
कृपासिंधु
@kurpasindu
वाहिला हा देह "श्री स्वामींच्या" सेवा-कार्यासाठी
🕉️☯️🛐
*🪷आई कामाख्या शक्तिपीठ येथील कुंडांविषयी श्रद्धापूर्वक स्पष्ट माहिती पुढीलप्रमाणे देत आहे.*
*(ही माहिती प्रामुख्याने स्थानिक परंपरा, तीर्थवर्णने आणि कामाख्या क्षेत्रातील प्रचलित मान्यतांवर आधारित आहे.)*
*कामाख्या_शक्तिपीठातील_प्रमुख_कुंडांची_नावे_आणि_स्थान*
*कामाख्या धाम (नीलाचल पर्वत, गुवाहाटी, असम) येथे अनेक पवित्र कुंड मानले जातात. यांचा संबंध शक्ती-साधना, स्नान, शुद्धी आणि तीर्थमहिमेशी आहे.*
*(1) #सौभाग्य_कुंड*
*स्थान— कामाख्या मंदिर परिसराच्या जवळ आहे.*
*महिमा— हा कुंड विशेषतः सौभाग्य, दांपत्यसुख आणि गृहस्थ मंगलाशी संबंधित मानला जातो. भक्त येथे श्रद्धेने जलस्पर्श करतात.*
*(2) #ब्रह्म_कुंड*
*स्थान— मंदिर क्षेत्राजवळ, नीलाचल पर्वतावर आहे.*
*महत्त्व— अत्यंत प्राचीन व पवित्र कुंड मानला जातो. परंपरेनुसार तीर्थशुद्धी व साधनेपूर्व स्नानासाठीचे स्थान आहे.*
*(3) #देवी_कुंड (किंवा शक्ती कुंड)*
*स्थान— मंदिराच्या आतील क्षेत्राजवळ आहे.*
*विशेषता— हा कुंड देवीच्या शक्तितत्त्वाशी संबंधित मानला जातो. काही परंपरांत तो साधकांसाठी विशेष तीर्थ मानला जातो.*
*(4) #अमृत_कुंड*
*स्थान— नीलाचल पर्वत क्षेत्रात आहे.*
*मान्यता— या कुंडाचे पाणी मंगलकारी व कृपादायी मानले जाते. मात्र सर्वसामान्य यात्रेकरूंना ते नेहमी उपलब्ध नसते.*.
*(5) #नाग_कुंड*
*स्थान— कामाख्या क्षेत्रापासून थोड्या अंतरावर, पर्वतीय भागात आहे.*
*महत्त्व— नागपरंपरा व तांत्रिक परंपरेच्या प्राचीन स्मृतीशी जोडलेले मानले जाते. काही साधकांसाठी हे विशेष साधनास्थान आहे.*
*(6) #पाताळ_कुंड*
*(लोकमान्यता)*
*स्थान— नीलाचलच्या गुप्त भागात असल्याचे सांगितले जाते.*
*विशेषता— हा कुंड मुख्यतः गूढ तांत्रिक परंपरांत वर्णिला जातो. सर्वसामान्य यात्रेकरूंना तो स्पष्टपणे दर्शनीय नसतो.*
*हे कुंड नेमके कुठे आहेत?*
*बहुतेक प्रमुख कुंड पुढील परिसरात असल्याचे मानले जाते—*
*• नीलाचल पर्वत*
*• कामाख्या मंदिर परिसर*
*• मंदिराभोवतालच्या तीर्थक्षेत्रात*
*कामाख्या मंदिराचे स्थान गुवाहाटी (असम) येथे, ब्रह्मपुत्र नदीच्या काठाजवळ आहे.*
*#महत्त्वाची_सत्य_माहिती*
*कामाख्या धामातील कुंडांची नावे स्थानिक परंपरा आणि साधनाग्रंथांत भिन्न स्वरूपात आढळतात. आजही—*
*• काही कुंड मंदिर प्रशासनाने संरक्षित केलेले आहेत*
*• काही गुप्त / अप्रकाशित तीर्थ मानले जातात*
*• काही फक्त परंपरागत वर्णनांमध्येच उल्लेखिले जातात*
*आपले आपल्या परिवाराचे भविष्य, मुलांचे करिअर, शिक्षण, नोकरी, धंदा, विवाह, संतती, दारूनशा, वास्तूदोष, निवारण करण्यासाठी सकाळी अकरा वाजेपासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत संपर्क करू शकतात*
*📚📕🌎 संजय हिरे नाशिक #🙏भक्ती सुविचार📝 #🙏 प्रेरणादायक बॅनर #🙏श्री स्वामी समर्थ📿 #🙏श्री गुरुदेव दत्त💐 #🙏प्रेरणादायक / सुविचार
*श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट*
पुष्प -२
श्रीनृसिंहसरस्वती ज्या कर्दलीवनातून अदृष्य झाले तेथूनच श्रीस्वामींचे अवतरण झाले ' आपण कोठून आला ?'
