⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳
📜१२ फेब्रुवारी इ.स.१५०२
एका व्यापारी जहाजातून पोर्तुगीज सरदार वास्को-द-गामा २० मे १४९८ रोजी कालिकत बंदरात येऊन दाखल झाला. गोव्याला भेट देऊन तो २९ ऑगस्टला परत गेला. त्यानंतर १२ फेब्रुवारी १५०२ ला तो मोठं आरमार घेऊन परत आला. रेशीम व सोने यांची लुटालूट करून परत गेला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🚩शिवराय #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🗿शिवकालीन पुराणवस्तू
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1
शिव दिनविशेष Video Link🔗
https://youtu.be/GiD3Zgi4eqU
📜 १२ फेब्रुवारी इ.स.१६७४
छत्रपती शिवरायांनी बेहलोलखान आणि दिलेरखान यांचा पराभव केला ज्या खाना मुळं आपण स्वराज्याचे सरसेनापती प्रतापराव गुजर काकांना गमावून बसलो त्याच बेहलोलखानाचा आणि दिलेरखानाचा छत्रपती श्री शिवरायांनी पराभव केला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 १२ फेब्रुवारी इ.स. १६८५
सावंताने संभाजी महाराजांवर मोहीम सुरु करून वेंगुरल्याच्या खाडीत आरमार नेऊन पुष्कळ लूट केली. हे वर्तमान संभाजी महाराजास समजताच ते त्वरेने कोकणात उतरून सावंतावर चालून आले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 १२ फेब्रुवारी इ.स.१६८५
(माघ वद्य ३, त्रृतीया, शके १६०६, रक्ताक्ष संवत्सर, वार गुरुवार)
धरण गावाची दुसरी लुट!
अखबारातून धरणगाव मराठ्यांनी पुन्हा एकदा लुटल्याची माहिती मिळते. आधी ४ वर्षांपूर्वी सुद्धा मराठ्यांनी धरणगावात धुमाकूळ घातला होता. ४ वर्षांत याची परत पुणराव्रृत्ती होऊन मराठ्यांनी या प्रदेशात धुम माजवली. निळो मोरेश्वर व रंगराव हे ६०० ते ७०० स्वारांनिशी धरणगावला पोहोचले. त्यांनी इंग्रजांची वखार जाळली. मराठे खोलवर घुसून दहशत कशी माजवतात याचा प्रत्यय इंग्रजांना व मोगलांना धरणगावच्या निमित्ताने पुन्हा एकदा आला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 १२ फेब्रुवारी इ.स. १६८९
छत्रपती संभाजी महाराज हे कैदेत पडल्याने व त्यांची सुटका ही अशक्यप्राय झाल्याने रिकाम्या झालेल्या राजसिंहासनावर वारस बसविणे हे क्रमप्राप्त झाले होते छत्रपती संभाजी महाराज यांचे पुत्र शाहू महाराज हे अवघे ७ वर्षाचे होते व राजाराम महाराज हे १८-१९ वर्षाचे अशा समयी महाराणी येसूबाईसाहेब यांच्या समोर दोनच पर्याय होते एक म्हणजे आपला पुत्र शाहू महाराज यांना वारस घोषित करून छत्रपती बनवणे व सर्व राजसत्ता आपल्या ताब्यात घेणे आणि दुसरा म्हणजे राजाराम महाराज यांना वारस घोषित करून राज्यकारभाराची सूत्रे ही प्रमुख अष्टप्रधानमंडळाच्या हाती सोपविने. !
अशा वेळी दुसऱ्या कोणत्याही स्त्रीने आपल्या मुलाच्या सर्वप्रथम विचार केला असता परंतु त्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सून व छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी सखी राज्ञी जयती महाराणी येसूबाईसाहेब होत्या त्यांनी राजाराम महाराजांना वारस म्हणून घोषित केले आणि राज्याभिषेक न करता त्यांचे मंचकारोहन केले कारण राज्याभिषेक हा निवांत वैभवाने करायचा समारंभ होय.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 १२ फेब्रुवारी इ.स.१७४२
पेशव्यांच्या दरबारी असणारे मराठा साम्राज्यातील मुत्सद्दी होते. पेशवाईतील साडेतीन शहाण्यांपैकी हे अर्धे शहाणे समजले जात.नाना फडणवीस यांचे मूळ घराणे कोकणातल्या रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील होते. त्यांचा जन्म १२ फेब्रुवारी १७४२ रोजी सातारा येथे झाला. बालवयातच नानासाहेब पेशव्यांच्या सान्निध्यात आल्यामुळे राज्यकारभाराचे शिक्षण त्यांना मिळाले. वयाच्या २० व्या वर्षी थोरल्या माधवरावांकडून त्यांना फडणिशीची वस्त्रे मिळाली. एवढे मोठे पद नानांनी आपल्या कर्तृत्वाने आणि मुत्सद्दीपणाने सांभाळले. आपल्या चातुर्याच्या बळावर नानांनी राजकीय घडी बसवलीच होती पण त्यांची कामाची तडफ, त्यांच्या वागण्यातला समतोलपणा या बरोबरच पेशवाई आणि राजसत्तेचा दबदबा आणि दरारासुद्धा त्यांनी वाढवला. इंग्रजांचा पाडाव करण्यातही ते यशस्वी झाले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
https://youtu.be/GiD3Zgi4eqU
📜 १२ फेब्रुवारी इ.स.१७५६
११ फेब्रुवारी रोजी इंग्रजी आरमार विजयदुर्गवर मोर्चेदाखल झाले. इकडे जमिनीवर रामाजी महादेवांची फौज तयारच होती. इंग्रजांचे आरमार चालून येत आहे, हे पाहून आधीच दि. ८ फेब्रुवारी रोजी तुळाजींनी आपल्या मेहुण्यास विजयदुर्गाचा ताबा देऊन ते रामाजीपंतांच्या छावणीत भेटावयास आले. पण पेशवे आणि तुळाजी यांच्यातील इतक्या वर्षांच्या वैमनस्यामुळे चटकन निर्णय आणि वाटाघाटी होईना. तीन दिवस उलटले आणि चौथ्या दिवशी १२ फेब्रुवारी रोजी इंग्रजांचा विजयदुर्गावर भडिमार सुरू झाला. वॉटसनने मुंबईला कळवले, "तुळाजी आंग्र्यांचे व पेशव्यांचे (रामाजीपंतांचे) तहाचे बोलणे चालत असल्याचे मला कळले, तेव्हा तुळाजीस याबाबतीत अवकाश द्यायचा नाही, असा निश्चय करून, एकदम किल्ल्या स्वाधीन करून देण्याविषयी मी त्यास निरोप पाठविला. ठरलेल्या वेळात जबाब न आल्याने व पेशवेही जरा वेळ काढीत आहेत असे पाहून दि. १२ रोजी आम्ही किल्ल्यावर मारा सुरू केला." १२ तारखेला संध्याकाळी ४ च्या सुमारास इंग्रजांच्या तोफेचा एक गोळा आंग्र्यांच्या एका जहाजाच्या दारूखान्यावर पडून त्या जहाजाने पेट घेतला. या भडक्यात आसपासची इतरही जहाजे एकदम पेटली. आंग्र्यांच्या आरमारातील ७४ तोफांचे एक गुराब, त्याहून थोड्या लहान आकाराच्या ८ गुराबा आणि ६० गलबते उळून खाक झाली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 १२ फेब्रुवारी इ.स.१७९४
एप्रिल १७९३ मध्ये नाना फडणीस व महादजी शिंदे यांचा समेट झाला. १ जून १७९३ ला बावांच्या सैन्याने होळकर सैन्याचा सपशेल पराभव लाखेरी येथे केल्यावर पुणे दरबारने बावांच्या सर्व मागण्या मान्य केल्या. त्यानंतर महादजीबावांस ताप ज्वर येऊ लागला. आठ दिवस सारखा ज्वर येतो हे कळल्यावर खुद्द पेशवे एक वेळ समाचारास गेले होते. नानाही जाऊन आले. हरीपंत तात्या तर एक दोन दिवसाआड नेहमी जात होते. यापुढे महादजीबाबा जवळ जवळ आठ महिने थोडे थोडे आजारीच होते असे म्हणावे लागते. फेब्रुवारी १७९४ त महादजीबावांची भयंकर शीतज्वराची भावना झाली. पांच सात रोज यातच गेले, नंतर कफ झाला. वैद्य आणून औषधे चालू केली पण लागू होईना, चढ होत चालला. बोलणे राहिले. बुधवार त्रयोदशीस सायंकाळी नाना समाचारास आले. बोलणे झाले नाही. तसेच श्रीमंतांकडे जाऊन वर्तमान सांगितले, पेशवे महाराजांजवळ येऊन उभे राहिले. चिंता वाटली. सुवर्णतुला करण्याची सूचना केली. त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सुवर्णतुला केली. बोलले नाहीत. दुखणे वाढत जाऊन काल जाहला. (१२ फेब्रुवारी १७९४). मृत्युसमयी महादजींचे वय ६७ वर्षाचे होते. ते वानवडीस निवर्तले. त्या ठिकाणी दौलतराव शिंदे यांनी त्यांची छत्री बांधली. तिच्या खर्चास पेशवे यांनी ५ सप्टेंबर १७९५ रोजी १ चाहूर जमीन छत्रीचे लगत देवविली. ही छत्री पुढे माधवराव शिंद्यांनी वाढवून टोलेजंग केली. पुण्याच्या ऐतिहासिक स्मारकात त्याची गणना होते. महादजीबावांनी आपल्याला पुत्र संतान व्हावे म्हणून नऊ लग्ने केली पण त्यांना पुत्र लाभ झाला नाही. मृत्यूपूर्वी काही महिने अगोदर त्यानी आपल्या चुलत भावाचा १४ वर्षाचा मुलगा दौलतराव यास दत्तक घेतले. दौलतरावाचा जन्म १७८० चा असून त्याच वर्षी त्याचा समकालीन रणजीतसिंग जन्मला.
