⛳ आजचे ऐतिहासिक शिव'कालीन दिनविशेष ⛳
📜 १ फेब्रुवारी इ.स.१६७६
छत्रपती शिवरायांनी पाली गावचा तंटा मिटवला.
कान्होजी खराडे आणि काळभर यांच्या वादातील न्यायाची बाजू कोणती हे शिवाजी महाराजांना माहीत होते. या वादाचा निकाल १ फेब्रुवारी १६७६ रोजी पाली येथे शिवाजी महाराजांच्या उपस्थिीतच महजर झाला. त्यामध्ये खराडे यांनी रवादिव्य केले. त्यात ते खोटे ठरले आणि पाटीलकी काळभरांचीच आहे, असे सिद्ध झाले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🚩शिवराय #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🙏शिवदिनविशेष📜 #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1
शिव दिनविशेष Video Link🔗
https://youtu.be/Re_sO_rwRRg
📜 १ फेब्रुवारी इ.स.१६८३
शहजादा आज्जमशहाने छत्रपती संभाजी महाराजांच्या मुलखातील रहिमतपुरचे महादेवाचे देवालय जाऊन पाडून टाकण्याबाबत बादशहा औरंगजेबास हुकूम देण्याची विनंती केली. यावरून एक गोष्ट लक्षात येते की कोणतीही हिंदुंची देवळे पाडण्यासाठी बादशहाची संमती मिळवावी लागत असे.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 १ फेब्रुवारी इ.स.१६८९
माँसाहेबांचा छत्रपती शंभू बाळ, सह्याद्रिचा छावा कैद झाला...
मराठ्यांच्या इतिहासातील एक सर्वात काळा दिवस.
इ.स. १६८९च्या सुरुवातीला संभाजीराजांनी त्यांच्या महत्त्वाच्या सरदारांना बैठकीसाठी कोकणात संगमेश्वर येथे बोलावले. १ फेब्रुवारी, इ.स. १६८९ रोजी बैठक संपवून संभाजीराजे रायगडाकडे रवाना होत असतानाच त्यांचा मेहुणा गणोजी शिर्के आणि औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान यांनी संगमेश्वरावर हल्ला केला. या कारवाईसाठी गणोजी शिर्केने कमालीची गुप्तता बाळगली आणि सर्व कारवाईची आखणी खूपच काळजीपूर्वक केली. मराठ्यांत आणि शत्रूच्या सैन्यात चकमक झाली. मराठ्यांचे संख्याबळ कमी होते. प्रयत्नांची शर्थ करूनही मराठे शत्रूचा हल्ला परतवून लावू शकले नाहीत. शत्रूने संभाजीराजांना व त्यांच्यासोबत असलेल्या कवि कलश यांना जिवंत पकडले.
काळादेखील भयचकित करणारा ४० दिवसांचा तो रक्तरंजीत प्रवास .
देश धरम पर मिटने वाला। शेर शिवा का छावा था।। महापराक्रमी परम प्रतापी। एक ही शंभू राजा था।। तेज:पुंज तेजस्वी आँखें। निकल गयीं पर झुका नहीं।। दृष्टि गयी पण राष्ट्रोन्नति का। दिव्य स्वप्न तो मिटा नहीं।। दोनो पैर कटे शंभू के। ध्येय मार्ग से हटा नहीं।। हाथ कटे तो क्या हुआ?। सत्कर्म कभी छुटा नहीं।। जिव्हा कटी, खून बहाया। धरम का सौदा किया नहीं।। शिवाजी का बेटा था वह। गलत राह पर चला नहीं।। वर्ष तीन सौ बीत गये अब। शंभू के बलिदान को।। कौन जीता, कौन हारा। पूछ लो संसार को।। कोटि कोटि कंठो में तेरा। आज जयजयकार है।। अमर शंभू तू अमर हो गया। तेरी जयजयकार है।। मातृभूमि के चरण कमलपर। जीवन पुष्प चढाया था।। है दुजा दुनिया में कोई। जैसा शंभू राजा था ।।
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 १ फेब्रुवारी इ.स.१६८९
सरनौबत म्हालोजी घोरपडेंचे बलिदान
मराठा सरनौबत म्हालोजी घोरपडे यांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर सुद्धा 'छत्रपति संभाजी महाराज' संगमेश्वर येथे असताना मुघल सरदार शेखनजीब खानाच्या तावडीत सापडले. या लढाईमध्ये म्हालोजी घोरपडे धारातीर्थी पडले. ९ वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर शंभूराजे मुघलांच्या तावडीत सापडले होते. मराठ्यांच्या छत्रपतिला कैद करून आणले म्हणुन औरंगजेबाने शेखनजीब खानाला 'मुकर्रबखान' हा किताब दिला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
https://youtu.be/Re_sO_rwRRg
📜 १ फेब्रुवारी इ.स.१६८९
छत्रपती शंभूराजांना मुघलांनी कैद केले होते आणि स्वराज्याचा राज्यकारभार पुढे चालवण्यासाठी छत्रपती राजाराम महाराजांची निवड केली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 १ फेब्रुवारी इ.स.१८१४
ऑक्टोबर १८१३ मध्ये लोर्ड हास्टिंग्ज भारतात दाखल झाला. भारतातील स्थितीचा त्याने आढावा घेतला. मराठा राजमंडळातील सरदार पुन्हा एकत्र यायच्या प्रयत्नात आहेत व तुळसाबाईही त्यात सामील आहे हे त्याच्या लक्षात आले. होळकरांचे सैन्य त्याही काळात सर्वांत अधिक प्रबळ होते. बाजीरावावर अन्य सरदारांचा विश्वास नसला तरी पेशवेपदाचा मान होताच. त्यामुळे १ फेब्रुवारी १८१४ च्या पत्रात त्याने लिहिले कि ब्रिटिश साम्राज्याच्या सुरक्षिततेसाठी मध्य भारतात तातडीने असंतोष चिरडून टाकला पाहिजे. होळकर तसेच अन्य संस्थानिकांच्या सैन्याचा मुख्य आधार म्हणजे पेंढारी. त्यामुळेच ही इंग्रजांनी त्यांच्याहीविरुद्ध कारवाया करण्याचे निर्णय घेतले. पण यात होळकर, शिंदे आणि अमिरखान मोडता घालून मोठ्या प्रमाणावर बंड करतील अशी भितीही त्यांना वाटत होती. त्यामुळे त्यांनी कटकारस्थानाचाच वापर करायचा निर्णय घेतला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇
☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम ||
|| जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
⛳ आजचे ऐतिहासिक शिव'कालीन दिनविशेष ⛳
📜 ३१ जानेवारी इ.स.१६६३
(फाल्गुन शुद्ध २, द्वितीया, शके १५८४, संवत्सर शुभक्रृत, वार शनिवार)
वेदमूर्ती नारो पाध्ये यांचे वतन सुरू ठेवले. महाराजांना कल्याणकारी राज्य निर्माण करायचे होते त्यामुळे साधूसंतांना कुठल्याही प्रकारची तोशीस लागता कामा नये यावर त्यांचा नेहमीच कटाक्ष राहिला. वतन मात्र कोणालाही देण्यात येत नसले तरी धार्मिक क्षेत्रातील वतने महाराजांनी पूर्वीप्रमानेच चालू ठेवली. संगमेश्ववरचे वेदमूर्ती नारो पाध्ये बीन अंतो पाध्ये आणि केसो पाध्ये हे महाराज शृंगारपुरी येथे मुक्कामी असताना त्यांना भेटले आणि त्यांच्या वतनाविषयी राजा सत्तेश्वर व तुरुकांच्या कारकिर्दित दिलेले ज्योतिष व देशोपाध्येपणाचे ताम्रपट आणि वतनाचे कागद दाखवून अर्ज सादर केला. त्यांनी महाराजांना धार्मिक बाब म्हणून सदर वतन पूर्वीप्रमाने चालू ठेवावी अशी विनंती केली. महाराजांनिही धार्मिक बाब म्हणून हे वतन चालू ठेवण्यास मान्यता देऊन शामराजपंत पेशव्यांना आदेश देऊन शिक्क्यानिशी वतनाचे पत्र दिले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1
शिव दिनविशेष Video Link🔗
https://youtu.be/NbSQ4ANlE3k
📜 ३१ जानेवारी इ.स.१७२८
