#🙏श्री गुरुदेव दत्त💐 आपल्याला खरोखरच हवा आहे का ? आणि तो कशासाठी ? बाकी, एवढे कष्ट करून तुम्ही येथे येता, तेव्हा भगवंत तुम्हाला नको आहे असे कसे होईल ? तुम्हाला खात्रीने तो हवा आहे; पण कशासाठी ? तर आपला प्रपंच नीट चालावा म्हणून !*
*केवळ परमेश्वरासाठीच परमेश्वर हवा असे ज्याला वाटत असेल तो खरोखर भाग्यवान होय. मोठमोठ्या साधुसंतांना खरोखरच तशी नड भासली; त्यांनी परमेश्वर आपलासा करून घेतला.*
*परमेश्वर अत्यंत अल्पसंतुष्ट आहे. आपण त्याच्याजवळ एक पाऊल पुढे गेलो तर तो दोन पावले आपल्याजवळ येईल. परंतु आपल्याला त्याच्याकडे जायची तळमळच लागत नाही. आपले विकार, आपला अहंपणा, आपली देहबुद्धी, आपल्याला मागे खेचते. या सर्वांचे बंध तोडून जो परमेश्वराकडे जातो तो पुनः मागे फिरत नाही.
#🙏श्री गुरुदेव दत्त💐 मार्च - प्रापंचिक माणसाची स्थिती कशी असते ? 🌷🌷
सर्व संतांनी भवरोगावर खात्रीचे औषध सांगितले आहे. सर्व संत आपापल्या परीने मोठेच आहेत. पण त्यांतल्या त्यांत समर्थांनी आपली जागा न सोडता, विषयी लोकांचे चित्त कुठे गुंतलेले असते हे पाहिले आणि मगच रोगाचे निदान केले.
आमचा मुख्य रोग संसार दुःखाचा असून तो सुखाचा आहे असे वाटते,
हा आहे. रोग कळून आला पण औषध जर घेतले नाही तर तो बरा कसा होणार? रोग असेल तसे औषध द्यावे लागते.
अजीर्णाने पोट दुखते ते भुकेने दुखते असे वाटून आम्ही अधिक खाऊ लागलो तर कसे चालेल ? संसार ज्याला दुःखाचा वाटतो त्यालाच परमार्थमार्गाचा उपयोग !
एखादा दारू पिणारा मनुष्य दारूपायी आपले सर्वस्व घालवतो. दारूचा अंमल नसतो त्या वेळी तो शुद्धीवर येतो. आणि त्याला आपल्या बायकोमुलांची काळजी वाटते. आपला प्रपंच नीट व्हावा असेही त्याला वाटते. पण त्याच्या बुद्धीला त्यातून मार्ग सुचत नाही. मग तो पुनः इतकी दारू पितो की त्यात त्याला स्वतःचा विसर पडतो; आणि अशा रीतीने तो स्वतःचा नाश करून घेतो.
अगदी याचप्रमाणे प्रापंचिक माणसाची स्थिती होते. पहिल्यापहिल्याने प्रपंच बरा वाटतो, मनुष्य त्यात रमतो. पुढे काही दिवसांनंतर तो थकतो, त्याची उमेद कमी होते, आणि म्हणून, आता आपल्या हातून परमार्थ कसा होणार असे त्याला वाटते. पण नंतर तो पुनः जोराने प्रपंच करू लागतो, आणि शेवटी हीन अवस्थेत मरून जातो.
जो जगाचा घात करतो तो एका दृष्टीने बरा, कारण जग स्वतःला सांभाळून घेईल; पण जो स्वतःचा घात करून घेतो त्याला कोण सांभाळणार ? तो फार वाईट समजावा.
केवळ प्रापंचिक हा असा आत्मघातकी असतो.
खोटे कळूनही त्यात सुख मानून तो राहतो, आणि देवाने जे निर्माण केले ते माझ्या सुखाकरिताच केले असे समजून मरेपर्यंत त्यातच गुरफटून जातो. मनुष्य तेच तेच करीत असूनसुद्धा त्याला त्याचा कंटाळा कसा येत नाही ? कालच्या गोष्टीच आपण आज करतो. आपल्या लक्षात जरी आले नाही तरी त्या गोष्टी झालेल्याच असतात. तेच ते जेवण, ती नोकरी, तोच तो पैसा मिळविणे, सगळे तेच ! असे असताना माणसाला कंटाळा का येऊ नये ?
याचे कारण असे आहे की, विषय अत्यंत गोड तरी असला पाहिजे, किंवा हावेला तृप्ती तरी नसली पाहिजे. या दोन कारणांपैकी दुसरे कारणच खरे आहे; आपली हाव पुरी झाली नाही हेच खरे आहे.
