नीलकंठ
ShareChat
click to see wallet page
@5401380
5401380
नीलकंठ
@5401380
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
*हिंदू महारांची होळी आणि दिवाळी* -- भन्ते अनुत्तरबोधी --एकवेळ कुत्र्याच्या शेपटीला सरळ करता येईल , पण तथाकथित बौद्ध म्हणणाऱ्या महारांच्या खोपडीतून हिंदू धर्मातील सण उत्सव कधीच जाणार नाही. हेच ते डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे मारेकरी, गद्दार ! डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी अगदी स्पष्ट शब्दात ‘हिंदू धर्मातील सण उत्सव साजरा करू नये’ असा ठराव १९३६ ला महार परिषदेत पास केला होता. आज ८८ वर्षं पूर्ण होऊन तरीही ह्या महारांच्या खोपडीतून हिंदू धर्मातील सण उत्सव साजरा करण्याची हौस गेली नाही. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या परिश्रमातून ह्यांच्या खिशात बऱ्यापैकी पैसा आहे म्हणून हे उतमाज करीत आहेत. जेंव्हा जेंव्हा हिंदू धर्मातील सण उत्सव येतात तेंव्हा तेंव्हा ह्यांच्या जिभेला उत येतो आणि असले नसले कपोलकल्पित मनगढंत पुरावे देऊन ‘अरे ! हा तर बौद्धांचाच सण उत्सव आहे’ असे म्हणून हिंदू धर्मातील सण उत्सव साजरा करण्याची परंपरा कायम ठेवतात. असे समाजातील काही निर्बुद्धीजीवी बेंबीच्या देठापासून समाज माध्यमातून रकाने चे रकाने भरून लेख टाकतात. त्यांच्यासाठी —— *परिषदेमध्ये पास झालेले ठराव* *ठराव १ ला *(अ)* *मुंबई इलाख्यातील महार जातीची ही परिषद पूर्ण विचारांती असे जाहीर करते की, महार जातीला समाजात समता, स्वातंत्र्य मिळविण्यासाठी धर्मांतर करणे हा एकच उपाय आहे. ही परिषद आमचे एकमेव परमपूज्य पुढारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना निश्चयपूर्वक असे जाहीर आश्वासन देते की महार समाज सामुदायिकरित्या धर्मांतर करण्यास तयार आहे.* *(ब)* *पूर्वतयारी म्हणून महार जातीने यापुढे हिंदू देवतांची पूजाअर्चा करू नये. हिंदूंचे सण, व्रत वैकल्ये, उपोषणे, वगैरे पाळू नयेत हिंदूंच्या कोणत्याही उत्सवात भाग घेऊ नये. तीर्थाटने वाऱ्या वगैरे करू नयेत, अशी या परिषदेची महार जातीला सूचना आहे.* (संदर्भ -- खंड १८ भाग १ पृष्ठ क्र ४९०) आता त्या ठरावाला ८८ वर्षे पूर्ण झाली आहेत तरीही या महारांना हिंदू धर्मातील सण उत्सव साजरा करण्याची हौस गेली नाही. असे हे बौद्ध म्हणणारी गद्दार आहेत. हिंदू धर्मातील कोणताही सण उत्सव येवो, मग रंगपंचमी असो, नागपंचमी असो की बैलपोळा असो, हा बौद्धांचाच सण आहे , अशी आरोळी ठोकतात. त्यामुळे समाजात संभ्रमावस्था निर्माण होते. आपल्या पूर्वजांना एकवेळ धड अन्न खायला मिळत नव्हते, म्हणून मेलेल्या ढोरांचे मास कापून उन्हामध्ये सुकविण्यासाठी ठेवत असत‌. अंगावर चिथडे स्वरूपात फाटके कपडे असायचे ज्यामध्ये पांढऱ्या उवा शिलाईमध्ये असायच्या. अशा परिस्थितीत आपण हिंदू धर्मातील सण उत्सव साजरे करीत असेल काय ? महार समाजाची त्यावेळी काय अवस्था होती त्याबाबत डॉ बाबासाहेब काय म्हणतात ते पाहा—- *तुमची खरी स्थिती काय आहे याची तुमच्याच हाडामासाच्या मला पूर्ण जाणीव आहे. आठवड्यातून तीन दिवस पोटभर अन्न मिळण्याची तुम्हाला मारामार. अंगावर एखादा फाटका सदरा व एक लंगोटी. ती देखील लवकर बदलता येत नाही अशी तुमची कंगाल स्थिती.