
Dhamnashrya yuwa vichar mnach nanded
@63559539
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
अंधेरे में बैठकर ही समझ आया, जीवन बाहर नहीं... भीतर घटता है।" #😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ #💪बुद्धांची तत्वे📜 #🙂Positive Thought #🙏 प्रेरणादायक बॅनर #🎑प्रेरणादायी मोशन व्हिडीओ
*नालंदा विद्यापीठ*
*'नालंदा' एक प्राचीन नगर बिहार प्रांतात पाटण्यापासून चाळीस मैल अंतरावर आग्नेय दिशेला वसलेले होते.*
*'नालंदा' भगवान बुद्धाच्या काळात एक समृद्ध व संपन्न नगर होते. भगवान बुद्ध तेथे अनेक वेळा गेलेले होते व तेथे त्यांनी वास्तव्य केलेल होते. बुद्ध धर्मानुयायांची संख्या नालंदामध्ये मोठ्या प्रमाणात होती आणि भगवान बुद्धांवर त्यांची अपार श्रद्धा होती.*
*नालंदा येथील प्रवारीक नावाचा एक धनीसेठ याने भगवान बुद्धाला प्रवारीक भवन दान केले होते. भगवान बुद्ध येथे कधी-कधी वास्तव्य करीत असत.*
*नालंदा हे जैन धर्मियांचेही केंद्र होते. एकदा तीर्थंकर महावीर आणि भगवान बुद्ध हे दोघेही एकाच वेळी नालंदा येथे वास्तव्य करण्यास थांबलेले होते. महावीरांनी येथे चौदा चातुर्मास वास्तव्य केलेले होते असे जैन परंपरा सांगते.*
*भगवान बुद्धाचे प्रमुख शिष्य 'सारिपुत्र' यांचे कपिलनाक हे जन्मस्थानही नालंदा येथूनच जवळच आहे असे म्हणतात की, सारिपुत्र येथे आपल्या ऐंशीहजार भिक्षूसह राहत होते. भगवान बुद्धाचे दुसरे प्रमुख शिष्य 'महामोग्गलान' यांचे कोलीत हे जन्मस्थान नालंदापासून जवळच आहे.*
*नालंदा येथे पूर्वी एक आमराई होती. ती पाचशे व्यापाऱ्यांनी दहा लाख सुवर्ण नाणी देवून विकत घेतली आणि तथागतांना अर्पण केली. तथागतांनी येथे तीन महिने धम्मज्ञान दिले होते. त्यामुळे त्या व्यापाऱ्यांना आणि इतरांना अर्हतपद प्राप्त झाले.*
*अशाप्रकारे प्राचीन परंपरा असलेल्या या ठिकाणाला 'नालंदा' नाव कसे पडले? याबाबत विविध मते दिसून येतात.*
*नालंदा' नाव कसे पडले?*
*ह्यु-एन-त्संग या चीनी यात्रेकरुने आपल्या प्रवास वर्णनात नालंदाबद्दल लिहिले आहे की, या ठिकाणी पूर्वी एक आम्रवन होते. त्यामध्ये एक विशाल पाण्याचा तलाव होता. त्यात एक नालंदा नावाचा नाग राहत होता म्हणून त्या ठिकाणाला नालंदा असे नाव पडले.*
*'नालंदा' नावाविषयी आणखीही एक आख्यायिका रुढ आहे. तथागत पूर्व एकेकाळी या प्रदेशात बोधिसत्वाचे जीवन व्यतित करीत असतांना या भागातील एका मोठ्या राजाचा अधिपती बनला व त्याने आपली राजधानी या जागेवर स्थापन केली. भूतमात्रांसंबधी दयेने प्रेरीत होवून तो त्यांना नेहमी सहाय्य करी. या सदगुणामुळे त्याला अविरत दान असे म्हणत. तो जे किंवा जेवढे देईल ते त्याला कधीच पुरेसे वाटत नसे. म्हणून नालंदा हा शब्द 'न अलम् दा' ('न'म्हणजे 'नाही', 'अलम्' म्हणजे 'पुरे' आणि 'दा' म्हणजे 'देणे' याचा मिळून बनलेला आहे. हे दानात खंड न पडणारे ठिकाण असल्यामुळे याला 'नालंदा' असे नाव पडले.*
