#🌻आध्यात्म 🙏 #💐संत महंत🙏 #✍️भक्ती संदेश ❗२४ ऑक्टोबर❗
‼जय हरि विठ्ठल‼🙏🙏
🌹🌹प्रवचनाचा विषय🌹🌹
🟧🟫🟧परमेश्वराची खरी पूजा.🟧🟫🟧
⭕देहाभिमान नाहीसा झाला म्हणजे काळजीचे कारण उरत नाही. 'मी साधन करतो' असा अभिमान देहाभिमानामुळे उत्पन्न होतो. हा साधनाभिमानही घातुक असतो. तेव्हा, जे काही होते ते परमेश्वराच्या सत्तेने होते असे मानीत जावे.⭕
❄आपले हित कशात असते ते त्यालाच उत्तम कळते, आणि तो सर्व तुमच्या बर्या करिताच करीत असतो. तेव्हा कसलीही काळजी करू नये. त्याच्यावर विश्वास टाकून आनंदात असावे.❄
🔹️चित्तवृत्ती परमेश्वराकडे लावावी. तेथून ती विषयाकडे जाऊ लागली म्हणजे संधी साधावी; म्हणजे त्यावर लक्ष असावे. मन विषयाकार होऊ लागले म्हणजे माझे स्मरण करावे. बर्याच वेळाने आठवण झाली तरी माझे स्मरण करावे, म्हणजे पुढे पुढे लवकर आठवण होऊ लागेल.🔹️
🪞ज्याचे मन पूजेत असते त्याची खरी पूजा होते.🪞
🔸️सर्वांभूती भगवद्भाव, आणि कोणाचे मन न दुखविणे, ही पूजा खरी होय.🔸️
💠पूजेला बाह्योपचाराची गरज नसते. मन मात्र अर्पण होणे जरूर आहे. पूजेत भाव असणे जरूर आहे.💠
🛟भक्ति आणि वैराग्य यांच्यामध्ये तसा फरक नाही. परमेश्वराची आवड म्हणजे भक्ति, आणि विषयाची अनासक्ति म्हणजे वैराग्य.🛟
💢रामराय वनवासात जायला निघाले तेव्हा त्यांनी सीतामाईला बरोबर न येण्याविषयी सांगितले.त्या वेळी तिने उत्तर दिले की, 'रामा❗ तुझ्याबरोबर असेन तर मला सर्व कष्ट सुखमय आहेत; आणि तुझ्याशिवाय असेन तर सर्व सुखोपभोग हे मला कष्टमय आहेत.' सीता ही रामाची मोठी भक्त होती, आणि म्हणून तिची अशी अवस्था होती. तिला परिस्थितीची जाणीव नव्हती. पण आपली गोष्ट अशी नाही.💢
💮आपण एकीकडे परिस्थितीवर अवलंबून आहोत आणि दुसरीकडे आपल्याला भगवंत पाहिजे, म्हणून आपण मध्यम मार्ग धरावा; तो हा की, आपण म्हणावे, 'रामा, माझी परिस्थिती तुझ्या इच्छेवर अवलंबून आहे.' असे आपण मनःपूर्वक म्हटले की परिस्थिती बदलली तरी आपला आनंद टिकेल.💮
♦'माझ्या देवाला हे आवडेल का❓' अशा भावनेने जगात वागणे हाच सगुणोपासनेचा हेतू आहे.♦
🌸जसजशी आपण सगुणाची उपाधी वाढवतो तसतशी आपली इतर उपाधी कमी कमी होत जात🌸
🌀सगुणाच्या उपासनेला आज आपण कल्पनेने प्रारंभ करू, मागून निश्चयात्मकता आपोआप येईल.🌀
🛟चैतन्य सर्व ठिकाणी भरलेले आहे; ते कुठेही प्रकट होऊ शकेल. त्याला प्रकट करणे हे आपल्या भावनेवर अवलंबून आहे.🛟
❄ज्याची भावना खरी शुद्ध, म्हणजे निःसंशय असते, त्याला दगडाची मूर्तीदेखील देव बनते. भावना मात्र शंभर नंबरी पाहिजे; त्यामध्ये भेसळ उपयोगाची नाही.❄
🌷#बोधवचन :उपाधी वासना नाहीशा करण्यासाठीच नाम घ्यायचे असते.🌷
🌲#प्रवचने:श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज🌲
🚩श्री राम जय राम जय जय राम🚩
#🙏श्री महालक्ष्मी कार्तिक शुद्ध द्वितीया श्री करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी देवी ची आजची अलंकार पुजा
23/10/25
