༗ सखी🪈𓏧
ShareChat
click to see wallet page
@mujramaharajagdamb
mujramaharajagdamb
༗ सखी🪈𓏧
@mujramaharajagdamb
|| धर्म एव हतो हन्ति, धर्मो रक्षति रक्षितः ||
#🙏श्री स्वामी समर्थ📿
🙏श्री स्वामी समर्थ📿 - ShareChat
00:15
#✍मराठी साहित्य #👍लाईफ कोट्स #🤩जीवनाबद्दल कोट्स 📝 #✍🏽 माझ्या लेखणीतून #🎑जीवन प्रवास चार्ली चॅप्लिन 88 वर्षे जगले त्यांनी आपल्याला 4 विधाने दिली: (१) या जगात काहीही कायमचे नाही, अगदी आपल्या समस्याही नाहीत. (२) मला पावसात फिरायला आवडते कारण माझे अश्रू कोणी पाहू शकत नाही. (३) आयुष्यातील सर्वात हरवलेला दिवस म्हणजे आपण हसत नाही तो दिवस. (४) जगातील सहा सर्वोत्तम डॉक्टर...: 1. सूर्य 2. विश्रांती 3. व्यायाम 4. आहार 5. स्वाभिमान 6. मित्र तुमच्या आयुष्याच्या सर्व टप्प्यांवर त्यांना चिकटून राहा आणि निरोगी आयुष्याचा आनंद घ्या... चंद्र दिसला तर देवाचे सौंदर्य दिसेल... जर तुम्ही सूर्य पाहिला तर तुम्हाला देवाची शक्ती दिसेल... जर तुम्ही आरसा पाहिला तर तुम्हाला देवाची सर्वोत्तम निर्मिती दिसेल. त्यामुळे विश्वास ठेवा. आम्ही सर्व पर्यटक आहोत, देव आमचा ट्रॅव्हल एजंट आहे ज्याने आमचे मार्ग, बुकिंग आणि गंतव्यस्थाने आधीच ओळखली आहेत... त्याच्यावर विश्वास ठेवा आणि जीवनाचा आनंद घ्या. आयुष्य म्हणजे फक्त एक प्रवास! म्हणून, आज जगा ! उद्या कदाचित नसेल.
#😍 awww... 🥰😘❤️
😍 awww... 🥰😘❤️ - ShareChat
00:08
#✍मराठी साहित्य #🙏शिवदिनविशेष📜 #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #😇आमचे प्रेरणास्थान: छत्रपती🙏 *🚩🙏छत्रपती शिवरायांच्या गारदेचा अर्थ काय?🙏🚩* महाराज दरबारात प्रवेश करत असताना जी घोषणा किंवा ललकारी दिली जात असे तिला मराठीत 'गारद' असे म्हटले जाते. गारदेला संस्कृत मध्ये 'बिरूद:' तर उर्दू भाषेत 'अल्काब'असे म्हणतात. ही गारद देणाऱ्यांना 'गारदी' असे म्हणतात. *गडपती* गडकोटांचे अधिपती, राज्यातील गडकोटांवर ज्यांचे अधिपत्य (राज्य) आहे असे महाराज *गजअश्वपती* ज्यांच्याकडे स्वतःच्या मालकीचे हत्ती व घोड्यांचे दल आहे असे महाराज. (त्याकाळी हत्ती हे वैभवाचे प्रतीक समजले जायचे म्हणून गजअश्वपती हा शब्द वैभव संपत्तीचे प्रतीक होता) *भूपती-प्रजापती* वास्तविक राज्याभिषेक म्हणजे राज्यकर्त्याचा भूमिशी झालेला विवाह आहे. म्हणजेच ज्यांनी राज्यातील भूमीचे व प्रजेचे पती हे पद स्वीकारले आहे आणि त्यांचे सर्वत्र रक्षण करणे हे ज्या राज्यकर्त्याचे प्रथम कर्तव्य आहे असे महाराज *सुवर्णरत्नश्रीपती* सोने आणि रत्ने हे देखील वैभवाचे प्रतीक आहे. राज्याच्या खजिन्यातील वेगवेगळे