adityakumar.
ShareChat
click to see wallet page
@adityakumar8892
adityakumar8892
adityakumar.
@adityakumar8892
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
स्वाती चाळिशीतली, दोन मुलांची आई. नवरा बँकेत नोकरीला. संसार वाईट नव्हता. भांडणंही फार नव्हती. पण काहीतरी कमी होत ते म्हणजे संवाद. नवरा घरी यायचा, जेवायचा, टीव्हीसमोर बसायचा आणि झोपायचा. स्वाती दिवसभर घर, मुलं, सासू-सासरे, आणि अधूनमधून स्वतःशी बोलणं. एक दिवस तिने फेसबुकवर जुना कॉलेज ग्रुप जॉइन केला. सुरुवातीला फक्त फोटो, शुभेच्छा, आठवणी. तिथेच संदेश आला. “ओळखलंस का?” नाव पाहिलं आदित्य. कॉलेजमध्ये तिच्या मागे फिरणारा, पण तिने कधी गंभीरपणे न घेतलेला. “अरे वा! किती वर्षांनी!” तिने उत्तर दिलं. पहिले दोन-तीन दिवस साध्या गप्पा. मग रोजच. सकाळचा “गुड मॉर्निंग” आणि रात्रीचा “झोपलीस का?” असा क्रम सुरू झाला. आदित्य ऐकायचा. ती बोलायची. घरात कोणी विचारलं नव्हतं इतक्या वर्षांत, “तुला काय आवडतं?” तो विचारायचा. स्वातीला जाणवू लागलं ती पुन्हा हसते आहे. फोन हातात घेताना चेहरा उजळतो आहे. तिच्या नवऱ्याने लक्षात घेतलं. “खूप फोनवर असतेस हल्ली.” “असं काही नाही,” ती म्हणाली. पण तिलाही कळत होतं काहीतरी आहे. एक दिवस आदित्य म्हणाला, “आपण भेटू का? फक्त कॉफीसाठी.” तिचं मन धडधडलं. चुकीचं आहे हे तिला ठाऊक होतं. पण ती गेली. कॉफी शॉपमध्ये बसताना तिला अपराधी वाटत होतं. पण त्याच्याशी बोलताना सगळं विसरायला झालं. तो तिच्या डोळ्यांत पाहून म्हणाला, “तू अजूनही तशीच आहेस.” ती वाक्य तिने वर्षानुवर्षं ऐकली नव्हती. त्या भेटीनंतर मेसेज वाढले. फोटो. आठवणी. मग हळूहळू तक्रारी. “तुझा नवरा तुला समजत नाही.” “तू यापेक्षा जास्त deserve करतेस.” प्रेमाचा गोडवा हळूहळू वेगळ्या दिशेने वळू लागला. ती त्याच्याशी भांडायची, रुसायची, वाट पाहायची. एक दिवस आदित्य दोन दिवस गायब राहिला. मेसेज नाही, फोन नाही. ती बेचैन झाली. मनात राग, भीती, शंका. तिसऱ्या दिवशी त्याचा मेसेज आला “सॉरी, बिझी होतो.” ती तेव्हा प्रथम थांबली. तिने स्वतःला विचारलं मी काय करते आहे? हे प्रेम आहे? की लक्ष मिळाल्याची सवय? त्या रात्री तिच्या नवऱ्याने सहज विचारलं, “उद्या सुट्टी आहे. आपण सगळे बाहेर जाऊया का?” खूप वर्षांनी तो स्वतःहून काही सुचवत होता. स्वातीला जाणवलं तिचं घर मोडलेलं नव्हतं. फक्त धुळीने झाकलेलं होतं. तिने आदित्यला मेसेज केला. “आपण इथेच थांबूया. हे योग्य नाही.” तो लगेच उत्तरला नाही. आणि यावेळी तिला वाट पाहण्याची गरजही वाटली नाही. प्रेमाचं जाळं असंच असतं. सुरुवातीला उबदार. मग घट्ट. आणि कळत नकळत गुंतवणारं. स्वातीने फोन बाजूला ठेवला. दुसऱ्या दिवशी ती कुटुंबासोबत बाहेर गेली. सर्व समस्या सुटल्या नाहीत. संवाद अजूनही थोडा कमी होता. पण ती पळत नव्हती आता. तिला समजलं प्रेमाची भूक खरी असते. पण प्रत्येक गोड शब्द प्रेम