#🙏श्री गुरुदेव दत्त💐 म्हणजे असते तरी काय..?🚩*
*भजन म्हणजे मनाची एकाग्रता. भजनातील शब्द, अर्थ, विचार, संगीत - स्वर, ताल, लय, वाद्य, टाळ या सर्वांचे एकत्रीकरण म्हणजे भजन होय. कारण भजनाला संगीताच्या स्वरांची आणि नादमयतेची साथ असते. भजन म्हणजे परमेेशराचे नामस्मरण, भक्ती. नवविधाभक्तीतील कीर्तनभक्ती, भज म्हणजे संगीत, नादब्रह्माशी एकरूपत्व, सप्तसुरांची आळवणी, परमेेशराच्या दिव्यशक्तीचे गुणगान, दिव्यशक्तीचे चिंतन, एकाग्रता. भजन म्हणजे आत्मोन्नती, होकारात्मक विचार, मनाचे आरोग्य, शारीरिक व्याधी विसरणे, बुद्धिचा विकास करणे, माणूस आपले दु:ख विसरतो.*
*नादब्रह्मामुळे भजन गाणारा साधक परमेेशराच्या नावाचे शब्द, त्याचा अर्थ आणि ते उच्चारण्यासाठी आवश्यक असलेल्या स्वरांशी एकरूप होतो. त्यांचा (एकरूपत्वाचा) आनंद अनुभवून शारीरिक, मानसिक, बौद्धिक, आत्मिक असे त्रास विसरून व्याधी निर्मूलन करण्यासाठी मनाची सकारात्मक अवस्था. भजन म्हणजे परमेेशराच्या शक्तीची अनेक रूपे आहेत. प्रत्येक रूपाचे नाव वेगळे अशा वेगवेगळ्या रूपामध्ये प्रकट झालेल्या परमशक्तीचे नाव घेत बसले तर मनात कसलेही वाईट विचार येत नाहीत. जसे संत तुकाराम महाराज विठ्ठल विठ्ठल, पांडुरंग यातच गुंग असत. असे मन जर एकाच ठिकाणी स्थिर झाले तर मनाची शक्ती वाढते. परमेेशराचे गुणवर्णन आळवून केले जाते. त्यावेळी त्या भगवंताचे रूप आपल्या नजरेसमोर जसेच्या तसे उभे राहते आणि त्यातच आपले मन रमते. मनावर त्याच गुणांचे संस्कार होतात.*
*नैराश्य, नकारात्मक विचार, आचार यांना स्थानच राहात नाही आणि परमेेशराच्या रूपातील निर्मळ आनंदाने मन भरून जाते. भजन म्हणजे भक्तीचा सर्वात सोपा प्रकार. सतत म्हटलेल्या भजनातून मनामध्ये भक्तीचाच आविष्कार होतो आणि साधक परमेश्वराशी एकरूप होऊ शकतो. जसे मनात वाईट गोष्टींचा विचार केला तर मनावर वाईट संस्कार होतात. त्यामुळे माणसाच्या हातून कृतीपण वाईट होते. तसे भजनाने माणूस सतत परमेश्वराशी एकरूप होऊन राहातो. त्यामुळे त्याच्या हातून कर्मही चांगले घडते. चांगल्या विचारांमुळे आपल्या हातून आचारही चांगलेच घडतात. त्यामुळे भजनाला मनोरंजनाचे साधन समजू नये.तर भगवंताला भावणारे उतम साधन समजुन भजन करावे...!!*
#👣गजानन महाराज🌺 मे ❗
‼जय गजानन माऊली‼
🌹प्रवचनाचा विषय🌹
🟫🟩🟫वृत्ती भगवंताच्या ठिकाणी स्थिर ठेवावी.🟫🟩🟫
🔶️माझा देह परमार्थाच्या आड येतो हे म्हणणे खरे नाही. तो मदत करतो किंवा आड येतो,या दोन्हीत विशेष तथ्य मानू नये. माझी वृत्ती कुठे गुंतते ते पाहावे.🔶️
💢भगवद्भजनात दिवस घालवावा असे वाटू लागले, पण संगत मिळाली खेळ खेळणार्याची. तेव्हा त्याचे मन कशाला मोडा असे म्हणून खेळ खेळू लागाला, भगवंताच्या स्मरणात राहण्याच्या वृत्तीपासून ढळू लागला, तर कसे होणार❓💢