* (संदर्भ -- १८ भाग १ पृष्ठ क्र ४५३ पैरा १) ह्या अवस्थेत आपण हिंदू धर्मातील सण उत्सव कसे साजरे करीत असू ? खायला पोटभर अन्न नसेल तरीही फटाके फोडत असणार काय ? डोक्याला तेल लावाची सोय नव्हती, भाजीमध्ये पुरेसे खाण्याचे तेल मिळत नव्हते तरीही तेलाचे दिवे लावून दिवाळी साजरी करीत असेल काय ? पण म्हणतात ना, संपत्ती मारवाड्यांनी हजम करावी , महारांच्या पचनी पडत नाही. *"घरात नाही दाणा आणि महार चाले उताणा"* आता जरी तशी आर्थिक परिस्थिती नसली (आणि हे सर्व डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या परिश्रमाने आणि त्यागाने मिळाले आहे !) तरी हिंदू धर्मातील सण उत्सव साजरा करण्याची मानसिकता आहे बौद्धांची ! #☺️उच्च विचार #💪बुद्धांची तत्वे📜 #🙏महामानव डॉ. आंबेडकर #☸️जय भीम #🙏 बाबांची शिकवण -- भन्ते अनुत्तरबोधी
#☀️गुड मॉर्निंग☀️ #🙂 शुभेच्छा #💐शुभेच्छा क्रियेटर🙏
☀️गुड मॉर्निंग☀️ - Good Morning Good Morning - ShareChat
*सर्वसाधारणपणे बुद्धांचा अहिंसेच्या तत्वाशी संबंध जोडण्यात येतो‌.* त्याच्या शिकवणुकीचा तो आदि व अंत असल्याचे मानले जाते. बुद्धाने शिकवले ते अहिंसेच्या पण पलीकडचे व अत्यंत व्यापक आहे. हे क्वचितच कोणाला माहिती असेल‌. म्हणून त्याची तपशीलवार मांडणी आवश्यक आहे. त्रिपिटकाच्या वाचनातुन मला जी तत्वे समजली ती खालीलप्रमाणे मी नमुद करत आहे. १) स्वतंत्र समाजासाठी धर्म आवश्यक आहे. २) प्रत्येक धर्म स्विकारण्यासारखा असतोच असे नाही. ३) धर्माचा जीवनाच्या तथ्यांशी व वास्तविकतेशी संबंध असला पाहिजे. त्याचा ईश्वर, आत्मा, स्वर्ग व पृथ्वी विषयीच्या कल्पनांशी संबंध असता नये. ४) ईश्वराला धर्माचा केंद्रबिंदू मानणे अयोग्य आहे. ५) आत्म्याची मुक्ति हा धर्माचा केंद्रबिंदू मानणे चुक आहे. ६) प्राण्यांचा बळी देणे हा धर्माचा केंद्रबिंदू मानणे चुकीचे आहे. ७) खरा धर्म माणसाच्या मनात बसतो, शास्त्रात नाही. ८) मनुष्य व नीती हा धर्माचा केंद्रबिंदू असला पाहिजे व तसे नसेल तर धर्म हि एक क्रुर अंधश्रद्धा ठरेल. ९) जगात ईश्वर नसल्याने नीती हि केवळ जीवनात आदर्श असणे पुरेसे नाही तर जीवनाचा नियम अथवा कायदा असावा‌ . १०) धर्माचे कार्य जगाला सुखी करणे व जगाची पुनर्रचना करणे हे आहे. त्याचा आरंभ वा अंत यांचे स्पष्टीकरण नव्हे. ११) हितसंबंधांच्या कलहामुळे जगात दुःख आहे व ते सोडवण्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे अष्टांग मार्गाचे अनुसरण होय. १२) संपत्तीची खाजगी मालकी एका वर्गाला सत्ता तर दुसऱ्या वर्गाला दुःख देते. १३) समाजाच्या भल्यासाठी दुःखाचे कारण दुर करून ते नष्ट केले जाणे आवश्यक आहे. १४) सर्व मानव समान आहेत. १५) माणसाचे मुल्यमापन त्याच्या जन्माने नसुन कर्तृत्वाने होते. १६) महत्वाचे