हिरे, माणिक, मोती आणि सुवर्ण (सोने) यावर ज्यांचे अधिपत्य (मालकी) आहे असे महाराज *अष्टवधानजागृत* आठही प्रहरी जागृत राहून राज्याच्या आठही दिशांवर लक्ष ठेवणारे महाराज *अष्टप्रधानवेष्ठीत* ज्यांच्या पदरी प्रत्येक शास्त्रात निपुण असलेले आठ प्रधान आहेत आणि राज्यकारभारात ते ज्यांचा सल्ला घेतात असे महाराज *न्यायालंकारमंडित* कर्तव्यकठोर आणि न्यायकठोर राहून सत्याच्या व न्यायाच्या बाजूने निकाल देणारे महाराज *शस्त्रास्त्रशास्त्रपारंगत* सर्व प्रकारच्या शस्त्रविद्या व शास्त्रांत पारंगत असलेले महाराज *राजनीतिधुरंधर* आदर्श राज्यकर्त्यांप्रमाणे राजकारणाच्या डावपेचांमध्ये (राजनीतीमध्ये) तरबेज असलेले महाराज *प्रौढप्रतापपुरंदर* मोठे शौर्य गाजवून ज्यांनी आपल्या पराक्रमाचा ठसा उमटवला आहे असे महाराज *क्षत्रियकुलवतंस* क्षत्रिय कुळात जन्म घेऊन त्या कुळाचे सर्वात श्रेष्ठ व्यक्ती व क्षत्रिय कुळाचे भुषण असलेले महाराज *सिंहासनाधीश्वर* जसा देव्हाऱ्यातील देव (अधिश्वर) असतो तसेच ३२ मन सुवर्णसिंहासनावर शोभून दिसणारे सिंहासनाचे आधिश्वर असे महाराज *महाराजाधिराज* विद्यमान सर्व राज्यांमध्ये जे सर्वांत श्रेष्ठ आहेत आणि साऱ्या राजांनी ज्यांच्या अधिपत्याखाली राहण्याचे स्वीकारायला हवे असे महाराज *राजाशिवछत्रपती* ज्यांनी जनतेवर न्यायाचे आणि त्यांच्या रक्षणाचे छत्र धरले आहे. जे जनतेचे पालनकर्ता आहेत असे सार्वभौम राजे, शिवाजी महाराज *कि जय* ज्यांचा कीर्तीरूपी विजय त्रैलोक्यात अढळ आहे. चंद्र-सूर्य असेपर्यंत ज्यांचे नाव प्रजेच्या मनात विजयाची ज्योत प्रज्वलित ठेवेल अशा महाराजांचा विजय असो *गारदेचा भावार्थ आणि महत्त्व:* शिवरायांची गारद देताना त्यामागे अनेक उदात्त भावना दडलेल्या आहेत *कृतज्ञता:* ज्यांनी शून्यातून स्वराज्य निर्माण केले आणि गुलामगिरीच्या अंधारातून प्रजेला बाहेर काढले, त्यांच्याप्रती व्यक्त केलेली ही कृतज्ञता आहे. *विजयी विचार:* ही गारद केवळ व्यक्तीचा विजय सांगत नाही, तर महाराजांच्या अंगी असलेली गुण कौशल्य व त्यांनी जपलेल्या न्याय, निती आणि मानवतेचा विजय असो, असे सांगते. *ऊर्जा आणि स्फूर्ती:* जेव्हा शिवभक्त गारद देतात, तेव्हा त्यांच्या अंगात एक वेगळीच ऊर्जा संचारते. त्यांना शिवरायांच्या प्रेरणेतून अन्यायाविरुद्ध लढण्याचे बळ मिळते. 🚩 जय शिवराय जय शंभूराजे 🚩
