adityakumar.
ShareChat
click to see wallet page
@adityakumar8892
adityakumar8892
adityakumar.
@adityakumar8892
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
#📸 माझी फोटोग्राफी
📸 माझी फोटोग्राफी - ShareChat
#जेठालाल फनी व्हिडिओज
जेठालाल फनी व्हिडिओज - ShareChat
00:41
#☀️गुड मॉर्निंग☀️ #💐शुभेच्छा क्रियेटर🙏
☀️गुड मॉर्निंग☀️ - যিন সনতা   যিল || शुभ सोमवार आदित्य क्रिएशन যিন সনতা   যিল || शुभ सोमवार आदित्य क्रिएशन - ShareChat
#💐शुभेच्छा क्रियेटर🙏 #☀️गुड मॉर्निंग☀️
💐शुभेच्छा क्रियेटर🙏 - Good| Soring आदित्य क्रिएशन Good| Soring आदित्य क्रिएशन - ShareChat
#☀️गुड मॉर्निंग☀️ #💐शुभेच्छा क्रियेटर🙏
☀️गुड मॉर्निंग☀️ - Il शुभ सकाळ |l ३९ साईरम | I| থুপস সুফলা২Il आदित्य क्रिएशन Il सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा |l Il शुभ सकाळ |l ३९ साईरम | I| থুপস সুফলা২Il आदित्य क्रिएशन Il सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा |l - ShareChat
बाप माणूस काल मुंबई वरून येताना रात्री वनाज ला उतरलो तिथून घरी जायला रिक्षाचे ५० रुपये होतात, बराच वेळ रिक्षा मिळेना आणि माझ्या कडे खूप जास्त सामान होतं, शेवटी एक रिक्षावाला थांबला आणि १००/- रुपयांमध्ये आमचा छोटासा प्रवास सुरू झाला, तो म्हणाला मला खरतर पिंपरी ला जायचंय पण तुमच्या कडे सामान जास्त आहे हे बघून मी थांबलो, थोडं पुढे गेल्यावर एका वडापावच्या गाडी वर थांबून २ वडापाव बांधून घेतले आणि मग त्याने जी त्याची स्टोरी सांगितली त्याने मी अंतर्बाह्य हलून गेलो मूळ कर्नाटक मधल्या एका गावात राहणारा, आई वडलांच्या निधनानंतर बहिणीच्या लग्नासाठी कर्ज घेतलं आणि ते फेडण्यासाठी आता पुण्यात रिक्षा चालवतोय २ महिन्यापूर्वी त्याला अजून एक धक्का बसला, ३ वर्षाच्या मुलीच्या हृदयाला ३ होल आहेत. डॉक्टर ने लगेच ऑपरेशन करायला सांगितलं खर्च सांगितला २.५ लाख, कसे बसे बायकोचे दागिने विकून आणि ५०,००० व्याजाने घेऊन त्याने पैसे उभे केले, मुलीला एडमिट केलं पण ३ दिवसापूर्वी हॉस्पिटल मध्ये सांगितलं अजून २७ हजार लागतील औषधाला, मग सलग ३ दिवस रात्र रिक्षा चालवून पैसे जमा करतोय, ३ दिवस झाले फक्त वडापाव खातोय आणि आता थोडे पैसे कमी पडत आहेत म्हणून जाताना फ़ोन विकणार. हे सगळं ऐकून डोळे भरून आले, उतरल्यावर त्याच्या हातात हजार रुपये ठेवले त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणालो, काळजी करू नकोस, ऑपरेशन नीट होईल, बरी होईल तुझी मुलगी, मी प्रार्थना करेन. पैसे खिशात ठेऊन डोळे पुसून तो निघून गेला, त्या पाठमोऱ्या रिक्षा कडे बघताना मला शिवनेरी च्या डिकी मध्ये सामान ठेवताना झालेला त्रास आणि माझा त्रागा आठवला आणि तो त्रास किती तुच्छ आहे ह्याची जाणीव झाली #😌sadness #😞mood off