🏵आईने आजवर खस्ता खाल्ल्या, लहानाचे मोठे केले, तीच आई लग्न झाल्यावर विषयाच्या आड येऊ लागली आणि म्हणून वैर्यासारखी वाटू लागली❗वास्तविक, दोघांच्याही देहांत फरक होण्यासारखे असे काहीच झाले नाही; पण वृत्तीत बदल झाला. विषयातच मी गुंतून राहू लागलो, याला काय करावे❓🏵
🌀'मी सुखी कशाने होईन' हे आपण आपल्या कल्पनेनेच ठरवले; पण या जगात पूर्ण सुख किंवा पूर्ण दुःख असे काही आहे का❓🌀
💮जे खरे असेल किंवा खोटे असेल याची आपल्याला खात्री नाही, त्या बाबतीत आपण रिकाम्याच कल्पना करीत बसतो.💮
❄दुसरा मनुष्य ज्या वेळी आपल्याला त्रास देतो, त्या वेळी त्यामध्ये पन्नास टक्के आपली कल्पना असते. बाकी उरले पन्नास टक्के; त्याबद्दल 'त्याने दिलेला त्रास मी करून घेणार नाही' ही वृत्ती असावी, म्हणजे संपले❗❄
🛟आपली वृत्ती सारखी बदलते आहे, आणि जगही सारखे बदलते आहे. त्यामुळे अमुक परिस्थितीमुळे सुख किंवा अमुक परिस्थितीमुळे दुःख होते हे वाटणे खरे नव्हे, कारण सुखदुःख अस्थिर असते.🛟
💠शास्त्रांचे नियम हे वृत्तीला स्थिर करतात. भजन, पोथ्यावाचन, मंदिर बांधणे वगैरे गोष्टी जर वृती सुधारण्यासाठीन केल्या तर ती नुसती करमणूक होते, त्यापासून खरा फायदा होत नाही.💠
♦️आगगाडी रोज काशीला जाते, पण तिला काही काशीयात्रा घडत नाही. यात्रा घडते ती आत बसलेल्या लोकांना. गंगास्नान, विश्वेश्वराचे दर्शन वगैरे आतल्या लोकांना घडते. त्याचप्रमाणे, देहाने नुसता पूजापाठ वगैरे करून परमार्थ घडत नाही. आपली वृत्ती भगवंताच्या ठिकाणी चिकटली पाहिजे.♦️
🔸️भगवंताचे रूप सारखे समोर ठेवता येणार नाही, पण त्याचे रूप लक्षात आले नाही तरी आपण त्याचे नाम घेतो हे लक्षात राहिले तर वृत्ती सुधारेल.🔸️
⭕आपल्या डोळ्यात अगदी बारीक कण गेला तरी तो खुपतो. त्याहीपेक्षा वृत्ती सूक्ष्म असते. ती भगवंताला कळते, म्हणजे त्याच्यापाशी लबाडी चालत नाही.⭕
🔹️विषयाचा भोग आला असता जो त्यामध्येच गुंतत नाही, त्याच्यावर भगवंताची खरी कृपा झाली असे समजावे.🔹️
🏵भगवंतापासून वेगळे न राहणे, त्याचे विस्मरण न होऊ देणे, त्याच्या स्मरणात राहणे, त्याच्या नामात राहणे, यांत खरे समाधान, शांती आणि सुख आहे.🏵
🌷#बोधवचन :वृत्ती स्थिर होणे,शांत होणे, याचे नाव समाधान,आणि भगवंताकडेच वृत्तीसारखी राहणे याचे नाव समाधी होय.🌷
🎄#प्रवचने :श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज🎄
🚩🚩श्री राम जय राम जय जय राम🚩🚩🙏🙏
#🌹देवी देवता🙏 मास याला पुरुषोत्तम मास का म्हणतात? अधिक मासात काय करावे?
अधिक मासाचे आराध्य स्वामी भगवान श्री विष्णू मानले गेले आहेत. पुरुषोत्तम हे भगवान श्री विष्णूंचे एक नाव आहे. म्हणून अधिक मासाला पुरूषोत्तम मास म्हणून देखील म्हटले जाते. याला मल मास देखील म्हणतात.