*स्थापना*
*भगवान बुद्धाच्या काळापासून प्राचीन परंपरा लाभलेली असल्यामुळे नालंदाचा विकास प्रदीर्घ काळात होत गेला. त्यामुळे नालंदाच्या स्थापनेबाबत विविध विचार प्रवाह दिसून येतात.*
*तथागताच्या महापरिनिर्वाणानंतर काही वर्षांनी शक्रादित्य नावाचा एक राजा या देशात होवून गेला. तो त्रिरत्नांचा फार आदर करीत असे. त्याचे आचरण तथागतांच्या धम्माप्रमाणे असे. शुभ लक्षणांनी युक्त अशा या जागेची निवड करुन त्याने येथे एक संघाराम बांधला. संघारामाच्या पाया खोदणीचे काम चालू असताना एका नागाला दुखापत झाली. त्यावेळी तेथे निर्ग्रथाचा एक प्रख्यात ज्योतिषी उपस्थित होता. त्याने नालंदा विषयी खालील भविष्य लिहून ठेवले होते.*
*'ही जागा अत्युत्तम आहे. या ठिकाणी जर संघाराम बांधला, तर निश्चितच तो फार प्रख्यात होईल. सर्व जम्बुद्वीपात तो एक आदर्श संघाराम होईल. एक हजार वर्षापर्यंत त्याची भरभराट हाईल. विद्यार्थ्यांना येथे सर्व प्रकारचे शिक्षण मिळेल. परंतु या नागाला जखम झाल्यामुळे बऱ्याच लोकांचा येथे रक्तपात होईल.*
*भगवान बुद्धांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या, त्यांचे प्रमुख शिष्य सारिपुत्र आणि महामोग्गलान यांची जन्मभुमी असल्याकारणाने बौद्ध भिक्षुकरीता नालंदाची महत्ता अधिक होती. ज्याने भगवंताच्या धम्मचक्राचे प्रवर्तन करण्याकरीता आपले संपूर्ण आयुष्य अर्पण केले. त्या सम्राट अशोकाने नालंदामध्ये प्रथम विहारची*
*स्थापना केली.*
*ह्युएनत्संग- यांच्या प्रवासवर्णनावरुन काही काळानंतर 'शंकर' आणि 'मुग्दलगोमि' नामक दोन ब्राह्मणांनी या विहाराला विशाल बनविले असे म्हटले जाते की, आचार्य नागार्जुन यांनी येथे शंकर ब्राह्मणाकडून शास्त्रार्थ ज्ञान प्राप्त केले.*
*नागार्जुन व त्यांचे शिष्य दोघेही नालंदामध्येच राहत होते. उच्चतम प्राचीन परंपरा लाभलेली असल्यामुळे आणि नगर विकासाला येथे वाव असल्यामुळे बौद्ध आचार्य नागार्जुन यांनी आपला शिष्य आर्यदेव याला नालंदा येथे विहार बांधण्याची आज्ञा केली. आर्यदेवाने इ.स.४ थ्या अखेरीस इथे विहाराची उभारणी करुन मोजक्या शिष्यासह 'बौद्ध दर्शन' आणि 'साधना पद्धती' यांच्या अध्ययन-अध्यापनास प्रारंभकेला.- *
*आर्यदेवाने लावलेले रोपटे पुढील दोन-तीन शतकात फुला-फळांनी बहरले. सातव्या शतकात ह्यु-एन-त्संग जेव्हा येथे आला तेव्हा नालंदा विहाराच्या वैभवाने त्यांचे डोळे दिपले. या विहाराची जागा प्रशस्त होती. विद्यापीठ विहाराच्या जागेत होते. इथे एक विशाल उद्यान होते. त्यामध्ये सदैव फुला-फळांनी बहरलेल्या वृक्ष-वेली होत्या. उद्यानात अनेक जलाशये आणि जलप्रवाह होते. त्या जलाशयात विविध रंगाची कमळे फुललेली असत. अशा रमणीय वातावरणात इथे अध्ययन-अध्यापनाचे कार्य चालत असे.*