या प्रश्नाला उत्तर देताना श्रीस्वामींनी सांगितले कि , ‘प्रथम आम्ही कर्दलीवनातून निघालो. पुढे फिरत फिरत कलकत्ता वगैरे शहरे पाहिली. बांगलादेश हिंडून कालीदेवीचे दर्शन घेतले. गंगा तटाकाने फिरत फिरत हरिद्वार व केदारेश्वर पाहिले. पुढे आम्ही गोदातटाकास आलो. गोदावरीचे स्नान करून हिंडत-हिंडत हैद्राबादेस गेलो. तेथे काही दिवस राहून नंतर पंढरपूर व बेगमपूर इथे जाऊन हिंडत मोहोळास आलो. तेथून सोलापुरास आलो. तेथे काही महिने राहून अक्कलकोटास आलो तो येथेच आहे.’ (कै. ग.ब. मुळेकर लिखित श्री स्वामी महाराज चरित्र पृष्ठ ५) श्री स्वामी महाराज मंगळवेढ्यात प्रकटले. याविषयीचा ऐतिहासिक संदर्भ चरित्रकारांनी नोंदविला आहे.
“शके सतराशे साठात ।
स्वामी जगदुद्धारार्थ ।
प्रकटले मंगळवेढ्यात ।
साक्षात दत्त अवतारे ॥”
(अ.स्वा. ली.अ. १ ओवी १६)
तेथून श्रीमाणिकप्रभूंच्या भेटीनंतर श्री स्वामी समर्थ हे अक्कलकोटास शके १७७९च्या आरंभीस आले. श्रीमंत मालोजीराजे त्यावेळेस नुकतेच राज्यपदारूढ झाले होते. त्यांची स्वामींच्या चरणी अपार श्रद्धा होती. श्री स्वामी समर्थांचे प्रकट वास्तव्य एकूण ४० वर्षे असून (शके १७६० ते शके १८००) त्यातली २१ वर्षे त्यांनी अक्कलकोट येथे वास्तव्य केले. अक्कलकोट येथील त्यांच्या वास्तव्यात त्यांनी दत्तसंप्रदाय बराच वाढविला.
असे पातकी दीन मी स्वामीराया |
पदी पातलो सिद्ध व्हा उद्धराया ||
नसे अन्य त्राता जगीं या दीनाला |
समर्था तुझ्याविण प्रार्थू कुणाला ||
एकदा कलकत्त्याचे एक इंग्रज बॅरिस्टर व एक पारशी गृहस्थ त्यांच्या दर्शनास आले असता “आपण येथे कोठून आलात?” असा साहेबांनी भीत भीत त्यांस प्रश्न विचारला. तेव्हा स्वामींनी उत्तर दिले ते असे- “प्रथम आम्ही कर्दलीवनातून (हिमालय) निघालो. पुढे फिरत फिरत हरिद्वार व केदारेश्वर पाहिले. नंतर स्वामींनी गावांची व तीर्थक्षेत्रांची शेकडो नावे घेतली. पुढे गोदातटाक हिंडत हिंडत दक्षिण हैद्राबादेस गेलो. तेथून मंगळवेढे, पंढरपूर, बेगमपूर, मोहोळ, सोलापूर अशा गावी रहात रहात अक्कलकोटास आलो.”
अक्कलसे खुदा पछानना” ह्या बोधवचनाची लोकांनी स्मृती रहावी म्हणूनकी काय स्वामी अक्कलकोटास येऊन प्रकट झाले, असा कोटीक्रम कोणी करतात व त्यास त्यांच्या चरित्रातील एका गोष्टीचा दाखला देतात. एकदा कोणी एक मोगलाईतील श्रेष्ठ दर्जाच्या सय्यदाने स्वामींच्या मठाशी येऊन
“क्यों जी, ये अक्कलकोटके स्वामीं कहॉं है?”