दौलतरावांचे दत्तविधान यथाविधी झाले नव्हते असे दिसते. बावा मरण पावल्यावर तेरावे दिवशी त्याचे दत्तविधान करून पेशव्यांनी त्यास शिंद्यांचे दौलतीवर स्थापन केले. (१० मे १७९४).
https://youtu.be/GiD3Zgi4eqU
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇
☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम ||
|| जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳
📜 ११ फेब्रुवारी इ.स.१६५८
छत्रपती शिवरायांनी आरमार उभारणीचा शुभारंभ केला.
मराठा साम्राज्यामधे कल्याण आणि त्याच्या आसपासचा संपूर्ण भाग होता, तेथेच १६५७ ते १६५८ साली जहाज बांधनीमधे कुशल आशा कारागिरांना काढुन जहजांची निर्मिति पहिल्यादा सुरु झाली, सीद्दी, पोर्तुगीज, इग्रज आणि डच यांच्या पासून स्वराज्याच रक्षण करण हे मराठा आरमाराच मुख्य काम, पण महाराजांची नजर होती अथांग आशा समुद्र साम्राज्यावर, आरमाराच काम सुरु असतानाच पद्मदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, सिंधुदुर्ग, आणि आणखिन बऱ्याच छोट्या मोठ्या सागरी किल्ल्याणची बांधनीही सुरु होती, अथांग आसा समुद्र आणि त्याच्या किनारी असणार हिंदवी स्वराज्य, मराठा साम्राज्यातील व्यापाऱ्याना समुद्रा मार्गे मुक्तपणे व्यापार करता यावा तसेच राज्याची भरभराट होण्यासाठी समुद्राच रक्षण अत्यंत गरजेच होत, त्यामुळे संपूर्ण कोकणामधे असणाऱ्या असंख्य खाडया जहाजांसाठी उत्कृष्ठ आसा आसारा होता. तर समुद्र किनारी आसणाऱ्या कठिण दगडाच्या जमिनी आरमाराच्या तळासाठी बलवान आशा होत्या.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #📜इतिहास शिवरायांचा #🚩शिवराय
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1
शिव दिनविशेष Video Link🔗
https://youtu.be/pYoicOF8mnU
📜 ११ फेब्रुवारी इ.स.१६८७
संताजी घोरपडे-केसोपंत त्रिंबक कर्नाटकात!
दख्खन जिंकण्याच्या इराद्याने आलेल्या औरंगजेबाने मराठ्याविरोधात आपली मात्रा चालत नाही असे पाहून आपली दृष्टी गोवळकोंडा आणि विजापूरकडे वळवली आणि अल्पावधीतच ती राज्ये जिंकूनही घेतली. ही बलाढ्य राज्ये हाती आल्यानंतर तो स्वराज्यातील कर्नाटक प्रांतात पुन्हा हल्ले सुरू करणार हे ओळखून छत्रपती संभाजीराजेंनी कर्नाटकचा प्रांताचा बंदोबस्त करण्याला विशेष प्राधान्य दिले. तिथे मुघल आणि म्हैसूरकरांच्या हल्ल्याला हरजीराजे महाडिक यांना एकट्याला तोंड द्यावे लागू नये म्हणून छत्रपती संभाजीराजेंनी ऑक्टोबर- नोव्हेंबर इ.स.१६८६ मध्ये केशव त्रिमल आणि संताजी घोरपडे यांना कर्नाटकात जायची आज्ञा केली. या आज्ञेनुसार केशव त्रिमल व संताजी घोरपडे आपल्या १२ हजार सैन्यासह कर्नाटकात पोहोचले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ११ फेब्रुवारी इ.स.१७५६
तुळाजींची निष्ठा पेशव्यांपेक्षा साताऱ्याच्या छत्रपतींच्या गादीवर अधिक होती. त्यामुळे पहिले बाजीराव यांच्यानंतर सत्तेवर आलेल्या नानासाहेब पेशव्यांना आंग्रे आपल्या आधिपत्याखाली असावे असे वाटत होते. मुळात नानासाहेब पेशव्यांस सातारा छत्रपतींच्या गादीविषयी प्रचंड द्वेष होता. याच द्वेषातून नानासाहेब पेशव्यांनी मानाजी आणि तुळाजी या आंग्रे बंधूंमध्ये कलह घडविला. नानासाहेब पेशवे हे आंग्रे आणि तत्कालीन मराठा छत्रपतींचा एवढा द्वेष करू लागले की, पुढे नानासाहेब पेशव्यांनी इंग्रजांची मदत घेऊन मराठ्यांच्या बलाढ्य आरमाराचा कपटनितीने पराभव केला. इंग्रजांनी आंग्रेचा दिवाण रामजीपंतास फितूर करून पेशव्यांस आपल्या बाजूने वळविले होते. इंग्रजांची चाल नानासाहेब पेशव्यास कळाली नाही. सन १७५६साली पेशव्यांनी आणि इंग्रजांनी विजयदुर्गावर एकत्र हल्ला करून तुळाजींचा पराभव केला. तारीख ११ फेब्रुवारी १७५६ रोजी कर्नल क्लाइव्हने विजयदुर्गावर प्रवेश करून मराठ्यांचा आरमाराचा मोठा खजिना ताब्यात घेतला. या युध्दात तुळाजी आंग्रेच्या बाजुने लढणारे ५०० हून अधिक सैन्य मारले गेले. तुळाजी आंग्रे पेशव्यांच्या ताब्यात आले.त्यांना पेशव्यांनी वंदन किल्ल्यावर कैदेत ठेवले.सुमारे तीस वर्ष ते पेशव्यांच्या कैदेत होते. कैदेतच पर्वती, पुणे येथे त्यांचे निधन झाले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ११ फेब्रुवारी इ.स.१७६०
सन १७६० रोजी सदाशिवराव भाऊसाहेब यांच्या नेतृत्वाखालील मराठा सैन्याने उदगीर येथे मराठ्यांचा कट्टर शत्रू निजामाचा दारूण पराभव केला. दिनांक ११ फेब्रुवारी सन १७६० रोजी निजामाशी तह झाला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ११ फेब्रुवारी इ.स.१८१८
अजिंक्यतारा इंग्रजांनी जिंकला
सन १८४४ साली तो छत्रपती प्रतापसिंह महाराजांचे ताब्यात आला. या गडावर पुरातनकालचे मंगळाई देवीचे व हनुमान मंदिर आहे. अजिंक्यताºयातील जो पडीक राजवाडा आहे तो कै. छत्रपती शाहू महाराज यांनी बांधलेला आहे. दिल्ली सुटकेनंतर त्यांनीच सातारला महत्व प्राप्त करून दिले. या किल्लयावर दुधबावी, सागरी सुलतान पीर, मंगळाई, शिवसागर सप्तऋषी, कोठी व भवानी ही सात तळी होती. तसेच मंगळाई, नृसिंह, हनुमंत, महालक्ष्मी, रामेश्वर, सप्तश्री व विठोबा ही सात देवालये होती. शेख सल्ला व साकडा सुलतान हे दोन पीर येथे होते. याच किल्लयावर महाराणी येसूबाई, महाराणी ताराबाई व महाराणी आनंदीबाई ऊर्फ माईसाहेब यांचे वास्तव्य घडले. १० फेब्रुवारी १८१८ रोजी इंग्रजांनी मराठ्यांचा जरीफटका उतरवून येथे युनियन जॅक फडकाविले.
साताराचा किल्ला हुकेबहन, सप्तर्षीचा किल्ला, मंगळाईचा किल्ला, इस्मतआरा, शाहूगड, सतारे तसेच अजिमतारा या नावाचा हा किल्ला अजिंक्यतारा झाला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ११ फेब्रुवारी इ.स.१८१८
छत्रपती प्रतापसिंह महाराजांना सातारच्या गादीवर
मराठेशाहीतील उत्कर्षाचा परमोच्च बिंदू-फर्मानबाडी.
छत्रपती शिवाजी महाराजांचा जेधे शकावली प्रमाणे १९ फेब्रुवारी १६३० रोजी जन्म झाला.इथपासून मराठेशाहीचा उदय झाला. ह्या नंतर सुमारे १८७ वर्षांनी म्हणजे १७ नोवेंबर १८१७ ला इंग्रजांनी शनिवारवाड्यावर युनियन ज्याक फडकवला व ११ फेब्रुवारी १८१८ रोजी जाहीरनामा काढून छत्रपती प्रतापसिंह महाराजांना सातारा ह्या अत्यंत छोट्या राज्यावर बसविले.अशा प्रकारे मराठेशाहीचा अस्त झाला.