#🤩जीवनाबद्दल कोट्स 📝 #✍🏽 माझ्या लेखणीतून #🎑जीवन प्रवास #👍लाईफ कोट्स #✍मराठी साहित्य वाचाल तर वाचाल पुण्यात धो-धो पाऊस पडत होता. 'अनिकेत' ला ऑफिसला जायला उशीर झाला होता. त्याने घाईघाईत एक रिक्षा थांबवली. रिक्षात एक ७०-७५ वर्षांचे आजोबा ड्रायव्हर होते. त्यांचे हातपाय वयामुळे थरथरत होते. डोळ्यावर जाड चष्मा होता. अनिकेत चिडून म्हणाला, "काय ओ आजोबा? घरी बसत जा ना या वयात. कशाला जीव देताय आणि आम्हाला उशीर करताय? चला, मला लवकर 'हिंजवडी'ला सोडा." आजोबा काहीच बोलले नाहीत. त्यांनी शांतपणे रिक्षा स्टार्ट केली. रस्त्यात खड्डे होते. आजोबांची रिक्षा खूप हळू चालत होती. प्रत्येक खड्डा चुकवताना त्यांना वेळ लागत होता. अनिकेतचा संयम सुटला. तो मागून ओरडला, "अहो, काय चालवलंय? बैलगाडी आहे का ही? जरा फास्ट घ्या ना! माझं मीटिंग आहे." आजोबांनी आरशातून एकदा अनिकेतकडे बघितलं. त्यांचे डोळे पाण्याने भरलेले होते, पण पावसामुळे अनिकेतला ते दिसले नाहीत. ते म्हणाले, "साहेब, रस्ता खराब आहे. गाडी जुनी आहे, घसरली तर तुम्हाला लागेल." अनिकेतने तोंड वाकडं केलं. "बहाणे नका सांगू. म्हातारपण झालंय तुमचं." शेवटी ऑफिस आलं. मीटरवर १४० रुपये झाले होते. अनिकेतने १५० रुपये दिले आणि म्हणाला, "ठेवा सुट्टे. उपकार समजा." आजोबांनी ते पैसे घेतले, पण ते पैसे खिशात ठेवण्याऐवजी, त्यांनी आपल्या सीटच्या खाली ठेवलेल्या एका 'छोट्या टिफिन बॉक्स' मध्ये ठेवले. आणि त्या डब्याला त्यांनी नमस्कार केला. अनिकेतला कुतूहल वाटलं. तो रागाने निघणार होता, पण पाय अडखळला. त्याने विचारलं, "त्या डब्यात काय देव आहे का? १० रुपयाला नमस्कार करताय?" आजोबांनी तो डबा उघडला. त्या डब्यात अन्न नव्हतं. त्यात 'चिल्लर आणि नोटा' होत्या आणि एक 'फोटो' होता. तो फोटो एका १० वर्षांच्या गोड मुलीचा होता, जिने शाळेचा युनिफॉर्म घातला होता. आजोबा थरथरत्या आवाजात म्हणाले: *"साहेब, ही माझी नात आहे, 'रिया'. माझा मुलगा आणि सून कोरोनात गेले. तेव्हापासून मीच सांभाळतो तिला. आज तिची 'शाळेची फी' भरण्याची शेवटची तारीख आहे. १५०० रुपये भरायचे आहेत. सकाळपासून १४०० रुपये जमले होते. १०-२० रुपयांसाठी मी लोकांच्या विनवण्या करत होतो. आता तुम्ही दिलेले हे १५० रुपये मिळून माझे १५५० रुपये झाले. साहेब, मी म्हातारा आहे, हात थरथरतात... पण या हातांनी आज माझ्या नातीचं भविष्य सुरक्षित केलंय. तुम्ही ज्याला 'उशीर' म्हणत होतात ना... तो माझ्यासाठी 'संघर्ष' होता. कारण जर आज मी फास्ट गाडी चालवून अपघात केला असता, तर माझ्या नातीला अनाथ आश्रमात जावं लागलं असतं."