
Kiran Gosavi
@kirangosvi
!! ओम नमो आदेश सत नमो आदेश
नाथजी गुरुजी को आदेश!!
#ओम श्री नवनाथाय नमः #!! ओम चैतन्य मच्छिन्द्रनाथाय नमः !! #गोरक्षनाथ वाणी #ओम चैतन्य कानिफनाथाय नमः #ओम शिवगोरक्ष
## ‼️ गजानना श्री गणराया ‼️
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ। निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥ संकष्टी चतुर्थीच्या आपणांस हार्दिक शुभेच्छा!🙏
#🌺💐दख्खनचा राजा जोतिबा माझा 💐🌺 #ज्योतिबाच्या नावानं चांगभलं 🙏🏻🌺 #🚩जोतिबाच्या नावानं चांगभलं🚩 #🔱🚩 दख्खनचा राजा जोतिबा माझा 🙏🏻 #🙏 दख्खनचा राजा श्री जोतिबा
☀️🌍🕉️#दख्खनचा_राजा_श्री_जोतिबा🕉️ 🌍 ☀️ *🌾⚜🔱#श्री जोतिर्लिंग प्रसन्न🔱⚜🌾*
*श्री जोतिबा देवाची आज #फाल्गुन कृष्ण पक्ष #द्वितीया #गुरुवार दिनांक ०५.०३.२०२६ रोजी श्रींची सकाळी बांधलेली खडी महाअलंकारिक महापुजा*🙏🏻🌺🦚🌺🦚🌺🦚🌺🦚🌺🦚🌺🦚🌺🦚🌺🦚‼🔔‼ *बोला श्री जोतिबा च्या नावांन चांगभल ‼🔔‼चांगभल‼🔔‼चांगभल‼🔔‼चांगभल‼*🔔🦚🏵️🦚🏵️🦚🏵️🦚🏵️🏵️🦚🏵️🦚🏵️🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🌹🙏🌺🌹🙏
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
#🙏संत तुकाराम बीज दिन🌹
आज जगद्गुरू संत शिरोमणी श्री तुकाराम महाराजांचा सदेह वैकुंठगमन सोहळा.त्यांच्या चरणी साष्टांग दंडवत 🙏🙏🙏
जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या वैकुंठगमानाच्या दिवशी आजही मध्यान्ही देहूतील नांदुर्कीचा पुरातन पावन वृक्ष सळसळतो,
इ.स. १६०९ मध्ये माघ शुद्ध पंचमी, वसंतपंचमीला त्यांचा जन्म झाला व इ.स. १६५० साली फाल्गुन कृष्ण द्वितीयेला, वयाच्या अवघ्या ४१ व्या वर्षी ते भगवान पंढरीरायांच्या साक्षीने सदेह वैकुंठाला गेले, असे म्हटले जाते.
चारचौघांप्रमाणे सामान्य जीवन वाट्याला आलेले असूनही तुकोबांनी आपत्तींनी घेरलेल्या जगण्यातील वेगळा अर्थ सर्वांना समजावून सांगितला. व्यवहाराची थोर शिकवण शब्दाशब्दांतून देत असतानाच भक्तीचे सहस्यही उलगडून दाखविले.