विषयामध्ये सुख आहे ही आपण कल्पना केली. त्याचा अनुभव अनेक वेळा घेतला. तरी अजून आपली कल्पना ही खरी की खोटी हे आपल्याला कळत नाही, हे मात्र और आहे.
६१. जो मनुष्य प्रपंचातला आपला अनुभव जमेस धरत नाही, तो कशानेच शहाणा होत नाही.
#🌹देवी देवता🙏 म्हणजे मातकट ,हा रंग भगवा नाही . संन्यासी जन घेतात ती छाटी मातकट किंवा गेरू रंगाची का ? तर हा मातकट रंग वैराग्याचा दर्शक आहे . छाटी हि मातकट रंगात तयार केली जाते आणि त्यासाठी गेरू ,तुरटी आणि लिंबाचा वापर केला जातो . आता तुरटी का तर हा मातकट रंग पक्का व्हावा किंवा उत्तम रीतीने बसावा म्हणून .
नृसिंहवाडीच्या रविवारी म्हटल्या जाणाऱ्या आरतीत एक उल्लेख आहे , काषायांबर खंडन निर्मित कौपीनम् ll श्रीगुरुमहाराजांनी छाटी फाडून लंगोट्या तयार केल्या . कौपीन म्हणजे लंगोटी .
लंगोटी देखील तयार स्वरूपात नाही ,ती छाटी फाडून तयार केलेली .वस्त्र आणि उपवस्त्र ह्या प्रकारात ह्या लंगोटी आणि छाटी ह्या गुरुमहाराजांच्या दोन वस्त्रांचा अनेकदा उल्लेख आहे . नित्य म्हटल्या जाणाऱ्या आरत्यात तर अनेकवार हे आले आहे . शनिवारी म्हटल्या जाणाऱ्या आरतीत काषायांबर युग्म करिचर्म वसन l दंड कमंडलू भस्म लेपन ll युग्म अर्थात दोन ,गुरुमहाराजांनी दोन वस्त्रे परिधान करून हत्तीच्या कातड्याचे आसन घेतले आहे .
श्रीकृष्णा तट निकटे यत्पाद युगलं --- या नृसिंहवाडीतील नित्य पदात काय उल्लेख आहे ? वामेदक्षिण भागेदण्डपात्र स्थितीः l काषायांबर युग्म परितो दधाति ॥ ७ ॥
डाव्या हाताला दंड तर उजव्या हाताला कमंडलू आहे ,दोन काषाय वस्त्रे धारण केली आहेत .
हे सर्व झाले छाटी आणि कौपीन बद्दल पण सप्तशती गुरुचरित्रात थोरल्या महाराजांनी दत्त महाराजांना काय म्हटले आहे ,नमः श्रीदत्त गुरवे हृव्दासोधौतिकारवे ll दत्त महाराज हे हृदयरुपी वस्त्र धुवून स्वच्छ करणारे ----
. लज्जारक्षणार्थ धारण केलेले वस्त्र स्वच्छ आहे अथवा कसे ? यापेक्षा आपले हृदयरुपी वस्त्र स्वच्छ असणे गरजेचे नाही का ??? .श्रीगुरुदेव दत्त !!!---अभय आचार्य
#🙏श्री गुरुदेव दत्त💐 …
आजीने तिच्या गुरुंच्या समाधी दर्शनाला घेऊन जाण्याचा फतवा काढला आणि दोन दिवसांनी आम्ही तिला घेऊन श्री क्षेत्र गोंदवले इथे निघालो. आजीचा तिच्या गुरूंवर आभाळाएवढा विश्वास आणि श्रद्धा.मी आणि सौ दोघेही तसे देव देव न करणाऱ्यातले. केवळ आजीच्या श्रद्धेखातर आम्ही निघालो होतो.गाडीत बसल्या पासून आजीच्या हातातल्या जपमाळेचे मणी सरकू लागले होते. काही वेळा मला ह्या बाबतीत आजीची चेष्टा करायची लहर येई. “ आजी, तुझी गुरु माउली तुझ्या बरोबर असतील तर आज आपल्याला दर्शन देतील का ?” मी गमतीने विचारलं. सौ चे डोळे मोठे झाले आणि मी गप्प. आजीने डोळे मिटले आणि म्हणाली “ मिळेल ना दर्शन. माझी श्रद्धा आहे, तुलाही अनुभव येईल.”