वर नमूद केलेल्या मराठ्यांच्या उदय आणि अस्ता दरम्यानच्या १८७ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीत मराठेशाहीच्या आयुष्यात अनेक चढ उतार,मान,अपमान,जय,पराजयाच्या घटना घडल्या.छत्रपती शिवाजी महाराजांनी ६ जून १६७४ ला स्वतःस हिंदू पद्पातशहा म्हणून राज्याभिषेक करून घेतला,दक्षिण दिग्विजय करून दक्षिणेकडे मराठी राज्याचा विस्तार केला.त्यानंतर पुण्यश्लोक शाहू महाराजांच्या कारकिर्दीत पेशव्यांनी मराठ्यांचा जरीपटका अटकेपार नेला,जवळपास निम्म्या भारतावर मराठ्यांचे प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष नियंत्र होते.मराठेशाहीत सगळ्याच काही गोष्टी सुखद घडल्या नाहीत.शिवरायांचा अकल्पित मृत्यू,त्यातून उद्भवलेले वारसा युद्ध,कट कारस्थाने,शंभू राजांची अत्यंत क्रूर तऱ्हेने हत्त्या,छ.राजाराम ,त्यांच्या नंतर ताराराणी व असंख्य मराठे सरदार,सैनिकांचा अपुऱ्या ताकदीनिशी सतत सव्वीस वर्षे मोगलांशी संघर्ष,व १७६१ मध्ये मराठे आजवर विसरू न शकलेली दुःखद घटना,पानिपत संग्राम ह्या काही प्रमुख सुद्धा घडल्या.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ११ फेब्रुवारी इ.स.१८१८
बाजीराव रघुनाथराव पेशवेंना बंडखोर ठरविण्यात आले
बाजीराव रघुनाथराव यांचा युध्दात पाडाव करता येत नाही हे लक्षात आल्यावर इंग्रजांनी अखेर बाजीराव रघुनाथराव यांच्या सैनिकांना बिथरविण्यासाठी ११ फेब्रुवारी सन १८१८ रोजी जाहीरनामा काढला. त्याचाही अपेक्षीत परिणाम न दिसल्याने १० एप्रिल सन १८१८ रोजी छत्रपतींना फर्मान काढावयास लावून बाजीराव रघुनाथराव यांना बंडखोर ठरविण्यात आले व तशी व्दाही फिरविण्यात आली. तरीही बाजीराव रघुनाथराव हातात येत नाहीत हे पाहून इंग्रजांनी अनेक मराठा सरदारांशी हातमिळवणी केली. अखेर ३ जून सन १८१८ रोजी बाजीराव रघुनाथराव यांनी ढोलकोठ येथे इंग्रजांसमोर शरणागती पत्करली. इंग्रजांनी ज्या बाजीराव रघुनाथराव यांची प्रतिमा "पळपुटा" अशी केली आहे त्याच बाजीराव रघुनाथराव यांनी दिलेल्या विस्मयकारक लढतीने इंग्रजांनी त्यांचा चांगलाच धसका घेतला आणि म्हणूनच महाराष्ट्रापासून दूर बिठूर येथे त्यांना हलविण्यात आले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇
☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम ||
|| जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
⛳ आजचे ऐतिहासिक शिव'कालीन दिनविशेष ⛳
📜 १० फेब्रुवारी इ.स.१६६५
शिवाजीराजांनी लहान वयातच स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्याप्रमाणे अंमलबजावणी करायला सुरूवात केली. सुरुवातीची बरीच वर्षे त्यांच्या ताब्यात जास्त करून आदिलशाहीचेच किल्ले आले. १६५७ साली त्यांचा प्रथमच मुघलांशी थेट संबंध आला कारण त्यांनी मुघलांच्या ताब्यातील सधन शहर जुन्नर लुटले. तसेच, १६३६च्या मुघल-आदिलशहा तहानुसार जे किल्ले मुघलांकडे असायला हवेत त्यातले बरेचसे शिवाजीराजांनी जिंकून घेतले होते.
पुढे १६६३ मधे शाहिस्तेखानावर हल्ला, १६६४मधे सुरतेची लुट, जसवंतसिंगाची फजिती या कारणांमुळे औरंगजेब चिडुन गेला व सप्टेंबर १६६४ मधे त्याने मिर्झाराजा जयसिंग या महापराक्रमी, मुत्सद्दी रजपुत मुघल मनसबदाराची स्वराज्यावरच्या मोहिमेवर नियुक्ती केली. भलीमोठी फौज, तोफखाना तसेच, सरकारी व खाजगी खजिना बरोबर घेऊन मिर्झाराजा स्वराज्याकडे निघाला. सोबत दिलेरखान हा पराक्रमी मुघल मनसबदार व इतरही नावाजलेले मनसबदार होते. १० फेब्रुवारी रोजी हे मुघल सैन्य औरंगाबादला पोहोचले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🙏शिवदिनविशेष📜 #🚩शिवराय #📜इतिहास शिवरायांचा #🗿शिवकालीन पुराणवस्तू
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1
शिव दिनविशेष Video Link🔗
https://youtu.be/zFuKcRTsJic
📜 १० फेब्रुवारी इ.स.१६७१
सिद्दी कसीम व सिद्दी खैरात यांनी दंडराजपुरी मराठ्यांकडुन जिंकली व या दिवशी होळी पोर्णिमा होती.
१६७१ च्या सुमारास महाराजांनी परत जंजिऱ्याची मोहीम हाती घेतली. जंजिरा फत्ते करणाऱ्यास त्यांनी एक मण सोन्याचे बक्षीस देण्याचे ठरवले होते. जंजिऱ्या हून तीन कोसांवर महाराजांचा तळ होता. त्याच रात्री दंड्याचा ठाण्यावरती छुपा हल्ला करण्यास सिद्दी कासीम तयारी करत होता (१० फेब्रुवारी १६७१) . हे ठाणे म्हणजे किनाऱ्या वरील किल्ला होता. मराठी फौज किल्ल्यात तैनात होती. सिद्दी कासीम समुद्रामार्गे तर सिद्दी खैर्यत जमिनी मार्गे असा दुतर्फा हल्ला करण्याची कासीम याची योजना होती. होळीचा सण असल्याने गस्तीच्या सैनिकां शिवाय किल्ल्यातली फौज बेसावध होती. कासिमच्या नावा किल्ल्याच्या तटाला लागताक्षणी खैर्यत ने किल्ल्यावर हल्ला चढवला. साहजिकच किल्ल्याची ताकद हा हमला थोपवण्या साठी गेली व त्यामुळे समुद्राच्या दिशेने होणाऱ्या हमल्या कडे दुर्लक्ष झाले. तटाला शिड्या लावून कासीमची फौज किल्ल्या वर आली आणि एकच कल्लोळ माजला. गस्तीच्या सैनिकांनी शिकस्त केली पण ताकद विभागली गेली होती. दरम्यान किल्ल्या वरील दारूगोळा कोठारात भयंकर स्फोट झाला. प्रचंड धूर उसळला. सगळे जणू ह्या स्फोटाच्या धक्क्याने स्तब्ध भारावले होते. ह्या अतीव शांततेत कासीमची ललकारी गुंजली. परत लढाईला तोंड फुटले, पण मराठ्यांच्या प्रत्युत्तरातली हवाच जणू निघून गेली होती. कासीम आणि खैर्यतची फौज भारी पडत होती, ह्या रणकंदनात मराठी फौजेचा धुव्वा उडाला आणि दंडा राजपुरी स्वराज्यातून परत सिद्दी कडे गेली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 १० फेब्रुवारी इ.स.१६८२
(फाल्गुन शुद्ध १३ त्रयोदशी शके १६०३ दुर्मती संवत्सर वार शुक्रवार)
सुरतकर इंग्रजांचे दुटप्पी धोरण!
इंग्रजांना छत्रपती संभाजी महाराजांना दारूगोळा (तोफेचा) विकल्याची तक्रार सिद्धी करत होता. ही तक्रार खोटी असल्याचे सुरतकर सांगतात. पण छत्रपती संभाजी महाराजांना मदत करताना, ती गुप्तपणे करा. असे ते पत्रातून कळवितात. शिवाय औरंगजेबाच्या मोहिमांची व छत्रपती संभाजी महाराजांच्या जवळील अफाट सेनेची कल्पना देतात.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 १० फेब्रुवारी १७५६
१० फेब्रुवारी १७५६ रोजी वॉटसनला अशी खबर लागली की तुळाजी आंग्रे घेरिया किल्ल्याचा ताबा मराठ्यांकडे (म्हणजे नानासाहेबांकडे) देण्याच्या वाटाघाटी करण्यासाठी गेलेले आहेत. हे समजताच वॉटसनने आंग्र्यांना दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत किल्ला स्वाधीन करून शरण यायचा खलिता पाठवून दिला. त्याचे उत्तर न आल्याने दुसऱ्या दिवशी दुपारी ४ वाजता आरमाराच्या २ डिव्हिजन्स घेऊन वॉटसन घेरियाकडे गेला आणि त्याने हल्ला सुरु केला. किल्ल्यावर तोफगोळे डागणे सुरु झाले. असाच एक गोळा आंग्र्यांच्या ताब्यात असणाऱ्या मूळचे इंग्रजी जहाज 'रिस्टोरेशन' ह्याच्यावर पडला आणि आंग्र्यांचे सर्व आरमार जळून खाक झाले. (आंग्र्यांकडे इंग्रजांची पकडलेली शार्लोट, विलियम, स्वेर्न, रिस्टोरेशन, डार्बी, पायलट, ऑगस्टा इत्यादी जहाजे होती!)