* हे ऐकून अनिकेत सुन्न झाला. ज्या हातांना तो 'कमकुवत' आणि 'म्हातारे' समजत होता, ते हात जगातले सर्वात मजबूत हात होते, जे एका अनाथ मुलीचं भविष्य सावरत होते. त्याला आपल्या मघाच्या वागण्याची, त्या १० रुपयांच्या उपकाराची आणि त्या टोमण्यांची प्रचंड लाज वाटली. अनिकेतने आपली बॅग उघडली. त्यात ५००० रुपये कॅश होती. त्याने ते सगळे पैसे काढले आणि आजोबांच्या त्या टिफिन बॉक्समध्ये ठेवले. आजोबांनी हात जोडले, "नको साहेब, हे खूप आहेत." अनिकेत रडत म्हणाला, "आजोबा, हे पैसे फी साठी नाहीत. हे त्या 'रिया'साठी आहेत. तिला सांगा, आज तिच्या आजोबांनी एका तरुणाला 'माणुसकी' शिकवली. तुम्ही आज घरी जा. ती तुमची वाट बघत असेल." आजोबांनी अश्रू पुसले आणि रिक्षा वळवली. अनिकेत ऑफिसच्या पायऱ्यांवर उभा राहून त्या जाणाऱ्या रिक्षाकडे बघत होता. आज त्याला समजलं होतं की, वेग हा गाडीचा नसतो, तर तो आयुष्याच्या परिस्थितीचा असतो. कधीही कोणाच्या कामावरून किंवा वयावरून त्यांचा अपमान करू नका. प्रत्येकजण आपली लढाई लढत असतो. रिक्षावाला, भाजीवाला हे सुद्धा कोणाचे तरी 'बाप' असतात. त्यांचा आदर करा. तुमची १० मिनिटांची घाई त्यांच्या आयुष्यापेक्षा मोठी नसते.
#✍मराठी साहित्य #👍लाईफ कोट्स #🤩जीवनाबद्दल कोट्स 📝 #🎑जीवन प्रवास #✍🏽 माझ्या लेखणीतून वाचाल तर वाचाल समस्त साळी बांधव विनम्र अभिवादन ! ही पोस्ट जरूर वाचावी. ✍️पुण्यातल्या 'कल्याणी नगर' या उच्चभ्रू भागात *'सखाराम'* नावाची व्यक्ती महानगरपालिकेची कचरा गाडी (Garbage Truck) चालवायची. सखारामचं वय ५० च्या आसपास होतं. अंगावर निळा गणवेश, हातात ग्लोव्हज आणि चेहऱ्यावर मास्क. सखारामचं एक वैशिष्ट्य होतं. जेव्हा तो सोसायट्यांतून कचरा गोळा करायचा, तेव्हा तो ओला आणि सुका कचरा तर वेगळा करायचाच, पण जर त्याला कचऱ्यात एखादं 'जुने पुस्तक' किंवा 'अर्धवट लिहिलेली वही' सापडली, तर तो ती बाजूला काढून एका वेगळ्या पिशवीत ठेवायचा. एका मोठ्या बंगल्यासमोर गाडी उभी होती. त्या बंगल्यातला 'चिन्मय' नावाचा इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आपल्या जुन्या सेमिस्टर ची पुस्तकं रद्दीत टाकायला आला होता. त्याने ती पुस्तकं कचऱ्याच्या डब्यात फेकली. सखाराम ने ती पुस्तकं उचलली, आपल्या शर्टाने पुसून पिशवीत ठेवली. चिन्मयने हे पाहिलं, हसून म्हणाला, "काय काका ? तुम्हाला वाचता येतं का ? कशाला कचरा गोळा करताय ? ती इंजिनिअरिंगची पुस्तकं आहेत, तुमच्या डोक्या वरून जातील. त्यापेक्षा भंगारात विका, दोन पैसे मिळतील चहा प्यायला." सखारामने काहीच उत्तर दिलं नाही. त्याने फक्त मान डोलावली आणि ती पुस्तकं जपून ठेवली. चिन्मयने पुन्हा टोमणा मारला, "अहो, जागा भरली की काय गाडीची? कचरा आणि ज्ञान एकाच पिशवीत? भारीच शौक आहे तुमचा." सखाराम शांतपणे म्हणाला, "साहेब, ज्याला पोटाची भूक असते त्याला अन्नाची किंमत कळते आणि ज्याला ज्ञानाची भूक असते त्याला अक्षराची किंमत कळते. ही तुमच्या साठी रद्दी असेल, पण कोणा साठी तरी हे भविष्य आहे." चिन्मयला ते कळलं नाही. तो हसून निघून गेला. ...