असे विचारले. तेव्हा त्यास स्वामींनी नेहमीच्या फटकळ भाषेत उत्तर केले ‘स्वामी बैठे… पर, स्वामी तो अक्कलकोटमें है, ह्या क्या देखता है?” या स्वामींच्या उत्तराने तो सैय्यद समजावयाचे ते समजून एकदम तटस्थ झाला! घटकाभर त्याची उभ्या उभ्याच समाधी लागल्याप्रमाणे दिसून आले. त्यातून तो पूर्वस्थितीवर आल्यावर त्याने मुक्तकंठाने स्वामींचे स्तोत्र गायले व आजपर्यंत अनेक साधने केली; पण हा आनंदानुभव मिळाला नाही. अनेक अवलियांस यापूर्वीही पाहिले, पण आज साक्षात् खुदाचेच दर्शन झाले. “आरे उसी लिये अक्कलके अंदर हरदेमें साहेबकू सच्चा देख लिया, सब जनमका सार्थक हुआ, पलखमें दरया माफक हो गया. किस्मतकी बात हैं मैं आपका बंदा हूं.” इत्यादी धन्योद्गार काढले. यावरून श्रीगुरूंचे निवासस्थान अक्कलकोट किंवा प्रज्ञापुरी हेच योग्य असे स्वामींचे भक्त म्हणू लागले.स्वामी अक्कलकोटीचे म्हणजे बुद्धिगम्य आहेत. ते स्वतःच म्हणाले, अकलसे खुदा पहचानो. निष्क्रिय व जुजबी वागणाऱ्याला आणि चिंतन न करणाऱ्याला स्वामींच्या कृपेचा व शक्तीचा बोध होणार नाही. स्वामी अद्भुत आहेत. निर्बुद्ध व चंचल असणाऱ्याला स्वामींचे 'स्व'रूप व त्यांची विलक्षण कृपासत्ता आणि त्यांचे विलक्षण व्यवहार (अघटित लीला) कळणार नाहीत व अनुभवास येणार नाहीत. स्वामी एकमेव चिरंतन सत्य आहेत. बाकी मायाभ्रम आहे. ते सर्वशक्तीमान असे सर्व विश्वाचे मालक आहेत. स्वामी 'अवधूत' म्हणजे सर्वोच्च संन्यासी आहेत. परमहंस आहेत. स्वामी स्वयंभू, स्वयंसिद्ध आहेत. ते अव्यक्त आहेत. ते भक्तांसाठी नाम व रूप घेतात. स्वामी ॐकारातील पहिला स्वर 'अ'कार, म्हणजे शेषशायी विष्णू भगवान आहेत. स्वामींना कुळ, जात, धर्म, पंथ, सांप्रदाय नाही. त्यांची जात सर्व संतांप्रमाणे कळवळ्याची आहे स्वामी अचलोपम म्हणजे उपमा न देता येण्यासारखे, अथांग सामर्थ्य व ज्ञानरूप आहेत. स्वामी अमर, अतर्क्य व अनुत्तम (सर्वोत्कृष्ट) आहेत. स्वामी तपोमय अजर यतिश्वर आहेत. ते अखंड व सर्व चराचराला व्यापून आहेत. श्री स्वामी समर्थ कल्याणकारी देवतांचे स्वामी आहेत. सर्व देवता आणि ऋद्धी-सिद्धी स्वामींची पूजा करतात. स्वामींना काम क्रोधादी विकार नाहीत. तसे संकल्प आणि विकल्प नाहीत.ते सर्वसाक्षी आहेत. स्वामीच सर्व विश्वातील 'अर्थ', आनंद, प्रेम आणि 'सुख'रूप आहेत. आहेत. स्वामीच सर्व जीवातील प्राण व तेज आहेत. स्वामी नित्य जागृत आहेत. म्हणजेच स्वामींची सर्व देवस्थाने स्वामींच्या अस्तित्वाने जागृत आहेत. स्वामी महाराज हे अतिसूक्ष्म वअतिविराट वटवृक्षासारखे, वटवृक्षाच्या तळी व मुळात (दत्तनगर मूळ मूळ) आहेत. म्हणून साध्या पार्थिव दृष्टीला त्यांचे दर्शन होणे अवघड आहे.``` #🙏श्री स्वामी समर्थ📿 #🙏श्री गुरुदेव दत्त💐 #🙏 प्रेरणादायक बॅनर #🙏प्रेरणादायक / सुविचार #🙏भक्ती सुविचार📝
*श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ*
-----------------------------------------------
*जगाच्या पाठीवर कुठेही भक्त असो, तिथे आपले स्वामी समर्थ महाराज आहेत*
------------------------------------------------
ही घटना आहे अनिकेत देसाई यांची. अनिकेतचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय होता. व्यवसायानिमित्त त्याला रात्री-अपरात्री प्रवास करावा लागे. अनिकेत स्वामींचा भक्त होता, पण तो 'चमत्कारांवर' विश्वास ठेवणारा नव्हता. त्याच्यासाठी 'कष्ट' हेच सर्वस्व होते.