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
https://youtu.be/zFuKcRTsJic
📜 १० फेब्रुवारी इ.स.१७६१
पानिपत युद्धानंतर उत्तरेत मराठा साम्राज्य कोसळले असा आरोप केला जातो. पानिपतावर प्रत्यक्षात झालेल्या युध्दानंतर विजयी ठरलेल्या अहमदशाह अब्दालीने मराठ्यांचा किती धसका घेतला होता ते पहा..
तह करण्यास अहमदशाह अब्दाली आतुर होता. त्यासाठी अब्दालीने अवघ्या महिन्याच्या आत म्हणजेच नानासाहेबांस वकीला मार्फत पोषाख पाठवून दिला होता. सदरचे दिनांक १० फेब्रुवारी सन १७६१ रोजीचे पत्र छायाचित्रात दिले आहे. आता यातूनच लक्षात येते की पानिपतावरील पराभावानंतरही मराठ्यांचा उत्तरेत किती प्रभाव होता ते... अनेकदा दिल्ली लुटणारा, बादशहास पळवणारा अब्दाली मराठ्यांच्या पहिल्याच तडाख्याने डगमगला हे निश्चितच.
सरदारक्या आणि जहागीरी वाचविण्यासाठी बायका - मुली देऊन स्वतःची सुटका करणारे मराठे नाहीत. उलट मराठे म्हणजे मरण समोर स्पष्ट दिसत असतानाही नरवीर दत्ताजींसारखे "बचेंगे तो और भी लडेंगे" म्हणून काळालाही जिंकणारे आहेत हे चाणाक्ष अब्दालीस चांगलेच उमजले यात शंकाच नाही आणि म्हणूनच त्याने तहासाठी तात्काळ हालचाल केली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 १० फेब्रुवारी इ.स.१७७१
महादजी शिंदे यांचा एक अधिकारी बाळाराव गोविंद यांनी दिल्लीच्या किल्ल्याचा ताबा घेतला. मराठ्यांचा तोफखाना दिल्लीच्या किल्ल्यावर धडधडू लागला. असद बुरूजाला खिंडार पडले. कासीमअलीचे धाबे दणाणले. आणि त्यांनी मराठ्यांच्या पुढे मुकाट्याने शरणागती पत्करून किल्ल्याचा ताबा मराठ्यांच्याकडे दिला. ५ हजार स्वारांनी दिल्ली व्यापून टाकली. मराठ्यांच्या जयघोषाने यमुणातीर दणाणला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 १० फेब्रुवारी इ.स.१८१८
अजिंक्यतारा इंग्रजांनी जिंकला
सन १८४४ साली तो छत्रपती प्रतापसिंह महाराजांचे ताब्यात आला. या गडावर पुरातनकालचे मंगळाई देवीचे व हनुमान मंदिर आहे. अजिंक्यताºयातील जो पडीक राजवाडा आहे तो कै. छत्रपती शाहू महाराज यांनी बांधलेला आहे. दिल्ली सुटकेनंतर त्यांनीच सातारला महत्व प्राप्त करून दिले. या किल्लयावर दुधबावी, सागरी सुलतान पीर, मंगळाई, शिवसागर सप्तऋषी, कोठी व भवानी ही सात तळी होती. तसेच मंगळाई, नृसिंह, हनुमंत, महालक्ष्मी, रामेश्वर, सप्तश्री व विठोबा ही सात देवालये होती. शेख सल्ला व साकडा सुलतान हे दोन पीर येथे होते. याच किल्लयावर महाराणी येसूबाई, महाराणी ताराबाई व महाराणी आनंदीबाई ऊर्फ माईसाहेब यांचे वास्तव्य घडले. १० फेब्रुवारी १८१८ रोजी इंग्रजांनी मराठ्यांचा जरीफटका उतरवून येथे युनियन जॅक फडकाविले.
साताराचा किल्ला हुकेबहन, सप्तर्षीचा किल्ला, मंगळाईचा किल्ला, इस्मतआरा, शाहूगड, सतारे तसेच अजिमतारा या नावाचा हा किल्ला अजिंक्यतारा झाला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇
☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम ||
|| जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳
📜 ९ फेब्रुवारी इ.स.१६५८
तुंग-तिकोना गडाचा फारसा इतिहास उपलब्ध नाही.. परंतु पंधराव्या शतकाच्या अखेरीस, मलिक अहमद निजामशहा याने इ. स. १४८२-८३ च्या सुमारास जुन्नर प्रांतावर स्वारी करून जुन्नर चा बराचसा प्रांत आला त्यानंतर त्याने लोहगड काबीज केला. नंतर त्याने आपले सैन्य तुंग व तिकोना गडांकडे वळविला.इ.स. १५८५ मध्ये मलीक अहमद निजामशाहने हा किल्ला जिंकुन निजामशाहीत आणला. इ.स. १६५८ मध्ये शिवाजी महाराजांनी तुंग- तिकोना किल्ला जिंकुन परत स्वराज्यात
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🚩शिवराय #🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1
शिव दिनविशेष Video Link🔗
https://youtu.be/NmJzx9gn17U
📜 ९ फेब्रुवारी इ.स.१६६५
छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापुरकरांचे 'बसनुर' छापा घालुन लुटले. छत्रपती शिवाजी महाराजांनी बसनुरची स्वारी ही जलमार्गे केली, राजांनी नौकाप्रवास करुन सागर ऊल्लंघु नये ही अंधश्रध्दा उधळुन लावली.
शिवराय हिंदु धर्मातील परंपरांचा सन्मानपुर्वक गौरव गाणारे होते पण धर्मातील खुळचट रुढींना आपल्या चरीत्रात त्यांनी मुळीच थारा दिला नाही.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ९ फेब्रुवारी इ.स.१६७०
(माघ वद्य १४, चतुर्दशी, शके १५९१, संवत्सर सौम्य, वार बुधवार)
महाराजांचे वाढते आरमार!
छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाढत्या आरमाराने आरमारी प्रभावाने त्रस्त होऊन नाइलाजाने पोर्तुगिजांनी महाराजांच्या बरोबर तह केला व आपल्या हद्दीतही महाराजांच्या गलबतांना मुक्त संचार करण्यास परवानगी दिली. महाराजांच्या आरमाराला तत्कालीन सत्ताकर्ते किती घाबरत होते हे यावरुन दिसते.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ९ फेब्रुवारी इ.स.१६८९
(माघ शुद्ध १४, चतुर्दशी शके १६१०, दुर्मती संवत्सर, वार शनिवार)
राजाराम महाराजांचे पुन्हा मंचकारोहण!
किल्ले रायगडावर राजाराम महाराजांचे पुन्हा एकदा मंचकारोहण करण्यात आले. शके १६११ फाल्गुन अमावस्या ११ मार्च इ.स.१६८९ रोजीच्या काळ्या दिवशी श्री सखी राज्ञी जयती, सकल सौभाग्य संपन्न वज्रचुडेमंडीत महाराणी येसुबाईसाहेब यांच्या कपाळावरचे कुंकू कायमचे पुसले गेले. ऐन तारुण्यात वैधव्याचा वज्रप्रहार त्यांना सहन करावा लागला. हे दुःख पचवणे खर तर सामान्य गोष्ट नव्हतीच. मात्र शोक करायला वेळ नव्हताच. महाराजाची ही सुन ऐन आणीबाणीच्या प्रसंगी पदर खोचून स्वराज्यासाठी तडफेने उभी राहिली. स्वतःच्या पुत्राचे हित बाजुला ठेवुन फक्त स्वराज्यासाठी स्वतःच्या दिराचा म्हणजेच राजाराम महाराजांचा मंचकारोहण करण्याचा धाडसी व क्रांतिकारी निर्णय येसुबाईसाहेब यांनी घेतला. किल्ले रायगडाला झुल्फिकारखानाचा वेढा होताच त्यामुळे गडावर मसलत बसून सर्वानुमते राजाराम महाराजांचे मंचकारोहण पार पडले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ९ फेब्रुवारी इ.स.१७४३
गोव्याच्या व्हिसेरेईने छत्रपती संभाजी महाराजांना पाठविलेल्या पत्राची नोंद!
"रामचंद्र बाबाजी यांची बडदास्त आम्ही चांगली ठेवली होती. तरिही ते आम्हाला न सांगता न सवरता इकडून गुपचूप निघून गेले". "मी आपल्या निदर्शनास आणू इच्छितो की, आमच्या शेजारच्या प्रदेशात जर रामचंद्र बाबाजी यांचे वास्तव्य झाले तर ते आम्हाला बिलकूल आवडणार नाही आणि त्यांनी आमच्यावर केलेल्या आरोपांचा आपण पाठपुरावा केला तर त्यालाही आमची हरकत असेल".
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
https://youtu.be/NmJzx9gn17U
📜 ९ फेब्रुवारी इ.स.१७५७
प्लासीचा तह
प्लासीच्या लढाईपासून इंग्रजांच्या राज्याचा पाया हिंदूस्थानात रोवला गेला असे म्हणतात. सिराजउदौला अनेक गोष्टींमुळे पेचात सापडलेला होता. याचा फायदा घेऊन क्लाईव्ह ने त्याच्याशी ९ फेब्रुवारी १७५७ रोजी तह करून घेतला.