६ महिने उलटले. चिन्मय च्या कॉलेजची 'एनएसएस' (NSS - राष्ट्रीय सेवा योजना) ची टीम एका ग्रामीण भागात शिबिरासाठी (Camp) गेली होती. ते गाव खूप मागासलेलं होतं. तिथे शाळा नव्हती, लाईट नव्हती. पण गावकऱ्यांनी सांगितलं की, "आमच्या गावात एक 'मोफत वाचनालय' (Free Library) आहे, जिथे आमची पोरं संध्याकाळी शिकायला जातात." चिन्मय आणि त्याचे मित्र कुतूहलाने त्या वाचनालयात गेले. ते वाचनालय एका पत्र्याच्या शेड मध्ये होतं. पण आतलं दृश्य बघून चिन्मय थक्क झाला. तिथे लाकडी कपाटां मध्ये हजारो पुस्तकं अतिशय नीटसपणे लावली होती. त्यात कादंबऱ्या होत्या, विज्ञानाची पुस्तकं होती, स्पर्धा परीक्षेची पुस्तकं होती आणि... इंजिनिअरिंगची पुस्तकं सुद्धा होती. तिथे ५०-६० गरीब मुलं, ज्यांच्या अंगावर धड कपडे नव्हते, ती मुलं त्या पुस्तकां मध्ये डोकं घालून अभ्यास करत होती. चिन्मयने एका मुलाला विचारलं, "हे वाचनालय कोणाचं आहे ? सरकारचं आहे का ?" तो मुलगा म्हणाला, "नाही दादा. हे आमचे 'सखाराम बाबा' आहेत ना, त्यांनी बनवलंय. ते शहरात कचरा गाडीवर काम करतात. दर रविवारी ते गावी येतात आणि पोत्यात भरून पुस्तकं आणतात. ते म्हणतात, 'माझ्याकडे पैसे नाहीत शाळा बांधायला, पण रद्दीतून वाचनालय तर बनवू शकतो ना'." चिन्मयच्या पायाखालची जमीन सरकली. 'सखाराम ?' तोच कचरा वेचणारा माणूस ? तेवढ्यात सखाराम तिथे आला. त्याने डोक्यावर एक पुस्तकांचा गठ्ठा घेतला होता. त्याच्या अंगावर तोच निळा, मळका गणवेश होता. चिन्मयला बघून सखाराम हसला. "अरे साहेब ? तुम्ही इथे ? ओळखलं का मला ? मी तोच... तुमच्या बंगल्या समोर चा कचरावाला." चिन्मयला काय बोलू सुचेना. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने सखारामच्या हातातलं ते पुस्तक पाहिलं. ते पुस्तक दुसरं तिसरं काही नसून, ६ महिन्यांपूर्वी चिन्मयने जे पुस्तक 'कचरा' म्हणून फेकून दिलं होतं आणि सखारामला 'अडाणी' म्हणून हिणवलं होतं, तेच पुस्तक आज सखारामच्या हातात होतं. चिन्मय धावत गेला आणि त्याने सखारामचे पाय धरले. "काका, मला माफ करा ! मी तुम्हाला अडाणी समजलो, पण तुम्ही तर खऱ्या अर्थाने 'सुशिक्षित' आहात. मी इंजिनिअर झालो, पण पुस्तकाची किंमत मला नाही कळली. तुम्ही कचऱ्यातून 'सोनं' शोधून या मुलांचं भविष्य घडवलंय. आज मला कळलं की, शाळा इमारती मुळे नाही, तर माणसां मुळे मोठी होते." सखारामने चिन्मयला उठवलं. "रडू नकोस, फक्त एक