ती पावसाळ्याची रात्र होती. अनिकेत आपल्या नवीन स्कॉर्पिओने पुण्याहून कल्याणला चालला होता. रस्ता माळशेज घाटातून जात होता. रात्रीचे २ वाजले होते. पाऊस इतका भयानक होता की वायपर चालू असूनही समोरचे काही दिसत नव्हते. घाटात दाट धुके (Fog) पसरले होते.
एका अवघड वळणावर अचानक अनिकेतच्या गाडीचे स्टिअरिंग जाम झाले. गाडी नियंत्रणाबाहेर गेली आणि सरळ रस्ता सोडून दरीच्या दिशेने घसरली!
अनिकेतने जोरात ब्रेक मारला.
गाडी थांबली... पण ती अशा अवस्थेत थांबली होती की पुढची दोन्ही चाके हवेत होती आणि खाली हजार फूट खोल दरी!
गाडीचं इंजिन बंद पडलं. अनिकेतचा श्वास अडकला. त्याला कळलं की जर त्याने गाडीतून हलायचा प्रयत्न केला, तर गाडी समतोल गमावेल आणि सरळ दरीत कोसळेल.
बाहेर मिट्ट काळोख, सोसाट्याचा वारा आणि पाऊस. मदतीला कोणीच नव्हतं. मोबाईलला रेंज नव्हती. मृत्यू त्याच्या समोर उभा होता.
१० मिनिटे गेली. अनिकेत देवाचा धावा करू लागला. "स्वामी... काय चूक झाली माझी? आज वाचवा!"
तेवढ्यात...
गाडीच्या मागच्या काचेवर कोणीतरी टक-टक केलं.
ठक... ठक... ठक...
अनिकेतने आरशात पाहिलं. इतक्या रात्री, या घनदाट जंगलात आणि पावसात बाहेर एक वृद्ध माणूस उभा होता.
त्या माणसाने खिडकीतून इशारा केला, "घाबरू नकोस, हँडब्रेक खाली कर आणि गाडी रिव्हर्स घे."
अनिकेत ओरडला, "बाबा, गाडी दरीत पडेल! पुढची चाकं हवेत आहेत!"
तो वृद्ध माणूस खणखणीत आवाजात म्हणाला, "मी सांगतोय ना! तू फक्त माझं नाव घे आणि गाडी मागे घे. मी धरली आहे गाडी!"
त्या आवाजात असा काही अधिकार होता की अनिकेतने डोळे झाकले, "श्री स्वामी समर्थ" म्हटलं आणि गाडी रिव्हर्स घेतली.
आणि काय आश्चर्य
ज्या गाडीला क्रेनशिवाय बाहेर काढणं अशक्य होतं, ती गाडी जणू एखाद्या खेळण्यासारखी अलगद मागे आली आणि रस्त्यावर सुरक्षित उभी राहिली!
अनिकेतच्या जीवात जीव आला. तो धावत गाडीबाहेर आला त्या बाबांचे आभार मानायला.
समोर एक भव्य व्यक्तिमत्त्व उभं होतं. पांढरी दाढी, तेजस्वी डोळे, अंगावर फक्त एक कफनी. ते पावसात उभे होते, पण त्यांचे कपडे ओले झाले नव्हते!
अनिकेतने त्यांचे पाय धरले. "बाबा, तुम्ही देवदूत आहात. मी तुमच्यासाठी काय करू शकतो? तुम्हाला कुठे सोडायचं आहे का?"
ते बाबा हसले. "मला कुठे जायचं नाही, मी इथेच असतो. फक्त एक काम कर... खूप थंडी वाजतेय, तुझी ती गाडीतली 'लाल शाल' मला देशील?"
अनिकेतने क्षणाचाही विलंब न लावता आपल्या गाडीतील नवीन लाल शाल काढली आणि त्या बाबांच्या अंगावर पांघरली.
बाबा म्हणाले, "जा आता. मागे वळून बघू नकोस."
अनिकेत गाडीत बसला. थोडं पुढे गेल्यावर त्याने आरशातून मागे पाहिलं.
रस्ता रिकामा होता. ते बाबा गायब झाले होते.
अनिकेतला वाटलं, कदाचित ते जंगलातल्या वाटेने निघून गेले असतील.