या तहानुसार सिराजउदौला ने मागील युद्धातले इंग्रजांचे नुकसान भरून दिले.तसेच तहात यानंतर सर्वांनी तटस्थ रहावे असे ठरले.परंतू इंग्रजांनी प्रामाणिकपणा न दाखविता फ्रेंचांविरोधात आघाडी उघडली व सिराजलाच मदत मागितली. क्लाईव्हने चंद्रनगरवर हल्ला करून ते ताब्यात घेतले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇
☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम ||
|| जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
💐💐🙏💐💐 #🙏भक्ती सुविचार📝 #संत गजानन महाराज शेगांव #जय गजानन #जय श्री गजानन
⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳
📜 ८ फेब्रुवारी इ.स.१६६५
( फाल्गुन शुद्ध तृतीया, शके १५८६, संवत्सर क्रोधी, शुक्रवार )
मराठ्यांची पहिली आरमार मोहीम :-
हिंदवी आरमाराचे जनक छत्रपती शिवरायांनी बसरूर उर्फ बसनुरवर पहिली आरमार मोहीम काढली. स्वतःच्या नेतृत्वात ३ मोठ्या नौका व ८५ लहान मोठी गलबते, गुराबे सामील करून बसनुरवर स्वारी केली.
स्वदेशी आरमार, लाकूड आणि स्वदेशी कारागिरांनी बनविलेली जहाजे वापरून मराठ्यांचे पहिले व एकमेव समुद्री मोहिम करणारे राजे म्हणजे छत्रपती श्री शिवाजीमहाराज....!!
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🙏शिवदिनविशेष📜 #🗿शिवकालीन पुराणवस्तू #📜इतिहास शिवरायांचा #🚩शिवराय
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1
शिव दिनविशेष Video Link🔗
https://youtu.be/qKryRcAGeEs
📜 ८ फेब्रुवारी इ.स.१६८९
छत्रपती संभाजी महाराजांच्या सुटकेसाठी कृष्णभट्ट उर्फ आप्पाशास्त्री दीक्षित ह्यांचे बलिदान
महाशिवरात्री अवघ्या चार - पाच दिवसांवर आली होती. गावो गावच्या शिवालयात त्याची तयारी ही सुरू होती. परंतू बत्तीस शिराळा त्यास अपवाद होते. कारण गुण्या गोविंदाने नांदणाऱ्या गावात एखादा माजलेला वळू शिरावा तशी एक मोगली तुकडी बत्तीस शिराळ्यात घुसली होती. कोणास ही मागमूस लागू न देता मोगलांनी शिराळ्याच्या कोटा जवळ पूर्ण छावणी न करताच मुक्काम टाकला होता.
दस्तुरखुद्द छत्रपती शंभाजी महाराजांना कैद करून मुकररबखान पुढे कऱ्हाड ला गपचूप निघाला होता.
परतूं शिराळ्यात ही बातमी शेवटी फुटलीच.
खबर एकूण आप्पाशास्त्री व इतरांचा धीर सुटला होता.
आता असेच तडक जावे अन मुकररबखानास मातीत मीळऊन स्वराज्याच्या धन्यास सुखरूप परत आणावे अशा विचाराने त्या रांगड्या गड्यांचे बाहू स्फुरण चढू लागले होते. कारण विचार करावयास जास्त वेळ न्हवता.
कारण इतरांच्या मदतीस थांबलो व जर मुकररब इथून पुढे कऱ्हाड ला ओलांडून पूर्वेकडील मोघली प्रदेशात पुढे गेला तर उघड्या मैदानावर त्याला अंगावर घेणे जड जाईल. म्हणून जास्त विचार न करता आप्पाशास्त्री ठाणेदारला हाताशी धरत त्याचे पथक दिमतीला घेत गावातील काही लढाऊ लोक व स्वतः आप्पा शास्त्रीनीं स्थापन केलेल्या तालमीतले तगडे मल्ल घेऊन मुकररबखनाच्या गोटावर चालून गेले.
मुकररब खान पूर्ण सावध होता. त्याने घेतलेली झेप त्यास एक आकस्मित यश देऊन गेली होती. व हे यश अलगद बादशहाच्या झोळीत टाकण्यास तो कितीही आतुर असला तरीही बेफिकिरी मुळे क्षण भरात होत्याचे नव्हते होऊ शकते हे तो जाणून होता. तसा हल्ला एक रात्र आधीच ज्योत्यजी त्यामुळे रात्रभर डोळ्यात तेल घालून पहारा देण्याचे आदेश त्याने मोघली हशमांस दिला होता.
सुरवातीस अचानक झालेल्या हल्ल्याने मोघल थोडे फार बिथरले.पण ह्या आशा प्रकारास आपल्याला कधीही कुठेही सामोरे जावे लागू शकते. ह्याची मानसिक तयारी मुकररबखानाची असल्याने त्याने त्याची संपुर्ण छावणी लगेच लढाईस तयार केली.
संख्येने जास्त असलेल्या मोगलांनी ह्या मोजक्या शिबंदीस जुमानले नाही. मराठ्यांचे प्रयत्न तोकडे पडले.
अनेक वीर गतप्राण होऊन शिराळ्याच्या त्या मातीत कायमचे मिळाले.उरलेले बरेच मराठे व स्वतः आपशास्त्री दीक्षित कैद झाले.
त्याने बत्तीस शिराळ्याच्या त्या माळवरच रात्रीच्या अंधारात आप्पा शास्त्री दीक्षित सह इतर सर्व कैद मराठा तुकडीचा शिरच्छेद करण्याचा निर्णय घेतला.
बत्तीस शिराळ्यातील मल्लशाळा, भवानी मंदिर, मारुती मंदिर व स्वामीकार्यास कामी आल्याने अप्पशास्त्रीच्या वंशजांना मौजे कणदूर येथील इनाम रुपी मिळालेली जमीन ह्याची साक्ष देते.
खरे जंत्री वरून १६८९ च्या महाशिवरात्रीची तारीख ८ फेब्रुवारी १६८९ येते. व वरील माहितीतील हल्ला महाशिवरात्रीच्या २-३ दिवस आधी झाल्याने म्हणजेच २ -३ फेब्रुवारी १६८९ ही तारीख शंभाजी महाराजांच्या अटकेच्या आसपास असल्याने त्यास जुळून येते.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ८ फेब्रुवारी इ.स.१७१४
समुद्रावरचा शिवाजी राजा
कान्होजींनी अलिबागचा कुलाबा किल्ला जिंकुन घेऊन तेथे आपली राजधानी थाटली.छत्रपती महाराजांनी आंग्रे यांना आरमारचा प्रमुख केले आणि आंग्रे कोकण किणार्याचे राजे झाले.इ.स. १७०० मध्ये राणी ताराबाईंनीही या पराक्रमी वीराला सन्मानित करून सावंतवाडी ते मुंबईपर्यंतची किनारपट्टी रक्षणासाठी ताब्यात दिली.या नव्या आव्हानाबरोबर कान्होजींना एकाच वेळी परकीय आणि स्वकियांबरोबर लढा द्यावा लागत होता.१७०७ मध्ये मराठेशाही मध्ये फ़ुट पडल्यावर त्यांनी कोणाचीही बाजू न घेता स्वतंत्रपणे कारभार सुरु केला.पुढे त्यांचे बालमित्र असलेला बाळाजी विश्वनाथ भट (पेशवे ) याने त्यांचे मन वळवून सातारा गादी बरोबर वळवंड, लोणावळा येथे तह करवला.कोकणाबरोबरच कच्छ, सौराष्ट्रपासून त्रावणकोर, कोचीनपर्यंतची सागरी सत्ता कान्होजींच्या हाती होती.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
https://youtu.be/qKryRcAGeEs
📜 ८ फेब्रुवारी इ.स.१७६०
पानिपतच्या संग्रामातील वाघ घराण्यातील असेच एक वीर योद्धा संताजी वाघ ह्यांच्या संदर्भातील एक पत्र
लढाईत आमच्या जीवाचे काही बरे वाईट झाले तर सरकार आमच्या घराण्यास संभाळून घेईल असा भाव पत्रात विदित होतो.
स्वराज्याप्रती निष्ठा किती आणि कशी असावी ह्याचे हे पत्र उत्तम उदाहरण आहे.
कृपया पत्र थोडं मोठ्या आवाजात वाचावे म्हणजे पत्राचा भाव जास्त चांगला लक्षात येईल.
पत्राची तारीख आहे ८ फेब्रुवारी १७६०
पत्र सुरु.
II श्री II
श्रीमंत राजश्री भाऊसाहेबांच्या सेवेसी,
श्री सकलगुणालंकरण अखंडितलक्ष्मी अलंकृत राजमान्य
आज्ञाधारक संताजी वाघ दंडवत.
येथील कुशल तागाईत माघ वाद्य सप्तमी पावेतो साहेबाचे कृपेंकरुन सेवकाचे वर्तमान यथास्थित असे.
विशेष.
आपण आजच हिंदुस्थानचे स्वारीस ( पानिपतच्या स्वारीस ) सुमुहूर्ते निघून डेरियास आलो.
याउपरी मजलदरमजल तीर्थरूप राजश्री मामाजवळ फौजसुद्धा जाऊन दाखल होतो.