श्रीमंत बाजीराव पेशवे चोपड्यानजीक तापी उतरून १८ डिसेंबर १७२७ रोजी पौष वद्य प्रतिपदेला कुकरमुंड्याजवळ कुसुंबी प्रांतात आले. तेथून निजामाच्या डोळ्यात धूळफेक करण्याच्या हेतूने बुऱ्हाणपूर जाळण्याची हूल उठवून दिली. अकस्मात बाबापाऱ्याचा घाट उतरून राऊ भडोचवर गेले. अंदाजे ३१ जानेवारीच्या दरम्यान अलीमोहन गाठले. कोणासही स्वप्नातही वाटणार नाही, अशी घोडदौड करून निजामाला निष्प्रभ करून त्याच्या प्रांताची धूळधाण उडवली. गुजरातमध्ये शिरताच सुभेदार सरबुलंदखान याला (निजामाचे आणि याचे आपसात वैर होते) असे भासवले की, निजाम आणि बाजीरावाच्या संयुक्त फौजा गुजरातेत सरबुलंदखानावर चालून येत आहेत. गुजरातेत यथेच्छ लुटालूट, जाळपोळ करून मराठी सैन्याने उच्छाद मांडला. पण बदनामी मात्र निजामाच्या वाट्याला आली. राऊसाहेबांच्या या कृतीमुळे निजाम भयंकर चिडला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ३१ जानेवारी इ.स.१७६०
यमुना नदीस महापूर आल्यामुळे मराठ्यांनी अंतर्वेदीतील स्वारी तहकूब केली. पुढे भाऊसाहेबाने व वजीर गाझिउद्यीनखान, बळवंतराव मेहेंदळे, मल्हारराव होळकर आणि जनकोजी शिंदे यांना दिल्लीस रवाना केले. या मराठा फौजेने दिल्लीस जाऊन, हल्ला करून दिल्ली शहर घेतले पण किल्ला घ्यायचा राहिला, त्यास मोच लाविले. किल्यात अबदालीने दि.३१ जानेवारी १७६० रोजी आपल्यावतीने नेमलेला दिल्लीचा सुभेदार वजीर शहावलीखान याचा चुलतभाऊ याकूबअलीखान हा आपल्या लोकासह होता. मराठ्यांनी मोर्चे कायम करून ते तोफांचा भडीमार सुरू केला त्यामुळे किल्यातील दिवाणी-इ-खास रंगमहाल, मोतीमहाल व शहाबुरुज या सुंदर इमारतींना तोफांच्या माऱ्यामुळे चिरा पडल्या. तेव्हा किल्यातील अबदालीचे लोक घाबरे होऊन कौल मागू लागले. सदाशिवराव भाऊ २९ जुलै रोजी दिल्लीस पोहोचले त्यानंतर २-३ रोज लढाई चालू होती. त्यात किल्लेदार याकूबचा निरुपाय होऊन त्याने मराठ्यांशी सुलुखाचे बोलणे सुरू केले. भाऊने त्याची शरणागती पत्करुन त्यास आपल्या मंडळीसह सुखरूप जाऊ दिले. तो यमुनेपलीकडील पटांगणावर अबदाली व नजीबखान यांच्या फौजेचा तळ पडला होता तेथे उतरुन गेला. दि. २ ऑगस्ट १७६० रोजी पातशाही किल्यात मराठ्यांचे ठाणे बसले. काही दिवसानी नारो शंकर यास भाऊने दिल्लीचा सुभेदार नेमले आणि बाळोजी पाळंदे यास सुभेदाराच्या हाताखाली किल्लेदार नेमले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ३१ जानेवारी इ.स.१७९३
दि. ३१ जानेवारी १७९३ रोजी श्रीमंत सवाई माधवराव पेशव्यांचे कुटुंब (पत्नी) रमाबाई या दीर्घ आजाराने मृत्यू पावल्या. त्यांना तीन-चार महिने ताप येत असताही कोणास निदान झाले नाही. यानंतर एक महिन्याच्या अवधीतच, दि. ३ मार्च १७९३ रोजी सवाई माधवरावांनी विजयदुर्गाच्या गोखल्यांची कन्या यशोदाबाई यांच्याशी लग्न केले. या लग्नसमारंभाच्या प्रित्यर्थ आणि दिल्लीच्या यशस्वी राजकारण्याच्या आनंदास्तव पर्वतीच्या डोंगरावर मोठी रोषणाई करण्यात आली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ३१ जानेवारी इ.स.१८००
मल्हारराव होळकरांच्या मृत्यूनंतर यशवंतराव पुण्याहून निसटले व जेजुरीस आले. जेजुरीचा खंडोबा हे त्यांचे कुलदैवत व त्यांस नमस्कार करून भटकत भटकत नागपूर भोसल्यांकड ते आले. त्यांस दौलतरावाच्या सांगण्यावरून
भोसल्यानी कैदेत टाकले. ते भोसल्यांच्या कैदेतून दिनांक ३१ जानेवारी १८०० रोजी सुटून धारच्या आनंदराव पवारांपाशी ३०० स्वारानिशी चाकरीस राहिले. पवारांचा दिवाण रंगराव ओढेकर दौलतरावाचे पक्षात होता. त्याने यशवंतरावाचा जम बसू दिला नाही. म्हणून यशवंतराव पवाराकडून निसटले. आणि तापी नर्मदेकांठच्या निबिड अरण्यांत भटकत त्यांनी भिल्ल सैन्य जमा केले. ह्याच वेळी त्यांस अति विश्वासू असा लाला भवानी शंकर हा साथी मिळाला. यावेळी त्यानी मीरखान पठाण व जुने सरदार यांस सामील करून घेऊन माळव्यांत लुटालूट करण्यास सुरुवात केली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ३१ जानेवारी इ.स.१८१९
वीर नोवसाजी मस्के नाईकांचे स्वातंत्र्य युद्धसमाप्ती -
हे नोवाहचे युध्द दिनांक ८ जानेवारी १८१९ ते ३१ जानेवारी १८१९ पर्यंत चालले. "१९ तारखेच्या रात्री १० वाजता नोवसाजीच्या सैन्यातील २०० घोडेस्वार अचानक आले आणि त्यांनी लष्करी छावणीच्या मागील बाजूस असलेल्या रक्षकावर गोळीबार केला. ते हल्ला परतवत होते, लेफ्टनंट सुथरलैंड यांनी त्वरित काही स्वार जमवून छोटे दल तयार केले, आणि काही मैलांपर्यंत त्यांचा पाठलाग केला, परंतु रात्रीच्या अंधारात ते दिसेनासे झाले."
निजामाच्या ५,००० सैन्याविरुद्ध हाटकरानी निकराचा लढा दिला होता. या संपूर्ण युद्धात हटकरांकडील ५०० अरब, ८० पेक्षा जास्त अतिजखमी आणि ४०० योद्धे शहीद झाले. तसेच, हैद्रबाद सरकारकडचे १८० सैनिक जखमी आणि २४ मारले गेले. जखमींमध्ये ६ युरोपीय अधिकारी होते. या युद्धात हटकरांना पराभव स्वीकारावा लागला. काही काळानंतर सर्व हटकर नाईकांना पकडून फाशीवर देण्यात आले. नोवसाजी यांना दगा करून पकडण्यात आले. ब्रिटिशांच्या दृष्टीकोनातुन हे युध्द इतके महत्त्वपूर्ण होते कि नंतर रेजिमेंटमध्ये युद्धाच्या विजयानंतर पदक वाटली गेली. ३१ जानेवारी १८१९ ला हाटकरांचे हे युद्ध संपल्याची माहिती मिळते.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇
☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम ||
|| जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀ #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩शिवराय
⛳ आजचे ऐतिहासिक शिव'कालीन दिनविशेष ⛳
📜 ३० जानेवारी इ.स.१६४२
शहाजी राजे कर्नाटकास जातात
माहुलीच्या पराभवानंतर शाहजी राजे रणदुल्लाखान सोबत विजापुरास गेले. त्यांना आदिलशाहकरिता काम करायला मिळणार होते पण कडक जाचाखाली. लगेच त्यांना रणदुल्लाखान बरोबर कर्नाटकात पाठवले गेले. शाहजी राजाच्या कर्नाटकातील कार्याची अजून फारशी माहिती उपलब्ध नाही. त्यांना कर्नाटकात पाठवल्यानंतरचे पहिले पत्र ३० जानेवारी १६४२ सालचे आहे व ते आदिलशाहने शाहजी राजांना लिहीले आहे.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🙏शिवदिनविशेष📜 #🚩शिवराय
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1
शिव दिनविशेष Video Link🔗
https://youtu.be/CC7rPBEPYqE
📜 ३० जानेवारी इ.स.१६५८
राजे शहाजीराजे यांना अदिलशहाने लिहीलेल्या पत्राची नोंद!