पुराणात या विषयाशी निगडित एक अतिशय रंजक गोष्ट आढळते. असे म्हटले जाते की भारतीय विद्वानांनी आपल्या गणना पद्धतीने प्रत्येक चंद्र महिन्यासाठी एक एक देव निश्चित केले आहेत. जरी अधिक महिना सूर्य आणि चन्द्र महिन्यामध्ये संतुलन निर्माण करण्यासाठी असला तरी ही या अतिरिक्त महिन्याचा अधिपती होण्यासाठी कोणीही देव तयार नव्हते अश्या परिस्थितीत ऋषी मुनींनी भगवान श्री विष्णूंना विनवणी केली की तेच स्वतः या महिन्याचे भार स्वतःवर घ्यावे.
भगवान श्री विष्णूनी त्यांचा विनवणीला मान देऊन हे स्वीकारले आणि अश्या प्रकारे हा मलमासा प्रमाणेच पुरूषोत्तम मास देखील झाला.
अधिक मासात काय करावे
हिंदू भक्त सामान्यतः अधिक महिन्यात व्रत कैवल्य, उपवास, पूजा, पठण, ध्यान, भजन, कीर्तन, चिंतन याला आपले जीवनक्रम बनवतात. पौराणिक तत्वांच्यानुसार या महिन्यात यज्ञ-हवनाच्या व्यतिरिक्त श्रीमद् देवीभागवत, श्री भागवत पुराण, श्री विष्णु पुराण, भविष्योत्तर पुराण इत्यादींचे श्रवण किंवा पठण आणि ध्यान करणं फलदायी असतं.
अधिक महिन्यातील भगवान विष्णू हे प्रमुख देव आहे, म्हणून या संपूर्ण काळात विष्णूंच्या मंत्राचे जप करणे फायदेशीर आहे. असे मानले जाते की अधिक महिन्यात किंवा मासात विष्णूंच्या मंत्रांचे जप करणाऱ्या साधकांना खुद्द विष्णू देव आशीर्वाद देतात, त्यांचे सर्व पाप नाहीसे करतात आणि त्यांचा सर्व इच्छापूर्ण करतात.
जय हरि विठ्ठल, राम कृष्ण हरी, नमो नारायणा
#👣गजानन महाराज🌺 मे❗
‼जय गजानन माऊली‼
🌹प्रवचनाचा विषय🌹
🟥🟩🟥 देह हा परमार्थाचे साधन समजावा.🟥🟩🟥
🔹️संतांचे काम तुम्हाला देहबुद्धीपासून सोडविणे हे आहे; तुम्हाला मुलगा देणे, तुमचे दुखणे बरे करणे, म्हणजे विषय देणे हे नव्हे.🔹️
🔸️जो जो परमार्थाला लागावे तो तो देहबुद्धी तिथून ओढण्याचा जास्त जास्त प्रयत्न करते.🔸️
🏵 विद्येची बुद्धी ही देहबुद्धीला धरून आहे; ती मारून आपण शुद्ध केली पाहिजे. याकरिता भगवंताच्या स्मरणासारखा दुसरा उपाय नाही.🏵
⭕कुत्रा हा आपल्याला रात्रीच्या पहार्याकरिता उपयोगी पडतो. पण तो कितीही चांगला अणि उपयोगी असला, तरी आपण त्याला पानात जेवायला घेऊन बसत नाही. त्याप्रमाणे देहाचेही आहे.⭕
💠आतल्या खोबर्याच्या रक्षणाकरिता ज्याप्रमाणे करवंटी, त्याप्रमाणे देहाला परमार्थाकरिता साधन मानावे. पण मनुष्य 'हा देहच मी आहे' असे मानून व्यवहार करतो. वास्तविक, आपण देहापासून निराळे आहोत असे पदोपदी दाखवित असतो. माझा हात, माझा पाय, माझा डोळा, माझे मन, फार काय माझा जीव असेही म्हणतो; पण वागतो मात्र 'मी तोच आहे' असे समजून. देहाशी संबंध जास्त येईल असेच आपण भगवंताजवळ मागतो. असे न करावे.💠
