'हरिपाठ' या शब्दचा अर्थ
ह — हरिनामाचा ध्यास लागता,
मिळतो मनाला विसावा
रि — रिकामी होते "मन"
लाभे भक्तीचा पान्हा
पा — पावन होई देह विठ्ठल
चरणी लीन
ठ — ठसुन भरला विठ्ठल
हरिपाठात जन होई तल्लीन... असा हरिपाठचा अर्थ गोड
हरिपाठ भवात म्हणुया
विठू माऊलीच्या गजरात,
दुमदुमतो हा हरिपाठ
मुक्तीची ही सोपी वाट
दावी भक्तीचा हा गजर
अभंगांच्या ओळींतून
पांडुरंग भेटतो अभंग
अमृताच्या या शब्दांनी
दु:ख सारा हा मिटतो
ज्ञानेश्वरांच्या हरिपाठातुन
मनामनात हा रुजतो
हरिपाठाच्या या गोड अभंगातुन
माणूस देवाशी जुडतो.
🕉️ #🙏कर्म क्या है❓ #🙏🏻हनुमान जी के भजन #🙏🏻आध्यात्मिकता😇 #🙏गुरु महिमा😇 #🙏गीता ज्ञान🛕
🕉️
हरिपाठ करा हरिपाठ करा
हरिपाठ करा हरिपाठ करा
जीवनाची वाट मोकळी करा
वाईट विचाराना सोडा
नको ते रडगाणे सारखे सारखे मन सुद्धा तुमचे खिन्न होते,
हरिपाठ केल्याणे मन तुमचे
प्रफुल्लित होईल,
हरिपाठ करा हरिपाठ करा
हरिपाठ करा हरिपाठ करा
जड चित्त ग्रंथी गाठ सोडा
संसार आणि परमार्थ एक करा
धावपळीतुन त्या मनाला
थोड़ा विसावा द्या,
हरिपाठ करा हरिपाठ करा
हरिपाठ करा हरिपाठ करा
सुखी जीवनाची गुरुकिल्ली ही
हरिपाठ करून जीवनाचे सार्थ होईल, जेथे नाम घोष चालतो तेथे कुटुंबाचे कल्याण होते,
हरिपाठ करा हरिपाठ करा
हरिपाठ करा हरिपाठ करा
मुलांना सोबत घ्या, पूर्ण परिवार
एकत्र येऊन हरिपाठ करा,
एकत्र येऊन हरिपाठ करा, नकारात्मकता दूर होईल,
घरात सुख शांती नांदेल,
हरिपाठ करा हरिपाठ करा
हरिपाठ करा हरिपाठ करा
पैसे कमवणे हा परिवार
चालवण्याचे मार्ग तर हरिपाठ करून आपले मनाला प्रसन्न करण्याचा मार्ग
करा करा हरिपाठ करा आपल्या जीवाचा कुटुंबाचा उद्धार करा,
हरिपाठ करा हरिपाठ करा
हरिपाठ करा हरिपाठ करा. #🙏गुरु महिमा😇 #🙏🏻हनुमान जी के भजन #🙏गीता ज्ञान🛕 #🙏🏻आध्यात्मिकता😇 #🙏कर्म क्या है❓
🕉️
हरिपाठ हा मुक्तिचा मार्ग,
हरिपाठ हा मुक्तिचा मार्ग
जीवाची शिवाची गाठ जुड़ते
जीवंत पणी मोक्ष गाठतो
हरिपाठ मुक्तीचा मार्ग
हरिपाठ हा मुक्तीचा मार्ग
भक्तीच्या रंगात पांडुरंग येतो
चित्ताच्या त्या गाठी युक्तीने
सहज सुटून जातात
हरिपाठ हा मुक्तिचा मार्ग
हरिपाठ हा मुक्तिचा मार्ग
अंतरी विठ्ठल नित्य तो पहतो
चित्त चैतन्यमय होवून जाते,
हरिपाठ हा मुक्तीचा मार्ग
हरिपाठ हा मुक्तीचा मार्ग
दुःखाचे रूपांतर सुखात होते
मनाचे रूपांतर उन्मनित होते
बुद्धी प्रतिभावंत होते,
विचाराचे रूपांतर शुन्यत होते
देह चे रूपांतर विदेहेत होते,
हरिपाठ हा मुक्तीचा मार्ग
हरिपाठ हा मुक्तीचा मार्ग
हरिपाठ केल्याने मन शुद्ध
पवित्र होते, अंतरंग विशाल होते,
जीवन प्रकाशमय होते,
जीवाचा उद्धार होतो,
शिवशक्तीचे मिलन होते,
हरिपाठ हा मुक्तीचा मार्ग
हरिपाठ हा मुक्तिचा मार्ग
🕉️ #🙏🏻आध्यात्मिकता😇 #🙏🏻हनुमान जी के भजन #🙏कर्म क्या है❓ #🙏गीता ज्ञान🛕 #🙏गुरु महिमा😇
🕉️
किती यंत्र बाजारात आली आपल्याला सुख मिळवण्यासाठी पण यंत्र आपल्याला सुख देऊ शकत नाही??? कारण की सुख हे आपल्या मनात असते,
सुख तेच मिळवू शकतात ज्याचे मन त्याच्या ताब्यात आहे, त्यांनाच सुख मिळेल, इतर मग कोणाला ही नाही.