"तुमच्या अर्जाप्रमाणे अफजलखान मुहम्मदशाही यास कर्नाटकाची सुभेदारी मुद्दाम फर्माविली आहे. तरी तुम्ही त्याशी मिळून राज्यनिष्ठा प्रकट करावी. तुम्ही कर्तबगार व हुशार आहा. दोघे एकदिल झाला म्हणजे काम दुरुस्त होऊन येईल. तुम्ही मनपसंत राज्यनिष्ठा दाखवावी. खानास आम्ही असा आदेश दिला आहे की, तुमच्याशी मिळवून घेणे हे अतिशय आवश्यक आहे असे जाणून तुमचा सल्ला योग्य आहे असे समजावे. तुम्ही सर्वतर्हेने संतुष्ट राहून कर्नाटकाचे काम उत्तम तर्हेने पार पाडावे."
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ३० जानेवारी इ.स.१६८१
(माघ वद्य सप्तमी शके १६०२, रौद्र संवत्सर, वार रविवार)
सरनौबत हंबीरराव मोहीत्यांचा बुर्हाणपुरवर हल्ला!
बुर्हाणपुरचे विराणपुर !
बुऱ्हाणपूरवर प्रचंड हल्ला. बुऱ्हाणपूरचे विराणपुर बुऱ्हाणपूर या कील्याविषयी "एन ए अकबरी" या ग्रंथात खूप चांगल्या नोंदी वाचावयास मिळतात. त्यात हे शहर आदिलशाह पहिला याच्या कारकिर्दित वैभवाचा उत्तुंग शिखरावर होते. पुढे हे शहर मोघलांनी जिंकून घेतले आणि मोघली कारकिर्दित बुऱ्हाणपूर आर्थिक भरभराटीने यशोशिकरवर होते. अत्यंत संपन्न असे हे शहर बुऱ्हाणपूरचे विराणपुर करण्याची योजना छत्रपती संभाजी महाराज आणि सरसेनापती हंबीरराव मोहिते यांनी आखली. प्रचंड लूट करून मराठे ज्या पावली आले त्या पावली खानजहानला चकवा देवून चोपडामार्गे तडक साल्हेरलाही पोहचले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ३० जानेवारी इ.स.१६८१
(माघ वद्य ७, सप्तमी, शके १६०२, रौद्र संवत्सर, वार रविवार)
छत्रपती संभाजी महाराजांच्या कारभाराने त्रस्त झालेल्या गव्हर्नरचे पत्र!
गोव्याच्या गव्हर्नरचे अर्थात आंतेनियू पाईद द सांद याने कोकणच्या सुभेदारास पत्र लिहिले आहे. त्यात तो म्हणतो की, छत्रपती संभाजीराजे व आपले राज्य यांच्यामधे शांतता व सलोखा नांदावा अशी आपण इच्छा व्यक्त केली. परंतु आपणास हे माहीत असेल की, आमच्या या प्रांतात छत्रपती संभाजी महाराजांचे अधिकारी, त्यांच्या अनिर्बंध अरेरावी मुळे प्रस्तुत शांतता व सलोखा टिकणे कठीण झाले आहे. हा तह आहे का? असा प्रश्न मला पडला असून त्यापेक्षा युद्ध परवडले कारण मिळमिळीत तहापेक्षा युद्ध बरे' अशा आशयाची तक्रार या गव्हर्नरने केली आहे. यावरून तहानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या अधिकाऱ्यांनी पोर्तुगीज गोवा प्रांत व कोकण प्रांत यावर चांगलाच दबाव ठेवला होता.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ३० जानेवारी इ.स.१६८२
(फाल्गुन शुद्ध २, द्वितीया, शके १६०३, दुर्मती संवत्सर, वार सोमवार)
हसनअलीचा कल्याण भिवंडीवर हल्ला.
छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रखर हल्ल्यामुळे हसनअलीची बिनीची फळी कोलमडून पडली. त्यातच नवीन येणाऱ्या रसदीचा मार्ग छत्रपती संभाजी महाराजांनी रोखून धरल्याने हसनअलीच्या मोगल सेनेचे, बोकड कापावेत असे पठाण कापले जावू लागले. त्यामुळे शेवटी अगतिक होऊन हसनअलीला माघार घ्यावी लागली. पुन्हा मराठ्यांची सत्ता कल्याण-भिवंडीवर प्रस्थापित झाली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
https://youtu.be/CC7rPBEPYqE
📜 ३० जानेवारी इ.स.१७१५
कान्होजी आणि सिद्दी यांमध्ये तह
सातारकर छत्रपतींची कोकणची जहागीर मोगलांपासून सुरक्षित राखण्याची जबाबदारी छत्रपती पहिले राजाराम यांनी सिधोजी घोरपडे यांचेवर सोपविली होती, परंतु हे जोखमीचे काम घोरपडे पार पाडू शकले नाही आणि पुढे ही जवाबदारी कान्होजींवर आली. मोगलांच्या जुलमापासून मुक्त केलेल्या कोकणातील जहागिरीला राजमुद्रेची संमती मिळाली, म्हणून कान्होजी आंग्रे यांचे समाधान झाले; तर आपले हितसंबंध राखण्यासाठी आपला एक कर्तबगार प्रतिनिधी आपण कोकणासाठी मिळविला, असे समाधान शाहू छत्रपतींना झाले. १७१३ मध्ये कान्होजींना जो प्रदेश दिला गेला त्यात सिद्दीचा काही प्रदेश दिला गेला होता यामुळे कान्होजी आणि जंजिरेकर सिद्दी यांचे युद्ध झाले. सिद्दीचे परिपत्य करण्यासाठी कान्होजींना इ. स. १७१३ ते १७१५ पर्यंत खूप परिश्रम करावे लागले. अखेर ३० जानेवारी १७१५ मध्ये कान्होजी आणि सिद्दी यांमध्ये तह झाला त्यात
१. मामलत तळे व गोरेगाव, गोवेळ व निजामपूर या महलांवर आंग्रे यांना एक हजार रुपये कर मिळाला. तळेपैकी ८००, गोरेगाव ६००, गोवळ १०००, तर्फ निजामपूर १७५ मिळून रुपये २५७५ पैकी १००० रूपये कान्होजींना मिळाले.
२. तर्फ नागोठणे, अष्टमी पाली, आश्रेधार पेटा व अंतोणे यांतील निम्मा वसूल कान्होजींनी घेण्याचे ठरले. या तहाने आपली सत्ता कमी झाली हे शल्य जंजीरेकराचे मनात सलत राहिले आणि त्याने कान्होजींचा पराभव करण्यासाठी मुंबईकर इंग्रजांची मदत घेण्याचा उपक्रम केला, इंग्रजांनी मदत केली देखील परंतु कान्होजी पुढे त्या दोघांचे काही चालले नाही.
सुरतपासून दक्षिणेकडे गोव्यापर्यंत त्यांचे अनिर्बंध वर्चस्व होते.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ३० जानेवारी इ.स.१७३३
शाहू महाराजांनी कै. संभाजी राजांच्या व्रुन्दावनाची झाडलोट, स्वच्छता, तसेच निगा राखण्याकरिता गोपाल ढगोजी मेगोजी यांना ३० जानेवारी १७३३ रोजी सनद दिली.