🛟आपल्या देहावरचे प्रेम कमी होण्यासाठी, दुसर्यावर प्रेम करायला लागावे. प्रेम बसायला आपल्याला आपल्यासारखाच देहधारी लागतो. कुत्रे रडत असले तर आपल्याला नाही वाईट वाटत; पण एखादे लहान मूल रडत असले तर वाईट वाटते. देवावर प्रेम करायला, देवाला आपल्यासारखाच देहधारी कल्पावा लागतो. म्हणून, आपले देहावरचे प्रेम कमी व्हायला, देहबुद्धी कमी व्हायला, सगुणमूर्तीचे, सद्गुरूचे ध्यान करावे लागते. ते जसजसे दृढ होत जाईल, तसतसे आपण स्वतःला विसरून जातो; आणि आपण देहाच्या पलिकडे गेलो, म्हणजे सद्गुरूचे खरे स्वरूप हे देहातीत आहे असे प्रत्ययाला येते.🛟
❄देहबुद्धी नष्ट होईल तसतशी सद्गुरूची ओळख होईल. ज्याने देहाभिमान नष्ट केला त्याचा मोठा ज्ञानीसुद्धा हेवा करतो.❄
♦️'मी देह' म्हणावे, यापलिकडे दुसरे अज्ञान कोणतेही नाही. मी भगवंताचा असून देहाचा म्हणणे यासारखे दुसरे खोटे नाही.♦️
💮 प्रपंचात संकटे येतात, तरी पण तो सोडावासा वाटत नाही; याहून भगवंताची माया ती कोणती❓अति सहवासामुळे देहाचे ममत्व सुटत नाही. परमात्म्याचा सहवास, उदाहरणार्थ, देवाला जाण्याचा वा जप करण्याचा नेम केला, म्हणजे देहाचे ममत्व थोडे कमी होते. देहाच्या सहवासाने आपण देहाचे होतो, नामाच्या सहवासाने आपण परमेश्वराचे होऊ.💮
🍁#बोधवचन :भगवंताच्या स्मरणामध्ये देहबुद्धीचे मरण आहे.🍁
🌷#प्रवचने :श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज🌷
🎄श्री राम जय राम जय जय राम🎄
#👣गजानन महाराज🌺 #👣गजानन महाराज🌺 एप्रिल❗️
‼️जय गजानन माऊली‼️
🌹प्रवचनाचा विषय🌹
🟧🟥🟧खरी तळमळ लागली म्हणजे संत भेटतो.🟧🟥🟧
❄असंताची आवड नाहीशी होईल तेव्हाच संत हवासा वाटेल. विषय आपल्याला त्रास देतात, पण ते सोडावे कसे हे समजत नाही.❄
⭕जंगलात सापडलेल्या माणसाप्रमाणे आपले झाले आहे. आपली वाट चुकली आहे असे ज्याला वाटेल तोच जंगलातून बाहेर पडण्याची वाट विचारतो.⭕
🔸️‘आता वय फार झाले, काळाच्या स्वाधीन होण्याची वेळ आली, रामा तूच आता तार,’ अशी तळमळ लागली, तरच संतसहवास लाभेल.🔸️
🔹️सत्संगत हवी असे आपण म्हणतो खरे, पण मागतो मात्र ‘असत्’; मग आपल्याला सत्संगत कशी मिळेल❓🔹️
💢स्वत:ला कसे विसरावे हे कळण्याकरताच संताला शरण जावे. आपले विस्मरण म्हणजे भगवंताचे स्मरण.💢
💮वडील दूर आहेत, त्यांचे पत्र नाही, म्हणून काळजी करतो; पण जन्मापासून भगवंत दूर आहे, त्याची तळमळ का लागू नये❓ आपण नामस्मरण करतो, पण ज्याचे नाम घेतो तो कोण, असा विचार करतो का❓💮
🌀विषय सोडल्याशिवाय राम कसा भेटणार❓ रामही हवा आणि विषयही हवा, हे जुळणार कसे❓🌀
🏵मला जोपर्यंत चिमटा घेतलेला कळतो तोपर्यंत कर्ममार्गानेच जाणे जरूर आहे. कर्ममार्ग सांभाळताना, ‘कर्ता मी नव्हे’ ही भावना सांभाळणे जरूर आहे.🏵
❄जो खरा अनुभवी आहे तो बोलणारच नाही, आणि बोललाच तर तो अगदी थोडे बोलेल; तो उत्तम होय. अनुभवी खरा, पण नाइलाज म्हणून जो बोलतो तो त्याच्यापेक्षा थोडा कमी समजावा.❄