यंत्रणे तात्पुरता व्यवस्था होईल,
क्षणिक सुख प्राप्त होईल पण अखंड सुख हे फक्त आत्मज्ञानेच प्राप्त होते,
सुख बाहेर नसून आपल्या आत आहे,
म्हणून बाहेरची कोणतीही वस्तू यंत्रणा व्यक्ति आपल्याला सुख देऊ शकत नाही, आपले सुख आपल्यालाच मिळवायचे आहे??? आणि ते आपल्यातच आहे, चला मग शोधून काढा सुख.... सुख आपल्या आतच आहे शोधायचे की नाही शोधायचे हे तुम्हीच ठरवा कारण की तुम्हीच आहेत तुमच्या जीवनाचे निर्मिते.
🕉️ #🙏गीता ज्ञान🛕 #🙏🏻हनुमान जी के भजन #🙏गुरु महिमा😇 #🙏कर्म क्या है❓ #🙏🏻आध्यात्मिकता😇
🕉️
सुख आणि दुख या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत ज्याला सुख हवे असेल त्याला दुःखही स्वीकारावे लागेल,
जसे की रात्र झाली की सकाळ होणारच असते, हे त्रिवार सत्य आहे तसेच दुःख गेले की सुख येणार.. हे त्रिवार सत्य आहे पण सुख गेले की दुःख येणार आणि दुःख गेले की सुख येणार, हे सत्य तुम्हाला स्वीकारावंच लागेल, जोपर्यंत तुमचा श्वास आहे जोपर्यंत पृथ्वीमाता आहे तोपर्यंत सुख दुःख यांचा मेळ म्हणजे "संसार" आहे मग असे कधीही होणार नाही की आपल्या वाट्याला फक्त सुखच येईल किंवा आपल्या वाटेला दुःखच येईल असं कधीही होणार नाही.
असे हे सुख आणि दुःख याच्या सम कसं राहायचं यासाठी तुम्हाला सत्संगातच जावे लागेल.
मनुष्यप्राणी "सुख" आले की त्याला फार आनंद होतो, त्याला सर्व जग आनंदी वाटायला लागते, पण त्याचा धाकटा भाऊ "दुःख" आलं की त्याला म्हणतो तू नको येऊ त्याला तो कंटाळतो त्याला नको म्हणतो,
असं चालणार नाही जितकं तुम्ही सुखाचे स्वागत करतात तितकेच "दुःख" स्वीकारायला तयार राहा, कारण हे सुख आणि दुःख हे आपण केलेली निर्मिती आहे, भगवंत आपल्याला सुख व दुःख देत नाही,
हे आपले कर्माची फळ आहेत आणि आळीपाळीने आपल्याला चाखायला मिळतात,
त्यापैकी सुख फळ खूप चांगले वाटते, व दुःख हे फळ कडू लागते, पण हे तुम्हाला चाखायचेच आहेत, ते कडू जरी असलं तरीही आणि गोड असलं तरीही दोन्ही फळ तुम्हाला चाखावेच लागतील, म्हणून तोंड आपले वाकडे तिकडे न करता आपण आनंदाने चाखायला सुरुवात करा, काही काळजी करू नका, जीवनात सत्संगात संगत संगती करा तिथे सुख आणि दुःख कसं आनंदी राहायचं हे आपल्याला सहज ज्ञान प्राप्त होते, आणि आपल्याला सुख आलं तरी काही वाटत नाही आणि दुःख आलं तरी काही वाटत नाही हे दोन्ही फळ आपले जीवन घडवत असतात, म्हणून कोणाचाच नकार देऊ नका,
आनंदाने जीवन जगत चला फक्त भगवंताला नामस्मरणाला सोबत ठेवा,
आता हे दोन्ही फळ सुख दुःख हे चाखायचे की नाही चाखायचे ते तुम्हीच ठरवायचं कारण की तुम्हीच आहात तुमच्या जीवनाचे निर्माते.