नसतो. कधी कधी जाळ्यातून बाहेर पडणं म्हणजे प्रेमाला नाकारणं नाही, तर स्वतःला वाचवणं असतं. जर ही कथा वाचताना कुठे स्वतःचा प्रतिबिंब दिसलं असेल, तर लक्षात ठेवा भावना चुकीच्या नसतात, निर्णय चुकू शकतात. आणि प्रत्येक जाळं तोडायला उशीर झालेला नसतो. उशीर होण्याआधी च ते जाळ तोडा कारण याचे परीणाम फार वाईट होतात.. #✍🏽 माझ्या लेखणीतून #👍लाईफ कोट्स #🙂Motivation #🎑जीवन प्रवास
#🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🚩शिवराय #🚩छत्रपती शिवाजी महाराज कोट्स
🙏शिवदिनविशेष📜 - ShareChat
#🚩छत्रपती शिवाजी महाराज कोट्स #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🚩शिवराय #🙏शिवदिनविशेष📜
🚩छत्रपती शिवाजी महाराज कोट्स - Koooooon0aಊ[ Koooooon0aಊ[ - ShareChat
#🚩शिवराय #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🚩छत्रपती शिवाजी महाराज कोट्स
🚩शिवराय - ShareChat
#🚩छत्रपती शिवाजी महाराज कोट्स #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🚩शिवराय
🚩छत्रपती शिवाजी महाराज कोट्स - dAEIIO dAEIIO - ShareChat
#✍🏽 माझ्या लेखणीतून #🙂माणुसकीच नात #🎑जीवन प्रवास #🙂सत्य वचन #💭माझे विचार
✍🏽 माझ्या लेखणीतून - दोन फळ एकाच फांदीवर वाढलेली अगोदर पिकते , एक दुसरा आपल्या वेळेची वाट बघतो निसर्ग शिकवतो की दुसऱ्याचे यश म्हणजे आपला पराभव नव्हे. आपली वेळही नक्कीच येईल. आदित्य क्रिएशन दोन फळ एकाच फांदीवर वाढलेली अगोदर पिकते , एक दुसरा आपल्या वेळेची वाट बघतो निसर्ग शिकवतो की दुसऱ्याचे यश म्हणजे आपला पराभव नव्हे. आपली वेळही नक्कीच येईल. आदित्य क्रिएशन - ShareChat
#🚩शिवराय #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🚩छत्रपती शिवाजी महाराज कोट्स #🙏शिवदिनविशेष📜
🚩शिवराय - ShareChat
म्हणून मी शिवाजी महाराजांची आरती करत नाही... हो. मी कधीच छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करत नाही. कारण मला माहीत आहे की ते एक हाडामासाचा माणूस होते. एक सर्वसामान्य माणूस. ज्याने प्रखर बुध्दीमत्ता आणि शौर्याचा जोरावर स्वराज्य निर्माण केले. आपल्या पुराणात आढळणाऱ्या इतर देवदेवतांप्रमाणे छत्रपती शिवाजीमहाराज काल्पनिक नव्हेत. तर ते खरोखर होऊन गेलेत. त्यांचे महात्म्य सर्वात आधी इथल्या सनातन्यांनी बरोबर ओळखले होते. आणि म्हणूनच त्यांचा राज्याभिषेक होऊन त्यांना "जनमान्याता" मिळू नये म्हणून ते जिवंत असतांनाच त्यांच्या विरूद्ध कुटील डाव येथील सनातन्यांनी खेळून पाहीला होता. पण तो डाव शिवछत्रपतींनी लिलया हाणून पाडला. म्हणूनच मग शिवछत्रपतींच्या निधनानंतर छत्रपती संभाजी महाराजांची यथेच्छ बदनामी करत दोन्ही छत्रपतींचा इतिहास पुसत पेशवाई निर्माण करण्यात आली. मधला काही काळ असा होता की, महाराष्ट्राच्या मातीला जणूकाही शिवाजी महाराजांचा विसरच पडला होता. थोर समाज सुधारक महात्मा जोतिबा फुले यांनी शिवछत्रपतींची समाधी