माघ वद्य ११ छ २४ साबान
शके १६५४ सु।। सलास (सलासीन)
मंगळवार (३० जानेवारी, सन १७ मया व अलफ
राजमंडळ इनाम –
गोविंद गोपाल ढगोजी
मेगोजी हे मौजे वढू त।। (तर्फ) पा
बल येथे राहुन कैलासवासी
यांचे वृंदावनापासी राहुन
झाडलोट करिताती या
करिता जफर मजकुरास मौजे
मजकूर पैकी पड जमीन
छ२४ शाभान सन सलास
जमिन बिघे
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ३० जानेवारी इ.स.१७९१
पोर्तुगीज सैन्याचे टीपू सुलतानकडून किल्ले सदाशिवगडाचा ताबा घेतला. बहुधा टीपू सुलतानचे आणि पोर्तुगिजांचे आतून सूत जमल्यामुळे रक्ताचा एक थेंबही न सांडता टीपूने किल्ले सदाशिवगडावरील आपली कबज सोडली असावी.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ३० जानेवारी इ.स.१९४८
महात्मा गांधी पुण्यतिथी
दिल्लीच्या बिर्ला भवनच्या बागेतून लोकांबरोबर फिरत असतांना गांधीजींची गोळी मारून हत्या करण्यात आली. नथुराम गोडसे यांनी ट महात्मा गांधी यांची हत्या करण्यासाठी बरेटा मॉडेलचे पिस्तूल वापरले होते.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇
☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम ||
|| जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀ #🗿शिवकालीन पुराणवस्तू #📜इतिहास शिवरायांचा
⛳आजचे ऐतिहासिक शिव'कालीन दिनविशेष⛳
📜 २९ जानेवारी इ.स.१६७०
(माघ वद्य ३, त्रृतीया, शके १५९१, संवत्सर सौम्य, वार शनिवार)
मराठ्यांनी किल्ले सुलतानगड सर केला.
औरांगजेबाच्या धर्माधतेच्या रोज वेगवेगळ्या कहाण्या छत्रपती शिवरायांच्या कानावर येत होत्या. संपूर्ण हिंदुस्तान औरांगजेबाच्या धर्मांधतेच्या विखारी मांडवाखाळून जात असता, मराठी मनगटे शिवशिवली नसती तर नवल होते. महाराजांनी याच सुमारास मोगली प्रदेशावर आक्रमणाची मोहीमच उघडली... याच वेळेस मराठ्यांच्या २० हजार सैन्याने बागलाणात येऊन, धुमाकूळ घालायला सुरुवात केली. औरंगजेबास हे चोख प्रत्युत्तर होते... याच वेळी मराठ्यांनी सुलतान गडाला वेढा घालून किल्लेदार फतहुल्लाखान याला ठार मारले आणि गड जिंकून घेतला. मराठी मनगटाची ताकद काय असते याचा प्रत्यय औरंगजेबास आला!
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🚩शिवराय #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1
शिव दिनविशेष Video Link🔗
https://youtu.be/REPSRW2BWV0
📜 २९ जानेवारी इ.स.१६७८
( माघ वद्य द्वादशी, शके १६००, संवत्सर कालयुक्त, बुधवार )
शिवराय आजोबा झाले :-
शृंगारपुरी संभाजीराजांना कन्यारत्न झाले. शिवरायांनीच तिचे नाव भवानी ठेवले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २९ जानेवारी इ.स.१६८७
बादशहा औरंगजेबाच्या सैन्याचे डेरे कलारसला लागले. हैद्राबादच्या किल्ल्यापासून २ मैल अंतरावर डेरे लागले. मोर्चे बांधण्याला सुरूवात झाली. किल्ल्याच्याभोवती कुतुबशाही सैन्य होते. औरंगजेबाने त्यांच्यावर हल्ला करण्याचा हुकुम दिला. कुलीमखान हा आगीच्या डोंबातून दरवाजाजवळ पोहोचला आणि त्याला तोफेचा गोळा लागला. त्याचा हात जायबंदी झाला. मग तो डेर्यात परतला. बादशहाने असदखानाला त्याला पाहण्यासाठी पाठविले. ३ ते ४ दिवसांनी म्रृत्यूने त्याच्यावर झडप घातली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २९ जानेवारी इ.स.१७८८
वाडीकर सावंत आणि पोर्तुगीज यांच्यात तह! "वाडीकर सावंत आणि पोर्तुगीज यांच्यामध्ये ९१ कलमी मैत्रीचा करार होऊन वाडीकर सावंतांने पोर्तुगिजांचे मांडलिकत्व पत्करले."
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇
☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम ||
|| जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती विमान दुर्घटनेत अपघाती मृत्यू #👉शरद पवार #🏛️राजकारण #🗞देवेंद्र फडणवीस #💥राज ठाकरे #🔺भाजपा
⛳आजचे ऐतिहासिक शिव'कालीन दिनविशेष⛳
📜 २८ जानेवारी इ.स.१६४५
( माघ शुद्ध नवमी, शके १५६६, संवत्सर तारण, मंगळवार )
बाबाजी गुजरांचा चौरंगा :-
आजपासून ३७५ वर्षापूर्वी एक अशी घटना घडली कि पुन्हा कोणाचीही हिम्मत झाली नाही कुठल्याही आई-बहिणीकडे नजर वाकडी करून पाहण्याची ....... पण आज आमच्याकडे आज कुठलीही आई, बहिण, मुलगी, पत्नी हि सुरक्षित नाही. खूप विचार करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज डोक्यावर घेऊन नाचू नका, पण त्यांचे विचार डोक्यात घेऊन कार्य करण्याचा प्रयत्न करा.
!! २८ जाने १६४५ !!
!! रांझ्याच्या पाटलाची गोष्ट ही सर्वश्रुत आहे. रांझे गावचा पाटील बाबाजी गुजर याने गावकीतल्याच एका गरीब शेतकऱ्याच्या तरूण मुलीला दिवसाढवळय़ा सर्वासमक्ष पळवून तिच्यावर बलात्कार केला, अब्रुच्या भीतीने तीने जीव दिला! सारा गांव हळहळता पण मुकाच राहिला!.. पण छत्रपती शिवरायांच्या कानी ही गोष्ट आली. ते सालं होतं १६४५ आणि शिवरायाचं वय होत केवळ पंधरा वर्षे परंतु या वयातही छत्रपती शिवरायांनी मुजोर बाबाजी गुजरला पकडून आणले. खटला चालवून बाबाजी गुजर या पाटलांचा चौरंगा केला. चौरंगा करणे एक हात पाय कलम करणे, विचार करा ही शिक्षा जर आजच्या काळात अमंलात आणली तर काय होईल! परंतु याच शिक्षेमुळे साऱ्याच मावळ खोऱ्यावर एक प्रकारची दहशत बसली. रयत लहानग्या छत्रपती शिवरायांवर अक्षरश: खुश झाली. स्त्रियांच्या अब्रु रक्षणाबाबत जर छत्रपती शिवराय असे धोरण अवलंबत असेल तर त्यांच शिवबांसाठी रयत काहीही करायला तयार झाली. छत्रपती शिवरायांचे वय १५ वर्षांचे पण त्यांच्या याच न्याय स्वभावामुळे अनेक मराठे त्यांच्या फौजेत नुसते सामीलच झाले नाही तर मरायला सिद्ध झाले. कारण ज्यांच्या पाठबळावर राजांनी राज्य करायचं त्या वतनदार, पाटील, देशमुख आदी मंडळीची सुद्धा गय न करता त्यांना शिक्षा करायची धमक शिवरायांच्या ठायी होती.
याच दिवशी रांझ्याच्या पाटलाला शिक्षा दिली गेली आणि इथूनच एका क्रांतीची सुरूवात झाली.. !!
