत्याचाराला सामोरे जावे लागले होते. त्यांच्या मदतीसाठी देशातून राष्ट्रसेविका समितीच्या कित्येक सेविका सीमावर्ती भागात सक्रिय झाल्या होत्या. राष्ट्रसेविका समितीला सुरुवातीला संस्थापक मावशी केळकर त्यांच्यानंतर उषाताई चाटी मग प्रमिलाताई मेढे आणि आता शांताक्का या प्रमुख संचालिका म्हणून नेतृत्व देत आहेत.
आज राष्ट्रसेविका समिती ही संघाच्याच बरोबरीने देशहिताच्या रक्षणासाठी कार्यरत आहे, आणि संघ विचारांवरच तिचे कार्य सुरू आहे. अशावेळी संघाच्या सरसंघचालक पदी महिला असावी असा हट्ट हर्षवर्धन सपकाळ यांनी धरावा? हा त्यांचा पोरकटपणाच म्हणावा लागेल.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही केवळ संघटना नाही तर तो एक विचार आहे. आणि तोही राष्ट्रभक्तीने प्रेरित झालेला विचार आहे. त्यामुळेच या विचाराने प्रेरित झालेले स्वयंसेवक या संघटनेने घडवले, आणि ही संघटना आज १०१ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. मात्र जे संघात गेले आणि संघात रुळले त्यांनाच हा विचार समजला आहे. अन्यथा बाकीच्यांची अवस्था एक हत्ती आणि सात आंधळे या कथेतल्या सात आंधळ्यांसारखी झालेली आहे. त्यामुळेच मग हर्षवर्धन सपकाळ यांच्यासारखे अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले नेते अभ्यास न करता संघाबाबत तोंडाला येईल ते विधान करत असतात आणि स्वतःला हास्यास्पद ठरवून घेतात.
अर्थात हे माझे मत झाले.......
तुमचे मत मांडायला तुम्हाला मोकळीक आहेच.......
#JKK_Weekly_News_Bulletin
https://youtube.com/shorts/XEMVkjgGoyI?si=nWHn-ghR83HdQe5u
#🌞 Good Morning🌞
जेव्हा मुख्यमंत्री तुमची चौकशी करतात....
ज्येष्ठ मुक्त पत्रकार, लेखक व निवेदक वसुंधरा काशीकर, पुणे यांचे मनोगत
जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार - नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.
पुणे हे समाजसुधारकांचं आणि स्वातंत्र्य सैनिकांचं शहर म्हणून भारतात प्रसिद्ध आहे, पुणे हे आयटीचं शहर आणि पूर्वेचं ऑक्सफर्ड म्हणून पण प्रसिद्ध आहे. तसंच गेल्या काही वर्षात ते चितळ्यांच्या बाकरवडीसाठीही प्रसिद्ध पावलं आहे.
परवा पुण्यातील रांजे गावात चितळे बंधू मिठाईवाले यांच्या व्हिजन पार्कचं उद्घाटन होतं. २५ एकर अशा विस्तीर्ण जागेवर उभारलेल्या या व्हिजन पार्कवर संपूर्ण यंत्रचलित असं बाकरवडी, मिठाई आणि स्नॅक्सचं उत्पादन होणार आहे. याआधी इथेच बाकरवडीचं मशीनद्वारे उत्पादन होत होतंच पण आता वाढती मागणी बघता त्यांनी हे दुसरं उत्पादन युनिट उभारलं आहे.