कुठलंसं गाव मागे पडलं होतं. श्री क्षेत्र गुरु स्थान अजून 18-20 किलोमीटर दूर होतं. दुपारची वेळ . रस्त्यावर कडकडीत उन्हामुळे चिटपाखरूही नव्हतं. मधूनच एखादं वाहन जात होतं… बाकी शांतता आणि उन्हाच्या झळा. अचानक मला पुढे एक माणूस उभा दिसला. धनगराचा वेष आणि बरोबर दोन भरलेली पोती. त्या माणसाने हात करून थांबायला सांगितलं. मी थांबलो. “ मालक … अहो एवढी दोन पोती जरा गोंदवल्यात पोचवाल कां ? कधी पासून यष्टीची वाट बगतुया. गाडीचा पत्याचं न्हाई बगा.” मी गाडीच्या बाहेर आलो, मागची डिकी उघडली आणि ती दोन पोती आत ठेवली. त्या धनगराने मला नमस्कार केला आणि तो मागे फिरून चालू लागला. मी डिकी बंद करून मागे बघितलं. तो माणूस कुठल्या दिशेला गेला हे मला समजलंच नाही. त्या पोत्यांत तांदूळ आणि वांगी होती.
आम्ही मुक्कामी पोचलो. सौ, आजीला घेऊन समाधी मंदिरात दर्शनाला गेली. मी त्या संस्थानाच्या ऑफिस मध्ये जाऊन वाटेत भेटलेल्या माणसाने दिलेल्या गोणीबद्दल सांगितलं. तो समोर बसलेला माणूस आश्चर्याने माझ्याकडे पहात राहिला. बाजूलाच बसलेला कोठी घराचा व्यवस्थापक ताड्कन उभा राहिला. म्हणाला “ आपल्या महाराजांनी आज लाज राखली. सर्व भक्तांच्या रात्रीच्या जेवणासाठी तांदूळ पुरेसा नव्हता आणि भाजीही सगळी संपली होती. भाऊ… अहो तुमच्या बरोबर माउलींनी धान्य पाठवलं बरं कां.. त्या धनगराच्या रूपात प्रत्यक्ष महाराजांनी तुम्हाला दर्शन दिलं. धन्य आहात हो तुम्ही.” माझ्या अंगावर सरसरून काटा आला आणि आजीचे बोल आठवले. मला अनुभव आला होता. एक श्रीमंत समृद्ध अनुभव… मी आजीला आणि सौ ला झाला प्रकार सांगितला. आजी प्रसन्न हसली.
दुसऱ्या दिवशी आम्ही पुन्हा समाधी दर्शन घेऊन परत निघालो. काल घडलेला प्रसंग .. मिळालेली अनुभूती सगळंच विलक्षण होतं. घरी आलो. डिकीत ठेवलेल्या बॅगा काढायला म्हणून डिकी उघडली … समोर त्या पोत्यातून सांडलेले पसाभर तांदूळ आणि दोन वांगी दिसली. गुरूंचा प्रसाद मिळाला होता … यात्रेची सांगता झाली होती. मिळालेला अनुभव श्रीमंत होता.
केवळ आजीच्या गुरुंवरील नितांत श्रद्धेमुळे, विश्वासामुळे आम्ही दोघे श्रीमंत अनुभवाचे साक्षीदार झालो होतो..
#🙏श्री गुरुदेव दत्त💐 भक्त आणि परमात्मा एकरूपच असतात. 🌺🍀🌺
'आमच्या हातून वारंवार चुका होतात' असे तुम्ही म्हणता. लहान मुलगा चालताना अडखळतो, पडतो, किंवा बोलताना बोबडे बोलतो. त्याचे आईबापांना कौतुकच वाटते,
त्याप्रमाणे तुमच्या चुकांचे मला कौतुक वाटते. चुका सावरण्याच्या तुमच्या प्रयत्नांचेही तसेच कौतुक वाटते. म्हणून त्याबद्दल तुम्ही काहीही मनात आणण्याचे कारण नाही. गुरूने एकदा सांगितले की, 'तुझे मागचे सर्व गेले, पुढे मात्र वाईट वागू नकोस,' तर शिष्याने ते श्रद्धेने खरे मानावे.
आपल्या हातून होणाऱ्या चुकांचे परिमार्जन नामच करू शकते. भगवंताचे नाम हे सर्व रोगांवर रामबाण औषधच आहे. नामाचे हे औषध सतत थेंब थेंब पोटात गेले पाहिजे.
ऑफिसमध्येसुद्धा ते आपण बरोबर घेऊन जावे. विद्वान, अडाणी, श्रीमंत, गरीब, सर्वांना हे औषध सारखेच आहे.