पण खरा धक्का (Twist) त्याला दोन दिवसांनी बसला.
अनिकेत या घटनेनंतर दर्शनासाठी अक्कलकोटला गेला.
त्याने मठात प्रवेश केला. गाभाऱ्यात स्वामींच्या मूर्तीसमोर नतमस्तक झाला.
जेव्हा त्याने मान वर केली आणि स्वामींच्या मूर्तीकडे पाहिले, तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली!
त्याला दरदरून घाम फुटला.
स्वामींच्या मूर्तीला पुजाऱ्यांनी जी शाल नेसवली होती...
ती तीच 'लाल शाल' होती, जी अनिकेतने दोन रात्रींपूर्वी माळशेज घाटात त्या वृद्ध बाबांना दिली होती!
अगदी तीच डिझाइन, तोच रंग!
अनिकेतने धावत जाऊन पुजाऱ्यांना विचारले, "गुरुजी, ही शाल कुठून आली?"
पुजारी म्हणाले, "अहो, काय सांगू! परवा रात्री एक चमत्कारच झाला. सकाळी आम्ही गाभारा उघडला, तेव्हा स्वामींच्या अंगावर ही शाल होती. रात्री तर आम्ही साधी वस्त्रे नेसवली होती. मठाची कडी-कुलपे बंद असताना ही शाल आत आली कशी, हे कोणालाच समजलं नाही. पण भक्तांनी प्रसाद मानून ती तशीच ठेवली आहे."
अनिकेत तिथेच कोसळला आणि रडू लागला.
त्याला समजलं की त्या काळरात्री घाटात त्याची गाडी धरणारे दुसरे तिसरे कोणी नसून साक्षात ब्रह्मांडनायक होते. त्यांनी फक्त भक्ताचा जीव वाचवला नाही, तर त्याची प्रेमाने दिलेली भेट (शाल) सुद्धा स्वीकारली होती.
तुम्ही स्वामींना कुठेही हाक मारा, ते अक्कलकोटला असले तरी भक्तासाठी ते क्षणात 'माळशेज घाटात' ही उभे राहू शकतात.
|| श्री स्वामी समर्थ || #🙏 प्रेरणादायक बॅनर #🙏प्रेरणादायक / सुविचार #🙏श्री गुरुदेव दत्त💐 #🙏भक्ती सुविचार📝 #🙏श्री स्वामी समर्थ📿
*स्वामींच्या प्रकट दिनाविषयीची खरी हकीकत.*
स्वामी समर्थ महाराज कदी आले,कोठून आले, ते कोण होते या बद्दल कोणालाच काही माहिती नाही पण स्वामीसुत नावाचे त्यांचे एक आतिशय महान भक्त होऊन गेले.त्यांना स्वामी समर्थ आपला मुलगा मानायचे त्यांच्या तर त्यांच्या आनुभावावरून आपल्याला समजेलच कि स्वामी कसे प्रकटले.तर स्वामींच्या प्रकटण्याची हकीकत आशी.
शेकडो वर्षापूर्वी एक पंजाब प्रांतात हस्तिनापुर पासून १२ कोस(जवळपास २४ कि.मी.अंतरावर) छेली खेडा नावचा गाव होता.त्याठिकाणी विजयसिंग नावाचा एक लहान मुलगा आपल्या भाऊ आणि भावजय बरोबर राहायचा.तो मुलगा कोणाही बरोबर मिसळायचा नाही तर तिथून थोड्याश्या अंतरावर असणाऱ्या साधारण पडक्या आश्या जागेत एक खूप मोठा वटवृक्ष होता त्यात एक छोटीशी दिवळी होती आणि त्यात एक छोटी गणपतीची मूर्ती होती,तर तो विजयसिंग खुप खिशात गोट्या भरून तिथे जायचा आणि त्या गणपती बरोबर खेळायचा पण तो मुलगा गणपती ला आपला मित्र मानून त्याचाही डाव स्वतः वरच घेऊन खेळायचा असेच एक दिवस जात होते आणि त्या परमात्म्याला आपला आविष्कार दाखवण्याची गरज वाटू लागली आणि त्याने विजयसिंग ला कारण बनवून आपला आविष्कार दाखवला .तर तो दिवस होता चित्र शुद्ध द्वितीया.आणि विजयसिंग रोजच्या आपल्या पद्धतीने या हि दिवशी तिथे गेला गणपती बरोबर पण आज अचानक त्याच्या मनात आले कि रोज आपणच खेळतोय आणि आज याने पण खेळायचे आणि तरव सर्व गोट्या त्या मूर्तीच्या समोर टाकल्या व ते बोलले”बाप्पा रोज मीच तुझा डाव खेळतोय पण आज नाही,आज तूच खेळायचं”बस इतके त्यांच्या तोंडातून शब्द निघतच धरणी कंपित होऊ लागली सर्वत्र ढग जमून अंधार होऊ लागला वारे वेगाने वाहू लागले आणि कोणालाच काही कळेना कि काय होतंय पण काय करणार ती अद्भुत शक्ती आज प्रकटणार होती आणि तिच्याच आगमनाची हि सूचना होती.,आणि ज्याठिकाणी गणेश मूर्ती होती त्याठिकाणी धरणी दुभंगून एक ८ वर्षाची आतिशय तेजस्वी एक बालमूर्ती प्रकटली आणि तेच दुसरे तिसरे कोणीही नसून प्रत्यक्ष परब्रम्ह श्री स्वामी समर्थ महाराज.आणि तो विजयसिंग गोट्या खेळताना तेव्हा स्वामींकढून हरला आणि बालरूप स्वामिनी त्याला गोट्या उधार दिल्या आणि परत भेटण्याचे देऊन वचन तिथून ते गुप्त झाले.