*उत्तुंग संघारामची निर्मिती -*
*ह्यु-एन-त्संगने या संघारामाचे मोठ्या प्रसन्नतेने वर्णन केले आहे. पद्धतशीर रीतीने बांधलेले उंच उंच मनोरे, अनेक मंडळ व प्रासाद व ज्यांची शिखरे जणु अभ्रमंडळ भेदून वर गेली आहेत. अशी विहारे सर्वच मोठे सुंदर दिसे. या विहाराभोवती एक नीलवर्ण जलप्रवाह वाहत असून त्याची शोभा त्यातील नीलोत्पलांनी अधिकच वृद्धिंगत केली होती. विहारामध्ये तेजस्वी सुवर्ण-पुष्पांच्या भारांनी वाकलेले कर्णिकार वृक्ष होते. तर बाहेर आम्रवृक्षवाटिकांच्या दाट छायेने भिक्षूची निवासस्थाने आच्छदिलेली होती. संघारामात आठ मोठमोठाले भव्य चौक होते. निरनिराळ्या चौकात भिक्षूना राहण्यासाठी बांधलेल्या अनेक चार मजली इमारती होत्या. "भारतातील संघारामाची संख्या आजही हजारोंनी मोजता येईल. परंतु विस्तार, भव्यता, उंची व श्रीमंती याबाबतीत येथील संघारामाची सर दुसऱ्या कोणत्याही संघारामाला येणार नाही. संधारामात राहणाऱ्या व बाहेरुन येणाऱ्या भिक्खूंची संख्या नेहमी दहा हजारापर्यंत असते, आणि हे सर्व भिक्खू महायान पंथी आहेत अठरा पंथांचे अनुयायी येथे एकत्रित झाले आहेत. येथे सामान्य ग्रंथापासून वेद व तत्सम अन्य ग्रंथ, त्याचप्रमाणे वैद्यकीय ग्रंथ, गुहय शास्त्रे व गाणितशास्त्र इत्यादी अनेक विषयांचा अभ्यास होतो...*
*पुढील भागात*
*मुक्तीदाता विशेषांक* #🙏 प्रेरणादायक बॅनर #🙂Positive Thought #😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ #💪बुद्धांची तत्वे📜 #🙋♂️Thank You🙂
*यमलोकाचा शिक्षेचा नियम म्हणजे कर्मांचा शाश्वत हिशोब आहे.*
*भिक्षूंना संबोधित करताना, तथागत भगवान सम्यक संबुद्ध यांनी कर्माचे परिणाम अतिशय स्पष्टपणे सांगितले. देवदूत सुत्तमध्ये या शिकवणीचे तपशीलवार वर्णन केले आहे.*
*1. बलात्काराचे कारण*
*जेव्हा माणूस*
*शारीरिक दुष्कर्म करतो*
*ने शाब्दिक गैरवर्तन केले.*
*मानसिक दुष्कृत्ये करतो*
*आणि जर तो त्याच्या पालकांचा, शिक्षकांचा, श्रमणांचा, ब्राह्मणांचा आणि वडीलधाऱ्यांचा आदर करत नसेल तर शरीर सोडल्यानंतर तो वाईट स्थितीत जन्माला येतो.*
*२. यमराजासमोर सादर केले*
*यमदूत त्याला पकडून यमराजासमोर घेऊन जातात.*
*तिथे त्याला आठवण करून दिली जाते की, "हे पापी कृत्य आईने, वडिलांनी किंवा मित्रांनी केले नाही; ते फक्त तूच केले आहेस. त्याचे परिणाम फक्त तुलाच भोगावे लागतील."*
*येथे हे स्पष्ट आहे - कृती वैयक्तिक आहे, परिणाम देखील वैयक्तिक आहे.*
*३. पाच प्रकारच्या कठोर शिक्षा: यमदूत वेगवेगळ्या प्रकारे शिक्षा देतात.*
*हात, पाय आणि छातीत गरम लोखंडी खिळे ठोकणे*
2
*कुऱ्हाडीने सोलणे*
*३ उलटे लटकवून कापणे*
*जळत्या जमिनीवरून रथातून ओढले जात आहे*
*गरम लोखंडी कढईत उकळणे*
*प्रत्येक अवस्थेत तीव्र, कडू, असह्य वेदना असतात आणि कर्माचा नाश होईपर्यंत मृत्यू होत नाही.*
*४. महान नरकाचे वर्णन*