♦️कोणीतरी बोलल्याशिवाय लोकांना कळणार कसे, म्हणून हे लोक कमीपणा पत्करूनही पुष्कळ बोलतात.परंतु अनुभव नसताना उगीच शब्दपांडित्य करणारे हे अगदी खालच्या दर्जाचे होत. ज्याला अनुभव कमी त्याला शब्दपांडित्य फार असते. ♦️
🏵जो जगाला फसविणार नाही आणि स्वत:ही फसणार नाही, असाच मनुष्य जगाला मार्गाला लावू शकेल.🏵
💢कित्येक साधू दगड मारतात किंवा शिव्या देतात, तरी लोक त्यांच्या मागे लागतात, कारण त्यांच्या शिव्यादेखील आशीर्वादाप्रमाणे असतात. हे कित्येक लोकांच्या ध्यानी येत नाही.💢
❄एखादा मुलगा बापाला म्हणू लागला की, ‘मी इतका जवळचा, पण मला मिळतो मार; आणि तो लांबचा पोर, त्याचे मात्र लाड !’ पण तो मारच आपल्या हितासाठी असतो, हे त्याला नाही समजत❗❄
🛟साधूच्या बोलण्यामध्ये किंवा मारण्यामध्येसुद्धा दुष्ट बुद्धी नसते. संत जे काही बोलतील ते जगाच्या कल्याणाकरताच असते. संत नि:स्वार्थी असतात. ते तळमळीने सांगतात. त्यावर आपण श्रद्धा ठेवली पाहिजे.🛟
🪞संताच्या सांगण्याचा खरा अर्थ आचरणानेच कळेल.🪞
🌷#बोधवचन : संतांच्या संगतीत आपण गेलो की आपले कर्तृत्व संपले.🌷
🎄#प्रवचने :श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज🎄
🚩🚩श्री राम जय राम जय जय राम🚩🚩
#🙏श्री गुरुदेव दत्त💐 पाडवा 2026 मुहूर्त🌹💐
गुढी पाडवा: गुरुवार, 19 मार्च 2026
मुख्य तिथी
चैत्र शुक्ल प्रतिपदा सुरू: 19 मार्च 2026 सकाळी 6:52 am
चैत्र शुक्ल प्रतिपदा समाप्त: 20 मार्च 2026 पहाटे 4:52 am
गुढी उभारण्याचा शुभ मुहूर्त
गुढी पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने संपूर्ण दिवस शुभ मानला जातो. तरीही गुढी उभारण्यासाठी सकाळचा वेळ सर्वोत्तम मानला जातो.
सर्वोत्तम वेळ (सकाळी):
सूर्योदयानंतर ते सुमारे 10:30 वाजेपर्यंत
साधारण 6:35 AM ते 10:30 AM
गुढी पाडवा पूजा विधी (सोप्या पद्धतीने)
सकाळची तयारी
लवकर उठून अभ्यंग स्नान करा
घराची स्वच्छता करून दारासमोर रांगोळी काढा
घराच्या प्रवेशद्वारावर आंब्याची/कडुलिंबाची तोरण लावा
देवघर स्वच्छ करून दिवा लावा
गुढी तयार करण्यासाठी लागणारे साहित्य
बांबूची काठी
स्वच्छ रेशीम/नवीन कापड (पिवळे, केशरी, हिरवे चालते)
साखरेच्या गाठी / गाठी
कडुलिंबाची पाने
आंब्याची पाने
फुलांचा हार
तांब्या/चांदी/स्टीलचा लोटा (उलटा ठेवण्यासाठी)
हळद-कुंकू, अक्षता
अगरबत्ती, दिवा, नैवेद्य
गुढी कशी उभारावी
बांबूला स्वच्छ कापड बांधा
त्यावर फुलांचा हार, साखरेच्या गाठी, कडुलिंब-आंब्याची पाने लावा
वरती उलटा तांब्या/लोटा ठेवा
घराच्या उजव्या बाजूला / खिडकीत / गॅलरीत उंच ठिकाणी गुढी उभारा
गुढीला हळद-कुंकू, अक्षता, फुले अर्पण करा
