नीलकंठ
ShareChat
click to see wallet page
@5401380
5401380
नीलकंठ
@5401380
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
#😴शुभ रात्री😴 #🙂 शुभेच्छा #💐शुभेच्छा क्रियेटर🙏
😴शुभ रात्री😴 - Night 6000 Sueet Dreams Night 6000 Sueet Dreams - ShareChat
👌🏻🌹☘️🌼☘️🌺☘️🌻☘️🌸☘️👌🏻 🪷 *बुद्ध आणि त्यांचा सुधारणावादी दृष्टीकोन* 🪷 #💪बुद्धांची तत्वे📜 #🙂Positive Thought #👍लाईफ कोट्स #☺️उच्च विचार *समाजसुधारणेच्या बाबतीत प्रथम क्रांतीकारी समाजसुधारक व त्यातही श्रेष्ठ असे तथागत गौतम बुद्ध होत. समाज सुधारणेचा इतिहास हाच मुळी बुद्धापासून सुरु होतो. किंबहुना समाजसुधारणेचा इतिहास हा बुद्धाचा इतिहास सांगितल्याविना अपूर्ण आहे.* *सुखी जीवनाकरीता जीवनाचा मापदंड म्हणून नैतिक आचरण आवश्यक आहे. अशी बुद्धाची शिकवण होती. समाजाच्या विकासाकरीता बंधुते बरोबरच लोकतांत्रिक भावनांची वृद्धीसुद्धा होणे आवश्यक आहे असा बुद्धाचा उपदेश होता.* *बुद्धाचा धम्म हा मानवतावादी असून मैत्री, बंधुता, अहिंसा आणि नैतिक शीलाचरणावर आधारलेला होता. बुद्धाच्या शिकवणीने समाजात एक क्रांतीच घडून आली. व्यक्तिगत नैतिकतेचे आचरण हाच मनुष्याच्या जीवनाचा खरा मापदंड आहे अशी बुद्धांची शिकवण होती. तत्कालीन समाजाला बुद्धाचे विचार अभिनव व क्रांतीकारी वाटले.* 👌🏻🌹☘️🌼☘️🌺☘️🌻☘️🌸☘️👌🏻 🌞 *प्रकाशाने अंधार भेदला जातो.* 🌞 🙏🌹☘️🌼☘️🌺☘️🌻☘️🌸☘️🙏
#😴शुभ रात्री😴 #🙂 शुभेच्छा #💐शुभेच्छा क्रियेटर🙏
😴शुभ रात्री😴 - Risrectes R7,33. @oo@t Sweet dedms] a Risrectes R7,33. @oo@t Sweet dedms] a - ShareChat
*।। एकादशी।।* पिढ्यान पिढ्याची ऊपास मार बा भिमाने मोडली। खऱ्या अर्थाने एकादशी आम्ही १४ ऑक्टोबर १९५६ ला च सोडली।। रोजचाच ऊपवास रोजचाच वार रे माझ्या गरिब पोटने कीती सोसला आत्याचार रे!! ना साबुदाना ना खिचडी ना भगरेचा भात रे !! माझी एकादशी रोजचीच शिळ्या टुकड्याचीच साथ रे माझ्या बा भिमाने माझ्या पुढे पंच पक्वान्न मांडली!!! खऱ्या अर्थाने आम्ही एकादशी १४ऑक्टोबर १९५६ ला च सोडली तुझी एकादशी काही तरी मागण्यासाठी साठी माझी रोजची एकादशी फक्त जिवन जगण्यासाठी! एक दिवस ऊपवास करुन तुला देव पावला काय?? मग माझी रोज एकादशी मला कसा घावला नाय? माझ्या बा भिमान माझ्या ज्ञानाची पुरचुंडी सोडली खऱ्या अर्थाने आम्ही एकादशी १४ऑक्टोबर १९५६ ला च सोडली खुप केले ऊपास तापास आता पोटभर खातो रे भिमाच्या आशिर्वादाने महालासम घरात राहतो रे माणुस म्हणुन कसे जगतात ते जगने आज पाहतो रे म्हणून मि न थकता माझ्या बा भिमाचे गुनगान गातो रे माझ्या बा भिमाने त्या रुढीची कम्बर एका लाथेत मोडली खऱ्या अर्थाने आम्ही एकादशी १४ऑक्टोबर १९५६ ला च सोडली *✍️विद्रोही कवी देवदत्त सुर्यवंशी निलंगेकर* #🙏महामानव डॉ. आंबेडकर #☸️जय भीम #🙏 डॉ. बाबासाहेब आंबेडकर #🙂माणुसकीच नात #☺️उच्च विचार