आम्हास सर्वस्वे आश्रा स्वामींचे पायाचा आहे.
पूर्वीपासून एकनिष्ठ सेवकव्रत मात्र जाणत आहो.
सर्व निर्वाह करणार धनी समर्थ आहेत.
वरकड वर्तमान राजश्री हरी वल्लभ यांनी विज्ञापनपत्र लिहिले आहे त्या वरून विदित होईल.
कृपाळू होऊन पत्राचे उत्तर आज्ञापत्र पाठवावे.
बहुत काय लिहिणे
कृपा कीजे
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ८ फेब्रुवारी इ.स.१८९९
रँडचा खून करण्यार्या चाफेकर बंधूंची नावे इंग्रज सरकारला सांगणार्या गणेश शंकर द्रविड व रामचंद्र शंकर द्रविड या बंधूंचा वासुदेव चाफेकर आणि महादेव रानडे यांनी गोळ्या झाडून वध केला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇
☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम ||
|| जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
⛳आजचे ऐतिहासिक शिव'कालीन दिनविशेष⛳
📜 ७ फेब्रुवारी इ.स.१६५८
भोरप किल्ल्यावर मराठा सैन्याने हल्ला करून स्वराज्यात आणला. तळकोकण व घाटमाथा या दरम्यान असलेला भोरप हा किल्ला विजापूरच्या ताब्यात होता त्यामुळे तळकोकनातील घाटमाथ्यावर लक्ष ठेवण्यासाठी शिवरायांनी सैन्य पाठवून भोरप किल्ला आणि जवळपासचा मुलुख सुद्धा जिंकून स्वराज्यात परत आला. सुधागड म्हणजे भोर संस्थानाचे वैभव. सुधागड किल्ल्यास पूर्वी भोरपगड असेही म्हणत असत. शिवछत्रपतींचा पदस्पर्श त्या गडाला झाला आणि त्याचे नाव सुधागड ठेवले गेले. स्वराज्याच्या राजधानीसाठी रायगडा आधी भोरपगड, म्हणजे आताचा सुधागड किल्ल्याचा विचार करण्यात आला होता. नारोमुकुंद यांनी शिवाजी महाराजांना राजधानीसाठी हा किल्ला सुचवला होता.शिवाजीं महाराजांना राजधानीसाठी रायगड किल्ला योग्य वाटला.
विजापुरकरांच्या ताब्यातील किल्ले भोरप मराठ्यांनी स्वराज्यात परत आणला. तळकोकण व घाटमाथा या दरम्यान असलेला भोरप हा किल्ला विजापूरच्या ताब्यात होता त्यामुळे तळकोकनातील घाटमाथ्यावर लक्ष ठेवण्यासाठी शिवरायांनी सैन्य पाठवून भोरप किल्ला आणि जवळपासचा मुलुख सुद्धा जिंकून स्वराज्यात परत आला. सुधागड म्हणजेच भोरप, भोर संस्थानाचे वैभव सुधागड किल्ल्यास पूर्वी भोरपगड असेही म्हणत असत. शिवछत्रपतींचा पदस्पर्श त्या गडाला झाला आणि त्याचे नाव सुधागड ठेवले गेले. स्वराज्याच्या राजधानीसाठी रायगडाआधी भोरपगड, म्हणजे आताचा सुधागड किल्ल्याचा विचार करण्यात आला होता. नारोमुकुंद यांनी शिवाजी महाराजांना राजधानीसाठी हा किल्ला सुचवला होता. शिवाजींना राजधानीसाठी रायगड किल्ला योग्य वाटला. मात्र महाराजांनी सुधागडाच्या बांधकामासाठी पाच हजार होन देऊन किल्ला लढाऊ बनवला. त्या काळी गडावर ७०० गडक-यांचा राबता होता. रायगडाचा महादरवाजा आणि सुधागडचा महादरवाजा यात साम्य आहे. सुधागडाला लाभलेली अभेद्य तटबंदी, गडमाथ्यावरील विशाल पठार, पाण्याचे असंख्य टाक, तसेच भौगोलिक दृष्ट्या असलेले महत्त्व यामुळे सुधागड हा बळकट किल्ला म्हणून गणला जातो. हा किल्ला म्हणजे कोकणात उतरणा-या सवाष्णीच्या घाटाचा पहारेकरीच!
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🚩शिवराय #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1
शिव दिनविशेष Video Link🔗
https://youtu.be/fY4_J81xDxY
📜 ७ फेब्रुवारी इ.स.१६८५
मराठ्यांनी धरणगाव शहर लुटून अनेक घरांना आगी लावल्या. मराठ्यांनी यावेळी इंग्रजांची वखारही जाळली. ही बातमी समजताच औरंगजेबाने आपले सरदार धरणगावाला पाठवले. दोन्ही सैन्यात ७ फेब्रुवारी १६८५ ला चकमकी उडाल्या.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ७ फेब्रुवारी इ.स.१६८८
आलमगीर औरंगजेबाने गोवळकोंड्याच्या किल्यास वेढा दिला होता. गोवळकोंड्याच्या किल्यातून सतत तोफांचा मारा चालू होता. त्यामुळे मोगल सैन्याची दरोरोज जीवितहानी होत होती. मृत्यू पडलेल्या सैनिकांची व जखमी सैनिकांची आकडेवारी रोज वाढत होती. गोवळकोंड्याच्या किल्याच्या सभोवती संरक्षणाची व्यवस्था म्हणून खोल खंदक खोदण्यात आले होते त्यामुळे मोगली सैन्य पुढे सरकू शकत नव्हते. तीन महिने वेढा चालवून देखील मोगल सैन्यास अपेक्षित यश मिळत नव्हते.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ७ फेब्रुवारी इ.स.१६९८
किल्ला जिंजी....
१२४० मध्ये कृष्णगिरीचा किल्ला कृष्ण कोण या राजाच्या राजवटीत बांधला गेला १३८३ ते १७८० या कालखंडात जिंजीवर विजयनगर, नायक, मराठा, मुघल, नवाब, फ्रेंच व इंग्रज अशा अनेक राजवटी नांदल्या. या विविध राजवटीत या किल्ल्याचा विस्तार झाला. या ९ किलो मीटरच्या परिघातील किल्ल्यात आज कल्याण महाल वेणुगोपाल, वेंकटरमणा, पट्टाभिरामा मंदिरे, सादत-उल्लाह-खान मशीद, प्रचंड मोठे धान्य कोठार, सुंदर तलाव असे बरेच पाहण्या सारखे आहे.
शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजयाच्या वेळी हा दुर्ग नासीर मुहम्मद या किल्लेदाराकडून जिंकून घेतला व त्यास नावे दिली.. शारंगगड, गर्वगड आणि मदोन्मत्तगड हा गड जिंकून घेण्यामागची दूरदृष्टी मात्र भविष्यात कामी आली १६८९ मध्ये मुघलांनी रायगडाला वेढा घातल्यावर राजाराम महाराज निसटले दक्षिणेतील या जिंजी किल्ल्याने त्यांना आश्रय दिला झुल्फिकारखान नुसरतजंग या मुघल सरदाराने अखेर जिंजीला वेढा घातला... धनाजी जाधव हा मराठा वीर बाहेरून गनिमी हल्ले करत होता पण वेढा काही ढिला पडत नव्हता.. राजाराम महाराजांनी स्वत:ची सुटका करून घेतली.. यानंतर चिडलेल्या मुघलांनी जिंजीवर निकराचा हल्ला चढविला. शिधा सामुग्री संपल्यामुळे मराठ्यांना शरणागतीशिवाय पर्याय उरला नाही ७ फेब्रुवारी १६९८ रोजी मुघल फौजांनी गड ताब्यात घेतला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ७ फेब्रुवारी इ.स.१७३५
सुभेदार मल्हारराव होळकरांनी खाने दौरान या मुघल सेनापती कडून २२ लाख रुपये वसूल केले आणि बादशाह कडून ५० लाख रुपये मिळवून सरकारात जमा केले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ७ फेब्रुवारी इ.स.१७७१
दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा!
दिनांक ७ फेब्रुवारी सन १७७१ रोजी मराठी फौजा दिल्लीच्या वेशीवर उभ्या ठाकल्या. महादजी शिंदेनी शहाआलम बादशहा बादशहाची दिल्लीत व्दाही फिरवली व झाबेताखानाकडून दिल्लीचा ताबा मागीतला. त्याने रितसर ताबा देण्यास नकार दिल्याने महादजींनी पानशांना तोफा डागण्यास संमती देताच पानशांनी तोफांच्या मार्याने दिल्ली अक्षरशः दणाणून सोडली. झाबेताखान आणि त्याच्या सैन्याचा या प्रलयापुढे निभाव लागला नाही. मराठी सैन्याच्या उरात पानिपतचे शल्य दशकभर टोचत असल्याने मराठ्याच्या पराक्रमाला पारावार उरला नव्हता. दरम्यानच्या काळात उत्तर हिंदुस्थानात मराठ्यांनी मराठी शौर्याचा तमाशा दाखवत जेते तेथे भगवे उभारले होतेच. दिल्लीच तेव्हढी बाकी होती.
https://youtu.be/fY4_J81xDxY
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ७ फेब्रुवारी इ.स.१८००
कोल्हापूरचे सरदार गायकवाडबंधु स्मृतिदिन
एकाच लढाईत दौलतराव गायकवाड व विश्वासराव गायकवाड हे बंधू शत्रूशी लढा देत असताना धारातिर्थी पडले. कोल्हापूरचे छत्रपती शिवाजी महाराजांनी या निष्ठावंत गायकवाड बंधूंचे स्मारक बांधले. हे स्मारक आजही आपल्याला पन्हाळगडावर पहावयास मिळते.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇
☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम ||
|| जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳
📜 ६ फेब्रुवारी इ.स.१६७४
महाराणी काशीबाई पुण्यतिथी
शिवरायांचा सातव्या पत्नी काशिबाई राणीसाहेब. छत्रपती शिवाजी महाराज यांचा विवाह काशीबाई जाधव यांच्याशी शके १५७९ वैशाख शुद्ध पंचमीला ८/०४/१६५७ रोजी राजगडावर जिजाऊसाहेबांच्या उपस्थितीत पार पडला .काशीबाई साहेबांचा जन्म सन १६४८ मध्ये जाधव राव घराण्यात झाला. काशीबाईसाहेब संताजी जाधव यांच्या कन्या होत. संताजी जाधव म्हणजे जिजाऊंचे भाऊ अचलोजी यांचे द्वितीय पुत्र, संताजी जाधवराव यांच्या कन्या म्हणजे काशीबाईसाहेब.