थोडक्यात स्वामींचा अवतार हा पंजाब प्रांतात हस्तिनापुर पासून १२ कोस(जवळपास २४ कि.मी.अंतरावर) छेली खेडा नावच्या गावात वटवृक्षाच्या जवळ गणेश मूर्तीच्या शेजारी शेजारी झाला.
आता शंका हि उपस्थित होईल कि हि गोष्ट कशी काय कळली.पण यागोष्टीचा उलगडा आस झाला.कोकणातील *हरिभाऊ(स्वमिसुत)* हे अक्कलकोटला आले होते आपल्या ऐहिक इच्छापुरती साठी तेव्हा ते तिथे काही दिवस वास्तव्यला होते .आणि एक दिवस स्वामिनी त्यांना जवळ बोलावले मांडीवर घेतले सांगितले कि आजपासून तू माझा सुत झालास सर्व घरदार सोडून दे आणि दर्याकिनारी माझी ध्वजा उभी कर हे ऐकून हरीभाऊना रडू कोसळले कारण ते इथे ऐहिक इच्छापूर्ती साठी आले होते आणि महाराज तर सर्व सोडायला सांगता आहेत हे पाहून त्यांना थोड रडू कोसळलं तेव्हा स्वामी त्याला म्हणाले कि “रडतोयस काय माझे पोट बघ किती मोठे आहे त्याच्यावर हात फिरव बघू.”आणि ज्यावेळी हरीभाऊनी तसे केले त्यांना ध्यान लागले आणि त्यामध्ये त्यांना आपले सगळे जन्म आठवू लागले आणि त्यातील त्यांना एक आपलाच जन्म आठवला विजयसिंग म्हणजे दुसर तिसर कोणी नाही तर तो स्वमिसुतांचाच पूर्व अवतार होता.आणि त्यानंतर या सर्व गोष्टींचा उलगडा झाला.
आणि या गोष्टीला स्वतः स्वामिनी मान्यता दिली आहे ती पुढील प्रमाणे .
स्वामी प्रकटदिनाचा उत्सव स्वमिसुत महाराजांनी सुरु केला आहे. ज्यावेळी स्वमिसुत महाराज हा उत्सव अक्कलकोट मधे करत होते तेव्हा भुजंगा सारख्या भक्तांनी स्वामिना प्रश्न विचारला स्वमिसुत हे काय करत आहेत तेव्हा स्वामींचे उततर आसे होते”माझा बळ मी सदेह ज्या प्रकटलेल्या दिवसाचा उत्सव करत आहे.”