!! चला तर मग छत्रपती शिवरायांना मानाचा त्रिवार मुजरा
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩शिवराय
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1
शिव दिनविशेष Video Link🔗
https://youtu.be/y8u2sfpeqCU
📜 २८ जानेवारी इ.स.१६६०
२८ जानेवारी १६६० या दिवशी खान औरंगाबादहून निघाला. खानासोबत ७७००० घोडदळ, हत्ती बकसर, तिरंदाज, बरखंदाज, आड़हत्यारी, बाजारबुणगे, दारूगोळा, बाणांच्या भांडत्या, आरबा, उंटांचा तोफखाना, पायदळाची तर गणतीच नाही! असे अमर्याद सैन्य, बेमोहिन रुपे, होन, मोहरा, ऐसे ३२ कोटी द्रव्य घेऊन खान रजियावारी चालून आला, खानची स्वारी म्हणजे जणू कलयुगाच्या रावणाचीच खानासोबत असलेले उत्तम आघाडीचे पदाती घेऊन सरदार अंबिकानगर वरून पुरंदर ,शिरवळ कडे निघाला. एवढं सैन्य घेऊन येतोय म्हणजे तो शांततेत आला नाही. नासधूस करतच चाललेला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २८ जानेवारी इ.स.१६६४
मुघलांनी सुरतेच्या या लुटीची हाय खाल्ली. ही बातमी ऐकून अनेक जण दिड्मूढ झाले. औरंगजेब सुन्न झाला. पोर्तुगीज, इंग्रज, फ्रेंच, डच यांनी मोठमोठी बातमीपत्रे आपापल्या राजांकडे पाठवून दिली. रेव्ह. जॉन एस्कॅलियट याने २८ जानेवारी १६६४ रोजी सर टॉमस ब्राऊन यांना लिहिलेल्या एका पत्रात शिवाजी महाराजांचे वर्णन आले आहे. पत्रात लिहिले आहे,
kk .., His person is decribed them who have seen him to bee of meane stature, lower some what then I am, errect and of an excellent proportion, active in excerisise, and when ever hee speaks seems to smile, a quicke and peercing eye, and whitter than any of his people...!ll
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २८ जानेवारी इ.स.१६७१
( माघ वद्य द्वादशी, शके १५९२, संवत्सर साधारण, बुधवार )
सोनाजी गुजर यास पाटीलकीची सनद :-
पुरंदर मुक्कामी असताना महाराजांनी सोनाजी गुजर यास रांझे गावच्या पाटीलकीची सनद दिली. त्याच्याच भावकीतल्या बाबाजी गुजर यास मात्र शिवरायांनी बदअमल केल्याच्या आरोपावरून त्याचा चौरंगा केला होता.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २८जानेवारी इ.स.१६८१
बुऱ्हाणपूरवर छापा...
छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवर दोनदा छापा टाकला हे आपल्याला माहित आहे. त्याच प्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांनी महाराष्ट्राच्या बाहेर जावून मध्य प्रदेशातल्या बुऱ्हाणपूर वर छापा टाकला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
https://youtu.be/y8u2sfpeqCU
📜 २८ जानेवारी इ.स.१६८४
केजविनने आपल्या इंग्लंडच्या राजाला लिहीलेल्या पत्राची नोंद! "छत्रपती संभाजी महाराजांनी करंजा व एलेफंटा ही बेटे घेतली. खरोखर ती मुळ इंग्लंडच्या मालकीची होती.जवळ जवळ ४० मैलांचा प्रदेश छत्रपती संभाजी महाराजांनी पादाक्रांत केला. तहाची बोलणी सुरू झाली. जवळ जवळ ६ महिने मराठे चौलवर लढत होते. "
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २८ जानेवारी इ.स.१७३४
श्रीमंत बाजीराव आणि मस्तानी या दोघांचा एकुलता एक मुलगा म्हणजे समशेर बहाद्दर यांचा जन्म २८ जानेवारी १७३४ ला झाला, त्याचे मूळ नाव कृष्णसिंह, पण नंतर मामाच्या नावावरून ठेवलेले समशेर नाव प्रचलित झाले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २८ जानेवारी इ.स.१७६०
तुळाजी आंग्रेंचा पराभव झाल्यानंतर पेशव्यांनी ऑक्टोबर १७५६ मध्ये इंग्रजांशी तह केला व त्या तहाने इंग्रजांना बऱ्याच व्यापारी सवलती मिळाल्या, तसेच बाणकोटचा किल्ला व त्याच्या आजूबाजूची गावे इंग्रजांना मिळाली. सन १७६०, २८ जानेवारीस पेशव्यांनी सिधीचा पराभव करून उंदेरी घेतली. त्यामुळे पेशवे व आंग्रे यांचे अलीबाग तालुक्याच्या उत्तरेकडील पूर्व पश्चिम पट्टीतील गावे आंग्रे व पेशवे यांच्या संयुक्त अंमलाखाली आली. सन १७६० मध्ये पेशव्यांचा पहिला सुभेदार नारो तिरमल हा उंदेरी व जयदुर्ग येथे राहू लागला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇
☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम ||
|| जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
⛳ आजचे ऐतिहासिक शिव'कालीन दिनविशेष ⛳
📜 २७ जानेवारी इ.स.१६५८
छत्रपती शिवरायांनी "माहुलीचा किल्ला उर्फ भंडारगड" जिंकून स्वराज्यात आणला.
ठाणे जिल्ह्यात आसनगावजवळ एक गडाचे त्रिकुट आहे (माहुली, पळसगड आणि भंडारगड). १४८५ च्या सुमारास हे ठिकाण नगरच्या निजामशाहीचा संस्थापक मलिक अहमद याच्याकडे आले. नंतर शहाजी राजे निजामशाहीचे संचालक झाल्यावर मुघल सेना आणि आदिलशाही संयुक्तपणे निजामशाही बुडवण्याचा प्रयत्न करत होत्या. १६३५ च्या सुमारास शहाजीराजेंनी कठीण परिस्थितीत बळकट आश्रयस्थान म्हणून शिवनेरी, जुन्नर-पुणेहून जिजाबाई राणी आणि बाल शिवबासह माहुलीला मुक्काम हलवला. खानजमानने त्यावेळी माहुलीला वेढा दिला. शहाजीराजेंनी पोर्तुगीजांकडे मदत मागितली पण त्यांनी नकार दिला. त्यावेळी शहाजीराजेंनी शरणागती पत्करली. शिवाजी महाराजांनी हा किल्ला २७ जानेवारी१६५८ ला मोघलाकडून परत मिळवला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #📜इतिहास शिवरायांचा #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩शिवराय
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1
शिव दिनविशेष Video Link🔗
https://youtu.be/UwtjlIO1TCw
📜 २७ जानेवारी इ.स.१६६७
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल २७ जानेवारी १६६७ च्या एका पत्रात पोर्तुगीज व्हॉइसरॉय लिहतो :
"धुर्तपणा, चातुर्य, पराक्रम, चपलता आणि लष्करी बुध्दी ह्या बाबतीत शिवाजीची तुलना करायची झाल्यास ती सिझर आणि सिकंदर ह्याच्याशी करावी लागेल. तो नाही अशी एकही जागा नाही तो सबंध आशियाशी युध्द करीत आहे."
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २७ जानेवारी इ.स.१६८०
(माघ शुद्ध ६, षष्ठी, शके १६०१, संवत्सर सिद्धार्थी, वार मंगळवार)
उंदेरीवर पुन्हा आरमारी युद्ध!
पहाटे छत्रपती शिवरायांच्या आरमारी तुकडीने पुन्हा उंदेरीसाठी सिद्धी बरोबर तुंबळ युद्ध आरंभले. दौलतखानाच्या नेतृत्वात सुमारे ३० जहाजे व शेकडो सैनिकांनी उंदेरीवर पुन्हा एकदा एल्गार मांडला. या युद्धात सिद्धीचे तसेच मराठ्यांच्या आरमाराचेही बरेच नुकसान झाले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
https://youtu.be/UwtjlIO1TCw
📜 २७ जानेवारी इ.स.१६८४
सुमारास क्रृष्णा नदीच्या काठावर मराठे सैनिकांच्या एका तुकडीची युद्ध करण्याची तयारी चालू होती. अचानकपणे खानजान बहादूर व त्याचा मुलगा हे मराठ्यांवर तुटून पडले. अनेक लोक मारले गेले. बायकामाणसे कैद झाली. अखबारात खोट्या बातम्या दिल्या जात असत ह्याचे हे एक उदाहरण आहे. "मराठे सैनिक लढाईवर आपल्या बायकांना कधीही येत नसत."
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇
☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम ||
|| जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
⛳ आजचे ऐतिहासिक शिव'कालीन दिनविशेष ⛳
📜 २६ जानेवारी इ.स.१६७१
( माघ वद्य एकादशी, शके १५९२, संवत्सर साधारण, गुरुवार )
शंभुराजांना स्वतंत्र राज्यकारभार सोपवला :-
शंभुराजांना चौदावे वर्ष सुरू झाले होते. अंगापिंडाने मजबूत असणारे शंभूराजे यांना लष्करी विद्ये बरोबरच राज्यकारभार देखील यायला हवा या हेतूने सदरेवर बसवून कारभार चालविण्यास सांगितले.