*चार कोपरे, चार दरवाजे*
*लोखंडी भिंती*
*वरून झाकलेले*
*शंभर योजनेसाठी जळणारी लोखंडी जमीन*
*हे दृश्य भीती निर्माण करण्यासाठी नाही तर जागरूकता जागृत करण्यासाठी आहे.* #💪बुद्धांची तत्वे📜 #😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ #🙂Positive Thought #🙏 प्रेरणादायक बॅनर
*यमलोकाचा शिक्षेचा नियम म्हणजे कर्मांचा शाश्वत हिशोब आहे.*
*भिक्षूंना संबोधित करताना, तथागत भगवान सम्यक संबुद्ध यांनी कर्माचे परिणाम अतिशय स्पष्टपणे सांगितले. देवदूत सुत्तमध्ये या शिकवणीचे तपशीलवार वर्णन केले आहे.*
*1. बलात्काराचे कारण*
*जेव्हा माणूस*
*शारीरिक दुष्कर्म करतो*
*ने शाब्दिक गैरवर्तन केले.*
*मानसिक दुष्कृत्ये करतो*
*आणि जर तो त्याच्या पालकांचा, शिक्षकांचा, श्रमणांचा, ब्राह्मणांचा आणि वडीलधाऱ्यांचा आदर करत नसेल तर शरीर सोडल्यानंतर तो वाईट स्थितीत जन्माला येतो.*
*२. यमराजासमोर सादर केले*
*यमदूत त्याला पकडून यमराजासमोर घेऊन जातात.*
*तिथे त्याला आठवण करून दिली जाते की, "हे पापी कृत्य आईने, वडिलांनी किंवा मित्रांनी केले नाही; ते फक्त तूच केले आहेस. त्याचे परिणाम फक्त तुलाच भोगावे लागतील."*
*येथे हे स्पष्ट आहे - कृती वैयक्तिक आहे, परिणाम देखील वैयक्तिक आहे.*
*३. पाच प्रकारच्या कठोर शिक्षा: यमदूत वेगवेगळ्या प्रकारे शिक्षा देतात.*
*हात, पाय आणि छातीत गरम लोखंडी खिळे ठोकणे*
2
*कुऱ्हाडीने सोलणे*
*३ उलटे लटकवून कापणे*
*जळत्या जमिनीवरून रथातून ओढले जात आहे*
*गरम लोखंडी कढईत उकळणे*
*प्रत्येक अवस्थेत तीव्र, कडू, असह्य वेदना असतात आणि कर्माचा नाश होईपर्यंत मृत्यू होत नाही.*
*४. महान नरकाचे वर्णन*
*चार कोपरे, चार दरवाजे*
*लोखंडी भिंती*
*वरून झाकलेले*
*शंभर योजनेसाठी जळणारी लोखंडी जमीन*
*हे दृश्य भीती निर्माण करण्यासाठी नाही तर जागरूकता जागृत करण्यासाठी आहे.*b #🎬 गुड मॉर्निंग व्हिडीओ स्टेटस #🙏 प्रेरणादायक बॅनर #🙂Positive Thought #😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ #💪बुद्धांची तत्वे📜
*आम्ही सारे पानसरे!*
*धर्मनिरपेक्षता, सामाजिक, न्याय आणि समता या* *मूल्यांसाठी त्यांनी आयुष्यभर काम केलं. एक शक्तिशाली वक्ता, ट्रेड युनियनिस्ट आणि सांस्कृतिक इतिहासकार म्हणून त्यांनी निर्भयपणे सत्यासाठी लढा दिला. फॅसिस्ट शक्तींनी केलेली त्यांची हत्या आमच्या आदर्शाबद्दलची त्यांची अस्वस्थता दर्शवते.*
*पानसरे यांचा वारसा आपल्या प्रत्येकामध्ये, आपल्या न्यायाच्या लढ्यात जिवंत आहे. आम्ही सारे पानसरे !*
*#आम्ही_सारे_पानसरे #गोविंद_पानसरे #कॉम्रेड #Maharashtra*