2) पूजा करताना म्हणायचे मंत्र
सूर्य प्रार्थना
ॐ सूर्याय नमः।
शुभारंभ मंत्र
ॐ श्री गणेशाय नमः।
गुढी पूजनासाठी
ॐ ब्रह्मध्वजाय नमः।
ॐ विजयध्वजाय नमः।
समृद्धीसाठी
ॐ श्रीं महालक्ष्म्यै नमः।
नववर्ष मंगल मंत्र
सर्वे भवन्तु सुखिनः
सर्वे सन्तु निरामयाः।
सर्वे भद्राणि पश्यन्तु
मा कश्चिद् दुःखभाग्भवेत्॥
3) गुढी पाडव्याचा खास प्रसाद
कडुलिंब + गूळ खाणे शुभ मानतात
याचा अर्थ:
जीवनात गोड-तिखट-कडू सर्व अनुभव स्वीकारून पुढे जाणे
#shreedattarajgurumauli #spirituality #spiritualgrowth #blessings
#🙏श्री गुरुदेव दत्त💐 नृसिंहवाडी हिला दत्तगुरूंची राजधानी का म्हणतात तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या ह्या लेखात...🌹💐
कृष्णा-पंचगंगेच्या संगमावरती वसलेले कोल्हापूर जिल्ह्यातील छोटेसे गाव नृसिंहवाडी. श्री क्षेत्र नरसोबावाडी म्हणूनही या देवस्थानाची ख्याती आहे. 'श्रीपादश्रीवल्लभ' हा श्रीगुरू दत्तमहाराजांचा पहिला अवतार तर 'नृसिंहसरस्वती' हा 'दुसरा अवतार' समजला जातो. दत्त महाराजांनी या ठिकाणी 12 वर्षे अर्थात एक तप तपश्चर्या केली आणि आपल्या पादुका स्थापन केल्या. त्यामुळेच या स्थानास महाराजांची तपोभूमी मानली जाते. याठिकाणी तपश्चर्या केल्यानंतर ते औदुंबर, गाणगापूर आणि त्यानंतर कर्दळीवनात गेले आणि त्याच ठिकाणी त्यांनी अवतारसमाप्ती केल्याचा पुराणात उल्लेख आढळतो. दत्त माऊलींच्या स्पर्शाने पुनित झालेल्या या क्षेत्राची ख्याती सर्वदूर पसरली आहे. दररोज हजारो भक्तगण महाराजांच्या पादुकाचरणी नतमस्तक होतात. दोन नद्यांच्या संगमामुळे विस्तारलेले नदीचे पात्र, संथ पाण्यामधील नौकाविहार, स्वच्छ-सुंदर घाट, नदीपात्राला लागून वसलेल्या मंदिरामध्ये सुरू असणारा घंटानाद, अखंड नामजप..असा माहोल भक्तगणांना भारावून टाकतो..
संथ वाहणार्या कृष्णा नदीच्या एक्कावन्न पायर्यांच्या घाटावर, मध्यभागी औदुंबराच्या शीतल छायेखाली दत्ताचे मंदिर आहे. येथे श्रीदत्तात्रेय भगवंतांनी स्वयंभू श्यामसुंदर मनोहर पादुकांच्या स्वरूपाने वास्तव्य केले आहे.या देवालयाचा आकार बादशाही थाटाचा अर्थात घुमटाघुमटांचा आहे. याहून विशेष म्हणजे श्रींच्या पादुकांवरील वस्त्रही त्याच रिवाजाचे आहे. याचाच अर्थ गुरूचरित्रात उल्लेख असल्याप्रमाणे सर्व जातीधर्माचे लोक याठिकाणी एकाच भावनेने एकत्र येतात. 'श्री नरसिंह सरस्वती' हा दत्तावतार संन्यासी स्वरूपाचा मानला जातो त्यामुळे येथील भक्तगण संन्याशी लोकांचे पूजन करून त्यांचे आदरातिथ्य करतात. श्रीजनार्दन स्वामींच्या आज्ञेवरून एकनाथ महाराजांनी याठिकाणी घाट बांधला आहे. हा घाट पाहण्याजोगा आहे. येथील साधुसंतांच्या समाध्या आणि छोटी-छोटी मंदिरे पाहताना मन प्रसन्न होते.