शोधून काढत त्यांना परत एकदा जनसामान्यांपर्यंत पोहचवले. आता शिवाजी संपवता येणे शक्य नाही हे सनातन्यांच्या पूर्ण लक्षात आले होते. म्हणूनच त्यांनी आता नवीन डाव खेळायला सुरूवात केली आहे. शिवाजीला एकदा देव बनवून टाकले की मग त्याच्याकडून कोणी स्फूर्ती घेणार नाही. कारण देव चमत्कार करतो. आणि तो सर्वसामान्यांना करता येत नाही. म्हणजेच मग तो देव ठरतो आणि त्याने घालून दिलेल्या वाटेवरून चालणे सर्वसामान्यांना आपल्या आवाक्याबाहेरचे वाटते. या कुटील डावातूनच, कोणी नवीन शिवाजी निर्माण होऊ नये याची पुरेपूर काळजी सनातन्यांनी घेतली आहे. काल शिवजयंतीला गावागावात आणि चौकाचौकात जी शिवछत्रपतींची आरती चालू होती, ती आरती म्हणजे सनातन्यांचा कुटील डाव यशस्वी झाल्याचेच द्योतक होते. ज्यांची ज्यांची सदसद्विवेक बुध्दी जागी आहे त्यांनी वेळोवेळी या आरतीला विरोध केला पाहीजे. छत्रपती शिवाजीमहाराजांचे गुणगाणच करायचे असेल तर पोवाडे गायला काय हरकत आहे ? शिवाजी महाराजांचे आचार विचार अंगिकारून त्यावर चालण्यापेक्षा, आरती म्हणून स्वतःची सुटका करून घेणेच बहुजनांनाही जास्त सोपे वाटत असेल कदाचित. #🙏शिवदिनविशेष📜 #🚩शिवराय #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🚩छत्रपती शिवाजी महाराज कोट्स
देह विक्री 😭😭😭😭 भयान वास्तव 😔 ठिकाण: पुण्यातील बुधवार पेठ (Red Light Area). वेळ: रात्रीचे ११:०० वाजले होते. अरुंद गल्ली, पान-तंबाखूच्या पिचकाऱ्यांनी माखलेल्या भिंती आणि स्वस्त अत्तराचा उग्र वास. एका छोट्याशा खोलीत 'चमेली' (वय ४५) आरश्यासमोर बसून चेहऱ्याला जाड मेकअप थोपत होती. तिच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या होत्या, डोळ्याखाली काळी वर्तुळे होती, पण ती लपवण्यासाठी ती पावडरचा थर लावत होती. तिच्या मागे, खोलीच्या एका कोपऱ्यात पडदा लावून तिचा मुलगा, 'आकाश' (वय २२), कानात बोळे घालून अभ्यास करत होता. आकाश इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला होता. त्याला आपल्या आईची प्रचंड 'घृणा' (Disgust) वाटायची. लहानपणी त्याला कळत नव्हतं, पण आता समजल्यावर त्याला स्वतःच्या जन्माची लाज वाटायची. तो आईशी सरळ बोलत नसे. ती जवळ आली की तो दूर व्हायचा. "आई, तू माझ्याशी बोलू नकोस. तुझ्या अंगाला परक्या माणसांचा घाणेरडा वास येतो." असं तो तोंडावर बोलायचा. चमेली हे ऐकून हसायची, पण आतून तुटायची. त्या रात्री... आकाश बाहेर आला. तो चिडलेला होता. "आई, उद्या कॅम्पस इंटरव्ह्यू आहे. मला नवीन फॉर्मल शर्ट आणि पँट घ्यायची आहे. आणि कॉलेजची फी पण बाकी आहे. सगळे मित्र ब्रँडेड कपडे घालणार आहेत. मला ५००० रुपये हवेत. आहेत का तुझ्याकडे?" चमेलीने आपली बटवा उघडून बघितली. त्यात फक्त २०० रुपये होते. ती म्हणाली, "बाळा, आज धंदा नाही झाला रे. दोन दिवसांनी देईल का कॉलेज?" आकाश भडकला. "हेच! हेच ऐकायचं होतं मला! तू रोज रात्रभर जागतेस, 'ते' करतेस... मग