*अनेकदा कट्टर हिंदुत्ववाद्यांशी संघर्षाचे प्रसंग आले. परंतु ते आपल्या विचारांवर ठाम राहिले. कधीही दडपणाला बळी पडले नाहीत. संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे मोल त्यांच्या दृष्टीने मोठे होते. त्यांच्यावर हल्ला झाला त्याच्या आदल्याच दिवशी ते एका ग्रंथ महोत्सवात भाषण करण्यास गेले होते. बाहेर आल्यावर त्यांची पत्रकारांनी मुलाखत घेतली तेव्हा ते म्हणाले होते की महात्मा गांधींसारख्या वृद्धाचा गोळ्या घालून खून करतात, यात कसले शौर्य आहे? हा तर भेकडपणा आहे. परंतु त्यांनाही त्याच प्रकारे भेकडपणे मारले गेले.*
*शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे*
*यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन* #😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ #🙂Positive Thought #🙏 प्रेरणादायक बॅनर #🎬 गुड मॉर्निंग व्हिडीओ स्टेटस
गौतम बुद्ध म्हणतात -
"स्वाभिमान म्हणजे अहंकार नाही, तो स्वतःला कमी न समजण्याची शांत ताकद आहे. जो स्वतःचा मान राखतो, तोच माणूस इतरांसमोर वाकत नाही." #🙏 प्रेरणादायक बॅनर #🙂Positive Thought #😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ
*शिवकालीन कृषि अर्थव्यवस्था आणि खराज्याचे धोरण*
*रयतेच्या जगण्याचा एकमेव आधार शेती होती. दुष्काळाने गावगाडा उद्ध्वस्त झाला. या गावगाड्यातील हतबल प्रजेला दिलासा देण्याचे काम सर्वप्रथम शिवाजीराजांनी केले. दुष्काळाने वित्तहानी आणि मनुष्यहानी अतोनात झाली. गो. स. सरदेसाई या संदर्भात* *नोंदवतात, उद्ध्वस्त झालेली गावे शिवाजीने कौलनामे देऊन वसवली. नव्याने जमीन कसायला घेणाऱ्यांना बी-बियाणे देऊन व औतफाट्यास मदत करून शेती कसायला प्रोत्साहन दिले. नवीन लागवडीखाली आणलेल्या या जमिनींना सुरुवातीची चार-पाच वर्षे महसूलसुद्धा कमी ठेवला.*
*दुष्काळाच्या सावटाखाली असलेल्या पुणे प्रांतात शिवाजीराजांनी अशारीतीने आपला कार्यारंभ केला. संपूर्ण प्रदेश ओसाड पडलेला. जंगली श्वापदांचे साम्राज्य वाढले. लागवडीखालच्या जमिनीही पडीक पडल्या. गावगाड्यातला माणूस शेतीसह पूर्ण दुभंगला. अशा काळात जहागिरीची व्यवस्था लावण्याचे कार्य शिवबाने दादोजींना सोबत घेऊन केले. लुटारू आणि चोरांची भीती नष्ट करणे हे पहिले काम होते. शिवाजीने गावोगाव चौक्या बसवून लुटारूंना नियंत्रणात आणले. श्वापदांना मारणाऱ्यास बक्षिसे जाहीर केली. शेतीची पडीक अवस्था अशीच कायम राहिली तर उत्पादन वाढणार नाही, त्यासाठी शेतकऱ्याला प्रोत्साहित करण्यासाठी सारा माफी केली. स्वराज्याचा आशय फक्त राजकीय नसून, त्याला समाजजीवनाच्या सुस्थिरतेचा, संपन्नतेचाही संदर्भ असतो, हे जाणून राजांनी गावाला राब्बते केले. शेती आणि शेतकऱ्यांच्या संरक्षणाचे चहूबाजूंनी धोरण आखले.*
*शेती आणि बैल यांचे नाते अजोड आहे. जंगली प्राण्यांना पाळीव प्राणी करून त्यांच्या शक्तीचा वापर शेतीसाठी करणे, ही मानवाच्या उत्क्रांतीची अतिशय महत्त्वाची अवस्था होती. शेतीचे आज एवढ्या मोठ्याप्रमाणात यांत्रिकीकरण आणि आधुनिकीकरण झाले आहे तरी बैलाच्या वापराला पूर्ण पर्याय निर्माण झालेला नाही.* *बैलाचे शेतीव्यवसायातील असाधारण स्थान राजांच्या लक्षात येणे हीच मध्ययुगीन राजेशाही मनोवृत्तीचा विचार करता मोठी बाब होती. शत्रू बैलांना,* *गाईंनाही पळवून नेत असत. दुष्काळाने तर* *पशुधन धोक्यात*