या मंदिराचे आणखी एक वैशिष्ठ म्हणजे केवळ त्रिकाळपुजेवेळीच मंदिरामध्ये झांज किंवा घंटा वाजते.इतरवेळी ही वाद्ये वाजवायची नाहीत असा नियम आहे. भक्तगणांना एकचित्ताने ध्यान, जप करता यावा, असे यामागचे कारण असावे.पौर्णिमेला हजारो भक्तगण दर्शनासाठी लोटतात. पंचक्रोशीतील लोक पायी चालत येऊन पादुकांचे दर्शन घेतात. शनिवार हा दत्तमाऊलींचा जन्मदिवस असल्याने शनिवारीही गर्दी होते. दत्तजयंतीच्या दिवशी तर लाखो लोकांची उपस्थिती असते. दत्तमाऊलींचे स्थान म्हटले की श्वान आलेच, त्याचप्रमाणेच याठिकाणीही श्वानांचा मुक्तसंचार असतो. भक्तगण त्यांना खाऊ-पिऊ घालतात.
@shree_dattguru 🙏🙏🙏🙏
#shreedattarajgurumauli #spiritualgrowth #spirituality #blessings
#🙏श्री गुरुदेव दत्त💐 .गोदवलेकर महाराजांच एक वाक्य आहे वेळ आली की गोष्ट घडायची थांबत नाही.पण तो पर्यंत वाट पाहावी लागते. परमार्थाचे मर्म असे आहे की जे आपल्या वाट्याला आलं आहे ना ते शांतपणे भोगावे. ही ज्याची तयारी आहे ना त्याला जीवन थोडे तरी कळलं.अध्यात्म थोडं तरी कळलं. हे सोपं नाही. बनारसला पु.श्री.तैलंगस्वामी नावाचे एक सत्पुरुष भैरवनाथाच्या मंदिरात रहायचे. एका मुलीचे वाकडे पाऊल पडले.तीला दिवस राहिले. तिच्या बापाने विचारलं याचा बाप कोण तर त्या मुलीने तैलंगस्वामीचं नाव सांगितले. ते मूल झाल्यावर त्या बापाने ते मूल तैलंगस्वामीना आणून दिले. त्यांनी मग चार लोकांकडून कपडे आणले, त्याला दूध पाजले. ती मुलगी रोज येऊन मुलाला पाहून जायची. चार महिन्यांनी त्या मुलीने आपल्या बापाला त्या मुलाच्या खऱ्या बापाचे नाव सांगितलं.तो स्वामींकडे आला त्याने क्षमा मागितली आणि ते मूल परत घेतलं. ते म्हणाले " हरकत नाही ". हे फार कठीण आहे. मनासारखं झालं तरी हरकत नाही मनाविरुद्ध झालं तरी हरकत नाही. हे तितक्या समतेने म्हटलं पाहिजे. हे आपल्याला प्रत्येक गोष्टीत शिकता येईल. प्रपंच धड नाही हरकत नाही भगवंताचे स्मरण आहे ना. मग उत्तम . म्हणून श्री.तुकाराम महाराज म्हणाले "भागा आले ते करितो | तुझे नाम उच्चारितो ||" ही जी दृष्टी आहे पाहण्याची ही दृष्टी येणं हे खरं अध्यात्माचे मर्म आहे.