"तुझी लायकी नाहीये इथं बसायची, चल मागे जा!" लग्नमंडपात सासूने माझ्या आई-वडिलांना उठवलं... पण जेव्हा मी हातात माईक घेतला, तेव्हा नवऱ्याच्या अख्ख्या खानदानाला सिक्युरिटी गार्डने धक्के मारून बाहेर काढलं! माझं नाव 'स्वराली'. मी पुण्यात एका मल्टीनॅशनल कंपनीत 'फायनान्शिअल ॲडव्हायझर' म्हणून मोठ्या पदावर काम करते. माझे बाबा, 'माधवराव' हे एका सरकारी शाळेत शिक्षक होते आणि नुकतेच निवृत्त झाले होते. माझ्या बाबांनी त्यांच्या आयुष्याची ३५ वर्षांची पुंजी, म्हणजे जवळपास ४० लाख रुपये, माझ्या लग्नासाठी बाजूला काढून ठेवले होते. माझे लग्न 'समीर' नावाच्या एका मोठ्या बिझनेसमॅनच्या मुलाशी ठरले होते. समीरचे कुटुंब अत्यंत श्रीमंत होते. लग्नाआधीच समीरच्या आईने (माझ्या होणाऱ्या सासूने) एक अट ठेवली होती- *"आम्हाला हुंडा नकोय, पण आमच्या स्टेटसप्रमाणे लग्न लोणावळ्याच्या 'फाईव्ह स्टार रिसॉर्टमध्येच' झाले पाहिजे."* मुलीच्या सुखासाठी माझ्या बाबांनी हसत हसत स्वतःचा सर्व 'पीएफ' (PF) आणि रिटायरमेंट फंड मोडून त्या ५-स्टार लग्नाचा सर्व खर्च उचलला. **तो अपमानाचा प्रसंग आणि माझ्या बापाचे डोळे:** लोणावळ्याच्या त्या आलिशान रिसॉर्टमध्ये लग्नाचा दिवस उजाडला. हॉल फुलांनी सजला होता. मी नवरीच्या वेशात स्टेजवर बसले होते आणि समीर माझ्या बाजूला होता. ५०० पाहुणे आले होते. स्टेजच्या अगदी समोर पहिल्या रांगेत 'व्हीआयपी (VIP) सोफे' लावले होते. माझे बाबा आणि आई तिथे जाऊन बसले, जेणेकरून त्यांना त्यांच्या लाडक्या लेकीचे 'लग्न आणि फेरे' जवळून बघता येतील. तितक्यात समीरची आई (सासूबाई) त्यांच्या श्रीमंत मैत्रिणींना घेऊन तिथे आल्या. त्यांनी माझ्या बाबांना बघितले आणि अत्यंत तुच्छतेने व मोठ्या आवाजात म्हणाल्या, *"अहो माधवराव, हे 'व्हीआयपी' लोकांसाठी आणि आमच्या खास पाहुण्यांसाठी सोफे आहेत. तुम्ही मुलीवाले आहात, त्यात तुमचे हे साधे कपडे या सोफ्यांना मॅच होत नाहीत. जा, तुम्ही तिथे मागच्या रांगेत जेवणाच्या काऊंटर जवळ जाऊन बसा!"* माझ्या काळजात धस्स झालं. ज्या बापाने या लग्नासाठी स्वतःच्या रक्ताचं पाणी केलं, त्या बापाला स्टेजसमोरून कुत्र्यासारखं हाकललं जात होतं! माझ्या बाबांनी कोणताही तमाशा केला नाही... त्यांनी मान खाली घातली, हात जोडले आणि ते शांतपणे आईला घेऊन एकदम शेवटच्या रांगेत एका कोपऱ्यात जाऊन बसले. माझ्या डोळ्यांतून पाणी आलं. मी समीरला म्हणाले, *"समीर, बघ तुझ्या आईने माझ्या बाबांचा किती मोठा अपमान केलाय. त्यांना पुढे बोलाव."* पण समीर अत्यंत निर्लज्जपणे हसून म्हणाला, *"अगं स्वराली, रिलॅक्स! आईला स्टेटस मेंटेन करावं लागतं यार. तुझे बाबा जुन्या विचारांचे आणि गरीब दिसतात, ते तिथे मागेच ठीक आहेत. तू फक्त स्माईल कर, फोटोग्राफर बघतोय!"* **तो संतापाचा स्फोट आणि माझा 'भयंकर' निर्णय:** समीरचं ते वाक्य ऐकलं आणि माझ्या डोळ्यांतले अश्रू अचानक आटले. तिथे प्रचंड संतापाची आग पेटली. जो नवरा माझ्या बापाच्या स्वाभिमानाची किंमत करत नाही, तो आयुष्यभर माझी काय इज्जत करणार? मी एक सेकंदही विचार केला नाही. मी नवरीचा तो जड शालू सावरला आणि स्टेजवरून थेट खाली उतरले. संपूर्ण मंडपात शांतता पसरली. मी चालत थेट डीजे (DJ) च्या माणसाकडे गेले आणि त्याच्या हातातला **'माईक' (Mic)** खेचून घेतला! *"सगळ्यांनी लक्ष द्या!"* माझा आवाज पूर्ण हॉलमध्ये घुमला. मी माईकवर अत्यंत करड्या आवाजात म्हणाले, *"समीर आणि त्याच्या घरच्यांना वाटतंय की ते खूप उच्च दर्जाचे लोक आहेत आणि माझे बाबा भिकारी आहेत. बरोबर ना सासूबाई? तुम्ही माझ्या बाबांना या पहिल्या रांगेतून उठवून मागे पाठवलं... कारण त्यांची 'लायकी' नाहीये. तर आता सर्वांनी कान उघडे ठेवून ऐका...