*आलेले.*
*"ज्याला शेत करावयास कुवत आहे आणि त्याला जोतास बैल, नांगर, पोटास दाणा नाही, त्यावीण तो आडोन, निकामी जाला असेल, तरी त्याला रोख पैसे हाती देऊन दो चौ बैलाचे पैसे द्यावे. बैल घेवावे."*
*"बैलाचे व गल्याचे पैके वाढी दिढी न करता मुदलचा उसनेच हळूहळू याचे तवानगी माफीक घेत घेत उसूल घ्यावा. जोवर त्याला तवानगी येई तोवर वागवावे."*
*शिवाजीराजांचे बैलजोडी घेण्याबाबतचे धोरण किती स्पष्ट आणि मूलभूत होते हे या पत्रावरून दिसते. अधिक हतबल झालेला शेतकरी त्याला व्याजाने पैसा देणे, बळजोरीने वसुली करणे ही बाब राजे त्याज्य मानीत होते. त्यासाठी मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांप्रती त्यांनी उदार धोरण स्वीकारले. शेतीची औजारे घेण्यासाठीही बिनव्याजी कर्जाची सोय उपलब्ध करून दिली. शेतकरी वर्गासोबतच गावगाड्यातला बलुतेदारही कोलमडून पडला होता. शेतकऱ्यांकडेच अन्नधान्य नाही तर तो बलुतेदारांना तरी कुठून देणार, शिवाजीराजांनी शेतीची औजारे, औतफाटा, नांगर विकत घेण्यासाठी बिनव्याजी कर्जाची सुविधा उपलब्ध करून दिली. त्याचप्रमाणे बी-बियाणे खरेदीसाठीही कर्ज दिले. शेतकऱ्यांना अडीअडचणीत नाडणारा सर्वांत मोठा वर्ग सावकारांचा. पुढील काळात उद्योगधंद्यांच्या विकासासाठी सावकाराबद्दल राजांनी थोडे उदार धोरण स्वीकारले असले तरी सामान्य प्रजेला सावकारापासून असणारा धोका ते ओळखून होते. त्यामुळे कर्जाच्या बिनव्याजी सुविधा बरोबरच गरजवंतांना शिवरायांनी सरकारी धान्यसाठ्यातून धान्य देण्याचीही सुविधा दिली.*
*सभासद बखरीत शेतकऱ्यांविषयी शिवाजीराजांच्या धोरणाचे तपशिलाने वर्णन सभासदाने केले आहे.*
*"पाच हात व पाच मुठीची काठी. हात चवदा तसूंचा असावा. हात व मुठी मिळून बैशी तसूची लांबी काठीची. वीस काठ्या औरस चौरस त्यांचा बिधा एक. बिघे एकशेवीस त्यांचा एक चावर, अशी मोजून आकारून गावाची गावास मोजून चौकशी केली.*
*बिघे यास पिकाचा आकार करून पाच तक्षिमा पिकाच्या करून तीन तक्षिमा रयतेस द्याव्या. दोन तक्षिमा दिवाणात घ्याव्या. येणेप्रमाणे रयतेपासून घ्यावे. नवी रयत येईल त्यास गुरे-ढोरे द्यावी. बीजास दाणा पैका द्यावा. भक्षावयासि दाणापैका द्यावा. तो ऐवज दोहो चोहो वर्षांनी आयुर्दाव पाहून उगवून घ्यावा. ये जातीचे रयतेचे पालग्रहण करावे. गावचा गाव रयतेची रयत कारकुनाचे कमाविस पाहून रयतेपासून वसूल, पिकाचे पिकावर घ्यावा. मुलुखात जमीदार, देशमुख व देसाई यांचे जप्ती खाली कैदेत रयत नाही! याणी साहेबीकडून नागवीन म्हटलियाने त्यांचे हाती नाही."*