जिजाऊंचे वडील लखुजी जाधव राव व बंधू अचलोजी जाधव राव या दोघांनी जाधवराव घराण्याला १७ व्या शतकाच्या आरंभी मोठी प्रतिष्ठा प्राप्त करून दिली होती. दौलताबाद व सिंदखेड राजा मुलुख इत्यादी भागात त्यांचा मोठा दरारा होता, पण दौलताबादेस निजामशहा कडून विश्वासघाताने लखुजी जाधव राव व त्यांचे दोघे पुत्र अचलोजी, रघुजी आणि नातू यशवंतराव हे सर्व पुरुष एकाच वेळी मारले गेले .या प्रकारानंतर अचलोजींचा अल्पवयीन मुलगा संताजी जाधव राव यांचे पालन पोषण जिजाऊसाहेबांनीच रायगडावर केले. संताजी राजगडावरच राहिले होते. त्यामुळे त्यांच्या कन्या काशीबाई साहेबांचा विवाह मोठ्या थाटामाटात राजगडावर करून जिजाऊसाहेबांनी जाधव भोसले संबंध परत एकदा जवळ केले काशीबाईसाहेब यांना अपत्य नव्हते. त्यांचा मृत्यू ६ फेब्रुवारी १६७४ मध्ये पाचाड येथे झाला..काशिबाई राणीसाहेब यांची समाधी पाचाड येथे कुशावर्त तलावाच्या ऊत्तरेस आहे.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🗿शिवकालीन पुराणवस्तू #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩शिवराय
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1
शिव दिनविशेष Video Link🔗
https://youtu.be/tnbuNzUI4ls
📜 ६ फेब्रुवारी इ.स.१६७५
विजापूरच्या कारवार येथील सुभेदाराने बंड पुकारल्याने विजापूरमधे जो गोंधळ माजला त्याचा फायदा छत्रपती शिवाजीराजांनी घेऊन १६७३ सालच्या सप्टेंबर महिन्यात त्यांनी फोंड्यास वेढा घातला परंतु विजापूरचे सैन्य पन्हाळ गडावर चाल करून आल्याने राजांना फोंड्याचा वेढा उठवून पन्हाळगडाकडे कूच करावे लागले. १६७४ सालच्या सप्टेंबर महिन्यात महाराजांच्या एका सरदाराने पुन्हा वेढा घातला पण तिथल्या शिबंदीचा किल्लेदार महमदखान ह्याने किल्ला बरेच दिवस लढवल्याने महाराजांच्या सरदाराला वेढा उठवावा लागला. प्रस्तुत वेढ्याचा उल्लेख वेंगुर्ला येथील इंग्रजी वखारातील एक अधिकारी अब्राहम ला. फेबर ह्याने Dutch Governor डच गव्हर्नर जनरल John Mastsuiker ह्याला लिहीलेल्या एका पत्रात केले आहे. त्याआधी इ.स १६७२ साली विजापूरचा सुलतान अली आदिलशहा मरण पावला त्याच्या पश्चयात विजापूर राज्यामधे जी दुही माजली त्याची संधी साधून छत्रपती शिवाजीराजांनी १६७५ सालच्या एप्रिल महिन्यात परत फोंड्यास वेढा घातला. प्रस्तुत वेढ्याचा उल्लेख इंग्रजी कागदपत्रात आढळतो. पहिला उल्लेख राजापूरच्या इंग्रजांनी दिनांक ६ फेब्रुवारी रोजी मुंबईला पाठवलेल्या पत्रातील असून दुसरा कारवार येथील इंग्रजांच्या दिनांक १४ एप्रिल १६७५ मधल्या पत्रातील आहे.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ६ फेब्रुवारी इ.स.१७३८
'बाजीराव म्हटल की फक्त मस्तानीच काहीजणांना आठवते.' बाजीरावांची परकीय शत्रूंना किती दहशत होती ते पहा..
"जर बाजीराव विजयी झाला तर मग त्याच्याशी लढणे कुणालाच शक्य होणार नाही आणि जर तो पराभूत झाला तर त्याचे माघार घेणारे सैन्य इकडे साष्टी बेटात येऊन तळ ठोकून राहण्याचा संभव आहे. ह्या दोन्ही प्रसंगी आम्हाला साष्टी बेट घेणे अशक्य होईल"
पोर्तुगीजांचा गोव्याचा व्हाॅइसराॅय कौंट द सांदोमिल याचे उत्तरेकडील सेनापती आंतोनियु कार्दिम फाॅइश याला पत्र..
दिनांक - ६ फेब्रुवारी १७३८
स्थळ - गोवा
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
https://youtu.be/tnbuNzUI4ls
📜 ६ फेब्रुवारी इ.स.१९३२
पहिली क्रांतिकारी महिला बिना दास यांनी बंगालचे गर्वनर स्टॅन्ले जॅक्सन यांचे हत्येचा ६ फेब्रुवारी १९३२ रोजी प्रयत्न केला.
कोलकाता विद्यापीठाचे दीक्षांत समारंभात त्यांनी स्टॅन्ले जॅक्सन यांचेवर पिस्तुलातून ५ गोळ्या झाडल्या. त्यांना ९ वर्षाची कारावासाची शिक्षा झाली. पदवीदान समारंभातच त्यांना अटक झाली व त्यांना त्यावेळी पदवी दिली नाही.
पतीच्या निधनानंतर त्या ऋषिकेश येथे अज्ञातवासात गेल्या. तेथेच २६ डिसेम्बर १९८६ रोजी निधन झाले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ६ फेब्रुवारी इ.स.१९३९
महाराज श्रीमंत सयाजीराव खंडेराव गायकवाड (तिसरे) स्मृतिदिन
(जन्म : कौळाणे, ता. मालेगांव, नाशिक जिल्हा, ११ मार्च १८६३)
हे इ.स. १८७५ ते इ.स. १९३९ सालांदरम्यान बडोदा संस्थानचे अधिपती होते. ते अत्यंत पुरोगामी वृत्तीचे, कर्तृत्ववान संस्थानिक (कारकीर्द - १८८१-१९३९) होते. बडोदा संस्थानातील प्रजेच्या कल्याणासाठी केलेल्या कार्याकरता ते विशेषत्वाने ओळखले जातात.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇
☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम ||
|| जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳
📜 ५ फेब्रुवारी इ.स.१२९४
देवगिरीचे यादव साम्राज्य संपुष्टात - महाराष्ट्र पारतंत्र्यात
यादव साम्राज्यावरील पहिला इस्लामी हल्ला झाला तो १२९४ च्या काळात. जलालुद्दीन खिलजीचा पुतण्या अल्लाउद्दीन खिलजी हा दख्खनस्वारी करिता यादवांवर लक्ष ठेउनच होता. त्याने निष्णात योजना आखली. देवगिरी वर असलेल्या यादवांचे सैन्य देवगिरी पासून दूर जाताच त्यावर हल्ला करायचा,कारण यादवांचे सैन्य विभागलेलं नसे. वर सांगितल्या प्रमाणे यादवांचे सैन्य होयसळ साम्राज्यावर मोहिमेत व्यस्त असताना अल्लाउद्दीन ला आयती संधी मिळाली आणि त्याने अत्यंत शांतपणे देवगिरीच्या दिशेने कूच केली. आपण दक्षिणेत चाललो आहोत अशी बतावणी करत, जंगल मार्गाने आपल्या छावण्या लावत अल्लाउद्दिन देवगिरीच्या दिशेने निघाला.