#🙏श्री गुरुदेव दत्त💐 मार्च❗
‼जय हरि विठ्ठल‼
🚩🚩पापमोचनी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा🚩🚩
🌹🌹प्रवचनाचा विषय🌹🌹
🟧🟥🟧उपाधीरहित 'मी' म्हणजेच भगवंत.🟧🟥🟧
🛟ब्रह्माचे निरूपण सांगता येण्यासारखे नसते. साखर खाल्ल्याशिवाय तिची गोडी कळत नाही, काही मर्यादेपर्यंत शब्दांनी सांगता येते.🛟
⭕खोटयावरून खऱ्याची परीक्षा करता येते, तसे माया ज्याला कळली त्याने ब्रह्म जाणले म्हणून समजावे. पण मी मायारूपच जर झालो तर ती कशी ओळखावी बरे❓सत्यावर छाया पडली तीच माया झाली.⭕
💢वस्तू आहे तशी न दिसता विपरीत दिसणे म्हणजे माया. तेव्हा मायेच्या तावडीत सापडल्यावर, सत्य आणि परमात्मस्वरूप असणारे ब्रह्म जाणणे कसे शक्य होणार❓💢
💠जी जगते मरते ती माया. म्हणजे माया ही नासणारी आहे, भंगणारी आहे. शाश्वत आनंदापासून जी मला दूर करते ती माया. म्हणूनच, ज्याने शाश्वत सुख मिळते, जे मायेच्या पकडीतून सुटण्याचा मार्ग दाखविते, तेच खरे तत्त्वज्ञान होय.💠
❄एक भगवंत फक्त सत्यस्वरूप आहे; त्याच्यासाठी जे जे करणे ते सत्य होय. 'मी देवाचा आहे' हे कळणे याचे नाव आत्मनिवेदन होय. आत्मनिवेदन म्हणजे देवाला ओळखणेच होय; म्हणजेच मायेला दूर सारणे. वास्तविक, उपाधिरहित जो 'मी' तोच भगवंत आहे. उपाधिरहित राहणे म्हणजे भगवदरूप होणे.❄
💮किनाऱ्यावरून पाण्याकडे जात असताना अशी एक जागा येते की, तिथे वाळू संपते आणि पाणी सुरू होते. म्हणजे त्या रेषेच्या अलीकडे वाळू आणि पलीकडे पाणी असते, ही मधली स्थिती म्हणजे तुर्यावस्था होय. इथे 'मी ब्रह्म आहे' अशी जाणीव राहते.💮
🏵निर्गुण परमात्मा आणि ही सगळी सृष्टी यांना जोडणारी सांखळी असेल तर तो ॐकार होय. म्हणून, परमार्थामध्ये कोणत्याही साधनाने जडाचा निरास करता करता शेवटी ॐकारापर्यंत येऊन थांबावे लागेल; म्हणजे प्रत्येकाला नामाशीच यावे लागेल.🏵
♦️दहा माणसे उभी केली, त्यांतली नऊ 'ही नव्हेत' म्हणून बाजूला सारली, दहावा राहिला तोच खरा. त्याप्रमाणे 'हे नाही, ते नाही' झाल्यावर जे शेवटी उरले ते ब्रह्मच होय.♦️
🔸️भगवंत गीतेमध्ये अर्जुनाला म्हणतात, "तू ज्ञानी असशील तर समाधानात राहा, पण तू तसा नसशील तर मग उगीच ज्ञानाच्या गोष्टी सांगू नकोस; आणि कोणाचे तरी, म्हणजे अर्थात् ज्ञानी माणसाचे, ऐक आणि त्याप्रमाणे वाग." याचा साधा अर्थ असा की, आपण संतांना शरण गेले पाहिजे.🔸️
🔹️सर्व सृष्टीच्या दृष्टीने आपण आणि आपला प्रयत्न कःपदार्थ आहे; म्हणजे खऱ्या अर्थाने आपण निमित्तमात्र आहोत. म्हणून आपल्या वाट्याला येणारी चांगली अगर वाईट कर्मे ही ईश्वराचे मनोगत आहे असे समजावे.🔹️
🌲#बोधवचन:वेदांत हा आचरणात आणल्याशिवाय त्याचा उपयोग नाही
🚩🚩श्री राम जय राम जय जय राम🚩🚩
#🙏श्री गुरुदेव दत्त💐 आपल्याला खरोखरच हवा आहे का ? आणि तो कशासाठी ? बाकी, एवढे कष्ट करून तुम्ही येथे येता, तेव्हा भगवंत तुम्हाला नको आहे असे कसे होईल ? तुम्हाला खात्रीने तो हवा आहे; पण कशासाठी ? तर आपला प्रपंच नीट चालावा म्हणून !*
*केवळ परमेश्वरासाठीच परमेश्वर हवा असे ज्याला वाटत असेल तो खरोखर भाग्यवान होय. मोठमोठ्या साधुसंतांना खरोखरच तशी नड भासली; त्यांनी परमेश्वर आपलासा करून घेतला.*
*परमेश्वर अत्यंत अल्पसंतुष्ट आहे. आपण त्याच्याजवळ एक पाऊल पुढे गेलो तर तो दोन पावले आपल्याजवळ येईल. परंतु आपल्याला त्याच्याकडे जायची तळमळच लागत नाही. आपले विकार, आपला अहंपणा, आपली देहबुद्धी, आपल्याला मागे खेचते. या सर्वांचे बंध तोडून जो परमेश्वराकडे जातो तो पुनः मागे फिरत नाही.