शंभूराजांच्या मदतीस महादजी यमाजी यांना त्यांचे मुतालिक म्हणून नेमून, कारभाराची जाण येण्यास आजच्या दिवशी सुरवात केली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🚩शिवराय #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1
शिव दिनविशेष Video Link🔗
https://youtu.be/80h9PtSyTD0
📜 २६ जानेवारी इ.स.१६८०
१६७६ मध्ये जंजिऱ्यात आणखी एक क्रांती झाली सिद्दी संबूळ आणि सिद्दी कासिम यांच्यामध्ये संघर्ष होऊन सिद्दी कासिमने आरमाराची सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली. तेव्हा सिद्दी संबूळने छत्रपती शिवाजी महाराजांकडे मदतीची याचना केली. जंजिऱ्यावर अधिपत्य निर्माण करण्याची ही एक सुवर्णसंधी चालून आली होती. परंतु सिद्दी कासिम याला मुघल आणि इंग्रज यांच्याकडून सतत कुमक मिळत असल्यामुळे त्यांनी सिद्दी संबूळला दाद दिली नाही. अशाप्रकारे सिद्दी आणि मराठे यांच्यात संघर्ष चालू असताना खांदेरी-उंदेरी प्रकरण उद्भवले. १६७९ मध्ये खांदेरी बेटावर तटबंदी बांधण्याचे काम शिवाजी महाराजांनी सुरू केले. तेव्हा सिद्दी कासीमने जानेवारी १६८० मध्ये खांदेरीजवळ असलेले उंदेरी बेट ताब्यात घेऊन शिवाजी महाराजांना विरोध सुरू केला. मराठ्यांचा आरमार प्रमुख दौलतखान यांनी २६ जानेवारी १६८० रोजी २००० फौजेनिशी उंदेरीवर हल्ला केला. परंतु सिद्दी कासीमने एवढा जबरदस्त प्रतिकार केला की दौलतखान यांना माघार घ्यावी लागली. उंदेरी सिद्दींच्याच ताब्यात राहिल्यामुळे खांदेरीवर नियंत्रण ठेवणे त्यांना सोपे झाले. अशा प्रकारे सिद्दी विरुद्ध संग्रामात मराठ्यांना माघार घ्यावी लागली. सिद्दींना यश येण्याचे प्रमुख कारण म्हणजे मुघल आणि इंग्रज यांच्याकडून मिळणारी मदत हेच होय. विशेष म्हणजे सिद्दींनी आरमारी सामर्थ्याप्रमाणे तोफखान्याचे सामर्थ्यही मोठे वाढविले होते. आधुनिक पद्धतीच्या लांब पल्ल्याच्या तोफा सिद्दीकडे होत्या त्यामुळे मराठ्यांना वारंवार माघार घ्यावी लागली सिद्दी मराठा संघर्ष पुढेही चालूच राहिला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २६ जानेवारी इ.स.१६८०
२६ जानेवारी १६८० रोजी दौलत खानाचा उंदेरीवर हल्ला झाला, तो फसला. या विषयी इंग्रजी पत्रातील उल्लेख असा
"Dowlett caun came out with all vessels, assaulting Henry in three places and had 3000 men to land, but the suddy beate him off with the loss of four men and seven wounded; but the news from chaul is that Dowlett caun hath received great damage, hath killed outright 200 men, and about 100 more wounded and hath lost several vessels. Shivajee's people have brought a gun to tull that reached to Hendry, but hath done the suddy noe great harme, and the suddy has guns that reacheth to the maine which hath killed several"
२६ जानेवारी च्या पहाटे दौलतखान आपले संपूर्ण आरमार घेवून उन्देरीवर चालून आला व मोठे युद्ध सुरु झाले याच दरम्यान रसदेने भरलेल्या २० होड्या खांदेरीला गेल्या. इंग्रज आणि मराठे यांचे वकील तहासाठी बराच कथला करीत होते आणि उभाय्पाक्षांना मान्य होईल अशी तहाची कलमे करण्यात ते व्यस्त होते. शिवाजीराजांच्या वतीने चौलचा सुभेदार हे प्रकरण सांभाळीत होता. त्याच्या सोबत सुरनवीस अण्णाजी दत्तो यांना पाठवण्यात आले होते. इंग्रजातर्फे राम शेणवी दुभाषी व मध्यस्थीचे काम करीत होता व निर्णय मुंबई व सुरत दोन्हीकडील अधिकारी मिळून घेत होते. दिनांक २८ जानेवारीला उभय पक्षांना यश आले आणि तहाची कलमे ठरली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २६ जानेवारी इ.स.१६८३
छत्रपती संभाजी महाराज व अकबर यांचे पारिपत्य करण्याचे औरंगजेबाच्या प्रयत्नांच्या यशापयशाविषयी इंग्रज वखारवाल्यांच्या नोंदी! पत्रात सुरतकर इंग्रज मुंबईकर इंग्रजांना लिहितात: "जमिनीवरून बादशहा औरंगजेब आपल्या मोठ्या सैन्यानिशी छत्रपती संभाजी महाराजांवर फार जोराने चढाई करीत आहे आणि समुद्रमार्गाने ह्या भागात कोणी पाहिले नाही इतके मोठे आरमारही छत्रपती संभाजी महाराजांच्या मुलुखावर झडप घालीत आहे." "परंतु छत्रपती संभाजी महाराज मोगलांना फार जड जातील यात शंका नाही".
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
https://youtu.be/80h9PtSyTD0
📜 २६ जानेवारी इ.स.१७४०
दि. २६ जानेवारी १७४० या दिवशी नानासाहेबांनी मस्तानीला पर्वतीच्या बागेत कैद केले. नानासाहेबांनी लगेच चिमाजीआप्पांना घडलेले सारे पत्राद्वारे कळवले आहे. नाना लिहितात, "मस्तानीस बागास बोलावून कैद
केली. कोणी हत्यार धरिले नाही. रात्री घरास घेऊन जाऊ. मग घरी ठेवावेसे जाले तर स्वामींचे (आप्पांचे) लिहिल्याप्रमाणे बंद करून ठेवू अथवा चोरून दहा माणसे बरोबर देऊन कोथळागड (घनगड) येथे भलते जागा पाठवू. स्वामींनी राऊंचा जीव जतन करावा..." यानंतर मात्र नानासाहेबांनी मस्तानीला शनिवारवाड्यातल्या तिच्याच महालात नेऊन भवताली चौक्या बसविल्या. नंतर चिमाजीआप्पा पैठण येथे बाजीरावांपाशी गेले. यावेळेस
बाजीराव आणि चिमाजीआप्पा यांच्यात मस्तानीबद्दल अनेक वाद झाले असावेत, असे वाटते. आप्पांनी राऊंना समजावण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण बाजीरावांना ते काही पटले नाही. शेवटी नाईलाजाने बाजीरावांची तब्येत जपण्यासाठी चिमाजीआप्पांनी मस्तानीला कैदेतून सोडून बाजीरावांकडे रवानगी करण्याचे ठरवले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २६ जानेवारी इ.स.१७७४
राघोबा दादा ना पेशवाई ची वस्त्रं तर मिळाली ... पण त्यांनी ज्या पध्दतीने ती मिळवली त्या मुळे कारभारी नाराज होते ....कारभाऱ्यांच्या गुप्त मसलती चालु झाल्या ...कारभारी म्हणजे कोण तर नाना फडणवीस, सखाराम बापु, त्र्यंबक राव पेठे, रामशास्त्री, मालोजी घोरपडे... या मंडळींनी ठरवले राघोबा दादा ला पेशवे पदा वरून दुर करायचे... हेच होते "बारभाई कारस्थान"
राघोबाला दुर करून मग कोणाला पेशवे करायचे ?
ठरले गंगा बाईच्या नावाने कारभार करायचा... तिला मुलगा झाला तर पुढचा पेशवा... नसता दत्तक विधान करायचे...
बाहेर काय चालू याची गंगा बाईंना अजिबात कल्पना नव्हती ती बिचारी अबला अडकली होती आनंदी बाईच्या महालात...
नाना आणि मंडळी बोलुन चालुन मुत्सद्दी, त्यांनी गंगाबाईंना २६ जानेवारी १७७४ ला शनिवार वाड्यातुन सुखरूप बाहेर काढून पुरंदरावर नेले... त्या वेळेस पार्वती बाई त्यांच्या बरोबर होत्या...