१९७६ साली मूळ गुजराती असलेला बाकरवडी हा पदार्थ त्यात आपला महाराष्ट्रीयन पुडाची वडीचा काही भाग घेऊन एक नवीनच बाकरवडी हा पदार्थ राजाभाऊ चितळे यांनी बनवला. त्यांच्या कल्पनेतल्या पहिल्या बाकरवडीची रेसीपी घरी त्यांची वहिनी कै.सौ विजया चितळे आणि पत्नी कै. सौ. मंगला चितळे यांनी तयार केली. मग ती ग्राहकांसाठी बाजारात आणली गेली. हा पदार्थ ग्राहकांच्या फारच पसंतीस पडला. वाढता वाढता वाढे अशी ग्राहकांची मागणी वाढू लागली..रोज ७०० किलो बाकरवडीचं उत्पादनही पुरेना. तेव्हा त्यांनी मशीनने बाकरवडीचं उत्पादन करायचं ठरवलं पण अर्थातच चवीत कुठलीही तडजोड न करता…
मग मशीनची शोधाशोध सुरू झाली अर्थातच अशी कुठलीही मशीन बाजारात नव्हती मग तशी जाहिरात देण्यात आली. एक डच कंपनी त्यांच्याशी संपर्क साधला. कंपनीने पाठवलेल्या पत्रात म्हटलं होतं की, आम्ही बाकरवडी तयार करण्याचं मशीन तयार करण्याचा प्रयत्न करु. या प्रयत्नाचे १० लाख रुपये लागतील. मशीन तयार करण्यात आम्ही अयशस्वी ठरलो तरी १० लाख परत केले जाणार नाही. राजाभाऊ आणि रघुनाथराव चितळे या बंधुद्वयांनी विचार केला की काय करावं..कंपनी अयशस्वी झाली तर १० लाख गेले. आज २०२६ साली सुद्धा १० लाखाची किंमत किती आहे तर १९९० च्या दशकात ती किती असेल आपण कल्पना करु शकतो...
पण उदयोजक आणि इतर माणसं यात फरक हा आहे की, उदयोजक धोका पत्करतो. हा जुगार रघुनाथरावांनी आणि राजाभाऊंनी खेळायचं ठरवलं. आणि डच कंपनीशी करार केला. पुढे काही दिवसांनी कंपनीचं पत्र आलं की बाकरवडी तयार करणारी मशीन त्यांनी बनवली आहे. तीची ट्रायल घ्यायला या या तारखेला तुम्हाला यायचं आहे. पण थांबा कथा इथे संपत नाही...इथून पुढे सुरू होते...
राजाभाऊंचे सुपुत्र संजय उर्फ गोविंद चितळे आणि त्यांचे चुलतभाऊ अनंत नेदरलँडला गेले. युरोपातला देश वेळेचं महत्व म्हणून सकाळी नऊची वेळ दिली होती त्याच्या पंधरा मिनिटं आधीचं ते पोहोचले. पण नऊ वाजले, साडे नऊ वाजले, दहा वाजले, साडे दहा वाजले तरी कोणी येण्याची चिन्ह नाहीत. यांनी परत तारीख वेळ ठिकाण चेक केलं. सर्व काही तेच होतं. बरोबर होतं. तेवढ्यात एक माणूस धापा टाकत आला. त्याने जी बातमी दिली ती पायाखालची जमीन सरकवणारी होती. तो म्हणाला, की मशीन झाली होती पण ती फेल गेली. त्यात बिघाड आलाय. ती बाकरवडी तयार करु शकत नाही. संजयची त्यांचा चुलतभाऊ दोघं स्तब्ध झाले, हतबुद्ध झाले...१० लाख पाण्यात गेले होते, शिवाय भारतातून युरोपात जाण्यायेण्याचा खर्च वेळ सर्वच वाया गेलं होतं. तेवढ्यात त्यांच्या चुलतभावाला काय सुचलं तो म्हणाला कारखान्यात आम्हाला मशीन बघू तर दया. ते दोघं कारखान्यात गेले. त्यांनी मशीन चेक केली. आणि शेवटचा प्रयत्न केला. आणि मशीन सुरू झाली आणि बाकरवडी तयार करु लागली....प्रयत्ने वाळूचे...
तर अशी ही बाकरवडीच्या यांत्रिक उत्पादनाची कथा...आज चितळे बंधू मिठाईवाले रांजे इथल्या पार्कमध्ये ६० टन म्हणजे ६० हजार किलो बाकरवडीचं उत्पादन करतात.