नाना रेखी नावाचे अहमदनगर चे स्वामीभक्त होते ते स्वमिसुतांच्या सांगण्यावरून अक्कलकोट ला आले होते तर ते पिंगला जोतिष्य विद्येत पारंगत होते.स्वामिनी त्यांना आज्ञा केली कि माझी कुंडली बनव तेव्हा त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांनी लगेचच कुंडली बनवण्याचं काम सुरु केल.आणि काही दिवसातच कुंडली बनली आणि त्यातील स्वामी प्रकटण्याचा मजकूर वर प्रमाणे होता ,तर ते ती कुंडली घेऊन स्वामींपाशी आले तेव्हा तिथे भजनाचा कार्यक्रम सुरु होता.तेव्हा स्वामींनी ती कुंडली भक्ताला सांगून माळ्यावर टाकायला सांगितली आणि ज्यावेळी कार्यक्रम संपला आणि परत स्वामिनी कुंडली आणण्याची आज्ञा केली तेव्हा त्या कुंडलीवर हळद ,कुंकू ,अक्षता ,तुळस,फुले वैगेरे वाहून सर्व दैवतानि त्या कुंडलीची पूजा केली होती.आणि कुंडली पाहून स्वामींनी खूप खुश आणि नानांचा उजवा हात हातात घेऊन त्यांनी आपला हात हातात त्याच्या ठेवला आणि त्याच्या हातावर विष्णुपद उमटले स्वामींचे आत्मलिंग आणि ते त्यांच्या हायती पर्यंत होते त्यांच्या हातावर .याचाच आर्थ स्वामिनी वरील कुंडलीला म्हणजे प्रत्यक्ष रित्या स्वामीसुतानी मांडलेल्या स्वामींच्या प्रकटन्यालाच मान्यता दिली आणि त्याचा प्रसाद म्हणून नाना रेखींच्या हातावर विष्णुपद उमटले.आणि आजही हि स्वामींची कुंडली स्वामींच्या अहमदनगर च्या मठात आहे.
स्वामी समर्थ महाराज कार्द्लीवनात योग्यांना मार्गदर्शन करायला येण्यापूर्वी ते जगात वेगवेगळ्या ठिकाणी स्वताचे खरे नाव,ओळख लपवून चंचलभारती,दिगंबर बुवा आशा नावाने सुद्धा कार्यरत होते.
श्री स्वामी समर्थ #🙏श्री गुरुदेव दत्त💐 #🙏श्री स्वामी समर्थ📿 #🙏प्रेरणादायक / सुविचार #🙏भक्ती सुविचार📝 #🙏 प्रेरणादायक बॅनर
❄❄❄❄❄🏵❄❄❄❄❄
*🔹श्री गुरुचरित्र पारायणास का बसावे?*
*अडचणी, संकटे, चिंता हि सर्व जणांनाच असते. पण मग काय माझे नशीबच खराब आहे. असेच बोलत राहायचे ?*
*साधे एक उदहारण घ्या - तुम्हाला खोकला, सर्दी किवा काही आजार झाला कि तुम्ही काय करता ? डॉक्टर कडे जाता! का जाता? तर बरे वाटावे म्हणून! मग हि संकटे, अडचणी दूर करण्यासाठी काही तरी उपाय तरी केला पाहिजे कि नाही!*
*ह्या आजच्या जगात उपाय तर खूप ज्योतिषी हे करा, ते करा, इकडे जावा, तिकडे जावा असे सांगतील पण तरी मन शांत, स्थिर होत नाही..!*
*गुरुचरित्र हे एक असे अमृत आहे कि तुम्ही किती पापे केली, तुम्ही किती जरी दुसऱ्यांबरोबर वाईट वागला असाल तरी चिंता करु नका. फक्त गुरुचरित्र वाचायला सुरवात करा !*
*ते वाचण्याच्या आधी दत्त गुरुंबरोबर बोला कि "स्वामी, आजपर्यंत स्वार्थ, मोह ह्यांच्यात अडकून खूप पापे केली, पण आतापासून तुम्हीच ह्या देहाला सांभाळा, तुम्हीच ह्या देहाचे मालक आहात!" आणि गुरुचरित्र वाचायला सुरवात करा. आणि बघा तुमची अडचणी, संकटे, चिंता, कुठे गेली तुम्हाला समजणारच नाही .*
*नंतर जसजसे वाचन वाढत जाईल तसे स्वतः दत्त गुरूच तुम्हाला कोणत्या न कोणत्या रूपाने येऊन सांगतील गाणगापुरला जा, अक्कलकोटला जा..! एकदा गुरु पकडलाना, कि सर्व ज्ञान होते आणि ते कायम स्वरूपी राहते.*