ज्या दिवशी गंगा बाई पुरंदरावर पोहोचल्या त्या दिवशी नाना आणि मंडळींनी राघोबा विरुद्ध रणशिंग फुंकले... आणि पेशवाई चा कारभार गंगा बाईंच्या नावे सुरु केला... पुरंदरावरच पार्वती बाईंनी त्यांचे साधे पणाने डोहाळ जेवण केले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २६ जानेवारी इ.स.१८३१
क्रांतिवीर संगोळी रायन्ना या स्वातंत्र्य योद्ध्याचा जन्मदिवस १५ ऑगस्ट पुढे जाऊन भारताचा स्वातंत्र्यदिवस ठरावा आणि प्रजेच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या या वीराला ज्या दिवशी फाशी देण्यात आली तो दिवस २६ जानेवारी पुढे जाऊन भारताचा प्रजासत्ताक दिन ठरावा यासारखा एकमेव्द्वितीय योगायोग म्हणजे जणू भारत-भारतीने आपल्या वीरपुत्रास देलेली हि आदरांजलीच म्हणावी लागेल...
क्रांतिवीर संगोळी रायन्ना कित्तूर साम्राज्याचे सरसेनापती ब्रिटीशांविरोधात सलग-सतत सहा वर्षे लढून, त्यांना 'सळो की पळो' करून सोडणारे आणि वेळोवेळी संकटात आणणारे एक महान क्रांतिकारक तलवारीच्या टोकावर इंग्रजांना आव्हान देणारा योद्धा स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती देऊन, फासावर जाणारे स्वातंत्र्यवीर मरण समोर असताना देखील पुन्हा जन्म घेऊन इंग्रजांना भारतातून बाहेर काढण्याची इच्छा व्यक्त करणारे भारतमातेचे सच्चे वीरपुत्र याच व्यक्तिमत्वा बद्दल घेतलेला हा आढावा..
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
https://youtu.be/80h9PtSyTD0
📜 २६ जानेवारी इ.स.१९४४
२६ जानेवारीला सुभाषबाबूंनी रंगून येथे स्वातंत्र्यदिन साजरा केला. नेताजींची अमरवाणी, "तूम मुझे खून दो - मै तुम्हे आजादी दुंगा !" ही इथूनच प्रगट झाली. १८ मार्च १९४४ या दिवशी १०,००० सैन्यानिशी नेताजींनी मातृभूमीत प्रवेश करून इंफाल, मोरा, कोहिमा या ठिकाणी प्रतिपक्षावर विजय मिळवले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇
☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम ||
|| जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
भारताच्या समृद्ध विविधतेतील एकता आणि संविधानाने नागरिकांना दिलेले अधिकार अबाधित राहण्याचा निर्धार व्यक्त करूया, देशाची प्रतिमा उंचावण्यासाठी कटिबद्ध होऊया सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या मंगलमय शुभेच्छा. 🇮!!भारतीय प्रजासत्ताक चिरायू होवो!! #🇮🇳 लाखात एक माझा फौजी #📲देशभक्ती स्टेटस #🫡स्वातंत्र्यसैनिक🇮🇳 #🇮🇳स्वातंत्र्याचे शिल्पकार #🇮🇳आम्ही भारतीय🫡
⛳ आजचे ऐतिहासिक शिव'कालीन दिनविशेष ⛳
📜 २५ जानेवारी इ.स.१६५६
महंमद सुलतान हैदराबादमधील हुसेन सागर तलावाजवळ पोहोचला. त्याने हैदराबाद लुटायला सुरुवात केली. पाठोपाठ औरंगजेब ६ फेब्रुवारीला हैदराबादला पोहोचला. पण गोवळकोंड्याला वेढा घालता येईल इतके सैन्य त्याच्याकडे नव्हते. त्याने शहाजहानकडून अधिक कूमक मागवली. कुत्बशहाने दाराशी संधान बांधून शहाजहानकडे तहाची मागणी केली. दाराने शहाजहानचे जान फुंकले. शहाजहानने सैन्य मागे घेण्यास सांगितले. पण औरंगजेबाने त्याकडे लक्ष दिले नाही. शहाजहानला या दरम्यान लिहीलेल्या एका पत्रात औरंगजेब हैदराबादच्या परीसराचे वर्णन करतो - "इथल्या सृष्टीसौंदर्याबाबत काय आणि किती लिहू? मला जागोजागी मोठे तलाव, गोड्या पाण्याचे झरे, भरपूर शेते, दिसत आहेत. असा समृद्ध प्रदेश त्या नादानांच्या हाती पडलाय तो आपण जिंकून घ्यायला हवा."
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🚩शिवराय #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🗿शिवकालीन पुराणवस्तू
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1
शिव दिनविशेष Video Link🔗
https://youtu.be/LHQF2gwGFKg
📜 २५ जानेवारी इ.स.१६५८
मुहम्मद आदिलशहाच्या गंभीर आजारपणामुळे कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद १६४६ पासून विजापूरातच होता. त्यास मुहम्मद आदिलशहाने बोलावून घेतले होते. आदिलशहा ४ नोव्हेंबर १६५६ रोजी मरण पावला. त्याचे तक्तावर वारस न बसविता आपल्या हातात सत्ता राखण्यासाठी बेगम साहेबिणीने अली नावाच्या विजापूरच्या १८ वर्षांच्या मुलास गादीवर बसविले. हा शाही घराण्यातील अस्सल राजपुत्र नाही अशा सबबीवर औरंगजेबाने विजापूरला वेढा घातला. आणि दोन्ही पक्षांनी छत्रपती शिवाजी राजांकडे मदत मागितली. शिवाजी महाराजांना या प्रसंगात विजापूरचा पक्ष घेऊन आपले राज्य अधिक वाढवावे हे फायदेशीर आहे असे जाणवले. पण सप्टेंबर १६५७ मध्ये विजापूर सरकारने औरंगजेबाशी शांतता करार केला. छत्रपती शिवाजी राजांनी मोंगलाशी सलोखा प्रस्थापित करण्याचा निर्णय घेतला. २५ जानेवारी १६५८ रोजी शिवाजीराजांनी आपला प्रतिनिधी म्हणून सोनाजी विश्वनाथ यांस औरंगजेबाच्या भेटीसाठी बेदरला धाडले. जुनी निजामशाही आणि आदिलशाही यांच्या ताब्यांतील कोकणपट्टी आपल्याला मिळावी अशी शिवाजीराजे यांनी आपल्या वकीलाकरवी औरंगजेबास विनंती केली. धूर्त औरंगजेबाने राजांचा डाव ओळखला व वकीलास सांगितले की, “हा मामला महत्त्वाचा असल्यामुळे खुद्द शिवाजीराजे यांनीच मला भेटावे हे बरे” राजे ओरंगजेबास भेटण्याच्या फंदात पडले नाहीत. त्यांनी औरंगजेबाच्या रागाची पर्वा न करता मोगलांच्या ताब्यांतील जुन्नर व अहमदनगर ही शहरे जिंकून घेतली. इतक्यात औरंगजेबास शहाजहान बादशहा आजारी असल्याचे समजले तेव्हा दिल्ली तक्त बळकावण्यासाठी त्याने घाईने उत्तरेची वाट धरली. वाटेत असता आपल्या सेना अधिकाऱ्यांस पत्रे लिहून शिवाजीराजांच्या पारिपत्यासाठी हालचाली करण्याचा आदेश दिला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २५ जानेवारी इ.स.१६६४
सुरतेच्या या लुटीमुळे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल प्रचंड दरारा निर्माण झाला. सुरतेच्या लुटीचे खरे फलित हेच आहे. लूट किती मिळाली, याचे आकडे भिन्न आहेत; परंतु राजांचा दरारा काय होता त्याचे चित्र इंग्रजी पत्रव्यवहारात मिळते. 'Surat trembles at the name obsevagee.' हे वाक्य बर्याच वेळा त्या पत्रव्यवहारात वाचावयास मिळते. 'छत्रपती शिवाजीराजांचे नाव काढताच सुरत भीतीने थरथरावयास लागते.' 'त्या' दरार्याचे अचूक वर्णन आहे. २५ जानेवारी १६६४ रोजी सुरतेच्या इंग्रजी वखारीतील एक फॅक्टर हेन्री गॅरी याने अर्ल ऑफ मार्लबरोला लिहिलेले एक पत्र फार बोलके आहे. त्यात गॅरी लिहितो, ''.. Savagee the grand rebell to the king of Deccan came here the 6th of this instant with a considerable army, entering the town before the governor scarce had any notice of his aproche. He made a great destruction of houses by fire, upwards of 3000, and carried a vast treasure away with him. It is credibly reported near unto ten million of ruppees.''