‼️जगरहाटीचे दर्शन आपल्या अभंगानुभवातून शब्दबद्ध केले‼️
तुकोबा एका सुखवस्तू घरात जन्माला आले. त्यांची वंशकुळी मोरे आणि आडनाव अंबिले. तीन भावांमध्ये तुकोबा मधले. थोरला भाऊ थोडासा विरक्त. घर-प्रपंच व्यवस्थित चाललेला असताना या कुटुंबावर एकामागोमाग एक आपत्ती कोसळू लागल्या. आईवडील गेले, थोरल्याची बायको गेली, तुकोबांची नेहमी आजारी असणारी पहिली पत्नी रखमाबाई हीदेखील गेली. सुस्थितीत असणाऱ्या तुकोबांवर कर्जबाजारी होण्याचा प्रसंग आला. या अशा अपघातात सर्वसामान्य माणसे खचून जातात, तुकोबांच्या थोरल्या भावाप्रमाणे घर-संसार सोडून निघून जातात किंवा वैतागून देहत्यागही करतात. इथेच तुकोबांचे थोरपण आहे. तुकोबा हरिचिंतनात निमग्न झाले. आपल्याला झालेल्या जगरहाटीचे दर्शन त्यांनी आपल्या अभंगानुभवातून शब्दबद्ध केले. संसारात वावरत असताना येणाऱ्या सुख-दुःखांना काही अंतरावर कसे ठेवावे, गुंतून न राहताही संसार कसा करता येतो त्याचे मार्गदर्शन तुकोबांसारखे दुसऱ्या कोणी केलेले नाही. स्वतः कटू अनुभवांचे हलाहल पचवून जगाला सद्विचारांचे अमृत उपलब्ध करुन देणारे तुकोबा महान संत आहेत.
‼️अद्भुत कार्याने अवघ्या महाराष्ट्रालाच नाही, तर संपूर्ण विश्वाला लावले वेड‼️
'मराठी म्हणजे माउली-तुकोबांची भाषा', असे समीकरणच आता रूढ झालेले आहे. त्यांची अजरामर अभंगवाणी ही त्यांच्याचसारखी अद्भुत गुणवैशिष्ट्ये असणारी, त्यांची साक्षात् वाङ्मयी श्रीमूर्तीच आहे. तिच्या रूपाने प्रत्यक्ष श्री तुकाराम महाराजच सदैव आपल्याला आशीर्वाद देत आहेत. "धन्य म्हणवीन येह लोकीं लोकां ।" अशी आपली प्रतिज्ञा पूर्ण करून प्रत्यक्ष देहाने वैकुंठगमन करणारे, आपल्या विलक्षण अभंगवाणीच्या माध्यमातून जनमानसाला विठ्ठलभक्ती, सदाचरण, परोपकार इत्यादी सद्गुण-मूल्यांचे सुयोग्य मार्गदर्शन करणारे,
"भले तरी देऊ कासेची लंगोटी । नाठाळाचे माथी हाणू काठी ।"
असा दुर्दम्य आत्मविश्वास असणारे, अत्यंत सडेतोड, परखड; पण त्याचवेळी मनाने अत्यंत सरळ, साधे, प्रेमळ असे श्री तुकोबाराय हे फार विलक्षण अवतारी सत्पुरुष होते.
🚩देहूतील नांदुरकी वृक्ष आजही हलतो🚩
आजही या द्वितीयेच्या मध्यान्ही देहूच्या इंद्रायणीगंगेच्या काठावरचा नांदुर्कीचा पुरातन पावन वृक्ष श्रीभगवंतांच्या आगमनाची शकुन लक्षणे जाणून सळसळतो, पक्षिराज गरुडाच्या विशाल पंखांच्या फडात्काराने वाहणाऱ्या वाऱ्याच्या तीव्र वेगाने आसमंत सुगंधित होतो, इंद्रायणीचा पुनीत काठही श्रीभगवंतांच्या दिव्य पदस्पर्शाने शहारतो, देवांना साक्षात् समोर पाहून, विश्व व्यापून उरलेल्या श्री तुकोबारायांचा कंठ आजही तितकाच दाटतो, त्यांचे थरथरणारे हात तेवढ्याच प्रेमावेगाने श्रीभगवंतांच्या चरणांना मिठी मारतात, नेत्रांतून अविरत वाहणारे आनंदबिंदू लक्ष्मीमातेने सेवन केलेले तेच पुण्यपावन श्रीचरण पुन्हा एकदा धुवून काढतात, श्रीभगवंतही आपल्या या लाडक्या सख्याला अत्यंत आनंदाने, अभिमानाने उराशी कवटाळतात; आणि तोच अलौकिक, अपूर्व-मनोहर, अद्वितीय वैकुंठगमन सोहळा पुन्हा एकदा नव्याने साकारतो.