जो पथ्य सांभाळून हे औषध घेईल त्याला गुण लवकर येईल.
एखादा मुलगा 'मी विहिरीत उडी घेणार' म्हणून हट्ट धरून बसला तर बापाने त्याचा हट्ट पुरवायचा, का त्याला समजावून किंवा तोंडात मारून तिथून बाजूला काढायचे ? त्याप्रमाणे तुमचे विषय मागण्याचे हट्ट आहेत.
खरा भक्त कधीही दुःखी-कष्टी असत नाही, आपल्या सधानात असतो; मग तो कितीही दरिद्री किंवा व्याधिग्रस्त असेना !
अमुक एक हवे ते मिळाले नाही म्हणजे सामान्य माणसाला दुःख होते. भक्ताला कसलीही आस नसते, त्यामुळे त्याला दुःख नसते. तो आणि परमात्मा एकरूपच असतात. परमात्म्याची इच्छा हीच त्याची इच्छा असते.
सगुणाची भक्ती करता करता त्याला 'मी' चा विसर पडत जातो. 'मी नसून तूच आहेस' ही भावना दृढ होत जाते. शेवटी 'मी' नाहीसा झाला की राम, कृष्ण, वगैरेही नाहीसे होतात आणि परमात्मा तेवढा शिल्लक उरतो.
आजारामधून उठलेल्या अशक्त माणसाने जसे काठीच्या आधाराने चालावे, त्याप्रमाणे प्रापंचिकाने सगुणभक्तीने तरून जावे. देहबुद्धी असणाऱ्या माणसाला सगुणावाचून भक्तीच करता येणार नाही.
भगवंताला आपण सांगावे की, 'भगवंता, तुझी कृपा मजवर असू दे; आणि कृपा म्हणजे, तुझे स्मरण मला अखंड राहू दे.' यातूनच त्याची भक्ती उत्पन्न होईल. भगवंतावाचून कशातही समाधान नाही. त्याच्याशिवाय जगण्यात आनंद नाही.
जो भगवंताचा झाला, म्हणजे त्याच्या नामात राहिला, त्याला जगण्याचा कंटाळा येणार नाही.
५५. परमात्म्याला प्रपंचरूप बनविण्याऐवजी आपण प्रपंचाला परमात्मरूप बनवावे.
#🙏श्री गुरुदेव दत्त💐 फेब्रुवारी - मला जनप्रियत्व आवडते.
इथून जाणार्या मंडळींना निरोप देताना मला खरोखरच फार वाईट वाटते. पुन्हा आपली भेट होईल की नाही ते काही सांगता येत नाही.
तुम्ही सर्वांनी एकमेकांशी अत्यंत प्रेमाने वागा. प्रेमाने जग जिंकता येते. तुम्ही माझ्यापासून जनप्रियत्व शिका. मला जनप्रियत्व फार आवडते. कारण जो लोकांना आवडतो, तोच भगवंताला आवडतो. जो निःस्वार्थी असेल त्यालाच जनप्रियत्व येईल. जो भगवंताच्या इच्छेने वागेल त्यालाच जनप्रियत्व येईल.
आपण आपल्यासाठी जे करतो ते सगळयांसाठी करणे, हे भगवंताला आवडते.
आपण आपल्यापुरते न पाहता सर्व ठिकाणी भगवंत आहे असे पाहावे. प्रत्येकाला आपण हवेसे वाटले पाहिजे. असे वाटण्यासाठी
लोकांच्या मनासारखेच वागले पाहिजे किंवा त्यांना आवडेल तेच बोलले पाहिजे असे नाही.
प्रेम करायला कशाचीही जरूरी लागत नाही; पैसा तर बिलकूल लागत नाही, हे मी माझ्या अनुभवावरून सांगतो.
जगात कुणी कधी भोगली नसेल एवढी गरिबी मी भोगली आहे. अशा गरिबीमध्ये राहूनही माझे अनुसंधान टिकले, मग तुम्हाला ते टिकवायला काय हरकत असावी ?
मी जर काही केले असेल तर मी कधीही कुणाचे अंतःकरण दुखवले नाही. तेवढे तुम्ही सांभाळा.
जो जो कोणी मला भेटला, तो तो मी आपलाच मानला.
मी नुसता खेळ मांडला आणि तो खेळलो; त्यामुळे त्याचे सुखदुःख मला कधी बाधले नाही. नाम घ्यायची इच्छा पूर्ण झाली नाही म्हणून मी पुन्हा जन्मास आलो. मला तुम्ही सगळे रामरूप दिसत आहात.