३५ देशांमध्ये चितळे बंधूंची मिठाई, मोदक, स्नॅक्स, बाकरवडी जाते. गुणवत्ता आणि सचोटी ही चितळ्यांची वैशिष्ट्य...
चितळ्यांच्या पुणे आणि भिलवडी दोन्ही कंपन्यांनी सर्वात जास्त इन्कमटॅक्स भरल्याचा रेकॉर्ड आहे. शिवाय चितळ्यांची ग्राहकांप्रतीची बांधिलकी कमाल कमाल कमाल आहे. तब्येतीला हानीकारक अशा पाम तेलाचा बहुतांश कंपन्या वापर करत असताना चितळे मात्र १०० टक्के शेंगदाणा तेल आणि शुद्ध तुपाचा वापर आपले उत्पादन तयार करताना करतात.
त्यांनी ग्राहकांसाठी खास अशा हाताने तयार केलेल्या प्रिमीयम मिठाया तयार केल्या आहेत. ज्यांची आधी ऑर्डर दयावी लागते....१९५० साली १०० स्क्वेअर फूट जागेपासून सुरू झालेला हा प्रवास आज २५ एकर पर्यंत पोहोचला आहे. प्रवास म्हणण्यापेक्षा ८७ वर्षांची ही इमानाची यात्रा आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.
या कार्यक्रमाचं निवेदन करताना खूपच छान वाटलं अर्थातच. वेळ कमी असल्यानं चितळे बंधू मिठाईवाले यांच्या तिसऱ्या पिढीचे श्री. श्रीकृष्ण चितळे यांचं भाषण रद्द झालं. माझ्यावरही तणाव होताच. कारण मुख्यमंत्र्यांना लगेच पुढे दुसरा कार्यक्रम होता. ऑलरेडी कार्यक्रम उशीरा सुरू झाला होता. अशावेळी आपण ठरवलेली स्क्रिप्ट कापावी लागते किंवा खूप बदलावी लागते. परत निर्णय घेणे...जे जबाबदारीचं आणि तणावाचही असतं.
आता मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत इतक्या कार्यक्रमांचं निवेदन झालंय की त्यांना माझा चेहरा ओळखीचा झालाय. यावेळी कार्यक्रम संपल्यावर आवर्जून मुख्यमंत्र्यांनी विचारलं..काय म्हणते, कशी आहेस...
प्रश्न साधाच आहे पण तो कोण विचारतं हे महत्वाचं. मुख्यमंत्री राज्यातील सर्वात ताकदीचं पद..एका सर्वसामान्य निवेदकाची दखल घ्यायची त्यांना काय गरज....पण इथे त्यांचं माणूसपण, विनम्रता आणि humility दिसते. मी म्हटलं छान आहे..आणि आम्ही एक फोटो काढला...
निवेदन करताना किती माणसं भेटतात, किती किस्से आणि प्रसंग...वक्तृत्व या कलेबद्दल आणि ती माझ्या वडिलांनी मला शिकवली तेव्हा वडिलांबद्दल मी कृतज्ञच राहू शकते...
#🌞 Good Morning🌞
https://youtube.com/shorts/XEMVkjgGoyI?si=nWHn-ghR83HdQe5u
#JKK_Weekly_News_Bulletin
माझंही मत;
नारीशक्ती वंदन विधेयकाचे राजकारण..;
ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार - नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.
शुक्रवारी १७ एप्रिल रोजी लोकसभेत महिला आरक्षणासाठी आणलेले नारीशक्ती वंदन विधेयक विरोधी पक्षाने फेटाळले. त्यावरून सध्या देशात दररोज राजकारण सुरू आहे. सत्ताधारी पक्ष सध्या विरोधी पक्षावर तुटून पडला असून देशाची अर्धी लोकसंख्या असलेल्या महिलांवर विरोधी पक्षाने राजकारणासाठी अन्याय केला आहे, असा आरोप करत आहे. त्याच वेळी विरोधक मात्र हे सत्ताधाऱ्यांचे राजकारण असल्याचा आरोप करत आहेत. तुम्हाला महिला आरक्षणाची इतकीच काळजी होती, तर हे विधेयक २०२३ मध्येच लोकसभेने पारित केले होते. ते तसेच लागू का केले नाही? फेरसिमांकनासाठी पुन्हा विधेयक का आणले? असा सवाल विरोधक उपस्थित करत आहेत.
देशातील भाजप सरकारने महिलांना लोकसभा आणि राज्यातील विधानसभा मध्ये ३३ टक्के आरक्षण दिले जाईल असे त्यांच्या जाहीरनामातच वचन दिले होते. त्यानुसार त्यांनी २०२३ मध्ये या संदर्भातील विधेयक पारित देखील करून घेतले. मात्र त्यानंतर हे विधेयक जनगणनेनंतर लागू केले जावे, त्याचबरोबर आधी फेरसिमांकन करून घेतले जावे, त्या योगे मतदारसंघांची पुनर्रचना करावी आणि मग हे विधेयक लागू करावे असा निर्णय झाला होता.
आज देशात ५४३ लोकसभा मतदारसंघ आहेत. हे १९७१ च्या जनगणनेच्या आधारावर गठीत केलेले मतदार संघ आहेत. त्यावेळी देशाची लोकसंख्या सुमारे ५६ कोटी इतकी होती. म्हणजे एका मतदारसंघात सरासरी दहा लाख मतदार असायचे. आज देशाची लोकसंख्या १४४ कोटीच्या वर गेली आहे. हे बघता 543 मतदार संघात संघाचा हिशोब लावल्यास प्रत्येक मतदारसंघात जवळजवळ 30 लाख मतदार येतात. हा मुद्दा लक्षात घेत मतदार संघाचे फेरसिमांकन करणे गरजेचे होते. यापूर्वी २००७/०८ या दरम्यान देशात मतदार संघ पुनर्रचना झाली होती. त्यानंतर ती झालीच नव्हती. २००७ /८ मध्ये जी फेररचना झाली, तिच्यात मतदारसंघ तेवढेच ठेवले होते. हे मुद्दे लक्षात घेत मतदार संघाचे फेरसिमांकन केले जाणे आणि मतदारसंघांची संख्या वाढवणे हे गरजेचे होते.
मात्र विरोधी पक्ष या फेरसिमांकनाची गरजच काय अशी ओरड करत आहे. एक खासदार तीस लाख नागरिकांना पुरेसा पडणार आहे का याचाही विचार त्यांनी करायला हवा.
फेरसिमांकनाचे हे विधेयक नेमके पाच राज्यांच्या निवडणुका असतानाच आणले गेले. त्यामुळे हे विधेयक पारित करून घेऊन सत्ताधाऱ्यांना मतदारांवर प्रभाव टाकायचा होता असा आरोप विरोधक करत आहेत. मात्र इथे माझे मत वेगळे आहे. क्षणभर मान्य केले की सत्ताधाऱ्यांना याचा फायदा घ्यायचा होता. पण आज ते विधेयक फेटाळल्यामुळे सत्ताधाऱ्यांना तुमच्या नावाने ओरड करायला आयतीच संधी मिळाली आहे. त्याचा जास्त फायदा सत्ताधारी आत्ताच घेत आहेत. शुक्रवारी विधेयक फेटाळले गेले. लगेचच भाजपच्या महिलांनी संसदेबाहेर विरोधकांसमोर निदर्शने केली. दुसऱ्या दिवशी शनिवारी पंतप्रधान मोदींनी राष्ट्राला उद्देशून भाषण केले, आणि त्यात विरोधकांना पार धुवून काढले. नंतर प्रत्येक प्रचार सभेतही ते विरोधी पक्ष आणि विशेषतः काँग्रेस पक्ष कसा महिला विरोधी आहे, हेच पटवून सांगत आहेत. तितका आक्रमक प्रचार आज विरोधी पक्ष करताना दिसत नाहीत. शिवाय आता देशभर भाजप याच मुद्द्यावर आंदोलन उभे करतो आहे. महाराष्ट्रातून एक कोटी महिलांच्या सह्यांचे निवेदन तयार केले जाणार आहे. आज प्रस्तुत लेख लिहीत असतानाच मुंबईत भाजपच्या महिलांनी विशाल मोर्चा काढल्याची माहिती आहे. इतरत्र देखील असे आयोजन केले जात आहे. काल मुंबई महापालिकेत सर्व भाजप शिवसेना नगरसेवक काँग्रेसचा निषेध करण्यासाठी काळे कपडे घालून निषेधाच्या घोषणा देत सभागृहात आले होते. एकूणच सत्ताधारी आता विरोधक आणि त्यातही काँग्रेसच्या विरोधात वातावरण तापवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करत आहेत.