पैसे जातात कुठे? तुला मला शिकवायचंच नाहीये. तुला वाटतं मी पण इथेच दलाली करत राहावं. नको तुझे पैसे! मी उद्या फाटकी पँट घालून जाईन, नाहीतर इंटरव्ह्यूला जाणारच नाही." आकाश रागाने पुन्हा पडद्यामागे गेला आणि रडत बसला. चमेलीच्या काळजाला घरं पडली. तिचा मुलगा... ज्याला तिने या नरकातून बाहेर काढण्यासाठी स्वतःचं शरीर विकलं, तो पैशावाचून इंटरव्ह्यूला जाणार नाही? नाही! हे ती होऊ देणार नव्हती. रात्रीचे १२ वाजले. गल्लीत एक 'हवालदार' आणि एक 'गुंड' टाईप माणूस आला. त्याचं नाव होतं 'भैय्याजी'. तो अतिशय क्रूर आणि विकृत (Sadistic) ग्राहक होता. तो पैसे जास्त द्यायचा, पण बाईला सिगारेटचे चटके द्यायचा, पट्ट्याने मारायचा. पेठेतल्या तरुण मुली सुद्धा त्याला घाबरायच्या. चमेलीचं वय झालं होतं, तिला आता कोणी गिर्हाईक घेत नव्हतं. पण आज चमेलीने स्वतःहून भैय्याजीला हाक मारली. "ए भैय्याजी! या ना. आज सेवा करायची आहे." भैय्याजी हसला. "क्या बात है चमेली? आज म्हातारीला जवानी आठवली काय? पण माझे शौक माहित आहेत ना? ओरडायचं नाही, रडायचं नाही." चमेलीने होकार दिला. तिने फक्त एकच अट घातली: "मला ५००० रुपये आताच्या आता ॲडव्हान्स पाहिजेत." भैय्याजीने ५००० च्या नोटा तिच्या ब्लाऊजमध्ये कोंबल्या. ती रात्र चमेलीसाठी काळरात्र ठरली. पडद्याच्या त्या बाजूला आकाश हेडफोन लावून झोपला होता. आणि या बाजूला... भैय्याजीने चमेलीच्या शरीराचे लचके तोडले. तिने स्वतःच्या तोंडावर उशी दाबून ठेवली होती, जेणेकरून तिचा आवाज आकाशला जाऊ नये. भैय्याजीने तिला पट्ट्याने मारलं, सिगारेटचे चटके दिले. चमेलीच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं, पण ती वेदना सहन करत होती... कारण तिला डोळ्यासमोर आकाशचा 'नवीन शर्ट' आणि 'पांढरी कॉलर' दिसत होती. पहाटे ४ वाजता भैय्याजी तिला रक्ताच्या थारोळ्यात सोडून गेला. सकाळी ७ वाजता. आकाश जागा झाला. त्याने पाहिलं, आई पलंगावर चादर ओढून झोपली आहे. टेबलावर ५००० रुपये आणि एक चिठ्ठी ठेवली होती. आकाश खुश झाला. "हिला नक्कीच रात्री एखादं मोठं गिर्हाईक मिळालं असेल." त्याने पैसे घेतले. आईला न उठवता, न बघता तो निघून गेला. त्याने नवीन कपडे घेतले, इंटरव्ह्यू दिला. तो पास झाला. त्याला मोठ्या कंपनीत नोकरी मिळाली. तो खूप आनंदी होता. आज तो या नरकातून आईला नाही, तर स्वतःला सोडवणार होता. संध्याकाळी तो घरी आला. हातात मिठाई होती. "आई! ए आई! मला नोकरी लागली ग! आता आपल्याला हे घाणेरडं काम करायची गरज नाही." पण घरात शांतता होती. चमेली अजूनही त्याच अवस्थेत पलंगावर होती. आकाशला संशय आला. "दुपार झाली तरी झोपलीये?" तो जवळ गेला. त्याने चादर ओढली. आणि... आकाशच्या हातातली मिठाई खाली पडली. चमेली मेली होती. तिचं शरीर निळं-काळं पडलं होतं. तिच्या अंगावर, पोटावर सिगारेटचे चटके होते. मानेवर पट्ट्याचे वळ होते. ती रात्रीच वेदनेने तडफडून मेली होती. पण मरताना तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र समाधान होतं. तिच्या उशीखाली आकाशला एक दुसरी 'डायरी' सापडली. ती डायरी वाचताना आकाशने हंबरडा फोडला. त्यात चमेलीने लिहिलं होतं: *"आकाश बाळा, आज तू इंटरव्ह्यूला गेला असशील. मला माहितीय तुला नोकरी मिळणारच. तुझे नवीन कपडे खूप छान दिसत असतील रे. तुला माझ्या अंगाचा 'वास' येतो ना? मला माहितीय. तुला माझी लाज वाटते, तेही बरोबर आहे. पण बाळा... आज तुला जे पैसे दिलेत ना, ते कमवण्यासाठी मी काल भैय्याजीला होकार दिला. मला माहित होतं माझं शरीर आता हे सहन करू शकणार नाही. पण तुझी 'पांढरी कॉलर' (White Collar) घेण्यासाठी, मला माझं 'चारित्र्य' पुन्हा एकदा काळं करावं लागलं. या पैशांना वास असेल रे... माझ्या रक्ताचा आणि लाचारीचा. पण तू काळजी नको करू. तू त्या वासाकडे लक्ष नको देऊ. तू फक्त पुढे जा. माझी एकच इच्छा आहे... मी मेल्यावर, माझ्या अंत्यविधीला तू येऊ नकोस. कारण लोक म्हणतील, 'बघा, एका रं#-डीचं पोरगं साहेब झालंय.' तुझा अपमान होईल. मला म्युनिसिपालिटीची गाडी नेईल. तू फक्त तुझ्या नवीन जगात सुखी राहा. तुझी (पापी) आई."* आकाश तिथेच जमिनीवर डोकं आपटून रडला. "आई!!! मीच पापी आहे ग! मी नराधम आहे! मी तुझ्या त्यागाला 'धंदा' समजलो. मी तुझ्या जखमांवर उभं राहून माझं भविष्य बनवलं!" त्या दिवशी आकाशने जगाची पर्वा केली नाही. त्याने स्वतः आपल्या आईला खांदा दिला. पूर्ण बुधवार पेठ बघत होती... एक टाय-कोट घातलेला 'साहेब', एका 'वेश्येच्या' तिरडीला खांदा देत रडत होता. त्याने स्मशानात आईला अग्नी दिला आणि ओरडून सांगितलं: "ही वेश्या नव्हती... ही जगातली सर्वात महान आई होती, जिने स्वतः जळून मला प्रकाश दिला." आज आकाश खूप मोठा अधिकारी आहे. पण तो कधीच 'परफ्युम' (Attar) वापरत नाही. कारण त्याला आजही वाटतं की, त्याच्या यशाला आईच्या घामाचा आणि त्यागाचा सुगंध आहे... जो जगातल्या कोणत्याही परफ्युमपेक्षा श्रेष्ठ आहे. परिस्थितीमुळे एखादी स्त्री देहविक्रय करत असेल, तर ती 'वाईट' नसते. ती सुद्धा कोणाची तरी आई, बहीण किंवा मुलगी असते. तिच्या व्यवसायाचा तिरस्कार करा, पण तिच्या 'मातृत्वाचा' अपमान करू नका. चिखलात कमळ उगवतं, हे आपण विसरतो... आणि त्या कमळासाठी चिखलाने स्वतःला किती घाण करून घेतलंय, हे ही विसरतो.😭😭😭😭😭😭 #🎑जीवन प्रवास #🙂सत्य वचन #🙂माणुसकीच नात #✍🏽 माझ्या लेखणीतून
#🌙रमज़ान मुबारक🤲
🌙रमज़ान मुबारक🤲 - मराठी हे चंद्रा सर्वांना माझा हा पैगाम दे दिवस, हास्याची शाम दे खुशीचा 1 येऊन ते तुला जेव्हा पाहतील बाहेर ` त्यांना माझ्याकडून ईद मुबारक बात दे! रमजान मुबारक! Happy Ramzan! आदित्य क्रिएशन मराठी हे चंद्रा सर्वांना माझा हा पैगाम दे दिवस, हास्याची शाम दे खुशीचा 1 येऊन ते तुला जेव्हा पाहतील बाहेर ` त्यांना माझ्याकडून ईद मुबारक बात दे! रमजान मुबारक! Happy Ramzan! आदित्य क्रिएशन - ShareChat