मुघलांनी सुरतेच्या या लुटीची हाय खाल्ली. ही बातमी ऐकून अनेक जण दिड्मूढ झाले. औरंगजेब सुन्न झाला. पोर्तुगीज, इंग्रज, फ्रेंच, डच यांनी मोठमोठी बातमीपत्रे आपापल्या राजांकडे पाठवून दिली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २५ जानेवारी इ.स.१६६५
छत्रपती शिवाजी महाराजांचे राजनैतिक सल्लागार व विश्वासू सेवक सोनोपंत तथा सोनोजी विश्वनाथ डबीर यांचे निधन.सोनोपंत डबीर म्हणजे शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळीतील एक मौल्यवान रत्न. मराठा साम्राज्याचे पेशवे (पंतप्रधान) श्री क्षेत्र महाबळेश्वर येथील शंकर मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांनी राजमाता जिजाऊ साहेब व सोनोपंत डबीर यांची सुवर्णतुला केली होती. सोनोपंत डबीर यांचे छत्रपति शिवाजी महाराज यांना सुनावलेले खड़े बोल -जेव्हा शहाजी राजे आदिलशाहकड़े बंदी होते त्यांच्या सुटकेसाठी आदिलशाहने सिंहगड किल्ला परत मागितला होता तेव्हा छत्रपति शिवाजी राजे आपल्या पित्यावर रुष्ट झाले होते अणि तेव्हा सोनोपंत डबीर यांनी त्यांचा रुसवा काढताना ""पराक्रमी राजलाच पृथ्वी वश होते , राजे एक सिंहगड गेला म्हणुन तुम्ही पित्यावर रागावता, त्यापेक्षा एक गडाच्या बदल्यात आदिलशाहने शाहजी राजंसारख्या सिंहाला मुक्त केले आहे राजे... आता तुम्ही पृथ्वीवर राज्य करा.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
https://youtu.be/LHQF2gwGFKg
📜 २५ जानेवारी इ.स.१६८४
व्हिसेरेईने गोव्याच्या दयनीय अवस्थेचे वर्णन पोर्तुगालच्या राजास लिहीलेले पत्राचे वर्णन!
आमच्या राजाची अवस्था शोचनीय आहे. मोगलांमुळे आमचे रक्षण झाले. परंतु मोगलांनी हे राज्य घेण्याचे ठरविले तर त्यांची अवस्था वाईट होईल आणि मोगल निघून गेले तरी देखील छत्रपती संभाजी महाराजांच्या स्वारीचा धोका पुनः आहेच." आमच्या आरमारात माणसे नाहीत. विश्वासू आधिकारी नाहीत. किल्ले निरुपयोगी झाले आहे. तंत्रज्ञाची, गोलंदाजांची आणि दारुगोळ्याची कमतरता आहे. द्रव्याची टंचाई तर पाचविलाच पुजलेली आहे. हे राज्य आमच्या हातून निसटण्याची भिती आहे. "
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २५ जानेवारी इ.स.१६८४
(माघ वद्य ४, चतुर्थी शके १६०५, रुधिरोद्रारी संवत्सर, वार शुक्रवार)
पोर्तुगिजांची शोचनीय अवस्थेबद्दल कोंट द आल्वोरचे पत्र!
पोर्तुगीजांची शोचनीय अवस्था झाली. बारदेशाच्या हल्ल्यात मराठ्यांनी अनेक परगण्यांवर हल्ला केला. मराठे इरेसच पेटले होते. इथला दैनंदिन वस्तूंचा पुरवठा मराठ्यांनी बंद केला. त्यामुळे पोर्तुगीजांची चांगलीच कोंडी झाली. मराठ्यांनी धर्मांधतेचा कळस केलेल्या पोर्तुगिजांना धडा शिकविण्यासाठी पोर्तुगीजांचे चर्च पाडून टाकले. चर्च मधील सर्व मुर्त्या फोडून बऱ्याच लोकांना कैद केले. 'छत्रपती संभाजी महाराजांचे सैन्य पळपुटे असून छत्रपती संभाजिराजे सर्व सैन्यानिशी जरी गोव्यात आले तरी आपण गोव्याचे रक्षण करू' अशी फुशारकी मारणारा 'कोंट- द- आल्वारे' याची अत्यंत शोचनीय अवस्था मराठी आक्रमनाणे केली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २५ जानेवारी इ.स.१७००
१६८१ नंतर १७०७ म्हणजे मृत्यूपर्यंत औरंगजेब दक्षिणेतच राहिल्यामुळे उत्तरेकडील जमा होणा-या महसुलाचा पैसा विजापूर, सोलापूर, हैदराबाद, कोल्हापूर परिसरात जाताना तो परंड्याहून व्यवस्था लावल्याशिवाय जात नव्हता. असेच एकदा परंड्याहून निघालेला खजिना सेनापती धनाजी जाधवाने २५ जानेवारी १७०० मध्ये परंड्याजवळील उंदरगाव या ठिकाणी लुटून फस्त केला होता. धनाजीने वारंवार परंडा परिसरात धुमाकूळ घातल्याची नोंद सापडते. एवढेच नाही तर शिवरायांचे कनिष्ठ चिरंजीव छत्रपती राजारामांनीही परंडा किल्ल्याच्या परिसरात धुमाकूळ घातल्याने मराठ्यांच्या छत्रपतींचे पाय परंड्याला लागले म्हणायला हरकत नाही.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २५ जानेवारी इ.स.१७३७
मडगाव शहर मराठ्यांच्या हाती! मंडगाव शहर मराठ्यांच्या हाती पडले तेथेच त्यांनी आपल्या सैन्याचा मुख्य तळ केला. मडगावची तटबंदी मराठ्यांनी काबीज करताच कुकल्ली येथील ठाण्याचा देशी अधिकारी कॅप्टन तुकू नाईक हा आपल्या सैन्यासह मराठ्यांना येऊन मिळाला. ह्यावरून गोव्यातील हिंदू पोर्तुगिजांच्या छळाने किती संत्रस्त झाले होते ते सिद्ध होते.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇
☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम ||
|| जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀










![📜इतिहास शिवरायांचा - IIMIIA HRHyAHIO4 WARATHAWARP ORS THE € SHIVDINVISHESH CREATED BY Rahul Borse Patil] शिवदिनविशेष २७ जानेवारी इ.स. १६५८ छत्रपती शिवाजी महाराजांनी fat1 माहुलीचा किल्ला उर्फ भंडारगड पुन्हा ' स्वराज्यात आणला. the qreat marathauarriors the great marathauarriors the_great marathawarriors IIMIIA HRHyAHIO4 WARATHAWARP ORS THE € SHIVDINVISHESH CREATED BY Rahul Borse Patil] शिवदिनविशेष २७ जानेवारी इ.स. १६५८ छत्रपती शिवाजी महाराजांनी fat1 माहुलीचा किल्ला उर्फ भंडारगड पुन्हा ' स्वराज्यात आणला. the qreat marathauarriors the great marathauarriors the_great marathawarriors - ShareChat 📜इतिहास शिवरायांचा - IIMIIA HRHyAHIO4 WARATHAWARP ORS THE € SHIVDINVISHESH CREATED BY Rahul Borse Patil] शिवदिनविशेष २७ जानेवारी इ.स. १६५८ छत्रपती शिवाजी महाराजांनी fat1 माहुलीचा किल्ला उर्फ भंडारगड पुन्हा ' स्वराज्यात आणला. the qreat marathauarriors the great marathauarriors the_great marathawarriors IIMIIA HRHyAHIO4 WARATHAWARP ORS THE € SHIVDINVISHESH CREATED BY Rahul Borse Patil] शिवदिनविशेष २७ जानेवारी इ.स. १६५८ छत्रपती शिवाजी महाराजांनी fat1 माहुलीचा किल्ला उर्फ भंडारगड पुन्हा ' स्वराज्यात आणला. the qreat marathauarriors the great marathauarriors the_great marathawarriors - ShareChat](https://cdn4.sharechat.com/bd5223f_s1w/compressed_gm_40_img_760127_33e9f7c6_1769479755108_sc.jpg?tenant=sc&referrer=user-profile-service%2FrequestType50&f=108_sc.jpg)