भाजपला फेरसिमांकन करून आपल्या सोयीचे मतदारसंघ करून घ्यायचे आहे असा आरोप विरोधक करत आहेत. आतापर्यंत काँग्रेसने तरी काय केले? त्यांनी देखील आतापर्यंत आपल्या सोयीनेच मतदारसंघ बनवून घेतले होते आणि त्या जोरावर दीर्घकाळ ते सत्ता मिळवत होते. मग आता भाजपने आपल्या सोयीचे मतदारसंघ केले तर तुमच्या पोटात का दुखावे, याचेही उत्तर काँग्रेसने द्यायला हवे.
२०२३ मध्ये महिला आरक्षण विधेयक पारित झाले होते. त्यामुळे फेरसिमांकन न करता ते लागू करायचे तर ५४३ पैकी ३३ टक्के म्हणजे १७९ जागांवर महिला खासदार येतील. आज एका लोकसभा मतदारसंघात 30 लाखाच्या आसपास नागरिक राहणार आहेत. त्यामुळेच फेरसिमांकन करून लोकसभा क्षेत्रांची संख्या वाढवायची असा प्रस्ताव आधीचाच होता. फेरसिमांकन करायचे तर जनगणना आवश्यक असते. २०२०/२१ मध्ये जनगणना व्हायला हवी होती. मात्र कोरोनामुळे ती होऊ शकली नव्हती. त्यामुळे यंदा केंद्र सरकार जनगणना करून घेत आहे. ती प्रक्रिया आता सुरू झालेली आहे. यानंतर लगेचच फेरसिमांकन केले जाईल. शासकीय आकड्यानुसार विद्यमान लोकसंख्येचा आवाका लक्षात घेता लोकसभेत ८५० लोकसभा क्षेत्र राहतील. जर ८५० लोकसभा क्षेत्र झाले, तर त्यात ३३ टक्के म्हणजे जवळजवळ २८१ क्षेत्र महिलांसाठी राखीव राहतील. म्हणजेच १०२ महिलांना संसदेत येण्याची अतिरिक्त संधी उपलब्ध होणार आहे.
मात्र विरोधक याकडे दुर्लक्ष करत आहेत. कारण त्यांना कसेही करून राजकारण करायचे आहे आणि सत्ताधाऱ्यांना बदनाम करायचे आहे.
मात्र या देशातील जनता आता सुजाण झाली आहे. विरोधकांचे हे महिला विरोधी धोरण देशातील नारीशक्ती निश्चितच लक्षात ठेवेल यात शंका नाही. त्यामुळे इथेही विरोधकांसाठी धोक्याची घंटा ठरू शकते हे त्यांनी लक्षात घ्यायला हवे.
*अर्थात हे माझे मत झाले......*
*तुमचे मत देखील तुम्ही मांडू शकताच.....*