काय तर उच्च आदर्श ‌, उच्च घराण्यातील जन्म नाही. १७) सर्वांबद्दल मित्रत्व व मैत्री सोडता कामा नये. आपण त्यासाठी शत्रुचे देखिल आभारी असले पाहिजे. १८) प्रत्येकाला विद्या प्राप्त करण्याचा व त्याचे अध्ययन करण्याचा अधिकार आहे जसे माणसाला जगण्यासाठी अन्नाची आवश्यकता आहे तशी विद्येची पण आवश्यकता आहे. १९) सदाचरणाशिवाय ज्ञान हे घातक होय. २०) कोणतीही गोष्ट कायम नाही, कोणतीही गोष्ट अंतिम नाही तर प्रत्येक गोष्ट चौकशी व परिक्षण यास पात्र आहे. २१) कोणतीही गोष्ट अंतिम नाही. २२) प्रत्येक गोष्ट कार्यकारण भावाच्या नियमाला धरून आहे. २३) कोणतीही गोष्ट कायम व सनातन नाही तर प्रत्येक गोष्ट परिवर्तनशील आहे. अस्तित्व हे नेहमीच घडत असते पण परीवर्तनशीलता हा जगाचा नियम आहे. २४) युद्ध हे सत्य व न्यायासाठी नसेल तर ते जगाला घातक आहे. २५) विजेत्यांची जितांबाबत काही कर्तव्ये असतात. ( 📃 4,5 पुस्तकाचे नाव - भगवान बुद्ध आणि कार्ल मार्क्स, लेखक- डॉ बाबासाहेब आंबेडकर) #💪बुद्धांची तत्वे📜 #☺️उच्च विचार #👍लाईफ कोट्स
#😴शुभ रात्री😴 #🙂 शुभेच्छा #💐शुभेच्छा क्रियेटर🙏
😴शुभ रात्री😴 - Night 6000 Sueet Dreams Night 6000 Sueet Dreams - ShareChat
👌🏻🌹☘️🌼☘️🌺☘️🌻☘️🌸☘️👌🏻 🪷 *बुद्ध आणि त्यांचा सुधारणावादी दृष्टीकोन* 🪷 #💪बुद्धांची तत्वे📜 #🙂Positive Thought #👍लाईफ कोट्स #☺️उच्च विचार *समाजसुधारणेच्या बाबतीत प्रथम क्रांतीकारी समाजसुधारक व त्यातही श्रेष्ठ असे तथागत गौतम बुद्ध होत. समाज सुधारणेचा इतिहास हाच मुळी बुद्धापासून सुरु होतो. किंबहुना समाजसुधारणेचा इतिहास हा बुद्धाचा इतिहास सांगितल्याविना अपूर्ण आहे.* *सुखी जीवनाकरीता जीवनाचा मापदंड म्हणून नैतिक आचरण आवश्यक आहे. अशी बुद्धाची शिकवण होती. समाजाच्या विकासाकरीता बंधुते बरोबरच लोकतांत्रिक भावनांची वृद्धीसुद्धा होणे आवश्यक आहे असा बुद्धाचा उपदेश होता.* *बुद्धाचा धम्म हा मानवतावादी असून मैत्री, बंधुता, अहिंसा आणि नैतिक शीलाचरणावर आधारलेला होता. बुद्धाच्या शिकवणीने समाजात एक क्रांतीच घडून आली. व्यक्तिगत नैतिकतेचे आचरण हाच मनुष्याच्या जीवनाचा खरा मापदंड आहे अशी बुद्धांची शिकवण होती. तत्कालीन समाजाला बुद्धाचे विचार अभिनव व क्रांतीकारी वाटले.* 👌🏻🌹☘️🌼☘️🌺☘️🌻☘️🌸☘️👌🏻 🌞 *प्रकाशाने अंधार भेदला जातो.* 🌞 🙏🌹☘️🌼☘️🌺☘️🌻☘️🌸☘️🙏
#😴शुभ रात्री😴 #🙂 शुभेच्छा #💐शुभेच्छा क्रियेटर🙏
😴शुभ रात्री😴 - Risrectes R7,33. @oo@t Sweet dedms] a Risrectes R7,33. @oo@t Sweet dedms] a - ShareChat
*।। एकादशी।।* पिढ्यान पिढ्याची ऊपास मार बा भिमाने मोडली। खऱ्या अर्थाने एकादशी आम्ही १४ ऑक्टोबर १९५६ ला च सोडली।। रोजचाच ऊपवास रोजचाच वार रे माझ्या गरिब पोटने कीती सोसला आत्याचार रे!! ना साबुदाना ना खिचडी ना भगरेचा भात रे !! माझी एकादशी रोजचीच शिळ्या टुकड्याचीच साथ रे माझ्या बा भिमाने माझ्या पुढे पंच पक्वान्न मांडली!!! खऱ्या अर्थाने आम्ही एकादशी १४ऑक्टोबर १९५६ ला च सोडली तुझी एकादशी काही तरी मागण्यासाठी साठी माझी रोजची