जे लोक म्हणतात की मंत्रोच्चाराने समुद्र आटतो, ग्रहांची दिशा बदलते, पृथ्वी २१ वेळा निष्क्रिय करता येते — तेच लोक आज UGC सारख्या कायद्याला घाबरत आहेत, हा विरोधाभास नाही का? जर शब्दांमध्ये इतकी शक्ती असेल की निसर्गाचे नियम बदलतील, तर एका शैक्षणिक कायद्यामुळे एवढी भीती का? इथे प्रश्न श्रद्धेचा नाही, प्रश्न तर्काचा आहे. UGC कायदा म्हणजे शिक्षणात एकसमान निकष, गुणवत्ता, पारदर्शकता आणि जबाबदारी आणण्याचा प्रयत्न. शिक्षणसंस्था नियमांनुसार चालाव्यात, विद्यार्थ्यांचे हक्क सुरक्षित राहावेत, अभ्यासक्रम वैज्ञानिक आणि आधुनिक असावेत — यासाठी कायदे बनतात. मग त्यात भीती कसली? खरं म्हणजे जेव्हा व्यवस्था पारदर्शक होते, तेव्हा अनियंत्रित सत्ता कमी होते. जेव्हा गुणवत्ता मोजली जाते, तेव्हा दिखावा उघड होतो. जेव्हा प्रश्न विचारले जातात, तेव्हा अंधश्रद्धेला धक्का बसतो. इतिहास सांगतो — समाज पुढे गेला तो प्रश्न विचारण्यामुळे, तर्क लावण्यामुळे, विज्ञान स्वीकारण्यामुळे. समुद्र मंत्राने नाही, तर विज्ञानाने समजला. ग्रहांची दिशा प्रार्थनेने नाही, तर खगोलशास्त्राने #🏛️राजकारण #🔺भाजपा {[{-1}]} उलगडली. पृथ्वी निष्क्रिय नाही झाली, पण अज्ञान जरूर कमी होत गेलं. मग शिक्षण क्षेत्रात सुधारणा आणणाऱ्या कायद्याला विरोध का? कारण कायदा आला की हिशोब द्यावा लागतो. नियम आले की विशेषाधिकार कमी होतात. तर्क आला की भीती निर्माण होते — ज्यांचं अस्तित्वच अंधश्रद्धेवर उभं आहे त्यांना. आपण ठरवायचं आहे — आपण विज्ञानाच्या बाजूला उभं राहणार का, की अंधविश्वासाच्या? आपण शिक्षण मजबूत करणार का, की भावनांच्या नावाखाली त्याला कमकुवत ठेवणार? भावना महत्त्वाच्या आहेत, पण शिक्षण तर्कावर उभं असतं. संविधान आपल्याला विचार करण्याचा अधिकार देतं, प्रश्न विचारण्याचं स्वातंत्र्य देतं. म्हणून भीती नको — चर्चा हवी. आंधळा विरोध नको — तथ्यांवर संवाद हवा. जय भीम। जय विज्ञान। जय मानवता। ✊📚
#☀️गुड मॉर्निंग☀️ #🙂 शुभेच्छा #💐शुभेच्छा क्रियेटर🙏
☀️गुड मॉर्निंग☀️ - Good Morning! Good Morning! - ShareChat
#☀️गुड मॉर्निंग☀️ #🙂 शुभेच्छा #💐शुभेच्छा क्रियेटर🙏
☀️गुड मॉर्निंग☀️ - Happy Morningi  Have a day nice Happy Morningi  Have a day nice - ShareChat
*अनेक ग्रृपवरुन अनेक वाचकांच्या आग्रहाखातर पुन्हा एकदा* 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 *_मनोगत माझे,_* *_मी बुद्ध विहार बोलत आहे...._* आज मी अमुक एक बुद्ध विहार म्हणून बोलत नाही तर, समस्त विहारांच्या वतीने आमच्या व्यथा तुमच्यापर्यंत पोचवत आहे. *डोळे उघडून नीट वाचा आणि जागे व्हा नाहीतर तुम्हाला विहारच उरणार नाही*. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला घाणेरड्या परिस्थितीतुन बाहेर काढले, अतिक्षुद्र आणि नीच समजल्या जाणाऱ्या जातीतून तुम्हाला वर आणले. विज्ञानवादी बौद्ध धम्म दिला, जेणेकरून तुम्ही सन्मानाने जगाल, एकत्र याल. तुम्हाला एकत्र राहण्यासाठी, बौद्ध धम्माची संस्कृती कळण्यासाठी, बुद्ध वंदना, गाथा पठण करण्यासाठी हक्काची समाजासाठी जागा हवी, जिथे स्वतंत्र विचारमंच आणि आदर्श विचारधारा पेरणारे बुद्ध विहार हवे होते. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने भारावलेले लोक एकत्र आले. त्यांनी खास्ता खाल्ल्या, दारोदार हिंडले, पै पै पैसा गोळा केला आणि बुद्ध विहार बांधली. हळूहळू लोक एकत्र येऊ लागली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, बुद्ध पौर्णिमा, धम्मचक्क प्रवर्तन दिन साजरा करू लागले. दर महिन्याच्या पौर्णिमा साजरा करू लागले. वर्षावास प्रवचन मालिका भरू लागल्या, वेगवेगळे वक्ते बोलावले गेले, भिक्खु / भिक्खुंनी संघाला आदराने आमंत्रित करुन धम्मदेसना आयोजित करु लागले, लोकांमध्ये प्रबोधन वाढू लागले. बुद्धरुपाला, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हार फुले वाहू लागले, मेणबत्ती / अगरबत्ती प्रज्वलित करू लागले. माझे अंतःकरण सुवासाने दरवळून गेले. बुद्ध विहारात लोक आली, लहान मुलांचा किलबिलाट होऊ लागला की, माझे मन सुखावत असे. ज्या लोकांना मंदिरात यायला आडकाठी होती, ते लोक अभिमानाने वंदना म्हणू लागले, धम्माचा अभ्यास करू लागले. लहानथोर माणसांचा मी अभिमान होऊ लागलो. जयंतीला तर माझी मज्जाच मज्जा, सजावट काय? रोषणाई काय? जेवणावळी काय? लयं भारी, मला वाटले. वाटले, आता बुद्ध विहारात खूप लोक येतील, दिवसेंदिवस विहार गजबजून जाईल. पण कसले काय? हळूहळू लोकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगिलेल्या मार्गाचा विसर पडला. *"शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा"* हा उपदेश लोकांनी कानाआड टाकला . विहारात बसून बुद्ध विहाराच्या मक्तेदारी मिळवण्यासाठी, टिकवण्यासाठी, आपल्याच समाजातील बांधवांच्या विरोधात गटतट निर्माण होऊ लागले. कुणाचा ना कुणाचा मान अभिमान, स्वाभिमान दुखवू लागला. धुर्त लोकांना तर बुद्ध विहार हे व्यवसाय करुन पैसे कमविण्याचे साधनच वाटू लागले. एखाद्याच्या दु:खासाठी जलदान विधीला भरमसाठ भाडे आकारायलाही न घाबरता समाजबांधवांना आर्थिक पिडा देताना माझ्या नावाने आम्ही बुद्ध विहाराचे मेन्टेनन्स करण्यासाठी घेतो, जमलं तर भाडं द्या अन्यथा दुसरी जागा बघा, अशी उद्धटपणे बोलून माणसं तोडू लागली, बुद्ध विहारात आता बाजार होऊ लागला. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कृपेने आज आर्थिक क्षमता असताही बुध्द विहार निर्मिती साठी हात पसरून मागितलेल्या देणग्या सह सभासदांच्या लोकवर्गणीतून निर्माण केलेले बुध्द विहार थोडे दिवसचं पावित्र्य राखले जाते. कालांतराने छोट्या मोठ्या डागडुजीसाठी मनुवादी वृत्ती असलेल्या संविधान विरोधी असलेल्या राजकीय प्रतिनिधींकडून पायघड्या वाहून बुध्द विहाराच्या नावाऐवजी राजकीय पाट्या दिसू लागल्या. कधी कधी वाटतं, आर्थिकदृष्ट्या सक्षम असणारे आजही वार्षिक सभासद वर्गणी काही वर्ष जयंती जल्लोष न करता एकत्रित फंड करून स्वबळावर बुध्द विहार बांधता येत असतानाही इतरांकडून बुध्द विहाराची पावत्या फाडून किंवा धम्माची आस नसणाऱ्या राजकीय लोकप्रतिनिधी किंवा व्यक्ती कडून का हात पसरावे, आजही इतका का समाज लाचार करावा लागतो? नवनवीन तयार झालेल्या बुध्द विहारात कालांतराने समाजाला धम्म संस्कृती दर्शवणारे स्थान