* *हा जो ५-स्टार रिसॉर्ट आहे, हे जे ५०० लोकांचे ५६ भोग ताटात वाढले आहेत आणि ज्या व्हीआयपी सोफ्यांवर तुम्ही तुमचा 'माज' घेऊन बसला आहात... त्या सगळ्याचे '४० लाख रुपये' माझ्या याच गरीब बापाने भरले आहेत! तुम्ही मुलावाले म्हणून एक रुपयाचाही खर्च केला नाहीये. माझ्या बापाच्या पैशांवर फुकटची मज्जा मारायला आलात आणि माझ्याच बापाला लायकी काढताय?"* हे ऐकताच समीरच्या आईच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला! समीर धावत खाली आला. *"स्वराली, काय वेडेपणा लावलाय हा? माईक खाली ठेव, आमची इज्जत जातेय!"* तो ओरडला. मी थेट समीरच्या श्रीमुखात अशी एक सणसणीत चपराक मारली की त्याचा माईकवर मोठा आवाज आला! *"तुझी इज्जत? भिकाऱ्यांची कसली आलीये इज्जत?"* मी गरजले. *"तू आणि तुझी आई माझ्या पैशावर विकले गेलेले भिकारी आहात! आणि मी माझ्या बापाच्या पैशातून तुमच्यासारखा 'कचरा' विकत घेणार नाहीये. मी हे लग्न आत्ता याच क्षणी मोडत आहे!"* **पायाखालची जमीन सरकवणारा तो 'मास्टरस्ट्रोक':** समीरचे वडील रागाने पुढे आले आणि म्हणाले, *"तुझी एवढी हिंमत? आता बघ आम्ही काय करतो. एकदा नवरी मंडपातून परत गेली ना, की कोणताच मुलगा तुझ्याशी लग्न करणार नाही! तू आयुष्यभर कुंवारी राहशील आणि हे ४० लाख पाण्यात जातील."* मी एक अत्यंत भेदक स्माईल दिली. मी रिसॉर्टच्या जनरल मॅनेजरला हाक मारली. *"मॅनेजर साहेब, या रिसॉर्टचे पूर्ण बुकिंग कुणाच्या नावावर आहे आणि पेमेंट कोणी केलंय?"* मॅनेजरने माईकवर सांगितले, *"मॅडम, सर्व ४० लाखांचे बुकिंग तुमच्या (स्वरालीच्या) अकाउंटमधून आणि तुमच्या नावावर झाले आहे."* मी समीरच्या बापाकडे बघून हसले आणि म्हणाले, *"ऐकलंत सासरेबुवा? या रिसॉर्टची मालकीण आजच्या दिवसापुरती 'मी' आहे! मॅनेजर साहेब... हे समीर आणि त्याचे नातेवाईक आता माझे पाहुणे नाहीत, ते 'घुसखोर' (Trespassers) आहेत. तुमच्या सिक्युरिटी गार्ड्सना बोलवा आणि या समीरच्या खानदानाला पुढच्या १० मिनिटांत गेटच्या बाहेर काढा! यांच्या ताटातलं जेवणही काढून घ्या!"* पुढच्या ५ मिनिटांत जे घडलं, ते बघून सगळ्या पाहुण्यांचे डोळे विस्फारले! रिसॉर्टच्या ८-१० बाऊन्सर आणि सिक्युरिटी गार्ड्सनी समीरच्या आई-वडिलांना आणि त्यांच्या त्या गर्विष्ठ नातेवाईकांना अक्षरशः धक्के मारत, त्यांचे सामान अंगावर फेकत त्यांना रिसॉर्टच्या बाहेर हाकलून दिले! जो माज ते दाखवत होते, तो माज रस्त्यावरच्या धुळीत मिळाला होता! तो सुवर्णक्षण आणि बापाचा सन्मान:** मी धावत गेले आणि माझ्या बाबांना घट्ट मिठी मारली. ते ढसाढसा रडत होते. मी आई-बाबांचा हात पकडला, त्यांना अत्यंत सन्मानाने घेऊन आले आणि स्टेजवरच्या त्या दोन राजेशाही खुर्च्यांवर बसवले. मी माईकवरून माझ्या घरच्या आणि ऑफिसच्या पाहुण्यांना म्हणाले, "हे ४० लाख रुपये पाण्यात गेले नाहीत! आजपासून हे माझे लग्न नाहीये... तर आज माझ्या बाबांच्या **'निवृत्तीचा (Retirement) भव्य सत्कार समारंभ'** आहे! ज्या बापाने माझ्यासाठी स्वतःचं आयुष्य पणाला लावलं, आज हा पूर्ण उत्सव फक्त त्यांच्या सन्मानासाठी आहे! तुम्ही सर्वांनी पोटभर जेवण करा आणि माझ्या आई-बाबांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा द्या!"* पूर्ण हॉलमध्ये टाळ्यांचा असा काही कडकडाट झाला की त्याच्या आवाजाने रिसॉर्टच्या बाहेर उभ्या असलेल्या समीर आणि त्याच्या कुटुंबाचे कान फाटले असतील! जेव्हा एखादी मुलगी रडत बसण्यापेक्षा किंवा समाजाला घाबरून अपमान सहन करण्यापेक्षा, आपल्या आई-वडिलांसाठी 'रणचंडी' बनते... तेव्हा खऱ्या अर्थाने समाजाला एक 'कडक' मेसेज जातो. आज मी कुंवारी असले, तरी मी अभिमानाने जगतेय... कारण मी एक नवरा गमावला, पण माझ्या बापाचा 'स्वाभिमान' जिंकला होता! खोट्या प्रतिष्ठेसाठी झुकण्यापेक्षा, मुलीने दाखवलेला हा 'कडक ॲटिट्यूड' आणि आई-वडिलांचा केलेला सन्मान तुम्हाला कसा वाटला? ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. तिचा कोणत्याही व्यक्तीशी, घटनेशी, ठिकाणाशी कोणताही संबंध नाही. #🙂Motivation #🤩जीवनाबद्दल कोट्स 📝 🙏
*फाशीची शिक्षा मरेपर्यंत फाशी का झाली* एक ज्वलंत उदाहरण दि. ९/१०/१९३८ (म्हणजे ८५ वर्ष्यापूर्वी ) दक्षिण सोलापूर येथे 1936 मध्ये शिवप्पा पुंडलिक पाटील या मराठा समाजाच्या तरुणावर खुनाचा आरोप होता.ब्रिटिश सत्र न्यायालयने त्यांना फाशीची सजा ठोठावली, आपल्या मुलाला विनाकारण फाशीची सजा देण्यात आली हा अन्याय आहे मला न्याय पाहिजे असे बोलत पुंडलिक पाटील न्यायाल्यात रडायला लागले कारण शिवप्पाची बायको ही नुकतीच बाळंत झाली होती आणि शिवप्पाचा मुलगा हा फक्त ११ महिन्याचा होता त्या मुलाला शिवप्पाने ने सुद्धा बघितले नव्हते फक्त त्याला जेल मध्ये सांगण्यात आले होते तुझ्या पत्नीला मुलगा झाला आहे शिवप्पाचा बाप हा गावचा पाटील होता. पैसा, संपत्ती खूप होती मानसन्मान, उठ बस वैगरे गावात चांगली होती. त्यामुळे पुंडलिक सिद्दपा पाटील ( शिवप्पाचे वडील ) यांनी चांगल्यात चांगला वकील करण्याचे ठरवले आणि आपल्या मुलाची फाशीची शिक्षा रद्द करायची यासाठी पुंडलिक पाटील पाहिजे तेवढा पैसा खर्च करण्यास आणि लावण्यास तयार होते.त्या साठी चांगल्यातला चांगला वकील शोधण्यासाठी गावो गावी शहरो शहरी फिरत होते खूप वकील, कायदेतज्ञ यांच्या कडे पुंडलिक पाटील जाऊन आले पण त्या सर्वांनी हात वर केले आता आम्ही काहीच करू शकत नाही न्यायालयाचा आदेश हा अंतिम असतो तुमच्या मुलाला फाशी होणार आणि त्यातून त्याला साक्षात देव जरी आले तरी ते सुद्धा त्याला वाचवू शकत नाही असेच सर्व नामवंत कायदेतज्ञ बोलत होते यात तर एक ब्रिटिश कायदेतज्ञ आणि त्यावेळेचे सुप्रसिद्ध वकील Henry Lutyens यांनी सुद्धा हार मानली होती. त्यांनी सुद्धा पुंडलिक यांना मी यात काहीच करू शकत नाही असे स्पष्ट सांगितले. या सर्वांचे मत आणि त्यांची भूमिका पाहून पुंडलिक पाटील हताश झाले. ते आता फक्त आपल्या निष्पाप मुलाचा मृत्यू आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहणार होते .याच्या शिवाय त्यांच्या कडे काहीच नव्हते .असेच काही दिवस गेले तो फेब्रुवारी महिना होता पुंडलिक पाटील यांचे विजापूरचे एक नातेवाईक पुंडलिक पाटील यांना भेटण्यासाठी आले होते. त्यांचे नाव अडवणे ते विजापूरमध्ये एक समाज सुधारक म्हणून कार्य करत होते. त्यांना पुंडलिक पाटील यांनी सर्व माहिती दिली. माझा मुलगा बेगुन्हेगार आहे पण सरकार खरा आरोपी सोडून एका निष्पाप मुलाला फासावर देत आहे मला न्याय पाहिजे त्यांनी अडवणे यांना सर्व सांगितले ते कोण कोणाला जाऊन भेटले मोठ्या मोठ्या वकीलाना जाऊन भेटले पण कुणीच माझ्या मुलाला वाचवण्यासाठी पुढे येत नाही आणि माझी केस सुद्धा घेत नाही! पुंडलिक पाटील यांचे सर्व म्हणणे ऐकून घेतल्यावर अडवणे यांनी त्यांना सांगितले आपण एक शेवटचा पर्याय म्हणून बॅरिस्टर 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' यांना जाऊन भेटू ते खूप मोठे बॅरिस्टर आणि उच्च कायदेतज्ञ आहेत ते काहीतरी करतील असे बोलून अडवणे यांनी पुंडलिक पाटील यांना उद्या आपण मुंबईला जाऊन बॅरिस्टर आंबेडकर साहेबांना भेटू ते यातून काहीतरी नक्कीच मार्ग काढतील अडवणे यांच्या अश्या विश्वासाच्या बोलण्यामुळे पुंडलिक पाटील यांच्या आशा उंचावल्या आणि त्यांना आशेचा किरण दिसून आला. ठरल्याप्रमाणे ते दोघे पुंडलिक पाटील यांच्या ऍम्बेस्यडर कारने मुंबईला निघाले दुसऱ्या दिवशी ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भेटण्यासाठी त्यांच्या बंगल्यावर गेले पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांना भेटले नाही त्या वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे त्यांच्या पनवेलच्या फार्म हाऊसवर विश्रांतीसाठी गेले होते असे त्यांना समजले ते तडक पनवेलच्या दिशेने निघाले ते पनवेल मध्ये रात्री पोहचले. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भेट घेतली आणि त्यांना सकाळी येऊन मला भेटा मी बघतो तुमची काय केस आहे ती असे सांगितले,, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अश्या बोलण्यामुळे पुंडलिक पाटील यांचा उत्साह वाढला कारण आता पर्यंत ते ज्या ज्या कायदा तज्ञला, नामवंत वकिलाला जाऊन भेटले होते त्या त्या सर्व वकिलांनी त्यांना सॉरी आम्ही यात काहीच करू शकत नाही असे सांगितले होते पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांना मी बघतो तुमची काय केस आहे यात मी बघतो हा शब्द फार दिलासादायक पुंडलिक पाटील यांना वाटला आणि त्यांना एक आशेचा किरण,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मध्ये बघायला मिळाला! दुसऱ्या दिवशी सकाळी अडवणे आणि पुंडलिक पाटील हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना येऊन भेटले त्या दोघांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सोफ्यावर बसवून त्यांचे म्हणणे ऐकण्यास तत्पर झाले पण इथे एक प्रॉब्लेम होता तो म्हणजे पुंडलिक पाटील हे दक्षिण सोलापूरचे असल्यामुळे त्यांना मराठी येत नव्हती ते कन्नड बोलायचे त्यामुले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांची भाषा समजत नव्हती अखेर थोडीफार मराठी येत असलेल्या अडवणे यांना त्यांची भाषा भाषांतर करण्यास सांगितले पुंडलिक पाटील यांचे सर्व म्हणणे ऐकल्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांची फाईल स्वतः जवळ ठेवून घेतली आणि सांगितले मी तुमची केस घेतली आहे मी फाशी सुनावण्याच्या वेळीस कोर्टात येईल आणि याला अजून 6 महिने आहे मी येईन तेव्हा कोर्टात आता तुम्ही निश्चित जा, ठरल्याप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोलापूर सत्र न्यायालात आरोपीची बाजू मांडण्यासाठी हजर झाले डॉ. बाबासाहेब आंबेडकर आले आहेत ही वार्ता सोलापूर विजापूर आणि इतर आजूबाजूच्या गावांना समजली तेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पाहण्यासाठी त्या सोलापूर शहराच्या कोर्टात हजारो लाखो लोकं जमले होते ( काही जेष्ठ पत्रकार आणि साहित्यिक सांगतात की,त्या वेळी सोलापूर शहरातील हॉटेल्स, दुकाने, यांच्या वरील सर्व खाद्य पदार्थ,साहित्य, पुस्तके आदी सर्व संपले होते. हा त्या दिवसाचा उच्चांक आहे ) डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोर्टात आल्यावर स्वतः त्या न्यायाधिशाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वागत केले, केस चालू झाली .दोन्ही वकिलांचा युक्तीवाद झाल्यावर सत्र न्यायालयाच्या न्यायाधिशाने पूर्व फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब करून आरोपीला फाशीची सजा सुनावन्यात आली,न्याया धिशाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सांगितले आम्ही आरोपीला फाशीची शिक्षा सुनावत आहोत तेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर इतकेचं बोलले ठीक आहे मला मान्य आहे आरोपीला फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे माझी काही हरकत नाही पण माझी एक अट आहे आरोपीला जेव्हा फाशी देण्यात येईल तेव्हा तुम्ही स्वतः आणि तुमचे न्यायालीन मंडळ तिथे हजर असायला हवे आता मी कुठलेच petition दाखल करत नाही दीड महिना गेल्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुन्हा एकदा सोलापूर कारागृहात हजर झाले तिथे शिवप्पाला फाशी देणार होते त्या कारागृहात हजर झाले ठरल्याप्रमाणे आणि कायद्याच्या सचोटीत राहून न्यायालयीन कामकाज सुरू झाले. न्यायाधीश सुद्धा हजर झाले आरोपीला फाशी देण्यासाठी सर्व तयारी झाली आरोपीला फाशीच्या दिशेने आणण्यात आले, इकडे पुंडलिक पाटील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जी सदर भावना होती त्यावर खेद व्यक्त करत होते अडवणे सुद्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना याच्यातून काही तरी दिलासा पर्याय शोधून काढतील म्हणून पूर्ण विश्वास ठेवून होते पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर तर स्वतः फाशी द्या, आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे असे स्पष्ट सांगत आहेत हे असे कसे ख्यातनाम बॅरिस्टर असे अनेक शंका कुशंका त्या दोघांच्या मनात प्रश्नांचे घर करत होते इकडे आरोपीला फाशीच्या तख्तावरआणले त्याच्यावर काळा कपडा टाकला हे सर्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर तिथे बसून बघत होते आणि न्यायाधिश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे बघत होते जल्लादने आरोपी शिवप्पा याच्या गळ्यात फाशीचा दोरखंड टाकला त्यावर लगेच बॅरिस्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी stop the my lord असे बोलून न्यायाधीशाकडे बघून ओरडले न्यायाधिशाला काहीच समजले नाही बॅरिस्टर बाबासाहेब आंबेडकर पुन्हा ओरडले stop the this actively my lord! न्यायाधिश बॅरिस्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे बघत म्हणाले what's the stupidity question? Why stop the court actively? बॅरिसर आंबेडकर " my lord तुम्ही सजा फक्त फाशी देण्याची ठरवली होती,ती जीव घेण्याची नाही! तुमची सजा आता पूर्ण झाली तुमच्या न्यायालयीन कामकाजा नुसार आरोपीच्या गळ्यात फास अटकवला त्यात ती सजा पूर्ण झाली आता तुम्ही आरोपीला कुठली ही सजा देऊ शकत नाही आरोपी आता दोष मुक्त झाला आहे तुमची सजा आरोपीने पूर्ण भोगली आणि पुर्ण केली! आणि बॅरिस्टर आंबेडकर अर्थात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे म्हणणे त्या ब्रिटिश न्यायाधिशाला मान्य करावे लागले (आणि तेव्हा पासून आरोपीला फाशीची सजा देताना मरे पर्यंत फाशी अशी सजा देण्यात येते )आणि शिवप्पा याची निर्दोष मुक्तता करण्यात आली! लेख खूप मोठा होईल पण जाता जाता थोडक्यात सांगतो आज ही पाटील यांच्या देवघरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मूर्तीवजा पुतळा आहे. आजची जी पाटील यांची पिढी आहे ती डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची रोज पूजा करते! आपण जी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे जी Ambassador कार बघतो ती पुंडलिक पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या जन्मदिनाच्या दिनी भेट म्हणून दिली आणि पुर्ण गावात पुंडलिक पाटील यांनी सोलापूर शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो हत्तीवर ठेवून पुर्ण सोलापुरात साखर वाटली होती. . . . #viral #trendingnow #post #everyone #sureshsonwane #🙂Motivation #🙂सत्य वचन #डॉ. बाबासाहेब आंबेडकर
#⚕️आरोग्य #🌿आयुर्वेदा #👨‍⚕️साध्या हेल्थ टिप्स #💪फिटनेस💪 #💪फिट रहा, हिट रहा💪
⚕️आरोग्य - ताक पिण्याचे हे 8 प्रकारचे फायदे १) ताक प्यायल्याने लठ्ठपणा कमी होतो. २) वारंवार लघवीचा त्रास होत असेल तर ताकात मीठ टाकून प्यावे. त्रास कमी होतो. पाणी अथवा ताकाने गुळण्या केल्यास तोंड येणे दह्याचे ३) बरे होतेः ४) ताकात ओवा टाकून प्यायल्यास पोटातील जंतू मरुन সানান ५) ताकात गुळ टाकून प्यायल्यास लघवी करताना होणारी  जळजळ बंद होते.  डोकेदुखी  ६) थोडेशी जायफळ पूड ताकात टाकून प्यायल्यास  कमी होते. पोटदुखी बरी होते. ७) रिकाम्या पोटी ताक प्यायल्याने ८) ताकात साखर आणि काळी मिरी टाकून प्यायल्यास पित्ताचा त्रास कमी होतो. माहिती साठी आपल्या पेज ला फॉलो नक्की करा  ८ अशाच आदित्य क्रिएशन ताक पिण्याचे हे 8 प्रकारचे फायदे १) ताक प्यायल्याने लठ्ठपणा कमी होतो. २) वारंवार लघवीचा त्रास होत असेल तर ताकात मीठ टाकून प्यावे. त्रास कमी होतो. पाणी अथवा ताकाने गुळण्या केल्यास तोंड येणे दह्याचे ३) बरे होतेः ४) ताकात ओवा टाकून प्यायल्यास पोटातील जंतू मरुन সানান ५) ताकात गुळ टाकून प्यायल्यास लघवी करताना होणारी  जळजळ बंद होते.  डोकेदुखी  ६) थोडेशी जायफळ पूड ताकात टाकून प्यायल्यास  कमी होते. पोटदुखी बरी होते. ७) रिकाम्या पोटी ताक प्यायल्याने ८) ताकात साखर आणि काळी मिरी टाकून प्यायल्यास पित्ताचा त्रास कमी होतो. माहिती साठी आपल्या पेज ला फॉलो नक्की करा  ८ अशाच आदित्य क्रिएशन - ShareChat