*शेतकऱ्याच्या परिस्थितीचे शिवाजीराजांना किती नेमके भान होते ते या नोंदीवरून दिसते. राजा हा प्रजेला जबाबदार असतो आणि प्रजा ही राजाला, याची पूर्ण जाणीव*
*असल्याने वतनदार, देशमुख, देसाई यांच्या जप्तीखाली रयत नाही या शिवाजीराजांच्या धोरणाची नोंद बखरकार घेताना दिसतो. यावरून राजेपणापेक्षाही लोकधार्जिणेपण राजांना विशेष महत्त्वाचे असल्याचे वाटत होते हेच दिसते.*
*वतनदार, मिरासदारांचा बंदोबस्त शिवाजीराजांनी कसा केला याची नोंद सभासद घेतो.* *हा बंदोबस्त करणे का भाग आहे याचीही पुरती जाणीव राजांना होती....*
*पुढील भागात*
*मुक्तीदाता विशेषांक* #😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ #🙂Positive Thought #🙏 प्रेरणादायक बॅनर #💪बुद्धांची तत्वे📜 #🎬 गुड मॉर्निंग व्हिडीओ स्टेटस
*जर देव सर्वत्र आहे, तर लोक त्याला फक्त मंदिरांमध्येच का शोधतात? आणि जर मानव ही देवाची सर्वात सुंदर निर्मिती आहे, तर मानव एकमेकांचा द्वेष का करतात?*
*देव शोधणे सोपे आहे, पण माणसाला समजून घेणे कठीण आहे. लोकांना दगडात देव दिसतो, पण जिवंत माणसात माणुसकी दिसत नाही. मंदिरात डोके झुकते, पण अहंकार हृदयात झुकत नाही...* #🙏 प्रेरणादायक बॅनर #💪बुद्धांची तत्वे📜 #🙂Positive Thought #😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ
.✍🏻
🇪🇺⛳🇪🇺 *#जय #भिम.. #जय #शिवराय..* 🇪🇺⛳🇪🇺
***** *बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज जयंती* *उत्सव*****
*तथागत बुद्धाच्या समतेचा विचार घेऊन,*
*जेथे बुद्ध लेण्या आहेत तेथे किल्ले आहेत .*
*बहुजनांना एकत्र करून शिवरायांनी रयतेचे राज्य निर्माण केले .*
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान तून रयत म्हणजे लोकशाही निर्माण केली।*
*छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त सर्व बहुजन जनतेस हार्दीक शुभेच्या*
*शुभेच्छूक*
*धम्मा श्रय युवा विचार मंच नांदेड* #😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ #🙂Positive Thought #💪बुद्धांची तत्वे📜 #🙏 प्रेरणादायक बॅनर
.✍🏻
🇪🇺⛳🇪🇺 *#जय #भिम.. #जय #शिवराय..* 🇪🇺⛳🇪🇺
***** *बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज जयंती* *उत्सव*****
*तथागत बुद्धाच्या समतेचा विचार घेऊन,*
*जेथे बुद्ध लेण्या आहेत तेथे किल्ले आहेत .*
*बहुजनांना एकत्र करून शिवरायांनी रयतेचे राज्य निर्माण केले .*
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान तून रयत म्हणजे लोकशाही निर्माण केली।*
*छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त सर्व बहुजन जनतेस हार्दीक शुभेच्या*
*शुभेच्छूक*
*धम्मा श्रय युवा विचार मंच नांदेड* #🎑प्रेरणादायी मोशन व्हिडीओ #😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ #🙂Positive Thought #💪बुद्धांची तत्वे📜