कालांतराने फक्त व्यावसायिक कम्युनिटी हॉल म्हणून अधिक वापर होऊ लागला. आपले बुद्ध विहार म्हणून हक्काने येणारे, दान पारमिता अगत्याने पालणारे, धम्माची ओढ असणारे, प्रामाणिकपणे, श्रध्दा भावनेने येणारे अंतर्गत वादात आता होरपळून बुद्ध विहारात येणं, टाळू लागले. तर स्वार्थी, अहंकारी, मक्तेदारी, श्रेयासाठी आपापसांत लढणारे धुर्त लोक इतरांबरोबर छोट्या छोट्या गोष्टीचे भांडवल करून लोक विहारात झगडत यायचे टाळू लागले. बुद्ध विहाराच्या विरोधात समाज माध्यमांवर, व्हॉट्स अप ग्रुपवर वाभाडे काढू लागले, विनाकारण त्रासदायक वर्तन करु लागले. पण बुद्ध विहार आपले संस्कार केंद्र आहे, हा शुद्ध हेतु ठेवून बुद्ध विहारापासून दुरावलेले, समाजापासून दुरावलेले समाजबांधव बुद्ध विहारामध्ये उपासक - उपासिका जास्तीत जास्त संख्येने उपस्थित कसे राहतील? याबाबत प्रयत्न करताना निवडक लोक सोडली तर कोणी अधिक दिसत नाहीत. बुद्ध विहाराचा ताबा सुटला तर ? ह्या भितीने इतर प्रयत्नशील समाजबांधवाला दाखवण्यासाठी अधिक प्रयत्न धुर्त लोक जास्त होऊ लागले. तर काही उच्च शिक्षीत, आर्थिक परिस्थिती बेताची असूनही काही स्वार्थी लोक बुद्ध विहारामध्ये मंगल परिणयासाठी, वाढदिवसासाठी, पुण्यमोदन आयोजित करण्यासाठी जागा वापरतात, पण बुद्ध विहारामध्ये माफक भाडे देताना मात्र खूप काचकूच करतात. बौद्ध धम्मामध्ये दानाला अत्यंत महत्त्व आहे, पण विहारातील दान पेट्या खाली. मंगल परिणयासाठी बाहेर बँडबाजा, डिजे, जेवणासाठी पंचपक्वान्न देतील, कॅटरींग आणि सजावटीसाठी लाखो रुपये देतील, मिरवणूक काढतील तिकडे लाखोंचा खर्च करतील. मात्र बुद्ध विहारात दान देताना टाळाटाळ करतील, बार्गिंग करतील (काही कमी करा, एवढे दान देणे शक्य नाही, अशी तुणतुण वाजवतील. काही तर महाभाग तर कार्यक्रम झाला की बुद्ध विहाराचे भाडे/धम्मदान उद्या देतो, मी काय पळून जाणार आहे का? अशी बतावणी करतात) आणि जर कार्यकर्त्यांनी भाडे/धम्मदान मागितले तर त्याच्याशी भांडतील. अपवादात्मक व्यक्ती सोडले तर काही लोक मात्र दानशीलवृत्ती आहेत, जे नावासाठी नाही, पण मोकळ्या हाताने बुद्ध विहारात आवश्यक वेळी आवश्यक गोष्टींची पुर्तता करण्यासाठी तत्परतेने वेळोवेळी धम्मदान देतात, पण कधीही प्रसिध्दीची हाव बाळगत नाहीत. अशा धम्मशील लोकांच्या जोरावरच तर काही बुद्ध विहारांमध्ये धम्माचा प्रसार आणि प्रचार करणे सुरू आहे. अशा धम्मशील वृत्ती बाळगणाऱ्या बुद्ध अनुयायांचा मी कृतज्ञता व्यक्त करत आहे. पण आता दिवसेंदिवस बुद्ध विहाराला बकाल स्वरूप येऊ लागले आहे. सातत्याने आपापसांत भांडण - तंटापाई लोक बुद्ध विहारात येणे कमी करू लागले आहेत. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मेहेरबानीमुळे चार पैसे खिश्यात खुळखुळू लागले आहेत. त्यामुळे सुद्धा विहारात यायची आवश्यकता राहिली नाही . आम्ही प्रार्थनास्थळंअ (मंदिर, मशीद, चर्च आणि मी) एकमेकांबरोबर गप्पा मारतो. मशीद मला सांगते की, काल माझ्याकडे बसायला जागा नव्हती, लोक रस्त्यावर बसुन नमाज अदा करीत होते. एवढे लोक आले होते. दर शुक्रवारी लोक न चुकता येतात आणि नमाज पढतात. चर्च म्हणाले की, दर रविवारी सकाळी हजारोंनी सहपरिवार चर्चमध्ये येतात आणि धर्म ऐकतात. मंदिरे तर म्हणाली की, आमच्याकडे तर एकही दिवस एक ही मंदिर रिकामे नसते. आमच्याकडे शनिवारी हनुमानमंदिर, गुरुवारी दत्तमंदिर , सोमवारी शंकराची मंदिरे लोकांच्या गर्दीने तुडुंब भरलेली असतात, अर्थात तुमची पण लोक असतात (हा मला मारलेला टोमणा होता) कळलं मला. मी तरी पण काय करणार ? डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले की, दर रविवारी बुद्ध विहारात जा. पण आपले लोकं साप्ताहिक गुरुवारी, साप्ताहिक सुट्टी रविवारी किंवा इतर दिवशी शासकीय सुट्टी असूनही बौद्ध धम्माचे संस्कारात्मक कार्यक्रम असतील, तेव्हा जाणूनबुजून बुद्ध विहारात येत नाहीत. त्यांना निमंत्रण पत्रिका लागते. त्यामध्ये माझ्या संस्थेचे नाव आहे का? आहे तर कितव्या नंबरवर आहे? फक्त बुद्ध विहाराचे नाव त्यांना पुरेसे नसते. मला ना अशा वृत्तीचा मत्सर वाटतो आणि इतर धर्मांच्या प्रार्थना स्थळांचाही. पण मी तरी काय करणार? आपली लोकं बुद्ध विहाराकडे फिरकत नाहीत. त्याचा परिणाम समाजावर होऊ लागला आहे. पण खापर कमिटीवर फोडणार. कमिटी बरोबर, समाज वाईट वगैरे वगैरे. दिवसेंदिवस बुद्ध विहार बकाल होऊ लागली आहेत. काही दिवसांनी बुद्ध विहारे बंद होतील. मग तुम्हा लोकांना जावे लागेल मंदिरात, मशीदमध्ये नाहीतर चर्च मध्ये. आणि पुन्हा पुर्वाश्रमीचा कमरेला झाडू आणि गळ्यात मडके, अशी मनुवादी प्रवृत्तीची गुलामगिरी आणण्यासाठी तुम्हीच जबाबदार राहाल. सर्वांना कळकळीची विनंती करतो की, अहंकार-इगो बाजूला ठेवा. धम्माचे पालन करणाऱ्या, धम्माचा प्रसार आणि प्रचार व धम्म कार्य करणा-या लोकांना विरोध करु नका. बुध्द विहारात घाणेरडे राजकारण करून अकुशल कर्म, व्यसनाधीनता, व्यभिचारीसारखे महापाप करून वाढवू नका. हो, मला माहीत आहे की, बुद्ध विहारात लोक येत नाही. कारण अनेक ठिकाणी विभागातील काही धम्मपालन न करणारी लोक आपल्याच लोकांमध्ये द्वेषाचे विष पेरतात. काया, वाचा, मनाने अकुशल कर्म करून धम्मशील लोकांना दुखावतात. त्यामुळे धम्मशील, शीलवान लोकं माझ्याकडे येत नाहीत. अशा वेळी अधिक वाईट वाटते.... *सब्ब दानं धम्म दानं जिनाती* *_सर्व दानांमध्ये धम्मदान श्रेष्ठ आहे.* धम्माचा प्रचार करण्यासाठी बुद्ध विहार असते. बुध्द विहारात भिक्खु / भिक्खुंनी किंवा बौध्दाचार्य धम्मगुरूंचे सातत्य असले पाहिजे. त्यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी बुद्ध विहार महत्वपूर्ण स्थळ असते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित धम्मकार्यासाठी बुद्ध विहार असते. फक्त बुद्ध जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, धम्मचक्र प्रवर्तन दइन, पौर्णिमा इ. दिवसासाठीच नसते, तर प्रत्येक मानवासाठी आदर्श जीवन जगण्यासाठी, बौद्ध संस्कृती समजून घेण्यासाठी, संस्कार शिकण्यासाठी, कर्मकांडाऐवजी वास्तविक जीवन जगताना क्षणिक सुखाऐवजी चिरशांती प्रदान करणारे, उत्कृष्ट स्थळ जिथे चांगले विचार संचारत असतात, ते स्थळ म्हणजे बुद्ध विहार आता तरी जागे व्हा. उगाच पद, अहंकार, समाज तोडणारे घाणेरडे राजकारण करून मला ओसाड करू नका. नाहीतर तुमची पुढची पिढी तुम्हाला कधीच माफ करणार नाही... *_चलो बुद्ध की ओर,_* *_एक दिवस स्वतः साठी,_* *_*एक दिवस आपल्या बुद्ध विहारात सहपरिवार उपस्थित राहण्यासाठी.