एकादशी फक्त जिवन जगण्यासाठी! एक दिवस ऊपवास करुन तुला देव पावला काय?? मग माझी रोज एकादशी मला कसा घावला नाय? माझ्या बा भिमान माझ्या ज्ञानाची पुरचुंडी सोडली खऱ्या अर्थाने आम्ही एकादशी १४ऑक्टोबर १९५६ ला च सोडली खुप केले ऊपास तापास आता पोटभर खातो रे भिमाच्या आशिर्वादाने महालासम घरात राहतो रे माणुस म्हणुन कसे जगतात ते जगने आज पाहतो रे म्हणून मि न थकता माझ्या बा भिमाचे गुनगान गातो रे माझ्या बा भिमाने त्या रुढीची कम्बर एका लाथेत मोडली खऱ्या अर्थाने आम्ही एकादशी १४ऑक्टोबर १९५६ ला च सोडली *✍️विद्रोही कवी देवदत्त सुर्यवंशी निलंगेकर* #🙏महामानव डॉ. आंबेडकर #☸️जय भीम #🙏 डॉ. बाबासाहेब आंबेडकर #🙂माणुसकीच नात #☺️उच्च विचार
जे लोक म्हणतात की मंत्रोच्चाराने समुद्र आटतो, ग्रहांची दिशा बदलते, पृथ्वी २१ वेळा निष्क्रिय करता येते — तेच लोक आज UGC सारख्या कायद्याला घाबरत आहेत, हा विरोधाभास नाही का? जर शब्दांमध्ये इतकी शक्ती असेल की निसर्गाचे नियम बदलतील, तर एका शैक्षणिक कायद्यामुळे एवढी भीती का? इथे प्रश्न श्रद्धेचा नाही, प्रश्न तर्काचा आहे. UGC कायदा म्हणजे शिक्षणात एकसमान निकष, गुणवत्ता, पारदर्शकता आणि जबाबदारी आणण्याचा प्रयत्न. शिक्षणसंस्था नियमांनुसार चालाव्यात, विद्यार्थ्यांचे हक्क सुरक्षित राहावेत, अभ्यासक्रम वैज्ञानिक आणि आधुनिक असावेत — यासाठी कायदे बनतात. मग त्यात भीती कसली? खरं म्हणजे जेव्हा व्यवस्था पारदर्शक होते, तेव्हा अनियंत्रित सत्ता कमी होते. जेव्हा गुणवत्ता मोजली जाते, तेव्हा दिखावा उघड होतो. जेव्हा प्रश्न विचारले जातात, तेव्हा अंधश्रद्धेला धक्का बसतो. इतिहास सांगतो — समाज पुढे गेला तो प्रश्न विचारण्यामुळे, तर्क लावण्यामुळे, विज्ञान स्वीकारण्यामुळे. समुद्र मंत्राने नाही, तर विज्ञानाने समजला. ग्रहांची दिशा प्रार्थनेने नाही, तर खगोलशास्त्राने #🏛️राजकारण #🔺भाजपा {[{-1}]} उलगडली. पृथ्वी निष्क्रिय नाही झाली, पण अज्ञान जरूर कमी होत गेलं. मग शिक्षण क्षेत्रात सुधारणा आणणाऱ्या कायद्याला विरोध का? कारण कायदा आला की हिशोब द्यावा लागतो. नियम आले की विशेषाधिकार कमी होतात. तर्क आला की भीती निर्माण होते — ज्यांचं अस्तित्वच अंधश्रद्धेवर उभं आहे त्यांना. आपण ठरवायचं आहे — आपण विज्ञानाच्या बाजूला उभं राहणार का, की अंधविश्वासाच्या? आपण शिक्षण मजबूत करणार का, की भावनांच्या नावाखाली त्याला कमकुवत ठेवणार? भावना महत्त्वाच्या आहेत, पण शिक्षण तर्कावर उभं असतं. संविधान आपल्याला विचार करण्याचा अधिकार देतं, प्रश्न विचारण्याचं स्वातंत्र्य देतं. म्हणून भीती नको — चर्चा हवी. आंधळा विरोध नको — तथ्यांवर संवाद हवा. जय भीम। जय विज्ञान। जय मानवता। ✊📚
#☀️गुड मॉर्निंग☀️ #🙂 शुभेच्छा #💐शुभेच्छा क्रियेटर🙏
☀️गुड मॉर्निंग☀️ - Good Morning! Good Morning! - ShareChat
#☀️गुड मॉर्निंग☀️ #🙂 शुभेच्छा #💐शुभेच्छा क्रियेटर🙏
☀️गुड मॉर्निंग☀️ - Happy Morningi  Have a day nice Happy Morningi  Have a day nice - ShareChat