🕉️ #🙏कर्म क्या है❓ #🙏🏻हनुमान जी के भजन #🙏🏻आध्यात्मिकता😇 #🙏गुरु महिमा😇 #🙏गीता ज्ञान🛕
🕉️
॥ शहाणपणाने वागणे ॥
मिळेल सर्व या बाजारात,
पैसा आणि मान,
पण कुठे मिळेल सांगा,
अढळ ते शहाणपण?
पुस्तकी ज्ञानाचे गाठोडे,
डोक्यावरती वाहतो,
पण जगण्याच्या परीक्षेत,
आपण का हो फसतो?
सत्संगाच्या पावन गंगेत,
ज्ञानाने रोज न्हातो,
पण कोरड्या माठासारखे,
मन रिकामे राहते,
सद्गुरूंचे शब्द मौल्यवान,
कानी तर पडतात,
पण आचरणा वाचून ते,
हवेतच विरतात.
नातीगोती रेशमी धागे,
गुंफलेली माया,
शहाणपणाविना सुकते,
संसाराची काया.
कुठे झुकावे, कुठे सोडावे,
कळेना हा खेळ,
अहंकाराच्या गर्दीत मग,
बसत नाही मेळ.
पाटी असावी कोरी,
अन् मनी असावी नम्रता,
शरणागतीच्या भावातूनच,
येते ज्ञान-प्रगल्भता.
ऐकतो एक अन् करतो दुसरे,
अशी आपली रीत,
म्हणूनच जीवनात उरत नाही,
सुखाचे संगीत.
अंतरीचा दिवा पेटवा,
व्हा स्वतःचे शिल्पकार,
शहाणपणानेच बदलेल,
आयुष्याचा आकार.
संसार अन् परमार्थ,
दोन्ही होतील सुखी,
जेव्हा विवेकाचे शहाणपण,
नांदेल तुमच्या मुखी.
🕉️
"शहाणपण हे अनुभवाच्या भट्टीतून आणि गुरूंच्या मार्गदर्शनातून तयार होणारे लेणे आहे. ते केवळ ऐकून नाही, तर जगून सिद्ध करावे लागते."
🕉️ #🙏गुरु महिमा😇 #🙏🏻हनुमान जी के भजन #🙏गीता ज्ञान🛕 #🙏🏻आध्यात्मिकता😇 #🙏कर्म क्या है❓
🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️
या जगात सर्व काही मिळतं पण एकच गोष्ट मिळत नाही ती म्हणजे "शहाणपण" शहाणपण अशी गोष्टी स्वतःच्या अंगी असावी लागते,
या पृथ्वीतलावर तुम्हाला सर्व काही मिळते, आपल्याला सत्संगात सर्व गोष्टी शिकवल्या जातात सर्व अंगाने ज्ञान दिले जाते म्हणून आपल्याला सत्संगातच खरे शहाणपण मिळते, पण ते शहाणपण आपण अंगिकारतो का?? स्वीकारतो का??? हे फार महत्त्वाचे आहे, आपण जर सत्संगात शहाणपण स्वीकारले तर आपण संसारात ते वापरू शकतो,
सर्वांकडे सर्वाना ज्ञान असतं पण त्याचा आपण जीवनात वापर करतो का??? नाही आपल्याला कोणीतरी सांगितले तर आपण त्याचे आचरण करतो का नाही, आपण दुसऱ्याचे ऐकतो का नाही, मग आपण कुठेतरी सत्संगात जातो,
आणि सत्संगात जेव्हा आपल्याला एखादा ज्ञानी व्यक्ती प्रवचन करत असेल सद्गुरूप आपल्या मार्गदर्शन करत असेल तर ते आपण स्वीकारतो अन्यथा आपण कधीही कोणाचे ज्ञान स्वीकारत नाही,
आपल्याकडे नाती गोती आहेत आई वडील मामा काकी आत्या मावशी भावंड बहीण भाऊ पण आपल्याला खरंच नाते सांभाळायचं शहाणपण आहे का??? आपण खरच त्यांना समजून घेतो का??
आजच्या या युगात नाती सांभाळणे किती कठीण झाले आहे, याचे कारण एकच की आपल्याकडे शहाणपण नसल्यामुळे, मग तो कोणी असो स्त्री असो पुरुष असो मुल असो कोणती पण नाते असू दे, एकमेकांना समजून घेणे फार कठीण आहे याचे कारण शहाणपणाचा अभाव नसल्यामुळे
कधी कधी सत्संगात जाऊनही आपल्याला शहाणपण येत नाही, कारण की आपण जे संत सद्गुरू असतात त्यांच्याकडून आपण काय ज्ञानग्रहण करायचे गुरूंचे आपण काय ऐकायचं काय सोडायचं असतं गुरु नेमके काय असतात हे आपल्याला समजत नाही???
सद्गुरु सांगतो आपल्याला एक आपण ऐकतो दोन???
हे सर्व समजून घेण्यासाठी आपल्याकडे पहिले कोरी पाटी असणे आवश्यक आहे, नम्रता लागते, आचरण लागते, शरणागति लागते, तरच आपण ज्ञानग्रहण करू शकतो,
आणि ते ज्ञानग्रहण करून जेव्हा आपण आचरणात उतरवतो त्या आचरणातून आपल्याला शहाणपण निर्माण होते, मग ती शहाणपण आपण संसारात सहज आपण वापरू शकतो, सर्वांशी कसे प्रेमाने वागावे कसे प्रेमाने बोलावे कुठे नम्रता घ्यावी कुठे सोडून द्यावे कुठे पकडून ठेवायचे हे सर्व शहाणपण आल्यामुळे आपला सहज संसार आणि परमार्थ सुखाचा होतो.
असो जीवनात शहाणपण खूप महत्त्वाचे आहे, आणि या शहाणपण तुमच्या आतून येत असते, असं हे शहाणपण अंतरंगात उतरवायचे की नाही उतरायचे हे तुम्ही ठरवा कारण की तुम्हीच आहात तुमच्या जीवनाची निर्माते.
🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️ #🙏🏻आध्यात्मिकता😇 #🙏🏻हनुमान जी के भजन #🙏कर्म क्या है❓ #🙏गीता ज्ञान🛕 #🙏गुरु महिमा😇
🕉️
देवाच्या भजनासाठी वेगळा वेळ काढायला नको काम करता करता नामस्मरण करत जावे म्हणून म्हटलं हाताने काम मुखाने राम असं आपण करत जायचं काम करता करता हरिपाठ म्हणत चला आणि आठवड्यातून एक दिवस सर्वजण एकत्र येऊन हरिपाठ करूया....
त्याच्याने जास्त फायदा आपल्या जीवनात होईल, आपल्या जीवनात आपल्या मुळाबाळांना आशीर्वाद मिळेल आपले ही आतून उन्नति होईल, आणि शंभर टक्के नाही तर एक से एक टक्का माझा विश्वास आहे.
मुसलमान लोक नमाज पडायला दर शुक्रवार एकत्र जाता,
आपण एक आठवड्यातून हरिपाठ करायला एकत्र का येवू शकत नाही, जागे व्हा आता तरी, वेळ गेली नाही,
बहाने करणे सोडा जीवनाचे नंदनवन करा खाण्यापिणे फिरणे वेळ नाही गावी गेलो फिरायला गेलो सुट्टी होती म्हणून फिरायला जातो, हे तुम्हाला काही कामात येणार नाही, पण देवाचे भजन एकत्र येऊन केलेले शंभर टक्क्याने हजार एकशे एक टक्का कामात येईल.
देव जेव्हा बुद्धी वाटतो तेव्हा लाईनीत उभे राहायचे मग म्हणू नका आम्ही फिरायला गेलो होतो?????
🕉️ #🙏गीता ज्ञान🛕 #🙏🏻हनुमान जी के भजन #🙏गुरु महिमा😇 #🙏कर्म क्या है❓ #🙏🏻आध्यात्मिकता😇
🕉️
उपासना म्हणजे उप म्हणजे जवळ आसन म्हणजे बैठक परमात्म्याच्या अगदी निकट जाण्याचा एक अंतर्मुख प्रवास. म्हणजे उपासना, रोज नित्य नियमाने आपण देवाचे नामस्मरण केले पाहिजे, रोज एकदा तरी हरिपाठ केला पाहिजे,
आपण जो सार्वजनिक सत्संग हरिपाठ घेतो तो परमात्मा जवळ जाण्याचा मार्ग आहे, तसाच रोज नित्यनेमाने आपण हरिपाठ केला पाहिजे, देवाचे नामस्मरण चिंतन केले पाहिजे,
नामस्मरण भजन भक्ति भावाने केले पाहिजे, म्हणजे आपले देवाजवळ बैठक नेणे होय, आणि प्रत्येकाने आवश्य केले पाहिजे, म्हणजे आपल्या नित्य कर्म ने आपले मन अंतरंग परिशुद्ध होत जाते, हृदयात भगवंतासाठी जागा होते,
जसे आपण नाष्टा जेवण रात्रीचे जेवण विसरत नाही??? पाणी पिणे विसरत नाही???? श्वास घेणे विसरत नाही??? प्रत्येकाच्या घरातील लोकांची काळजी घेणे विसरत नाही?? प्रत्येकाला जेवण देणे विसरत नाही??? घराला झाडू मारणे रोज विसरत नाही??? कपडे धुणे विसरत नाही??
तसेच नामस्मरण हरिपाठ विसरता कामा नये हे जीवनाचे जीवन आहे हे लक्षात ठेवावे हा मार्ग आपल्याला देवाजवळ घेऊन जातो, म्हणून नित्यक्रम तसेच कामांसाठी असतो तसे देवाच्या नामस्मरण हरिपाठ करण्यासाठी असावा.
हाताने काम मुखाने नाम हे हृदयामध्ये आत्माराम जीवनाचे सार आहे.
🕉️ #🙏कर्म क्या है❓ #🙏🏻हनुमान जी के भजन #🙏🏻आध्यात्मिकता😇 #🙏गुरु महिमा😇 #🙏गीता ज्ञान🛕
॥ आत्मज्ञानातून आनंदाचा शोध ॥
🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️
"आनंद" हे आपले मूळ स्वरूप असूनही आपण दुःखी का आहोत? कारण आपण त्याला आपल्या अंतर्यामी शोधत नाही. तो आपल्या अत्यंत जवळ, आपल्या आतच आहे; तरीही त्याचा आपल्याला पत्ता लागत नाही.
जगातील बाह्य वस्तूंमध्ये जो आनंद आपल्याला दिसतो, तो प्रत्यक्षात विखुरलेला आहे. ज्याप्रमाणे ताकामध्ये लोणी विखुरलेले असते, त्याचप्रमाणे या जीवनात आपला आनंद वेगवेगळ्या भौतिक वस्तूंमध्ये विभागलेला असतो.
एखादी वस्तू मिळाली की आपल्याला आनंद होतो, पण तो क्षणिक असतो.
या विखुरलेल्या आनंदाला एकत्रित करून त्याचा अक्षय स्रोत अनुभवण्यासाठी एकच पर्याय आहे— 'सद्गुरू'.
जेव्हा आपण सद्गुरूंना शरण जातो, तेव्हा ते आपल्याला 'आत्मज्ञानाचा मार्ग' दाखवतात.
सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली जेव्हा तुम्ही आत्मज्ञानाची अनुभूती घेता, तेव्हाच तो विखुरलेला आनंद एकत्रित होऊन तुमच्या अंतर्मनात प्रकट होतो. एकदा का अंतरीचा हा आनंदाचा झरा गवसला, की मग संपूर्ण विश्वच आनंदाने भरलेले आहे, असा दिव्य अनुभव तुम्हाला येईल.
🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️ #🙏गुरु महिमा😇 #🙏🏻हनुमान जी के भजन #🙏गीता ज्ञान🛕 #🙏🏻आध्यात्मिकता😇 #🙏कर्म क्या है❓