* #💪बुद्धांची तत्वे📜 #🙏महामानव डॉ. आंबेडकर #🙏 बाबांची शिकवण ************** *धम्म संदेश प्रसारक* *अशोक तुळशीराम भवरे सिडको नांदेड/पुणे.* 🪷🪷🪷🪷🪷🪷
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला लोकशाहीची केवळ रचना दिली नाही, तर तिचा आत्मा दिला. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही मूल्ये केवळ शब्दांत न ठेवता ती संविधानाच्या प्रत्येक कलमातून प्रत्यक्षात उतरवली. सामाजिक विषमता, जातीय भेदभाव आणि अन्यायाने ग्रासलेल्या समाजाला सन्मानाने जगण्याचा अधिकार संविधानाने दिला, हीच बाबासाहेबांच्या विचारांची खरी ताकद आहे. प्रजासत्ताक दिन हा केवळ ध्वजवंदन, संचलन आणि भाषणांचा दिवस नाही; तो सर्वांनी आत्मचिंतन करण्याचा आणि लोकशाही शासन व्यवस्था अधिक बळकट करण्याचा संकल्प करण्याचा दिवस आहे. आपण संविधानाने दिलेल्या अधिकारांचा उपयोग करताना कर्तव्यांची जाणीव ठेवतो का? लोकशाही केवळ मतदानापुरती मर्यादित न ठेवता ती आचरणात आणतो का? बहुसंख्याकतेच्या दडपशाहीविरोधात अल्पसंख्याकांचे हक्क जपतो का? हे प्रश्न या दिवशी अधिक तीव्रपणे आपल्यासमोर उभे राहतात. आजच्या काळात, जेव्हा लोकशाही मूल्यांवर, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आणि घटनात्मक संस्थांवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत, तेव्हा प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व अधिक वाढते. संविधान हे कोणत्याही एका पक्षाचे, सरकारचे किंवा विचारसरणीचे नसून देशातील प्रत्येक नागरिकाचे संरक्षणकवच आहे, ही जाणीव पक्की करणे अत्यावश्यक आहे. म्हणूनच प्रजासत्ताक दिन साजरा करताना केवळ “जय हिंद” म्हणणे पुरेसे नाही; तर बाबासाहेबांच्या संविधाननिष्ठ विचारांना रोजच्या आयुष्यात उतरवणे, अन्यायाविरोधात उभे राहणे आणि लोकशाही टिकवण्यासाठी सजग नागरिक म्हणून भूमिका बजावणे, हाच या दिवसाचा खरा सन्मान आहे. प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳 #जय भीम #📔माझे संवैधानिक अधिकार✍️ #🇮🇳 प्रजासत्ताक दिन स्टेटस🌷 #26 जानेवारी
#26 जानेवारी #26 जानेवारी #🇮🇳 प्रजासत्ताक दिन स्टेटस🌷 #📔माझे संवैधानिक अधिकार✍️ #जय भीम
26 जानेवारी - -=@0 FAPDY विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी  अत्यंत मेहनतीने प्रतिकूल परिस्थितीत  निर्माण केलेले भारतातील प्रजातंत्र 733 भांडवलशाही आणि ब्राह्मणवादाने उध्वस्त केले -=@0 FAPDY विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी  अत्यंत मेहनतीने प्रतिकूल परिस्थितीत  निर्माण केलेले भारतातील प्रजातंत्र 733 भांडवलशाही आणि ब्राह्मणवादाने उध्वस्त केले - ShareChat