मला जे सांगायचे असेल ते मारूतीरायाला सांगावे म्हणजे ते मला कळते.
माझा मनुष्य कुठेही असला तरी तो माझ्याकडेच येणार.
मला दुश्चित्तपणा अगदी आवडत नाही.
ज्यांनी माझी निंदा केली त्यांना तर मी कोण हे कळले नाहीच; पण ज्यांनी माझी स्तुती केली त्यांना मी कोण आहे हे त्याहून कळले नाही.
प्रत्येकाला वाटते की आपल्याला लोकांनी चांगले म्हणावे, मी मात्र वागायचा तसाच वागेन; हे कसे शक्य आहे?
नाम घेतल्याने आपले सर्व अवगुण आपल्यालाच कळून येतील याची खात्री बाळगा, आणि अंतःकरणपूर्वक नाम घ्या.
एक भगवंताचे नाम घट्ट धरावे, त्यामध्ये अती उत्कटता ठेवून एकतानता करावी, आणि स्वतःला पूर्ण विसरून जावे. 'मी नाम घेतो' हे देखील विसरून जावे. हाच खरा परमार्थ होय.
नामामध्ये एकतानता होण्यासाठी भगवंताच्या साक्षित्वाने वागा; हवे-नकोपण टाकून द्या; राम कर्ता ही भावना ठेवा; विषय मालकीने भोगा;
आपला गुण भगवंताकडे लावा; लहान मूल होऊन देवाकडे जा; रामाला आपले सुखदुःख सांगा;
देहभोगाला कंटाळू नका;
काळजी 'घ्या' पण काळजी 'करू' नका, आणि निर्भय बना, आणि अशा रीतीने जिवंतपणी आपले मरण पहा.
५६. जिथे नाम आहे तिथे मी आहे म्हणून खचित समजा.
#🌹देवी देवता🙏 सुस्वरूप स्त्री एका साधू महाराजांच्या आश्रमात आली . मनात इच्छा हि कि काही काळ संतसंगती लाभावी . काही काळ गेला मात्र तिथे निवास केल्यावर त्या स्त्रीच्या मनात आले या साधू महाराजांना आपल्यासौंदर्य पाशात भुलवून सोबत नेले तर दोन्ही गोष्टी साध्य होतील ,उपभोग आणि संतसंगती दोन्ही गोष्टी मिळतील . झालं या विचाराने प्रेरित होत त्या स्त्रीने आपले प्रेमपाश त्या साधू महाराजांवर टाकले . साधू महाराजांना या मोहमायेची कल्पना आली होतीच ,त्यांनी आपल्या आश्रमातील दत्त महाराजांना नमस्कार करत म्हटले , परीक्षा आहे तेव्हा आपले सान्निध्य असो द्यावे ,आपण यातूंन बाहेर काढालं यात शंका नाही .
दुसऱ्या दिवसापासून त्या मोहित झालेल्या स्त्रीबरोबर साधू महाराजांनी आपले प्रेम संबंध स्थापित करण्यास सुरुवात केली . हे पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या ,सर्वच म्हणाले आता यातून साधू महाराज काही सुटत नाहीत . या साधू महाराजांना एक असाध्य असा रोग होता ,पण या रोगाची कल्पना त्या स्त्रीला नव्हती .
एक दिवस प्रेम संवादात असताना महाराज म्हणाले ,प्रिये जे सर्व माझ आहे ते तुझ झाल ना ? यावर ती स्त्री म्हणाली ,यात काय संशय ? तुम्हीच माझे झाला आहात . यावर त्या साधू महाराजांनी आपल्याला असलेल्या असाध्य रोगाची कल्पना देत म्हटले ,कि हे शरीर जर तुझे आहे तर मग यात असणारे रोग देखील तुझेच नाहीत का ? यावर त्या स्त्री गडबडली ,म्हणाली या रोगाची कल्पना मला नव्हती . साधू महाराज म्हणाले ,प्रेमात शरीरासोबत सर्व आलंच ,हे ऐकताच त्या स्त्रीने तिथून पळ काढला .
दुसऱ्या दिवशी आश्रमात जनसमुदायाला दत्त माहात्म्यावर निरूपण करताना महाराज म्हणाले ,इथे दत्त महाराजांच्या जवळ मायारूपी सुस्वरूप स्त्री आहे ,देव आणि दानव दोघेही त्या आश्रमात आले होते ,देवांनी त्या स्त्रीकडे न पाहता दत्त महाराजांना नमस्कार केला तर दानवांनी दत्त महाराजांकडे न पाहता त्या स्त्रीला पळवून नेले . मायेकडे पाहता अधोगती आहे तर दत्त महाराजांकडे पाहता उद्धार आहे .
काल माझ्यासोबत असणाऱ्या स्त्रीने हृदयस्थ दत्त महाराजांकडे न पाहता इतर इंद्रियांकडे वास करणाऱ्या कलीला पाहिले म्हणून हे सर्व झाले . यापुढे कुठेही गेलात तर त्या कलीच्या मायेला न पाहता हृदयस्थ नारायणाला पाहण्याची सवय ठेवा .
श्रीगुरुदेव दत्त !!!---अभय आचार्य
#👣गजानन महाराज🌺 .*!गण गण गणात बोते’चा अर्थ!*
*༺꧁!! 🪷 !! ꧂༻*
*‘गण गण गणात बोते’चा*
*नेमका अर्थ काय?*
*༺꧁!! 🪷 !! ꧂༻*
*गजानन महाराजांनी मंत्र*
*का दिला?*
*༺꧁!! 🪷 !! ꧂༻*
*अखंड जपाने मिळेल पुण्य*
*वाचा आणि*
*जाणून घ्या.!*
*༺꧁!! 🪷 !! ꧂༻*
*गजानन महाराज अखंडपणे ‘गण गण गणात बोते’ या मंत्राचा जप करत असत. जाणून घ्या नेमका अर्थ...*
श्री गजानन महाराज हे दिगंबर वृत्तीतील सिद्धकोटीला पोचलेले महान संत होते. मिळेल ते खावे, कोठेही पडून रहावे, कोठेही मुक्त संचार करावा, महाराजांच्या या अशा अवलिया स्वभावामुळेच सर्व भक्त बुचकळ्यात पडायचे. गजानन महाराजांनी चैतन्यमय देहाने सर्वत्र संचार केला. दिगंबर वृत्तीच्या या अवलिया गजाननांनी विविध चमत्कार करून अनेकांना साक्षात्कार घडविला. त्यावेळी त्यांनी लोकांना भक्तिमार्गाचे महत्त्व पटवून सांगितले. ते सिद्धयोगी पुरुष होते.
*‘गण गण गणात बोते’* हा त्यांचा आवडता मंत्र, ज्याचा ते अखंड जप करित किंबहुना त्यामुळेच त्यांना गिणगिणे बुवा वा गजानन महाराज अशी नावे पडली. अद्वैत ब्रह्माचा सिद्धांत गजानन महाराजांच्या *“गण गण गणात बोते”* या सिद्धमंत्रात व्यक्त झाला आहे. गजानन महाराजांचे चरित्र अनेक प्रकारच्या चमत्कारिक कथांनी भरलेले आहे. सामान्य दिसणारी व्यक्ती एक योगी पुरुष आहे, याची जाणीव लोकांना झाली, तेव्हा लोकांनी गजानन महाराजांचा ध्यास घेतला. आपली दुःखे, अडचणी सांगून त्यातून मार्ग दाखवा अशी या सिद्धपुरुषाला विनवणी केली. तेव्हा गजानन महाराजांनी समस्त भक्तांना एकच मंत्र दिला, तो म्हणजे *‘गण गण गणात बोते!’*
*भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव अन् आत्मा-परमात्मा भेट*
*ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः। मनःषष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति।।* हेच तत्त्व भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्णांनी सांगितले आहे. या पृथ्वीवरील प्रत्येक जीव माझाच अंश आहे. या देहात स्थित असलेला जीवात्मा मन आणि पंचभूतांना आकर्षित करून घेतो. म्हणून तर आपण म्हणतो, जिवा शिवाची भेट झाली. किंवा भेटीची आस लागली. ही आस म्हणजेच एका जीवाला दुसऱ्या जीवाप्रती असलेली ओढ. हे प्रेम उत्पन्न होणे, म्हणजेच गजानन महाराजांच्या मंत्रानुसार *‘गण गण गणात बोते’* अर्थात *आत्मा आणि परमात्मा यांची भेट होणे.* *‘गण गण गणात बोते’ हा केवळ मंत्र नाही तर भगवंताच्या अस्तित्वाची पदोपदी होणारी जाणीव आहे,* असे सांगितले जाते.
*‘गण गण गणात बोते’चा अर्थ काय?*👇
*‘गण गण गणात बोते’* या मंत्राचा अर्थ लक्षात घेतला, तर ते समजू शकेल. पहिला गण म्हणजे जीव, दुसरा गण म्हणजे शिव, गणात म्हणजे हृदयात, बोते म्हणजे बघा! प्रत्येकाने हृदयस्थ परमेश्वर बघायला शिका. तो केवळ तुमच्यातच नाही, तर प्रत्येक जीवात्म्याच्या ठायी आहे. त्याचा आदर करा. ज्याला परमेश्वराचे रूप पाहता आले, तो कधीच कोणाशी वाईट वागणार नाही आणि स्वतःही वाईट कृत्य करण्यास धजावणार नाही.
*|| गण गण गणात बोते ||*
*༺꧁ !!जय हरी !! ꧂༻*
🙏
•┈✦✿✦•🌼•✦✿✦┈•
. 🚩 *!! राम कृष्ण हरी !!* 🚩
🙏
दिं. 07 फेब्रूवारी 2026
*शनिवार*
🥬🥬🥬🥬🥬🥬🥬
#🙏श्री गुरुदेव दत्त💐 ८ फेब्रुवारी ❗
‼श्री गुरुदेव दत्त‼
🚩श्री गजानन महाराज ह्यांच्या १४८ व्या प्रगट दिन सोहळ्याच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा. 🚩
🌹🌹प्रवचनाचा विषय🌹🌹
🟧🟫🟧नामस्मरणापरते दुसरे हित नाही.🟧🟫🟧
♦️एक गृहस्थ मला भेटले. ते म्हणाले, "मला देव पहावासा वाटतो. तुम्ही पाहिला आहे का❓" मी म्हटले, "पाहिला आहे." त्यांनी विचारले, 'तो मला दिसेल का ❓' मी म्हटले, "दिसेल, पण या डोळयांनी दिसणार नाही. देवाला पाहण्याची दृष्टी वेगळी आहे." आज आमची विषयाची दृष्टी आहे. ती भगवंताची नाही.♦️
🔹️आपल्याला भगवंत पाहायचा असेल तर त्याला एकच उपाय : भगवंताच्या नामात राहावे. नामाशिवाय दुसरा मार्ग नाही.🔹️
❄सगळयांना माझे सांगणे आहे; हे ऐकणे अत्यंत जरूर आहे बरे❗ ऐकणे कशासाठी❓तर मी बरोबर मार्गाने जातो आहे की नाही, ते कळण्यासाठी. पण नुसते ऐकून चालणार नाही; ऐकून कृती केली तरच साधेल. ती तुम्ही करा.❄
⭐आचरणात आणलेले तेवढेच कामाला येईल.⭐
💢सगळयांनी नामस्मरण करा. नामस्मरणासारखा कल्याणाचा दुसरा मार्ग नाही. जे सहज आपल्याजवळ आहे, अत्यंत उपाधिरहित आहे, जे कुणावर अवलंबून नाही, असे जर काही असेल तर ते भगवंताचे नाम आहे. तेव्हा शुद्धतेने, शुद्ध आचरणाने जो ते घेईल, त्याचे राम खरेच कल्याण करील.💢
🔸️आपल्या गुरूने जे सांगितले ते सत्य मानावे. "या मार्गाने शंभर पावले गेलास तर खजिना सापडेल." असे गुरूने सांगितले, तर दुसऱ्या मार्गाने दोनशे पावले जरी गेला तरी त्याचा काय उपयोग❓🔸️
⭕"मला सगुण साक्षात्कार व्हावा" असे म्हणतो, पण प्रत्यक्ष बोलणारा चालणारा सदगुरू पाहून समाधान होत नाही तर परमात्म्याचे दर्शन करून देऊन काय उपयोग❓⭕
आंबा हवा असेल तर कोय पेरल्याशिवाय कुठला मिळणार❓
💮सदगुरूने जे सांगितले त्यापरते माझे काही हित आहे, हे मनातच येऊ नये. आपण खरोखरी सर्वस्वी त्याचे व्हावे. नामस्मरणापरते दुसरे हित नाही. माझ्या नामाने घरात आजारी पडलेला मनुष्य बरा व्हावा म्हणणे, म्हणजे त्या नामाचा विषयाकडे उपयोग नाही का केला❓ बरे झाल्यावर ज्याप्रमाणे आम्ही बाटलीतले औषध टाकून देतो, त्याप्रमाणे गरज संपली की आम्ही देवाला विसरतो.💮
💠अमुक एक घडावे असे जिथे वाटते तिथे साधनात कमतरता आली. एका सदगुरू वचनावर विश्वास ठेवला म्हणजे सुखदुःखाच्या गोष्टींचा मनावर परिणाम होत नाही.💠
🛟मोठा अधिकारी झाला तरी पोराबाळांबरोबर खेळताना ज्याप्रमाणे तो त्यांच्यासारखा होतो, त्या प्रमाणे व्यवहारात वागावे. आपण निर्लोभतेने वागावे.🛟
🏵खेळात ज्याप्रमाणे आपण चुकू देत नाही, त्याप्रमाणे प्रपंचात करावे. प्रपंचाचा सहवास वरवरचा असावा. त्याचा वास आत नसावा. आत फक्त भगवंताचा वास असावा.🏵
🌷🌷#बोधवचन🌷🌷
गुरूचरणी अत्यंत विश्वास ।
आणि साधनाचा अखंड सहवास ।
येथे प्रपंचाचा सुटला फास ।
हाच परमार्थाचा मार्ग आहे खास ॥
🎄#प्रवचने:श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज🎄
🚩🚩श्री राम जय राम जय जय राम🚩🚩
#🙏श्री गुरुदेव दत्त💐 फेब्रुवारी❗
‼श्री गुरुदेव दत्त ‼
🌷🌷प्रवचनाचा विषय🌷🌷
🟫🟥🟫रिकामा वेळ सगळा भगवंताकडे लावावा.🟫🟥🟫
💢साधारणपणे ज्या वस्तू देहाला सुख देतात त्या पुष्कळ मिळवणे हे आपल्या जन्माचे ध्येय आहे असे आपल्याला वाटते.💢
🛟परंतु अशा वस्तू ज्यांच्यापाशी पुष्कळ आहेत ती माणसे सुखी झालेली आढळत नाहीत. किंबहूना, अशा वस्तू जितक्या जास्त जमा कराव्या तितकी आपली हाव वाढतच जाते.🛟
❄पुढे वय झाल्यावर देह क्षीण होतो आणि त्याचे भोगण्याचे सामर्थ्य कमी होते. मग वस्तू असून देखील मनाची तळमळ कायम राहते.❄
💮म्हणून शहाण्या माणसाने आत्तापासूनच आपले सुख बाहेरच्या वस्तूवर अवलंबून न ठेवण्याचा अभ्यास करावा. बाहेरची वस्तू सुटली तरी मनाला दुसरी वस्तू देणे अवश्य असते. अशी वस्तू म्हणजे भगवंत होय.💮
🪞भगवंत हा नेहमी राहणारा, स्वयंपूर्ण आणि आनंदमय असल्यामुळे त्याचे चिंतन करता करता मनामध्ये ते गुण उतरतात. अर्थात् मन भगवंताच्या चिंतनाने आनंदमय बनल्यावर त्या माणसाचे जीवन किती रसमय होत असेल याची कल्पना करावी.🪞
🔹️आपल्यासारखा व्यवहारी प्रापंचिक माणसांना भगवंताचे चिंतन करण्यात एकच अडचण येते. ती म्हणजे व्यवहार आणि साधन यांची जोड घालणे.🔹️
🔸️आपली अशी कल्पना असते की भगवंताचे चिंतन करणारा माणूस व्यवहार करू शकत नाही.तुकारामबुवां सारख्या परमात्मचिंतनात बेभान झालेल्या पुरूषांची गोष्ट निराळी.🔸️
♦️आपल्यासारख्या माणसांना आपला व्यवहार अत्यंत बरोबर केल्यानंतर जो वेळ उरेल तितका भगवंताकडे लावला तर आपण फारच प्रगती केली असे म्हणता येईल.♦️
🏵खरे पाहिले असता सध्या जेवढा रिकामा वेळ आपल्याला मिळतो तितका सगळा आपण भगवंताकडे लावत नाही. म्हणून दिवसातून काही वेळ तरी अत्यंत नियमाने भगवंताच्या नामस्मरणात घालवायचा आपण निश्चय करावा.🏵
⭕नामाच्या आड सर्वच गोष्टी येतात, आपण स्वतःदेखील त्याच्या आड येतो, तेवढे सांभाळावे आणि जगाच्या नादी फारसे न लागता आपले नाम चालू ठेवावे.⭕
💠देवासंबंधीची फक्त संतांनी लिहिलेली पुस्तके रोज थोडी वाचावी, त्यावर मनन करावे, आणि ते आपल्या आचरणात कसे येईल याचा सूक्ष्म विचार करावा. अशा मार्गाने जो जाईल त्याची हां हां म्हणता प्रगती होईल आणि त्याला समाधान मिळेल.💠
🌲#बोधवचन:समाधान हीच खर्या आनंदाची खूण आहे.🌲
🌷#प्रवचने:श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज🌷
🍁श्री राम जय राम जय जय राम🍁🙏🙏