*आता गुरुचरित्र वाचायचे कसे? प्राकृत (मराठी) गुरूचरित्र मन लावून वाचले तरी प्रत्येक अध्यायात काय सांगितले आहे ते सहजच समजेल. सप्ताह करायचे एक वेगळेच फळ आहे. पण आपल्याला हळू हळू सर्व समजून घेऊन पुण्ण्याच्या मार्गाला जायचे आहे. गुरुचरित्र वाचताना स्वामी महाराजांना तुमची जी ईच्छा असेल ती बिनधास्त मनातल्या मनात सांगा. आणि वाचायला सुरवात करा. तुम्ही वाचायला घेतलेला अध्याय जो पर्यंत संपत नाही तोपर्यंत कोणाबरोबर बोलू नये. फोनकडे लक्ष देऊ नये. तसेच इतर साधे नियम गुरुचरित्र पुस्तकाच्या सुरवातीला लिहिले आहेत, त्या नियमांचा जास्त बाऊ न करता पवित्र अंतःकरणाने गुरुचरित्र वाचून सर्वांनी आपल्या यशस्वी, आनंदी, आणि सर्व संपन्न अश्या नव्या आयुष्याची सुरवात करावी, अशी विनंती.*
*आता विसरा जे झाले ते आणि विचार करा स्वामींपर्यंत मी कसा पोहोचेन याचा. अर्थातच स्वामी तुम्हाला मदत करणारच. शेवटी आई आहे ती..!*
❄❄❄❄❄🏵❄❄❄❄❄ #🙏श्री स्वामी समर्थ📿 #🙏भक्ती सुविचार📝 #🙏 प्रेरणादायक बॅनर #🙏श्री गुरुदेव दत्त💐 #🙏प्रेरणादायक / सुविचार
#🙏 प्रेरणादायक बॅनर #🙏प्रेरणादायक / सुविचार #🙏भक्ती सुविचार📝 #🙏श्री गुरुदेव दत्त💐 #🙏श्री स्वामी समर्थ📿 म्हणतात - वडिलोपार्जित संपत्तीवर तसा प्रत्येक जण हक्क सांगतो, तसे वयोवृद्ध झालेल्या आईबापाची सहसा कुणी जबाबदारी घेत नाही...._*
*पुस्तकातील पाने वाचून त्यातील कथानक समजेलही पण माणूस समजायला त्याची व्यथा वाचता आली पाहिजे.*
*🌸!!श्री स्वामी समर्थ!!🌸*
*श्री स्वामी समर्थ (मूळ) वटवृक्ष देवस्थान अक्कलकोट २०•०४•२०२६ सोमवार विशेष वस्त्रअलंकार पूजा ✨🌸*
#🙏भक्ती सुविचार📝 #🙏श्री स्वामी समर्थ📿 #🙏प्रेरणादायक / सुविचार #🙏श्री गुरुदेव दत्त💐 #🙏 प्रेरणादायक बॅनर क्या बताए "स्वामी" आपको,हमारी सब खबर है आपको. 🙏श्री स्वामी समर्थ🙏*
#🙏प्रेरणादायक / सुविचार #🙏 प्रेरणादायक बॅनर #🙏श्री स्वामी समर्थ📿 #🙏श्री गुरुदेव दत्त💐 #🙏भक्ती सुविचार📝 सांगतात
जीवनात अडचणी येतील, लोक बोलतील,
मार्ग कठीण होईल.....!
पण जो स्वतः वर विश्वास ठेवतो
त्याला मी कधीच सोडत नाही..!!
*!!स्वामी वचन!!*
*भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे*
*अशक्य ही शक्य करतील स्वामी*
*!!हम गया नही जिंदा है!!*
*!!🌹श्री स्वामी समर्थ🌹!!*
#🙏श्री स्वामी समर्थ📿 #🙏श्री गुरुदेव दत्त💐 #🙏 प्रेरणादायक बॅनर #🙏भक्ती सुविचार📝 #🙏प्रेरणादायक / सुविचार ठेव कोणी नसेल
तर मी आहे तुझ्या सोबत...!!
*!!उगाची भितोसी भय हे पळू दे!!*
*!!जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे!!*
🌹 !!श्री स्वामी समर्थ!!🌹
#🙏प्रेरणादायक / सुविचार #🙏 प्रेरणादायक बॅनर #🙏भक्ती सुविचार📝 #🙏श्री गुरुदेव दत्त💐 #🙏श्री स्वामी समर्थ📿 बाळांनो.. मी भोळा शंकर आहे.. मी प्रत्येकाला 'तथास्तु' बोलतो आहे.. प्रत्येकाची इच्छा पूर्ण करतो आहे.. तुम्ही ज्या भावनेने कर्म करतात.. त्याच प्रमाणे मी फळ देतो आहे.. म्हणून प्रत्येक कर्मात भक्ती भाव ठेवा.. सकारात्मक भाव ठेवा.. सेवाभाव ठेवा.. बघा !! त्याचे येणारे फळ तितकेच महान असेल..!!!
💫🌺श्री स्वामी समर्थ🙇🏻♂️🚩