‼️काव्यातील गोडवा व भाषेची रसाळता अतुलनीय‼️
तुकाराम महाराज हे साक्षात्कारी व निर्भीड संत कवी होते. विशिष्ट वर्गाची पारंपरिक मक्तेदारी असलेला वेदार्थ तुकोबांच्या अभंगवाणीतून सामान्य जनांपर्यंत प्रवाहित झाला. संत तुकारामांचे अभंग महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे महान द्योतक आहेत. वारकरी, ईश्र्वरभक्त, साहित्यिक, अभ्यासक व सामान्य रसिक आजही त्यांच्या अभंगांचा अभ्यास करतात. भागवत धर्माचा कळस होण्याचे महद्भाग्य त्यांना लाभले. महाराष्ट्राच्या हृदयात अभंगरूपाने तुकोबा स्थिरावले आहेत. त्यांच्या अभंगांत परतत्त्वाचा स्पर्श आहे. तुकोबांच्या काव्यातील गोडवा व भाषेची रसाळता अतुलनीय आहे. संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगलेखनाबरोबरच गवळणीही रचल्या.
‼️संत तुकारामांचे धर्मक्रांतीचे समाज प्रबोधन आजही समाजाला मार्गदर्शक‼️
खऱ्या अर्थाने संत तुकाराम हे या काळातील लोक संत होते. बहुजन समाजाला जागृत करून देवधर्म यासंबंधी मते लोकांना पटवून देण्यामध्ये ते यशस्वी झाले. देव धर्मातील अनागोंदी त्याचप्रमाणे भोळ्या समजुती प्रयत्नपूर्वक नष्ट करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. समाजमनावरील अंधश्रद्धेचा पगडा दूर करून लोकांना नवा धर्म, नवी भाषा देण्याचे काम संत तुकारामांनी केले. संत तुकारामांचे धर्मक्रांतीचे समाज प्रबोधन आजही समाजाला मार्गदर्शक ठरलेले आहे. त्यांचे अभंग मानवी जीवनाला उपकारक ठरले आहेत.
🚩संत तुकाराम गाथा म्हणजे बहुजनांची गीता🚩
संत तुकाराम गाथा म्हणजे बहुजनांची गीता आहे. ज्ञानोबा आणि तुकाराम म्हणजे महाराष्ट्राची संस्कृतिक विद्यापीठे आहेत. त्यांचे साहित्य म्हणजे आध्यात्मिक ज्ञानाचा आधारवड आहे. ज्ञानेश्वरानंतर जनार्दन स्वामी, एकनाथ महाराज, नामदेव आणि त्यानंतर संत तुकाराम यांनी भागवत धर्माची पताका सर्वत्र फडकवली. भागवत धर्माचा कळस ठरलेल्या संत तुकारामांनी बहुजन समाजामध्ये पसरलेली धर्म-कर्मकांडाची जळमटे आपल्या कीर्तनातून पुसून टाकली. अभंगवाणी महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये वसली. अभंगवाणीतून सत्यधर्माची शिकवण जगाला संत तुकाराम यांनी दिली.
महापुरुष, संत, कवी हे जन्मावे लागतात, ते घडविता येत नाहीत असे आपण समजतो. हा समज खोटा ठरविणारे आपल्याकडील जबरदस्त व्यक्तिमत्त्व म्हणजे जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज. भगवद्भक्तीची पताका खांद्यावर घेऊन आसमंतात जनजागृतीचे वादळ निर्माण केले. तुकोबांचे अभंग वाचणारा प्रत्येकजण या वादळाने झपाटला जातो. तुकोबा वामनाप्रमाणे सारी भूमी पादाक्रांत करतात आणि आकाशालाही गवसणी घालतात. सागराचा ठाव घेणारी आणि हिमालयाच्या उंचीला स्पर्श करणारी अशी तुकोबांची लोकोत्तर प्रतिभा आहे.
आम्ही जातों तुम्ही कृपा असों द्यावी ।
सकळां सांगावी विनंती माझी ॥१॥
वाड वेळ झाला उभा पांडुरंग ।
वैकुंठा श्रीरंग बोलावितो ॥२॥
अंतकाळी विठो आम्हांसी पावला ।
कुडीसहित झाला गुप्त तुका ॥३॥
हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे ।
हरे राम हरे राम राम राम हरे हरे ॥
अनेक संतांनी अनेक शतके या निद्रेमधे रममाण असणाऱ्या मुर्ख जनमानसाला जागे करण्याचा प्रयत्न केला, त्यांनी ओरडुन ओरडुन सांगितले की बाबांनो वैकुंठ आहे, भगवान तेथे राहतो आणि आपण ही त्याच्या गावात जाऊन त्याच्याबरोबर राहू शकतो.
"जाऊ देवाचिया गावा । घेऊ तेथेचि विसावा ॥"
परंतु निराकारवाद आणि नास्तिकवादाच्या गर्तेत अडकलेल्या लोकांना संत शिरोमणी श्री तुकाराम महाराजांनी खरा वेदांचा अर्थ सांगितला. निराकारवाद आणि नास्तिकवादाचे खंडण केले.
"अहम् म्हणे ब्रम्ह नेणे भक्तीचे ते वर्म ।
तुका म्हणे क्षण नको तयाचे दर्शन ॥"
"तुका म्हणे जरी देवी नाहीं चाड ।
हाणोनी थोबाड फोडी काळ ॥"
तुकाराम महाराजांनी आपल्या गाथेमधे काय दिले नाहीं❓त्यांनी संसार कसा करावा येथुन सुरु करुन संसारातुन विरक्त कसे व्हावे हे सांगितले. सुख आणि दु:खात कसे भगवंताना शरण राहुन समदृष्ट रहावे हे शिकवले. भक्ती, भक्त आणि भगवान या तत्वांचे विस्तृत वर्णन केले. कोण भोंदू कोण साधु, कलियुगाचा मानवावर झालेला प्रभाव, पाखंड खंडण, नास्तिकवाद, मायावाद, अद्वैतवाद, शून्यवाद अशा एक ना अनेक अर्थहीन मतांतरांना तुकाराम महाराजांनी खोडुन काढले!आणि सरतेशेवटी वारकरी संप्रदायाचा कळस होऊन, सदेह वैकुंठाला गेले. संत निळोबाराय म्हणतात, सर्व संत जे इतकी वर्षे पोटतिडकीने सांगत होते की वैकुंठात श्रीहरी राहतो, तो तेथे आपल्याशी आदान प्रदान करतो, आपल्या बरोबर जेवतो, खेळतो, चेष्टा मस्करी करतो.
प्रयाणकाळी देवे विमान पाठविले ।
कलिच्या काळामाजी अद्भुत वर्तविले ॥
मानव देह घेऊनी निजधामा गेले ।
निळा म्हणे सकळ संता तोषविले ॥
माझा देव काही निराकार नाहीं,काही मुर्ख लोक म्हणतात की त्याला डोळे नाहीत, कान नाहीत, सुंदर मुख, रुप नाहीं, अशांचा एक क्षणही मला संग नको. परमसत्य हे एकाच वेळी साकार ही आहे आणि निराकार ही, कारण ते जर केवळ निराकार असेल तर ते परमसत्य असु शकत नाहीं, ते सर्व शक्यता परिपूर्ण करणारं असलं पाहिजे. म्हणुनच त्याचे परमरुप हे भगवद्गीता तसेच भागवतात ठळकपणे सांगितल्याप्रमाणे साकार आहे.
तुकाराम महाराजांच्या इतक्या निस्सिम भक्तीमुळे स्वत: भगवान पांडुरंग तुकाराम महाराजांना घ्यायला वैकुंठावरुन स्वत:चे वाहन श्रीगरुडांना घेऊन या मृत्युलोकात आले.
आणि तुकाराम महाराज विमान आल्याआल्या लगेच गेले नाहीत, त्यांनी जाण्याअगोदर शेवटचे कीर्तन केले आणि उपस्थित सर्वांना आपल्या बरोबर वैकुंठामधे येण्याचे आवाहन केले, परंतु कोणीही त्यांच्या बरोबर गेले नाहीं. वैकुंठाला गेल्यानंतर तीन वेळा तीन जणांसाठी तुकाराम महाराज वैकुंठावरुन परत आले आणि परत वैकुंठाला गेले. ते तीन जण म्हणजे त्यांची कन्या भागीरथी, त्यांना कीर्तनात साथ करणारे संताजी महाराज जगनाडे आणि त्यांनी ज्यांना अनुग्रह दिला असे संत निळोबाराय.सामाजिक परिवर्तनाची वादळ सर्वत्र पसरले. जाती-धर्माची उतरंड त्यांनी मोडून काढली. गुलामगिरीची चौकट मोडली. बहुजन समाजामध्ये स्वाभिमान निर्माण केला. संघर्षमय जीवन जगूनही अध्यात्म, भागवत भक्ती, उपदेशाची कास न सोडणाऱ्या तुकारामांनी फाल्गुन वद्य द्वितीयेला सदेह वैकुंठगमन केले.हे जग आपले घर नसुन वैकुंठ हेच आपले शाश्वत घर आहे, हे सांगुन तुकाराम राज वैकुंठाला निघाले.
आम्ही जातो आमुच्या गावा । आमुचा रामराम घ्यावा ॥
रामराम घ्यावा आमुचा रामराम घ्यावा ।
आम्ही जातो आमुच्या गावा आमुचा रामराम घ्यावा ॥
॥ विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल ॥
🚩रामकृष्णहरि रामकृष्णहरि रामकृष्णहरि🚩
संकलन :अनुप रैच नागपूर
#श्री दत्तात्रेय जयंती श्री गुरूदेव दत्त
•❀•॥जय श्री गुरूदेव दत्त॥•❀•
. ❁!!*श्रीदत्तात्रेयप्रातः स्मरणस्तोत्रम्*!!❁
प्रातः स्मरामि करुणावरुणालयं तम् । श्रीदत्तमार्तवरदं वरदण्डहस्तम्॥१॥
सन्तं निजार्तिशमनं दमनं विनीत -स्वान्तर्गताखिलमलं विमलं प्रशांतम्॥२॥
प्रातर्भजामि भजदिष्टवरप्रदं तम् । दत्तं प्रसादसदनं वरहीरदं तम्॥३॥
कान्तं मुदात्रितनयं भवमोक्षहेतुम् । सेतुं वृषस्य परमं जगदादिहेतुम् ॥४॥
प्रातर्नमामि प्रयतोऽनसूया -पुत्रं स्वमित्रं यमितोऽनसूयाः॥५॥भूयांस आप्तास्तमिहार्तबंधुं । कारुण्यसिन्धुं प्रणमामि भक्त्या ॥६॥
लोकत्रयगुरोर्यस्तु श्लोकत्रयमिदं पठेत् । श्रीदत्तात्रेयदेवस्य तस्य संसारभीः कुतः॥७॥
इति श्री. प. प. श्रीवासुदेवानन्दसरस्वतीविरचितं श्रीदत्तात्रेयप्रातः स्मरणस्तोत्रं संपूर्णम् ॥
✧॥ॐ जय श्री गुरुदेव दत्त॥✧
#!! ओम चैतन्य मच्छिन्द्रनाथाय नमः !! #ओम श्री नवनाथाय नमः #ओम शिवगोरक्ष #ओम चैतन्य कानिफनाथाय नमः #गोरक्षनाथ वाणी
"हे साधं ध्यान नाही… ही नवनाथ परंपरेची ऊर्जा आहे!"
ध्यानात बसलेले मच्छिंद्रनाथ…
पण या शांततेत दडलेली आहे प्रचंड शक्ती 🔥
ज्यांनी त्यांच्या चरणी श्रद्धा ठेवली,
त्यांच्या आयुष्यातील संकटे वितळली 🙏
#ओम श्री नवनाथाय नमः #!! ओम चैतन्य मच्छिन्द्रनाथाय नमः !! #ओम शिवगोरक्ष #ओम चैतन्य कानिफनाथाय नमः #गोरक्षनाथ वाणी
नाथ संप्रदायात मच्छिंद्रनाथ यांना बडेबाबा म्हणून आदर दिला जातो. त्यांनी सांगितलेला खरा विजय हा बाहेरील जगावर नसून स्वतःच्या मनावर असतो. माणसाने काम क्रोध लोभ मोह मद आणि मत्सर या षड्रिपूंवर नियंत्रण मिळवले पाहिजे असे त्यांचे तत्त्वज्ञान आहे.
कारण हेच अंतर्गत शत्रू मन अस्थिर करतात आणि जीवनात दुःख निर्माण करतात. योग साधना ध्यान संयम आणि सतत आत्मचिंतन यांच्या माध्यमातून मन शुद्ध केले तर खरा विजय प्राप्त होतो. बडेबाबा मच्छिंद्रनाथ यांचा संदेश असा आहे की ज्याने स्वतःच्या मनावर विजय मिळवला तोच खरा विजेता आहे आणि त्यालाच जीवनातील शांती आणि समाधान प्राप्त होते.
ॐ नमो आदेश 🔱🌹
#ओम चैतन्य कानिफनाथाय नमः #ओम श्री नवनाथाय नमः #!! ओम चैतन्य मच्छिन्द्रनाथाय नमः !! #गोरक्षनाथ वाणी #ओम शिवगोरक्ष
‼️ॐ नमो आदेश ‼️
ॐ चैतन्य श्री कानिफनाथ महाराज की जय 🙏🔱🚩
#🙏 दख्खनचा राजा श्री जोतिबा #🔱🚩 दख्खनचा राजा जोतिबा माझा 🙏🏻 #🚩जोतिबाच्या नावानं चांगभलं🚩 #ज्योतिबाच्या नावानं चांगभलं 🙏🏻🌺 #🌺💐दख्खनचा राजा जोतिबा माझा 💐🌺
✨☀️⚜#दख्खनचा_राजा ✨☀️⚜
*‼️श्री ज्योतिर्लिंग प्रसन्न ‼️*
*श्री जोतिबा देवांची आज #फाल्गुन कृष्ण पक्ष #प्रतिपदा #बुधवार दिनांक ०४.०३.२०२६ रोजी दुपारी ३ च्या अभिषेकानंतर श्रींची बांधलेली बैठी महाअलंकारिक महापूजा*🙏🏻🍒🦚🍒🦚🍒🦚🍒🦚🍒🦚🍒🦚🍒🦚🍒🦚‼🔔‼ *बोला जोतिबाच्या नावांन‼🔔‼चांगभल‼🔔‼चांगभल‼🔔‼चांगभल‼🔔‼* 🦚🍒🦚🍒🦚🍒🦚🍒🦚🍒🦚🍒🦚🍒🙏🏻💐🙏🏻💐🙏🏻💐🙏🏻💐🙏🏻💐🙏🏻💐🙏🏻💐🙏🏻💐🙏🏻💐 🙏🙏🌺🌸
🙏🙏🙏🙏🙏🙏