#🌺गणपती 🍁 *श्री सिध्दिविनायक प्रसन्न!!*🍁
*श्री सिध्दिविनायक गणपती मंदिर न्यास*
🛕 🙏 *आजचे शुभ दर्शन* 🛕 🙏
*गुरुवार दिनांक २३ ऑक्टोबर २०२५*
*🙏।।श्री गणेशाय नमः।।🙏*
*वक्रतुण्ड महाकाय सूर्य कोटी समप्रभ |*
*निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्येशु सर्वदा ||*
🌹 *सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा* 🌹
🍁 *ॐ गं गणपतये नमः* 🍁 🛕 *बाप्पा सर्वाना सुख, समृद्धी,निरोगी व भरभराटी देऊन आनंदात ठेवा*🛕 🚩🚩🚩 *जय गणेश*🚩🚩🚩
🏮🏮🏮🛕🏮🏮🏮
*🌺शुभ सकाळ*🌺
*दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा*
#🌻आध्यात्म 🙏 #✍️भक्ती संदेश #💐संत महंत🙏 #🙏भक्ती सुविचार📝 . .ll ज्ञानेश्वरीतील ज्ञानामृत चिंतन ll
. ------------------------------------------
'ईश्वरदर्शनासाठी चित्त स्वच्छ लागते. मलीन चित्ताला ईश्वराचे दर्शन होत नाही. भक्ताचे चित्त स्वच्छ असते म्हणूनच त्याला ईश्वराचे दर्शन होते. अभक्ताचे चित्त मलीन असल्यामुळे त्याला ईश्वरदर्शन होत नाही.
*************************************************
. यालागी दुष्कृती जही जाहाला । तरी अनुतापतीर्थी न्हाला l
. न्हाऊनि मजआतु आला । सर्वभावे ll
***************[ ज्ञानेश्वरी-९/४२०]*****************
. ------- अर्थ ------
. . याकरिता पूर्वीचा तो पापाचरणी जरी असला तरी पश्चातापरूपी तीर्थात स्नान करून मला सर्वभावाने शरण आला.
. ------विश्लेषण -----. .
. फक्त भक्तांवरच अनुग्रह करतो असे नाही जे भक्त नाहीत पण अनावधानाने व पश्चात्तापाने माझी भक्ती त्यांच्या हातून घडते त्या अभक्तावरही मी अनुग्रह करतो हे सांगताना भगवंत म्हणतात, 'सर्व प्राणिमात्रा मी सारखाच आहे. मी कोणाचा द्वेष करीत नाही अथवा कोणी मला प्रिय नाही. पण भक्तीने भजन करणारे माझ्या ठिकाणी असतात व मी त्यांच्या जवळ असतो. पूर्वीचा अत्यंत दुराचारी असूनही जर कोणी अनन्य भक्तीने माझे भजन करीत असेल तर त्याची सज्जनांमध्ये गणना करावी कारण तो आता आचारसंपन्न आहे.
. भगवंत निःपक्षपातीच आहेत. प्रतिबिंब दिसण्यासाठी आरसा स्वच्छ लागतो. त्यावरची धूळ झटकावी लागते. तसेच ईश्वरदर्शनासाठी चित्त स्वच्छ लागते. मलीन चित्ताला ईश्वराचे दर्शन होत नाही. भक्ताचे चित्त स्वच्छ असते म्हणूनच त्याला ईश्वराचे दर्शन होते. अभक्ताचे चित्त मलीन असल्यामुळे त्याला ईश्वरदर्शन होत नाही. म्हणूनच ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, 'सर्व ऐश्वर्य व कूळ यांचा डौल याप्रमाणे आहे ज्याप्रमाणे एखादे शरीर सर्व अवयवांनी पूर्ण असून त्यात फक्त जीवच नसावा. त्याप्रमाणे माझ्या भक्तीवाचून जे जगणे आहे ते पृथ्वीवरील दगडाप्रमाणे आहे.
. ज्याने आपल्या आयुष्याचा उरलेला काळ माझ्या भक्तीत र्च केला आहे जरी तो पूर्वीचा दुराचारी असला तरी आता तो सर्वतोपरी उत्तम आहे कारण पश्चात्तापरूपी तीर्थात स्नान करून तो मला आता सर्वभावाने शरण आला आहे.
. ll राम कृष्ण हरी, माऊली ll