देवगिरीपासून ८० मैलावर असलेल्या लासूर गावी जेव्हा अल्लाउद्दिन येऊन पोचला त्यावेळेस रामचंद्रदेवला येणाऱ्या संकटाची चाहूल लागली परंतु आता वेळ निघून गेली होती. रामचंद्राच्या सेनापतीने प्रतिकाराचा प्रयत्न केला खरा पण खिलजीच्या सैन्यापुढे त्याचा टिकाव लागला नाही आणि बघता बघता देवगिरी किल्ल्याला अल्लाउद्दिन खिलजीने वेढा घातला. अचानक समोर आलेला नव्हे थेट दाराशी येऊन ठेपलेला शत्रू पाहता रामचंद्रची काहीही तयारी नव्हती. त्याने आपला मुलगा शंकरदेवला तत्काळ परत येण्याचा निरोप तर धाडला होता खरा पण त्याच्या आगमनापर्यंत तग धरू शकेल इतकी देवगिरी किल्ल्याची तयारी नव्हती. आतील अन्नधान्यसाठा देखील पुरेसा नव्हता. त्यामुळे रामचंद्रने किल्ल्यातच शरणागती पत्करली आणि मोठ्या प्रमाणावर सोने, मोती, दागिने आणि हत्ती व घोडे खिलजीला देण्याचे काबुल केले. सोबतच वार्षिक महसूलही देऊ केला. त्याने शरणागती पत्करताच काही काळात रामचंद्रचा मुलगा संपूर्ण सैन्यासह देवगिरीवर दाखल झाला. त्याने खिलजीवर हल्ला करण्यचा प्रयत्न देखील केला मात्र त्यात त्याला यश आले नाही. अन अशा तर्हेने दख्खनचे सर्वात मोठे साम्राज्य उत्तरेतील परकीय शक्तीचे पायिक बनले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🚩शिवराय #📜इतिहास शिवरायांचा #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🙏शिवदिनविशेष📜 #🗿शिवकालीन पुराणवस्तू
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1
शिव दिनविशेष Video Link🔗
https://youtu.be/k-47fEyegFk
📜 ५ फेब्रुवारी इ.स.१६६४
(माघ वद्य चतुर्थी, शके १५८५, संवत्सर सौम्य, वार शनिवार)
राजे शहाजीराजे यांच्या समाधीवर छत्री अर्पण केली.
शहाजीराजांच्या समाधीवर छत्री... छत्रपती शिवाजी महाराजांनी राजे शहाजीराजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या समाधीवर छत्री अर्पण केली. राजे शहाजीराजांचे कर्नाटक येथील होदीगिरे येथे घोड्यावरून पडून निधन झाले होते. छत्रपती शिवरायांच्या स्वराज्य संकल्पनेचा फार मोठा आधार नियतीने हिरावून घेतला. छत्रपती शिवरायांनी राजे शहाजीराजांच्या समाधीवर छत्री अर्पण केली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ५ फेब्रुवारी इ.स.१६६४
शके १५८५ च्या माघ वद्य चतुर्थीला म्हणजे ५ फेब्रुवारी १६६४ ला महाराज सुरतेची लुट घेऊन राजगडी पोहचले. १८ जानेवारी १६६४ रोजी औरंगजेब लाहोरहून दिल्लीस पोहचला असता त्यास शिवाजी महाराज्यांकडून सुरतेच्या लुटची वार्ता समजली व त्याला याची खंत वाटून सुरतेच्या लुटीचा सूड घेण्याचा निश्चय केला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ५ फेब्रुवारी इ.स.१६६४
नारो बापूजी मुदगल यांचे बलिदान.
६ जानेवारी - ९ जानेवारी १६६४ पर्यंत महाराजांनी मनसोक्त सूरत लुटली. बाद्शःची सुरत बतसुरत झाली. सुरतेची धनलक्ष्मी घेउन मराठे थेट लोहगडावर पोचले. शहाजी राजांच्या मृत्युची बातमी कळताच महाराज राजगडी निघून गेले.
लुटीचा माघ काढीत मोघली हेर लोहगडाच्या आसमंतात पोचले आणि तडक मागे जुन्नरहुन मुकुंदसिंह लोहगडाच्या दिशेने निघाला. मुकुंदसिंहांस अटकाव करण्यासाठी महाराजांचा बाळसवंगडी नारों बापूजी मुदगल सरसावला. नारो बापूजी हे बापूजी श्रीपत मुदगल नर्हेंकर देशपांडे यांचे पुत्र. वडगावजवळ नारो बापुजिंच्या आणि मुकुंदसिंहाच्या सैन्याचा सामना झाला. मुघलांनकडे अनेक घोड़ेस्वार, तीरंदाज, आणि बंदूकधारी सैनिक होते. तरी सुद्धा मराठ्यांच्या युद्धतंत्रा समोर मुघलांचा निभाव लागत नव्हता. नारो बापूजी आपली नागवी समशेर नाचवित मोघलांनवर असे काही तुटून पडले होते की, मुघलांची त्रेधातिरपिट उडाली. या वीराला कसा थोपवावा हेच मुकुंदसिंहास कळत नव्हते. शेवटी मुघली तिरंदाजाने सोडलेला तिर नारो बापुजिंच्या छातीत घुसला आणि ते धरणीवर कोसळले. तो दिवस होता ५ फेब्रुवारी १६६४.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ५ फेब्रुवारी इ.स.१६७०
( माघ वद्य दशमी, शके १५९१, संवतस्त सौम्य, शनिवार )
सूर्याजी काका मालुसरे यांना सिंहगडाची किल्लेदारी :-
सिंहगडाच्या युद्धात ८० वर्षांचे शेलारमामा ह्यांनी अद्वितीय पराक्रम गाजवला. त्याचबरोबर तानाजी काकांचे बंधू सूर्याजी काका ह्यांनी खचून न जाता मराठी सेनेला धीर देऊन व मोठी कामगिरी करून सिंहगड जिंकला. हे सगळं पाहून शिवराय खरंच भारावले आणि शेलरमामांचा सत्कार करून पालखीचा मान दिला व सूर्याजी काकांना सिंहगडाची सुभेदारी दिली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
https://youtu.be/k-47fEyegFk
📜 ५ फेब्रुवारी इ.स.१६८३
(माघ वद्य चतुर्थी, शके १६०४, दुदुंभी संवत्सर, वार सोमवार)
पोर्तुगीज मुलूखातून मोगलांची हल्ला करण्याची तयारी!
पोर्तुगीज मुळखातून मोगलांची हल्ला करण्याची तयारी! रणमस्तखान व बहादूरखान कल्याण-भिवंडी मोहिमेवर होते. याचवेळी छत्रपती संभाजी महाराज मोगलांची कल्याण भिवंडीतील रसद बंद करण्याचे प्रयत्न करत होते. मात्र औरंगजेबाने पोर्तुगिजांना जबर तंबी दिल्याने पोर्तुगीज मुलखातून मोगली सैन्य बिनधास्तपणे ये-जा करत होते. धान्य, रसद, सैन्य, सामग्री आता पोर्तुगीजांच्या मुलखांतून मुक्तपणे येत होते.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ५ फेब्रुवारी इ.स.१७६६
ऑक्टोबर १७६५ मध्ये पेशवे निजामाच्या समाचारासाठी निघाले. राक्षसभुवनाच्या लढाईत निजाम चीतपट झाला असला, तरीही त्याची अंतस्थ कूटकारस्थाने सुरूच होती. म्हणूनच दि. ५ फेब्रुवारी सन १७६६ या दिवशी माधवरावांनी निजामाची भेट घेतली. भेटीप्रीत्यर्थ दोघांनीही एकमेकांचा सन्मान केला, भेटीदाखल उंची वस्त्रे आणि नजराणे दिले. वस्तुतः हा निजाम कसा आहे हे माधवरावसाहेब पक्के ओळखून होते. परंतु, यानिमित्ताने त्यांनी केलेले राजकारण एखाद्या मुत्सद्दयाहूनही सरस होते. 'जर निजाम आणि पेशव्यात सख्य झाले तर पुन्हा कोणीही कुरापती काढण्यास धजावणारही नाही' म्हणूनच केवळ दाखवण्यापुरता का होईना, सलोखा ठेवून आपला हेतू साध्य करावा हेच उत्तम!
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ५ फेब्रुवारी इ.स.१७८८
गोव्याचा गव्हर्नर फ्रांसिश्कू कुज्य द मिनेझिश याने कोल्हापूरचे छत्रपती शिवाजी महाराज तिसरे यांना पाठविलेल्या पत्राचा तर्जुमा! "तुमचे वकील सुलतानराव भोसले हे इकडे मदतीच्या कराराबाबत वाटाघाटी करण्यासाठी आले होते. त्यांना आम्ही तुमच्याकडून वाटाघाटी करण्यास आधिकारपत्रे आणण्यासाठी म्हणून कोल्हापूरला पाठविले होते. परंतु ते इकडे परतले नाहीत. त्या दरम्यान वाडीचे सावंत यांनी आमच्याशी तह करण्याची निकड दर्शविल्याने त्यांच्याशी आम्हाला तह करावा लागला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ५ फेब्रुवारी इ.स.१८०४
इंग्रजांच्या पराभवानंतर यशवंतरावांनी गुप्त रीत्या एक संयुक्त दल उभारण्यासाठी जयपूर, जोधपूर, उदयपूर, बेगम समरू, रोहिल्याचा मुख्य गुलाम मुहम्मद व काहीशीख राजांना पत्रे पाठविली. तसेच दौलतराव शिंद्यांकडे वकील पाठवून इंग्रजांबरोबरची मैत्री संपुष्टात आणण्याचे आवाहन केले (५ फेब्रुवारी १८०४). त्याचा नेमका उलट परिणाम झाला व इंग्रजांनी यशवंतरावांस एकाकी पाडण्याचे व त्यांचे साथीदार फोडण्याचे धोरण अंगीकारले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇
☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम ||
|| जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀













