भगवंत सगळे बघत असतो...
महेशचे एका देवळा समोर त्याचं घर होतं. पहाटेच लोक मंदिरात यायला लागायचे. एक दिवस महेश उठून पाहतो तर काय, रस्त्यावर असलेल्या त्याच्या गाडीला मागून कोणीतरी धडक दिलेली._
चडफडत महेश गाडीजवळ गेला, किती नुकसान झालंय ते बघायला, तर काचेवर अडकवलेली एक चिठ्ठीत
एक नाव आणि फोननंबर लिहिलेला होता आणि फोन करण्यास सांगितले होते.
त्याने त्या नंबरवर फोन लावला. पलीकडचा माणूस म्हणाला,
‘‘मी वाटच पाहत होतो तुमच्या फोनची._ _तुमच्या गाडीला धडक देणारा मीच._
मी काकड आरती करून बाहेर आलो. चुकीचा गियर पडल्यामुळे गाडी मागे जायच्याऐवजी पुढे गेली आणि तुमच्या गाडीवर आदळली.
पहाटे तुम्हाला त्रास म्हणून चिठ्ठी ठेवली. मी तुमचं सगळं नुकसान भरून देतो.’’_
त्याने सगळं नुकसान भरूनही दिलं, माफी मागत होता.
महेशला काही राहवेना. त्याने विचारलं, ‘‘तुम्हाला धडक देताना कोणीही पाहिलं नव्हतं. आपणहून कबुल कसं काय केलंत ? हे सगळं टाळू शकला असतात._
_तो माणूस म्हणाला ...., कोणी बघत नव्हतं कसं ? भगवंत सगळं बघत असतो आणि रोज पहाटे दर्शन घेऊन माझ्या अंगात एवढाही प्रामाणिकपणा नसेल तर
*माणसाला मंदिरात जाण्याचा काय अधिकार ??*
कॉपी पेस्ट. 🌹 #🙏श्री स्वामी समर्थ📿
#🙏श्री गुरुदेव दत्त💐 महाराजांची कृपादृष्टी यावर बोलताना उसासा सोडत मित्रवर्य म्हणाले ,अहो आचार्य आमच्यावर मात्र काही कृपा नाही . दत्त महाराज का बरं खप्पा मर्जी असावेत ? मी म्हटले अहो तुमच्यावर तर नित्य पूर्ण कृपा आहे . हे पहा ,तुमच्या कोणत्याही पिढीत मतिमंदता आहे का ? दारिद्र्य अवस्था आहे का ? खाऊन पिऊन सुखी असलात तरी कर्जाचे डोंगर ,उद्याची भ्रांत हे आहे का ? अपंगत्व कोणाला आहे का ? दुर्धर रोग आनुवंशिकतेने आहे का ? व्यसनाधीन कोणी आहे का ? नाही ना ??? मग हि दत्त महाराजांची कृपा नाहीतर काय आहे ? आणखी परत दत्त महाराज हे उपास्य दैवत लाभले आहे .
आणि समजा , वरील पैकी काही असले तरी महाराजांवरची श्रद्धा हे सर्व संपुष्टात आणते . आधीच नरजनन दुर्लभ ,त्यात उत्तम कुळात जन्म ,दत्त महाराज उपास्य दैवत हे सर्व अतिदुर्लभ आहे . वरीलपैकी काही काही प्रश्न सुटत नसल्यास कोणालाही काहीही न विचारता थोरल्या महाराजांची प्रश्नावली पहा . उत्तर निश्चित मिळते . आणि त्या उत्तराप्रमाणे केल्यास गुण हमखास आहे . तेव्हा दत्त महाराजांची कृपा म्हणजे मोठ्या पदव्या ,प्रसिद्धी ,पैका अडका ,मानसन्मान हे सर्व अजिबात नाही हे लक्षात घ्या .
दत्त म्हणावेसे वाटणे म्हणजेच त्यांची कृपादृष्टी आहे . नृसिंहवाडीला जावेसे वाटणे ,तिथे सेवा करणे म्हणजेच कृपादृष्टी आहे . महाराजांच्या लीला श्रवण करणे ,त्यांचे कीर्तन ऐकणे म्हणजे कृपादृष्टी आहे . महाराजांच्या लीला आठवून मनन करणे ,त्यांना रोज आज काय काय घडले याचे सर्वस्वात्मनिवेदन करणे म्हणजेच कृपादृष्टी आहे .
सर्वस्वात्मनिवेदन हि तर फार आगळीवेगळी भक्ती आहे बर का . रोज रात्री झोपण्याअगोदर दत्त महाराजांना आज काय काय घडले ते सांगून पहा . आज काय काय प्रमाद हातून घडले ,विषय वासना कशा तडाखे देत होत्या ,प्रलोभने कशी फेर धरून होती आणि या सर्वातून आपल्या कृपेने कशी सुटका झाली . काही प्रमाद घडल्यास आपल्याला मी नमस्कार करून शरण आलो आहे तेव्हा शरणागत वत्सल हे बिरुद सार्थ करत पुन्हा असा प्रमाद हातून होऊ नये हि प्रार्थना . आपल्या हृदयात नित्य असणाऱ्या दत्त महाराजांना हे सर्व माहीत नाही का ? परीक्षा घेत असतात झाले . श्री गुरुदेव दत्त !!!--- अभय आचार्य
#🙏श्री गुरुदेव दत्त💐 नोव्हेंबर❗
‼श्री गुरुदेव दत्त‼
🌹🌹प्रवचनाचा विषय🌹🌹
🟫🟫उत्कट भावनेने भगवंताची उपासना करावी.🟫🟫
💮विस्तव माहीत नसला, तरी तो हाताला चुकूनही लागला तरी हात भाजतो; किंवा हा परीस आहे हे माहीत नसूनही, लोखंडाचा घण त्यावर मारला तरी त्याचे सोने व्हायचे रहात नाही. त्याप्रमाणे ज्ञानाशिवाय नुसते भक्तीने जरी भगवंताकडे गेले तरी काम होते. परंतु दुसर्या विषयांची आसक्ति जोवर आपल्याला सुटत नाही, तोवर मनापासून भगवद्भक्ति होत नाही.💮
💢जिथे उत्कट भावना आहे तिथे सगुण मूर्तीला मनुष्यधर्म प्राप्त होतील.उपासक देहाला विसरला की उपास्यमूर्तीमध्ये त्याला जिवंतपणा अनुभवाला येऊ लागेल.शिवाय,जे इतर लोक थोडे तन्मय झाले आहेत,त्यांनादेखील तो अनुभवाला येईल.परंतु उपासकाची किंवा भक्ताची भावना नेहमी उत्कट राहीलच असा नेम नाही.म्हणून अशा उपासकाला मूर्तीमधल्या चैतन्याचा अनुभव येऊन देखील पारमार्थिकदृष्ट्या फायदा होईलच असे निश्चित नाही.💢
💠एका मुलाने काही खोडी केली म्हणून शेजारच्या बाईने त्याला एक चापट मारली. त्याबरोबर मुलाने मोठे भोकाड पसरले आणि त्या बाईला शिव्या देऊ लागला. ते ऐकून त्याची आई बाहेर आली आणि तिने त्याला चांगलाच झोडपला. परंतु आईच्या हातचा इतका मार खाऊनसुद्धा तो मुलगा फार ओरडला नाही, आणि त्याने आईला उलट शिव्यापण दिल्या नाहीत.हे जसे खरे,त्याप्रमाणे आपल्यावर येणारी संकटे ही भगवंताने आणली आहेत अशी निष्ठा असेल,तर आपल्याला त्यांचा त्रास होईल,पण त्यांनी आपली शांति बिघडणार नाही.भगवंताचा विसर आपल्याला पडला की आपली शांति बिघडते.💠
❄ज्या दातांनी सिंह मोठाले प्राणी मारतो त्याच दातांनी तो आपल्या पिल्लांना इजा न करता उचलतो, हे लक्षात असू द्यावे.❄
♦आपण निःपक्षपाती बुद्धीने विचार केला तर भगवंताचे सान्निध्य लाभले त्यालाच निर्भयता आणि निर्वासनता येईल.♦
🏵 प्रत्येक माणसाला आधार लागतो. पण आपण अपूर्णाचा आधार धरल्यामुळे आपल्याला निर्भयता येत नाही; यासाठी भगवंताचा आधार धरावा.🏵
⭕बुद्धीने निश्चय करावा आणि मन भगवंताकडे लावावे, की इंद्रिये तिकडे बळजबरीने जातीलच, राम उपाधिरहित आहे आणि त्याचे नामही उपाधिरहित आहे. म्हणून, ज्याप्रमाणे खडक किंवा वाळू पाण्याशी मिसळत नाहीत, साखर किंवा मीठच विरघळते आणि समरस होते, तद्वत् रामाशी त्याचे नामच समरस होते.⭕
🍀#बोधवचन :सर्व सृष्टी रामरूप दिसणे हेच भक्तीचे फळ आहे.🍀
🌷#प्रवचने:श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज🌷
🌲श्री राम जय राम जय जय राम🌲
💐🌹विनायक चतुर्थी कथा🌹💐
विनायक चतुर्थीची एक गोष्ट प्रचंड लोकप्रिय आहे. एकदा भगवान शंकर आणि देवी पार्वती यांना एक खेळ खेळण्याची इच्छा झाली. या बैठ्या खेळात कोण जिंकले, कोण हरले याचा निर्णय देण्यासाठी भगवान शंकराने गवतापासून एक पुतळा तयार केला आणि त्यात प्राण फुंकले.
खेळात तीन वेळा देवी पार्वतीचा विजय झाला पण पुतळारुपी बालकाने भगवान शंकराचा विजय झाल्याचे प्रत्येकवेळी सांगितले. या प्रकाराने संतापलेल्या देवी पार्वतीने त्या पुतळारुपी बालकाला तिथेच चिखलात पडून राहशील, असा शाप दिला. घाबरलेल्या पुतळारुपी बालकाने देवी पार्वतीची माफी मागितली. अखेर देवी पार्वतीने उःशाप दिला. एक वर्षानंतर नागकन्या या परिसरात येईल. जर तिच्या सल्ल्याने विनायक चतुर्थीचे व्रत केले तर तू शापातून मुक्त होशील असे देवी पार्वती म्हणाली. पुढे वर्षभराने देवी पार्वतीचे म्हणणे खरे ठरले. शापमुक्त बालक कैलास पर्वतावर आला. तिथे त्याने भगावन शंकर आणि देवी पार्वतीसोबत राहण्याची इच्छा व्यक्त केली. देवी पार्वतीने ही इच्छा पूर्ण करावी म्हणून भगवान शंकराने विनायक चतुर्थीचे व्रत केले. या व्रताने प्रसन्न होऊन देवी पार्वतीने बालकाला कैलास पर्वतावर राहण्यास परवानगी दिली. हे बालक म्हणजे गणपतीचा भाऊ कार्तिकेय.
जसा कार्तिकेयाला आणि पुढे शंकराला विनायक चतुर्थीच्या व्रताचा फायदा झाला तसाच लाभ इतरांनाही मनोभावे व्रत अंगिकारल्यास होऊ शकतो, असे सांगतात. त्यामुळेच विनायक चतुर्थीला गणपतीचा पूजा, उपवास, दानधर्म याला महत्त्व आले.
*दुसरी कथा*
शिवपुराणात उल्लेखित उपाख्यानानुसार, पार्वतीने एकदिवशी नंदीस द्बारपाल म्हणून नियुक्त करून स्नान करण्यास गेली. यावेळी शंकर तेथे आले. त्यांनी नंदीस झुगारून न्हाणीघरात प्रवेश केला. यामुळे पार्वती अपमानित व रागाने क्षुब्ध झाली. शेवटी सखी जया व विजया यांच्या सल्ल्याने चिखलापासून एका सुंदर पुत्राची मूर्ती निर्मिली व त्यात प्राण फुंकले. या पुत्रास तिने स्वतःचा अनुचर म्हणून नेमले. नंतर एकेदिवशी या कुमार मुलास द्वारपाल नेमून पार्वती स्नानास गेली असता शंकर तेथे उपस्थित झाले. त्यावेळी या कुमाराने शंकरास अडवले. पहिल्यांदा कुमारासोबत त्यांचा वाद व नंतर पार्वतीच्या मनातील इंगिताप्रमाणे युद्ध झाले. यावेळी शंकरांनी त्रिशुलाने त्याचे मुंडके उडवले. ही वार्ता ऐकून पार्वतीने क्रुद्ध होऊन सृष्टी नष्ट करण्यास प्रारंभ केला. नारद व देवगणांनी पार्वतीला शांत केले. तेव्हा पार्वतीने तिच्या पुत्राच्या पुनर्जीवनाची मागणी केली व तिचा पुत्र सगळ्यांना पूज्य व्हावा अशी इच्छा व्यक्त केली. शंकरांनी त्यास होकार दिला परंतु कुमाराचे मस्तक कोठेही न मिळाल्याने त्यांनी गणांस उत्तर दिशेस पाठवले व प्रथम जो प्राणी दिसेल त्याचे मस्तक आणण्याची आज्ञा केली. गण एका हत्तीचे मस्तक घेऊन उपस्थित झाले. देवगणांनी ह्या मुंडक्याच्या साहाय्याने कुमारास जिवंत केले. तदपरांत शंकरांनी या मुलास स्वपुत्र म्हणून स्वीकारले. देवगणांच्या आशिर्वादाने हा मुलगा पूज्य झाला व गणेश नावाने प्रसिद्ध झाला. कुठल्याही पूजे आधी पहिला मान गणपती बाप्पांना असतो आणि त्यांचीच पूजा केली जाते.
*काय करावे?*
विनायक चतुर्थी निमित्त प्रसन्न मनाने गणपतीची पूजा करताना अथर्वशीर्ष आणि गणपती स्तोत्र म्हणावे तसेच विनायक चतुर्थीच्या मंत्राचा जप करावा.
पूजा करण्यासाठी जास्वंदाची फुले आणि दुर्वा यांचा वापर करावा.
दिवसभर उपवास करावा. दूध, फलाहार असा हलका आहार घ्यावा.
राग, लोभ या दुर्गुणांचा त्याग करण्यासाठी संकल्प करावा आणि त्यावर अंमल करावा.
*काय टाळावे?*
विनायक चतुर्थी असल्यामुळे चंद्रदर्शन करू नये.
विनायक चतुर्थीच्या गणेश पूजेत तुळशीच्या पानांचा वापर टाळावा.
*विनायक चतुर्थी मंत्र*
प्रातर्नमामि चतुराननवन्द्यमानमिच्छानुकूलमखिलं च वरं ददानम्।
तं तुन्दिलं द्विरसनाधिपयज्ञसूत्रं पुत्रं विलासचतुरं शिवयो: शिवाय।।
प्रातर्भजाम्यभयदं खलु भक्तशोकदावानलं गणविभुं वरकुञ्जरास्यम्।
अज्ञानकाननविनाशनहव्यवाहमुत्साहवर्धनमहं सुतमीश्वरस्य।।
*विनायक चतुर्थिचे महत्व*
केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर भारतातील मंदिरांच्या प्रवेशद्वारावर गणपतीचे चित्र कोरलेले असते. तिला गणेशपट्ट असे संबोधले जाते. महाराष्ट्रातील घरांच्या मुख्य दारावर गणेशपट्टी वा गणेशप्रतिमा असते. गणपती हा विघ्नहर्ता असल्याने घरावर येणाऱ्या विघ्नांचे म्हणजे संकटांचे तो निवारण करेल ही भावना त्यामागे असते.
*विनायक चतुर्थी पूजा*
प्रत्येक महिन्याच्या अमावस्येनंतर येणार्या चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणतात. या चतुर्थीला स्नान करून धूतवस्त्र नेसावे. घरात स्वच्छ ठिकाणी अगर देव्हार्यासमोर एक स्वच्छ केलेला पाट ठेवावा त्यावर पिंजरीने एक आठ पाकळ्यांचे कमळ काढावे. त्यावर सोन्याचांदीची अगर तांब्यापितळेची छोटी मूर्ती असल्यास ती ठेवावी मूर्ती नसल्यास एक सुपारी ठेऊन पूजा करावी. पूजेवेळी गणपतीला टिळक करावे, लड्डू किंवा मोदकांचा नैवेद्य दाखवावा. आणि गणपती बाप्पाची आरती करावी.
*विनायक चतुर्थी – व्रत*
विनायकी चतुर्थी दिवशी करावयाची श्री विनायकाची व्रतपूजा (सोपी). प्रत्येक महिन्याच्या अमावस्येनंतर येणार्या चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणतात. स्नान करून धूतवस्त्र नेसावे. घरात स्वच्छ ठिकाणी अगर देव्हार्यासमोर एक स्वच्छ केलेला पाट ठेवावा त्यावर पिंजरीने एक आठ पाकळ्यांचे कमळ काढावे. त्यावर सोन्याचांदीची अगर तांब्यापितळेची छोटी मूर्ती असल्यास ती ठेवावी मूर्ती नसल्यास एक सुपारी ठेऊन पूजा करावी. आचमन करून
केशवाय नमः । नारायणाय नमः । माधवाय नमः ।
असे म्हणत तीन पळ्या पाणी उजव्या तळहातावर घेऊन प्राशन करावे आणि
गोविंदाय नमः ।
असे म्हणत चौथी पळी पाणी हातावरून ताम्हणात सोडावे. ते पाणी तुळशीत टाकून इच्छा असल्यास मूर्ती अगर सुपारी ताम्हणात ठेऊन स्नान घालावे. त्यानंतर पंचामृत स्नान घालावे. हा विधी दुर्वांनी मूर्तीवर अगर सुपारीवर असलेल्याच ठिकाणी पाणी व पंचामृत शिंपडून
स्नानं-पंचामृतस्नानं समर्पयामि
असे म्हणावे.
वस्त्र-वस्त्रोपवस्त्रार्थे कार्पासवस्त्रं समर्पयामि ।
असे म्हणून कुंकू लावलेले वस्त्र अर्पण करून नमस्कार करावा. गंध-तांबडे किंवा पांढरे गंध लावावे
चंदनं समर्पयामि
म्हणून नमस्कार करावा.
हरिद्रांच कुंकुमं समर्पयामि ।
हळद-कुंकू लावावे.
अक्षतां-विनायकाय नमः ।
अलंकारार्थे अक्षतान् समर्पयामि ।
म्हणून पिंजर लावलेल्या लाल अक्षता वाहाव्या.
फुले-पुष्पाणि समर्पयामि
म्हणून फुले अर्पण करावी. विनायकाला तुळस वाहूं नये, बेल चालतो.
दुर्वा-दुर्वांकुरान् समर्पयामि
म्हणत दुर्वा वाहाव्या. ।
धूपं-विनायकाय नमः ।
असे म्हणून सुगंधी उदबत्ती लावून देवाला
धूपं-समर्पयामी म्हणत ओवाळावे. दीप-निरंजनाची वात पेटवून
निरांजनदिप समर्पयामि
असं म्हणून ओवाळावे.
नैवेद्य-नैवेद्यार्थे स्वाद्यवेद्यं समर्पयामि
असें म्हणून गूळखोबर्याचा नैवेद्य दाखवावा व
नमस्करोमि
असें म्हणून नमस्कार करावा. प्रदक्षिणा व पुष्पांजलि-गंध, अक्षता व फुल हातात घेऊन देवाभोवती अगर आपल्याच भोवती १, ३ किंवा ५ प्रदक्षिणा घालून
प्रदक्षिणां समर्पयामि
म्हणावे व हातातील पुष्पांजलि
पुष्पांजलि समर्पयामि
असे म्हणून देवावर वाहावी. पूजा झाल्यावर खालील प्रार्थना म्हणावी –
विनायक गणेशान सर्वदेवनमस्कृत । पार्वतीप्रीव विघ्नेश मम विघ्नान्निवाराय ॥
नमो विष्णूस्वरूपाय, नमस्ते रुद्ररूपिणे । नमस्ते ब्रह्मरूपाय, नमोऽनन्तस्वरूपिणे ॥
नमस्कारान् समर्पयामि ।
नमस्कार करावा आपले मागणे देवाकडे मागावे. ॥ श्री विनायकार्पणमस्तु ॥
विसर्जन –
संध्याकाळी उदबत्ती ओवाळून विनायकावर पाणी शिंपडावे व पुनरागमनायच असे म्हणून मूर्ती अगर पूजेला लावलेली सुपारी हलवावी अशा रीतीने, श्रद्धेने विनायकी चतुर्थी व्रत पूजन करून आपल्या सवडीप्रमाणे पोथी मात्र अवश्य वाचावि रात्री नामस्तोत्र म्हणावे. पूजेनंतर गणपतीच्या आरत्या म्हणाव्या.
भक्तकवि मिलिंदमाधवकृत
विनायकी चतुर्थी माहात्म्य, व्रतकथा व नामस्तोत्र
ॐ विनायका नमः । ॐ नमो श्रीगजवदना । गणराया गौरीनंदना । विघ्नेशा भवभयहरणा । नमन माझे साष्टांगी ॥१॥
नंतर नमिली श्रीसरस्वती । जगन्माता भगवती । ब्रह्मकुमारी वीणावती । विद्यादात्री विश्वाची ॥२॥
नमन तैसे गुरूवर्या । सुखनिधान सद्गुरुराया । स्मरूनी त्या पवित्र पायां । चित्तशुद्धी जाहली ॥३॥
थोर ऋषिमुनी संतजन । माता-पिता आणि बुधगण । करूनी तयांसी नमन । विनायकी माहात्म्य आरंभिले ॥४॥
शुक्लपक्षी चवथी तिथी । तीच विनायकी चतुर्थी । गणेशजन्माची स्मृति । म्हणून हे व्रत करावे ॥५॥
या दिवशी प्रत्येकाने । वागावे अति संयमाने । आणि काया-वाचा मनें । पवित्र असावे ॥६॥
कठोर शब्द उच्चारून । दुखवू नये कोणाचे मन । जिवंत देवांना लाथाडून । काय उपयोग व्रताचा ? ॥७॥
दीनदुबळ्यांवरी दया करी । त्याचाच देव होतो कैवारी । संकटें सर्व निवारी । आणि सुखरूप ठेवितो ॥८॥
प्रथम करावें गणपती पूजन । गुळखोबर्याचा नैवेद्य अर्पून । मनोभावें प्रार्थना करून । आशिर्वाद मागावा ॥९॥
पूजा प्रार्थना संपल्यावरी । भोजन करावें दुपारी । साध्या सात्विक आहारीं । मीठ वर्ज्य करावें ॥१०॥
गरम मसाले टाळावे । उत्तेजक जिन्नस नसावें । ऐंसें जेवण जेवावें । विनायकी व्रताला ॥११॥
ज्यांची इच्छा असेल त्यांनी । रात्री उपास करावा त्या दिनीं । आणि इतर सर्वांनी । विनायक चिंतन करावे ॥१२॥
आधीं चित्त स्थिर करावें । एक माळा (१०८) नाम स्तोत्र म्हणावें । आणि नंतर झोपी जावें । विनायकी व्रतदिनीं ॥१३॥
गणपतीची व्रतें अनेक । त्यांतीलच हें व्रत एक । त्याची ही कथा सुरेख । ऐका आतां सांगतों ॥१४॥
विनायकी चतुर्थी दिवशीं । आपणास फुरसत मिळेल तशी । वंदन करूनी विनायकासी । पोथी अवश्य वाचावी ॥१५॥
फार फार प्राचीन काळीं । एक विशेष गोष्ट घडली । जी पुराणी आहे वर्णिली । तीच देतो संक्षेपें ॥१६॥
एक होता पारधी शिकारी । बायको, मुलें – बाळें होती घरी । कसेंबसें तो पोट भरी । पशुपक्षी मारूनी ॥१७॥
भल्या पहाटे उठुनी । तीरकामठा हाती घेऊनी । हिंडे सार्या रानींवनीं । शिकार काही शोधाद्या ॥१८॥
पसरूनी ठेवी जाळें फांसे । त्यांत अडकती पक्षी ससे. । प्राणी त्यापेक्षां जे मोठेसे । मारी धनुष्यबाणानें ॥१९॥
काळवीट, हरिणे, चितळे । वनगाई, सांबर, चित्ताही मिळे । कधीं कधीं ढाण्या वाघ आढळे । तेव्हा फायदा होतसे ॥२०॥
कवडे, कबुतरे, तितर, मोर । असे रंगीबेरंगीं लहानथोर । पशुपक्षी मिळतां भरपूर । आनंद त्याला होतसे ॥२१॥
टाकुनी पशूंचीं आंतडीं । काढुनी घेई शिंगे कातडी । विकुनी ती बाजारी हरघडी । चरितार्थ तो चालवी ॥२२॥
नाना रंगी पक्ष्यांचीं । आणिक सुंदर मोराची । पिसें विकून, पैशांची । प्राप्ती त्याला होतसे ॥२३॥
कधी होई खूप कमाई । कधी कधी उपाशीच राही । आला दिवस कसाबसा जाई । ऐसें जीवन व्याधाचें ॥२४॥
एकदां निघाला नेहमीप्रमाणें । हिंडत गेला रानेंवनें । परंतु कर्मधर्मसंयोगानें । शिकार नाहीं मिळाली ॥२५॥
दिवस आला माथ्यावरी । भुकेचा डोंब उठला उदरी । तो शमवाया पाणीतरी । प्यावे आतां भरपूर ॥२६॥
ऐसा विचार करूनी मनी । तलाव शोधत जावे म्हणुनी । व्याध निघाला मग तिथुनी । भर उन्हात भर दुपारी ॥२७॥
योगायोग खराच आगळा । एक दिव्य दृश्य दिसले त्याला । वनदेवीचा एक मेळा । पूजाविधीत रंगलेला ॥२८॥
व्याध तिथे झपझप गेला । हात जोडुनी उभा राहिला । वनदेवींनी विचारले त्याला । कुठला कोण आहेस तूं ? ॥२९॥
व्याधाने मग न डगमगता । सांगितली आपली सत्यकथा । वनदेवींना ती ऐकता । फार वाईट वाटले ॥३०॥
पाणी देऊनी त्या व्याधाला । म्हणाल्या दया नसे का तव ह्रदयाला ? । प्राणीहत्येचे पाप कशाला । पोटासाठी करिसी तूं ? ॥३१॥
ज्या मुक्या प्राण्यांना तूं मारिले । त्यांनी तुझे काय नुकसान केले ? । पापाचे मात्र डोंगर झाले । तुझ्या क्रूर कृत्यांनी ॥३२॥
तूं नाहीस लंगडा लुळा । अपंग किंवा आंधळा पांगळा । सुदैवाने मिळालें आहे तुला । धष्टपुष्ट शरीर हे ॥३३॥
अंग मोडून काही काम करावें । स्वकष्टानें द्रव्य मिळवावें । मिळालेल्यांत संतुष्ट असावें । आणि राहावें आनंदें ॥३४॥
जो पाप करी आचरणांत । आणि देवाला घाली दंडवत । अशा दांभिकाच्या पदरात । पुण्य कसें पडेल ?॥३५॥
श्रम तेथें येते संपत्ती । निरूद्योगाने येते विपत्ती । हे जाणे त्यालाच गणपती । सदा प्रसन्न होतसे ॥३६॥
व्याध म्हणाला खजिल होऊन । देवीनो आज मी झालो धन्य । तुमच्या उपदेशानुसार वागेन । अशी शपथ घेतों मी ॥३७॥
परंतु ही इथे थाटाची । पूजा करिता कोणाची ?। क्षमा करा विचारितो याची । मोठ्या उदार मनाने ॥३८॥
देवी म्हणाल्या जो कोणी कष्ट करतो । त्याला त्यात जो यश देतो । विघ्ने संकटे दूर करतो । आणि देतो सुखसमृद्धि ॥३९॥
असा देवाधिदेव विनायक । विश्वाधार मूळारंभ एक । त्याचीच नावे घेऊनी अनेक । पूजा आम्ही करितो ही ॥४०॥
आज विनायकी चतुर्थी । म्हणजेच विनायकी जयंती । आज त्याची पूजा करितां ती । सिद्धिदायक होतसे ॥४१॥
आजचे व्रत पाळावे । आणि कर्तव्य कर्म करावे । प्राणीमात्रांसी रक्षावे । परपीडा हे पाप असे ॥४२॥
व्रताची माहिती व महती । त्यांनी सांगितली व्याधाप्रती । तो व्याध ऐकुनी ती । फार संतुष्ट जाहला ॥४३॥
व्याधाने केले देवींना वंदन । आणि म्हणाला आजपासून । प्रत्येक विनायकी व्रत मी करीन । प्राणिहत्या सोड्ली ॥४४॥
गुप्त जाहल्या देवी तेवढ्यात । व्याध परतला आपल्या झोपडीत । राहू लागला खूप सुखांत । मेहनत मजुरी करूनिया ॥४५॥
त्याने अनेक वर्ष ते वरत केले । पुढे सृष्टिनियमाने निधन झाले । त्या व्रताच्या पुण्यसंचयाने । राजकुळी पुनर्जन्म लाभला ॥४६॥
पूर्वजन्मींची आठवण । विसरला नव्हता म्हणून । त्या जन्मीही केले व्रतपालन । तेणे सम्राट जाहला ॥४७॥
वैभवाने नाही उतला । सत्तेने नाही मातला । म्हणूनच विनायकाने त्याला । अखेर दिली सद्गती ॥४८॥
विनायकी चतुर्थीची ही कथा । थोडक्यात सांगितली आता । संतोष वाटो विनायक भक्तां । म्हणे मिलिंदमाधव ॥४९॥
या पोथीचे करिता वाचन श्रवण । विनायक कृपेने होईल कल्याण । मनोरथ होतील सफल पूर्ण । श्रीविनायकाच्या प्रसादाने ॥५०॥
ज्यांची श्रद्धा असेल त्यांनी । केवळ एखाद्याच व्रतदिनी । या पोथीच्या चार प्रती घेऊनी । गणेश मंदिरी वाटाव्या ॥५१॥
प्रसार व्हावा विनायक भक्तीचा । प्रचार व्हावा सद्विचारांचा । हाच उद्देश प्रती वाटण्याचा । कृपया ध्यानी घ्यावे हे ॥५२॥
विनायक भक्तीचा प्रभाव मोठा । नसतो सुखसमृद्धिचा तोटा । सर्व वैभवांचा होय पुरवठा । आनंदी आनंद होतसे ॥५३॥
नित्य केल्याने गणेशसेवा । मिळेल तुष्टी-पुष्टीचा ठेवा । ज्याचा त्याने अनुभव घ्यावा । या विनायकी व्रताचा ॥५४॥
असो. शके १९०८ वर्षी । चैत्र मासी शुक्लपक्षी । विनायकी चतुर्थीच्या शुभ दिवशी । पोथी पूर्ण झाली ही ॥५५॥ (ता. १३ एप्रिल १९८६)
ॐ शांतिः शांतिः शांतिः शुभं भवतु ॥ भक्तकवि मिलिंदमाधवकृत विनायकी चतुर्थी माहात्म्य संपूर्ण ॥
॥ श्री विनायक अष्टोत्तरशत नामस्तोत्र ॥
व्रतदिनी महर्षि गृत्सभदकृत । भविष्योत्तर पुराणोक्त । अष्टोत्तरशत नामस्तोत्र । रात्री एकदां म्हणावें ॥१॥
प्रथम ॐ अक्षर उच्चारावें । विनायकाचें एक नांव घ्यावें । नंतर नमः म्हणावें । मंत्र पूर्ण व्हावया ॥२॥
ऐसे करितां १०८ वेळां । संतोष होईल विनायकाला । प्रसन्न होईल तो तुम्हाला । देईल वरदान इच्छिलेलें ॥३॥
यांतली एकवीस नावे उच्चारूनी । श्रीगणपतीच्या चरणीं । दुर्वायुग्म वाहुनी । नमस्कार करावा ॥४॥
१. ॐ विनायकाय नमः
२. ॐ विघ्नराजाय नमः
३. ॐ गौरीपुत्राय नमः
४. ॐ गणेश्वराय नमः
५. ॐ स्कंदाग्रजाय नमः
६. ॐ अव्ययाय नमः
७. ॐ पूताय नमः
८. ॐ दक्षाध्यक्षाय नमः
९. ॐ द्विजप्रियाय नमः
१०. ॐ अग्निगर्वच्छिदे नमः
११. ॐ इंद्रश्रीपदाय नमः
१२. ॐ वाणीबलप्रदाय नमः
१३. ॐ सर्वसिद्धिप्रदाय नमः
१४. ॐ सर्वतनयाय नमः
१५. ॐ शिवप्रियाय नमः
१६. ॐ सर्वात्मकाय नमः
१७. ॐ सृष्टिकर्त्रे नमः
१८. ॐ देवानीकाचिंताय नमः
१९. ॐ शिवाय नमः
२०. ॐ शुद्धाय नमः
२१. ॐ बुद्धिप्रियाय नमः
२२. ॐ शांताय नमः
२३. ॐ ब्रह्मचारिणे नमः
२४. ॐ गजाननाय नमः
२५. ॐ द्वेमातुराय नमः
२६. ॐ मुनिस्तुत्याय नमः
२७. ॐ भक्तविघ्नविनाशनाय नमः
२८. ॐ एकदंताय नमः
२९. ॐ चतुर्बाहवे नमः
३०. ॐ चतुराय नमः
३१. ॐ शक्तिसंयुताय नमः
३२. ॐ लंबोदराय नमः
३३. ॐ शूर्पकर्णाय नमः
३४. ॐ हेरंबाय नमः
३५. ॐ ब्रह्मवित्तमाय नमः
३६. ॐ कालाय नमः
३७. ॐ ग्रहपतये नमः
३८. ॐ कामिने नमः
३९. ॐ सोमसूर्याप्रियलोचनाय नमः
४०. ॐ पाशांकुशधराय नमः
४१. ॐ चंडाय नमः
४२. ॐ गुणातीताय नमः
४३. ॐ निरांजनाय नमः
४४. ॐ अकल्मषाय नमः
४५. ॐ स्वयंसिद्धाय नमः
४६. ॐ सिद्धार्चितपदांबुजाय नमः
४७. ॐ बीजपूरप्रियाय नमः
४८. ॐ अव्यक्ताय नमः
४९. ॐ वरदाय नमः
५०. ॐ शाश्वताय नमः
५१. ॐ कृतिने नमः
५२. ॐ विद्वत्प्रियाय नमः
५३. ॐ वीतभयाय नमः
५४. ॐ गदिने नमः
५५. ॐ चक्रिणे नमः
५६. ॐ इक्षुचापधृते नमः
५७. ॐ अब्जोत्पलकराय नमः
५८. ॐ क्षीशाय नमः
५९. ॐ श्रीपतिस्तुतिहर्षिताय नमः
६०. ॐ कुलाद्रिभृते नमः
६१. ॐ जटिने नमः
६२. ॐ चंद्रचूडाय नमः
६३. ॐ अमरेश्वराय नमः
६४. ॐ नागोपवीतिने नमः
६५. ॐ श्रीकंठाय नमः
६६. ॐ रामार्चितपदाय नमः
६७. ॐ व्रतिने नमः
६८. ॐ स्थूलकंठाय नमः
६९. ॐ त्रयीकर्त्रे नमः
७०. ॐ सामघोषप्रियाय नमः
७१. ॐ अग्रण्याय नमः
७२. ॐ पुरुषोत्तमाय नमः
७३. ॐ स्थूलतुंडाय नमः
७४. ॐ ग्रामण्ये नमः
७५. ॐ गणपाय नमः
७६. ॐ स्थिराय नमः
७७. ॐ वृद्धिदाय नमः
७८. ॐ सुभगाय नमः
७९. ॐ शूराय नमः
८०. ॐ वागीशाय नमः
८१. ॐ सिद्धिदायकाय नमः
८२. ॐ दुर्वाबिल्वप्रियाय नमः
८३. ॐ कांताय नमः
८४. ॐ श्रीपापहारिणे नमः
८५. ॐ कृतागमाय नमः
८६. ॐ समाहिताय नमः
८७. ॐ वक्रतुंडाय नमः
८८. ॐ श्रीपदाय नमः
८९. ॐ सौम्याय नमः
९०. ॐ भक्तकंक्षितदात्रे नमः
९१. ॐ अच्युताय नमः
९२. ॐ केवलाय नमः
९३. ॐ सिद्धिदाय नमः
९४. ॐ सच्चिदानंदविग्रहाय नमः
९५. ॐ ज्ञानिने नमः
९६. ॐ मायापुताय नमः
९७. ॐ दांताय नमः
९८. ॐ ब्रह्मिष्ठाय नमः
९९. ॐ भयवर्जिताय नमः
१००. ॐ प्रमत्तदैत्यभयदाय नमः
१०१. ॐ व्यक्तमूर्तये नमः
१०२. ॐ अमूर्तिकाय नमः
१०३. ॐ पार्वतीशंकरोत्संगखेलनोत्सवलालसाय नमः
१०४. ॐ समस्त जगदाधाराय नमः
१०५. ॐ मूषकवाहनाय नमः
१०६. ॐ ह्रष्टचित्ताय नमः
१०७. ॐ प्रसन्नात्मने नमः
१०८. ॐ सर्वसिद्धिप्रदायकाय नमः
इति विघ्नेश्वराष्टोत्तरशतदिव्यनामस्तोत्रं संपूर्णम् ॥ #🙏श्री गुरुदेव दत्त💐
#🙏श्री गुरुदेव दत्त💐 - एक मेडिटेशन
पूर्वी देवांची पूजा झाल्याशिवाय तोंडात पाणीही न घेणारी लोकं होती. त्याची आठवण झाली.
मग विचार करता करता वाटलं किती सुंदर पद्धत आहे ना आपल्यात रोजच्या पूजेची.
माझ्या डोळ्यांसमोर पूर्वीचं एक छान चित्र ऊभं राहिलं. भल्या पहाटेच ऊठून सर्व स्त्रिया घरातलं दळण, स्वैपाकघरातली कामं, पाणी भरणं, लहान मुलांकडे लक्ष देणं वगैरे कामात मग्न असताना पुरूष मंडळी बाहेरच्या अंगणाची सफाई, चूल पेटवणं, बागेला पाणी देणं, गोठा सफाई, धारा काढणं वगैरे कामात गर्क आहेत.
सकाळची सर्व आन्हिकं ऊरकून शूचिर्भूत होऊन घरातले यजमान पूजेसाठी फुलं काढायला बागेत जातात. ऊगवतीची कोवळी किरणं अंगावर घेत, अनवाणी पायांनी, रंगीबेरंगी फुलांची शोभा निरखत पानाफुलांशी हितगूज करत निसर्गाचं अप्रूप मनात साठवत मनाला आल्हाददायक देणारा एक आनंददायी (आणि आरोग्यदायीही) सुंदर अनुभव.
फुलं घेऊन देवघरात आल्यावर सर्व देव (स्वत:) स्वच्छ घासलेल्या ताम्हनात काढून देवघराची स्वच्छता, देवांची ऊन पाण्याने अंघोळ, त्यांना लहान बाळांच्याच ममतेने आणि कोमलतेने (भक्तीने) स्वच्छ करून परत जागच्याजागी स्थानापन्न करतात.
एकतानतेने सहाणेवर चंदनाचं मऊ मुलायम सुगंधी गंध ऊगाळतात.
तुम्हाला तुमच्या चिंता, क्लेश, दु:ख, दैन्य सारं सारं काही विसरायला लावणारा हा अनुभव.
खऱ्या भक्तीभावनेत तल्लीन होऊन पूजा करताना 'तो' आहे माझ्या पाठीशी, हेही दिवस जातील, 'तो' समर्थ आहे, मी कशाला ऊगीच काळजी करू किंवा कशाला काही त्याच्याकडे मागू असा सार्थ विश्वास मनात जागतो.
चंदनाच्या गंधाचा मऊ स्पर्श, फुलांचे देखणे रंग आणि प्रकार, धूपाचा सुगंध, तेजाळलेले दिवे, वाहिली जाणारी अक्षत, दाखवला जाणारा नैवेद्य म्हणजे जणू टप्याटप्याने रंगत जाणारी महफिल.
ही पूजा पूर्ण केल्यानंतर ते सजलेलं, तेजाळलेलं, सुगंधित देवघराचं रूप डोळे भरून मनात साठवून डोळे मिटावेत आणि असा सुंदर दिवस दाखवल्याबद्दल त्या ईश्वराप्रती कृतज्ञता व्यक्त करावी.
अशी ही साग्रसंगीत पूजा म्हणजे रस, रंग, गंध, स्पर्श या सर्व इंद्रियांद्वारे केली जाणारी साधनाच जणू. यात नादही येतोच की.
तुमचं मन जराही भरकटू नये आणि ईश्वरावर अढळ निष्ठा ठेवून समर्पित व्हायला मदत म्हणून धीरगंभीरपणे म्हटली जाणारी स्तोत्रं.
खरोखरच तुम्हाला सर्व नकारात्मक भावना विसरायला लावणारी. सकारात्मक भाव जागवून तुम्हाला सात्विक बनवणारी. तुम्हाला जास्त प्रेमळ, करूणामय आणि क्षमाशील बनवून तुम्हाला आत्मविश्वास प्रदान करणारी.
मी तुझ्या पाठीशी आहे. सर्व काही ऊत्तमच होईल' असा भक्कम विश्वास देऊ करणारी.
हळूहळू तुमच्यातला 'अहं' विसरायला लावणारी....
अशी ही रोजची पूजा.
ही बहुधा प्रत्येकाने स्वतंत्रपणे आपापली करणे अपेक्षित असेल का?
या वेळेस अंतर्मुख होऊन मौन राखून रोज परमेश्वराशी अद्वैत साधण्याचा प्रयत्न असेल का?
यात अमुक फुलं आहेत किंवा नाहीत म्हणून, चंदनाचं गंध हवं तसं किंवा हवं तितकं नाही म्हणून, मनासारखा नैवेद्य नाही म्हणून तुम्हाला राग येत असेल तर किंवा पूजा करताना तल्लीनतेने न करता मनात बाकीचे विचार किंवा इतरत्र लक्ष असेल तर मंडळी या पूजेचा तुम्हाला काही ऊपयोग होईल का?
पूजा ही कुणा बाहेरच्या 'देवाला' प्रसन्न करून घेण्यासाठी नाहीये, तर स्वत:मधील ईश्वराची अनुभूती घेण्याचा तो एक प्रवास आहे. स्वतःला प्रसन्न ठेवण्यासाठी आहे. दिवसाची सुरूवात सकारात्मक ऊर्जेने आणि ऊत्साहाने करायचा तो एक सहजसोपा आणि सुंदर मार्ग आहे.
#🙏श्री गुरुदेव दत्त💐 सहस्त्रनामातील प्रत्येक नाम हे भगवंताचे गुण वा स्वभाव दाखवून देणारे आहे . ह्याला आपण उपाधी किंवा बिरुद हे देखील म्हणू शकतो . ह्या उपाधी अथवा बिरुदे म्हणजे भगवान विष्णूंचे स्वभाव दर्शन आहे ,दत्त महाराज हे भगवान विष्णूंचेच रूप असल्याने हि विशेषणे किंवा वैशिष्ठ्ये गुरुचरित्रात दत्त महाराजांच्या सर्व कथांमध्ये दिसून येतात .
उदाहरण म्हणून पाहू जाता शत्रू हा शब्द घेऊ . शत्रू हे दोन प्रकारचे असतात ,एक म्हणजे अंतस्थ आणि दुसरा बाहेरील . अंतस्थ शत्रूंमध्ये षड्रिपूंचा अंतर्भाव होतो तर बाह्य शत्रूंमध्ये आपल्या मनुष्य वा अन्य प्राणी योनीतील जीवांचा समावेश होतो . दोन्ही शत्रू हे घातकच असतात .
श्रीनृसिंहसरस्वती स्वामी दत्त महाराज या भगवंताच्या नामावलीत आलेल्या सर्व नामांनी किंवा बिरुदांनी संपन्न होते . साक्षात विष्णुस्वरूप आहेत ते , तेव्हा हि बिरुदावली त्यांनाही सार्थ आहे . जितक्रोधः ,क्रोधः आणि जितमन्युः हि विष्णुसहस्त्रनामातील नामे काय दर्शवतात ? क्रोधादि अन्तः शत्रुंना जिंकणारा ,त्यांना आपल्या स्वाधीन ठेवणारा ,याचप्रमाणे क्रोधी ,लोभी मानवाला त्याच्या दोषयुक्त प्रवृत्ती पासून निवृत्त करणारा .
गुरुमहाराज हे स्वतः जितक्रोध होतेच पण चौदाव्या अध्यायात त्यांनी क्रोधी अशा यवनाच्या दोषयुक्त प्रवृत्तीपासून त्याला निवृत्त केले . मनामध्ये घडवून आणलेला बदल हा फार मोठा क्रांतिकारी ठरला . सायंदेव हा भयमुक्त होऊन परत महाराजांकडे आला .
शत्रुघ्नः विदारणः हि भगवान विष्णूंची नामे दहाव्या अध्यायात दिसून येतात . शत्रूचा नाश करणारा शत्रूला जिंकणारा,शत्रूचे विदारण करणारा असा यांचा अर्थ होतो . केवळ धाव श्रीपादा या हाकेसरशी महाराज समोर उभे ठाकले आणि त्यांनी वल्लभेषाचा वध करणाऱ्या चोरांना मृत्यू दिला .
भगवान विष्णू हे श्रीवल्लभ अर्थात लक्ष्मीपती आहेत . या करिता विष्णुसहत्रनामात हिरण्यगर्भ ,श्रीगर्भ ,महाधन ,महानिधी ,श्रीधर ,श्रीपति ,श्रीमान आदी नावे आहेत . सुवर्णाचा संग्रह आपल्यापाशी ठेवणारा ,धनाला आपल्या कोषामध्ये ठेवणारा ,असे अर्थ याचे होतात . गुरुचरित्रात अठराव्या अध्यायात घेवडयाच्या वेलाखाली सुवर्ण कुंभ देणारे गुरुमहाराज ,गंगानुजाला शेतात सुवर्णठेवा देणारे महाराज ,हे भगवान विष्णुस्वरूपीच आहेत . भौतिक उद्धाराची वेळ येताच गुरुमहाराजांनी हा सुवर्ण ठेवा आपल्या भक्तांसमोर ठेवला आहे .
हेमांगः हे भगवान विष्णूंचे नाम म्हणजे शरीरावर सुवर्णाची भूषणे घालणारा . आता हे नाम गुरुमहाराजांनी सार्थ केलेले कधी दिसून आले ,तर महाराज एक्कावन्नाव्या अध्यायात जेव्हा पुष्पासनावर बसून गेले तेव्हा त्यांच्या पायात सुवर्ण पादुका नावाड्याला दिसल्याचा उल्लेख आहे . विष्णू सहस्त्रनामातील प्रत्येक नाम हे गुरुमहाराजांना देखील सार्थ होते कारण दत्त महाराज आणि भगवान विष्णू हे एकच आहेत तेव्हा यांची बिरुदे देखील एकच असणे स्वाभाविक नाही का ?? श्री गुरुदेव दत्त !!! --- अभय आचार्य
#🙏श्री गुरुदेव दत्त💐 क्षणी संपूर्ण मंडपात एक अदृश्य शांतता उतरली होती. फुलांची सुवास, मंत्रोच्चारांची मधुर लय, पादुकांवर पसरलेला दिव्य तेज हे सगळं मिळून एक अनिर्वचनीय पवित्रता निर्माण करत होतं.महापूजेचा प्रत्येक उपचार संपत आला तसा भक्तांच्या मनातली भक्तिरसाची तरलता अधिकच गहिरा होत गेली...
पावित्र्याचे सारे संकेत बाळगून गाभाऱ्यातील पादुकांची पूजा सुरु झाली . आत गेलेल्या पुजाऱ्यांनी पादुकांवरील वस्त्र आणि निर्माल्य अलगद बाजूला काढून ठेवले . याही वेळेस प्रातः पूजेप्रमाणे पुजाऱ्यांनी पाणी घातले आणि महापूजेला सुरुवात झाली . पादुकांना अर्थात दत्त महाराजांना आसन ,अर्घ्य ,आचमन समर्पण करून महापूजेचे उपचार सुरु झाले .
श्रींच्या पादुकांना सुवासिक तेल लावून बुक्का लावला आणि उष्णोदकाने न्हाऊ - म्हाखू घातले . पादुका अधिकच खुलून दिसू लागल्या . आता पंचामृत स्नान सुरु झाले . यात सर्वप्रथम दुग्धस्नान .
दुधाने भरलेले कलश पादुकांवर रिते होऊ लागले . श्रींच्या पादुका आता स्पष्ट आणि लोभस दिसू लागल्या . दुधाच्या प्रत्येक लाटेसरशी ती चिरंतन पाऊले पाहाताच सर्व भक्तांच्या मुखातून श्रीगुरुदेव दत्त हा भावपूर्ण उदगार मंडपात घुमला . यानंतर शीतल आणि देवांना प्रिय असे दही पादुकांवर अर्पण केले . यज्ञात आज्य म्हणून प्रतिष्ठा लाभलेले घृत ,सर्व औषधांमध्ये अमृतासमान मधू ,शर्करा अर्थात साखर ,आणि या हंगामात आम्रफ़ळ म्हणजेच आंब्याचा मधुर रस हे सर्व अनुक्रमे अर्पण केले गेले .
पंचामृत द्रव्ये पादुकांची स्पर्श होताच तीर्थमय बनली . भक्तांकरिता हे तीर्थ कलशांमध्ये भरून ठेवले . आता शुद्धोदक स्नानाचा महाभिषेक सोहळा सुरु झाला . त्याच वेळी मंडपात पुरुषसुक्त ,विष्णुसूक्त यांचे सामूहिक पठण सुरु झाले .
शंखतीर्थ घालून शुद्धोदक स्नानाची सांगता झाली . काषायवस्त्राने पादुका कोरड्या करताना चक्रादि चिन्हामध्ये पाण्याचा अंश राहू नये म्हणून पुजारी पाणी टिपून घेऊ लागले . स्वच्छ कोरड्या पादुकांवर अत्तराच्या कुप्या रित्या केल्या .
सर्वत्र सुगंधाचे साम्राज्य पसरले . केशरयुक्त चंदन पादुकांवर सजू लागले . मूळ पादुकांवर गंध पाऊले साकार झाली . प्रत्येक बोटावर अष्टगंधाची नखे उमटली . गुलाब ,तुळशी ,मोगरा ,जाई जुई ,शेवंती ,कुंद ,चंपक ,कल्हार आदी वाहून दोन्ही पादुकांच्या मध्ये गंध आणि बिल्वदल लावले .
भरगच्च फुलांवर छाटी पसरली . त्यावर सात पानांचे बनतीचे वस्त्र घातले . त्यावर नागप्रतिमा ठेवली . पाण्याचा कलश आत ठेवला आणि चांदीच्या तबकाला हिरव्या पानांची रचना असलेली दत्त प्रतिमा ठेवली . पानपूजेने सजलेली प्रसन्न दत्त महाराजांची प्रतिमा पाहून हात जोडले गेले आणि नकळत शब्द बाहेर पडले..
श्री गुरुदेव दत्त ll अभय आचार्य
दत्तरुप ll
#🙏श्री गुरुदेव दत्त💐 नोव्हेंबर ❗
‼श्री गुरुदेव दत्त‼
🌷🌷प्रवचनाचा विषय🌷🌷
🟪🟥🟪भगवंत कल्पनेच्या पलीकडे आहे.🟪🟥🟪
💠मनुष्याचा स्वभावच असा असतो की, आपल्या कल्पनेत जेवढे येते तेवढेच आपण सत्य मानतो. पण आपली कल्पनाच किती संकुचित असते, याचा कोणी विचार करीत नाही. जो कल्पनेच्या पलीकडे आहे, जिथे कल्पना थांबते, ज्याला कल्पना बांधू शकत नाही, त्याला कल्पनेने कसे ओळखता येईल❓💠
💢जो ज्ञानाच्या पलीकडे राहिला आहे त्याला माझ्या तोकड्या ज्ञानाने कसे आजमावता येणार❓माझ्या बुद्धीच्या पलीकडे तो आहे, तेव्हां त्याच्या इच्छेनेच त्याचे खरे ज्ञान होणार आहे.💢
❄अविद्या ती हीच की आपल्या कल्पनेने होणारे ज्ञान हेच खरे मानणे. याकरिता श्रद्धा आणि कल्पना यांतला फरक ओळखावा.❄
🛟खरी श्रद्धा तीच की जी कल्पनेच्या पलीकडे राहते. प्रल्हादाइतके आपण नामाला सत्यत्व देत नाही. कल्पनेची मजल प्रल्हादाने नाही चालविली.कल्पनेच्याहीपलीकडे राहिला असे मानायला काय हरकत आहे❓🛟
🔹️सूर्यप्रकाश जसा सर्व ठिकाणी भरलेला असतो, त्याप्रमाणे देवळात, घरात, तीर्थक्षेत्रांत, सर्वठिकाणी परमात्मा भरलेला आहे.🔹️
🔸️ परमात्मा फक्त विद्वानांचा किंवा श्रीमंतांचा नसून तो सर्वांचा आहे. भगवंत सर्वांचा आहे, म्हणूनच तो सर्वांना सुसाध्य असला पाहिजे.🔸️
💮एखादा मोठा गणिती हिशेब लवकर करू शकतो; परंतु खेडेगावातले अडाणी लोक गणित न शिकताही हिशेब बरोबर करतात, आणि त्यांचा व्यवहार बरोबर चालतो. तसे विद्वानाला कदाचित् भगवंत लवकर प्राप्त होईल, पण अडाणी माणसाला देखील तो प्राप्त होऊ शकेलच.💮
🌀भगवंताची दृष्टीच अशी आहे की, त्याला आपले अंतःकरण स्पष्ट दिसते. ते जसे असेल त्याप्रमाणे भगवंत आपल्याला जवळ किंवा दूर करतो.🌀
🏵मनुष्य जन्माला आला की सगळी नाती त्याला आपोआप येतात, त्याचप्रमाणे, परमात्मा आनंदरूप आहे असे म्हटले की बाकीचे सर्व गुण त्यामध्ये आले असे समजावे.🏵
⭕जसा मारुतीमध्ये देवअंश होता तसाच तो आपल्यामध्येही आहे. त्याने तो फुलविला, पण आपण झाकून तो विझवून टाकला, याला काय करावे❓⭕
🪞मामलेदाराला बरोबर असलेल्या शिपायाची भिती वाटत नाही, चोराला मात्र त्याच्याबरोबर असलेल्या शिपायाची भिती वाटते. त्याचप्रमाणे भगवंत आपल्या पाठीमागे आहे ही जाणीव ज्याला असते, त्याला उपाधीची भिती वाटत नाही; कारण ती त्याच्याच इच्छेने आली आहे अशी त्याची खात्री असते.🪞
🍥आपण आपले मागले घडलेले सर्व भगवंताला अर्पण करावे, मग पुढची जबाबदारी त्याच्यावर पडते.🍥
🌸#बोधवचन 🌸
🌹जे निश्चित नाही त्याचे नाव कल्पना होय.
देव आहे असे निःशंकपणाने वाटणे, हे ज्ञान होय.🌹
🌺#प्रवचने:श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज🌺
🎄श्री राम जय राम जय जय राम🎄
#🙏श्री गुरुदेव दत्त💐 दिवा पेटण्यासाठी वात, तेल आणि ज्योत यांचा संगम आवश्यक असतो, तसंच सत्संग म्हणजे भक्त, भक्ति आणि भगवंत या तिघांचा पवित्र संगम. काही क्षण देवाभावात, चांगल्या विचारात, नामस्मरणात घालवले की मन जणू पुन्हा नव्याने उजळतं.
चार नद्या एकत्र आल्यानं जसा पवित्र संगम तयार होतो, तसंच काही भक्त एकत्र आले की तेथे वातावरण भक्तिरसाने ओथंबून जातं. मनाचे शुद्धत्व टिकवण्यासाठी आणि देवाच्या सान्निध्यात राहण्यासाठी एवढा सुंदर मार्ग दुसरा नाही.
|| अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||
दत्तरुप ll
#🙏श्री गुरुदेव दत्त💐 क्षेत्र नृसिंहवाडी येथील पवित्र कृष्णा–पंचगंगा संगमावर, शांततेने न्हालेल्या या दैवी भूमीत, औदुंबराच्या सात्विक, पवित्र सावलीखाली अनंतकोटी ब्रह्मांडनायक, राजाधिराज श्री दत्तमहाराज अखंड वास करून आहेत. ध्यानस्त अवस्थेत, विश्वाचा भार हलका करत, ते प्रत्येक भाविकाकडे मृदू, कृपामय दृष्टिने पाहत असतात.
© दत्तरूप
जो कोण अनन्य भक्तीने त्यांच्या चरणी येतो, मन मोकळ करून शरणागती स्विकारतो त्याच्या इच्छा, त्याच्या मनातील आकांक्षा ते आपुलकीने पूर्ण करतात. कारण तेच आमचे त्रिमूर्ती गुरुमहाराज… भक्तांचे आधार, भक्तीचा अखंड स्त्रोत.
त्यांच्या चरणाशी ६४ योगिनींचा शुभसंभार आहे आणि अन्नपूर्णा आईसाहेबांची मातृछाया आहे. या पवित्र औदुंबराखालीच दत्तमहाराजांनी गाणगापूरला प्रस्थान करताना स्वतःच्या श्री मनोहर पादुका प्रस्थापित केल्या. श्रींच्या पादुका भक्तांच्या मनोमनातील प्रत्येक भाव समजणाऱ्या, प्रत्येक मनोकामना पूर्ण करणाऱ्या असून त्याची प्रचिती येथे आल्यावर प्रत्येक भक्तांना येतेच...
म्हणूनच, जेव्हा तुम्ही येथे याल, तेव्हा या औदुंबरासमोर शिरसाष्टांग नमस्कार करा… आपल्या मनातील शब्दही न उच्चारता इच्छा व्यक्त करा… आणि मग या पवित्र भूमीचा आश्वासक श्री दत्त महाराज तुम्हाला आपल्या कृपाशीर्वादाने आनंदमय जीवनासाठी प्रेरित करतील हा माझा विश्वास आहे. भयमुक्त व्हा, चिंतामुक्त व्हा… कारण दत्तमहाराजांच्या कृपेच्या सावलीत प्रत्येक भक्त सुरक्षित आहे.
|| अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||
© दत्तरुप ll
-------------------------------------------------------
#दत्तरूप #नृसिंहवाडी #दत्तगुरु #श्रीदत्त #दत्त #गाणगापूर #दत्तजयंती