विनंती आहे... पुढच्या वेळी रद्दी विकताना विचार कर. ती रद्दी कोणाचं तरी आयुष्य बदलू शकते. मी शाळेत गेलो नाही, गरिबी मुळे शिकलो नाही. म्हणून मला वाटतं की या पोरांनी तरी शिकावं. माझा हात कचऱ्यात असतो, पण या पोरांच डोकं आकाशात असावं, हेच स्वप्न आहे. " त्या दिवशी चिन्मयने शपथ घेतली. तो परत पुण्यात आला आणि त्याने आपल्या कॉलेजमध्ये 'डोनेट अ बुक' (Donate a Book) मोहीम सुरू केली. आज सखारामच्या त्या छोट्याशा वाचनालयात १० हजारांहून अधिक पुस्तकं आहेत. आणि ती सांभाळणारा तो 'कचरा गाडीचा चालक' आज त्या गावकऱ्यां साठी *'कुलगुरू'* पेक्षा कमी नाही. कोणाच्याही कामावरून त्याची बुद्धिमत्ता आणि दानत ठरवू नका. एक कचरा वेचणारा माणूस सुद्धा समाजा साठी *'विद्यापीठ'* उभा करू शकतो. *ज्ञान* हे *पुस्तकात* असतं, पण *शहाणपण* हे *संस्कारात* असतं. *जुनी पुस्तकं फेकून देण्या पेक्षा ती गरजूं पर्यंत पोहोचवा. काळाची आणि समाजाची गरज आहे* 🙏 आपण सर्व सुशिक्षित, *सखाराम* नाही होऊ शकत, परंतु त्या अशिक्षिता कडून खूप काही शिकू शकतो. आपण सर्वांनी काय करायचे ? आपल्या कडील पुस्तके, कपडे, जुनी सायकल, कॉम्प्युटर, लॅपटॉप, प्रिंटर , बेड, फर्निचर इत्यादी ... जे काही आपल्या उपयोगाचे नाही, वर्षानुवर्ष अडगळीत न ठेवता, खराब होण्यापूर्वी वेळेत दुसऱ्याला देणे. आपला वापर झालेला असल्याने त्याचे मोल आपल्याला नसते, ज्याला हवे आहे, त्याच्या साठी अनमोल असेल.... ! माझ्या मित्रांपैकी एका मित्राने आपला जुना सुस्थितीतील लॅपटॉप माझ्या कडे पाठवला, तो लॅपटॉप एका खेड्यातील शाळेत दिला जाईल, ज्याने तो दिला आहे, त्याच्याच शुभ हस्ते. अनेक शाळा, अनाथाश्रम, वृद्धाश्रमांना अशा वस्तूंची खूप गरज असते, त्यांना देता येतात. अनेक खेड्यात, शाळेत जाण्या साठी बस ची व्यवस्था नसते, पायी जावे लागते. आपल्या कडील अडगळीत पडलेल्या जुन्या सायकली त्यांच्या साठी खूप मोठी मदत असेल.
#✍मराठी साहित्य #🤩जीवनाबद्दल कोट्स 📝 #✍🏽 माझ्या लेखणीतून #👍लाईफ कोट्स #🎑जीवन प्रवास वाचाल तर वाचाल *येथे कर्मावर नाही, नशिबावरच विश्वास ठेवावा लागेल* ---------------------------------- नियतीचा खेळ कसा असतो, हे "फाल्गुन बिनेनडिक" यांच्या आयुष्याने दाखवून दिलं आहे. '१०-फेब्रुवारी १९८५' रोजी नागपूरमध्ये जन्मलेल्या एका नवजात बाळाच्या नशिबी अवघ्या तीन दिवसांतच पोरकेपण आलं. रक्ताच्या नात्यांनी पाठ फिरवली आणि तो चिमुकला जीव नागपूरमधील एका अनाथाश्रमात दाखल झाला. आयुष्याची सुरुवातच अनिश्चिततेने झाली होती. सुमारे एक महिना त्या अनाथाश्रमात राहिल्यानंतर, नेदरलँड्समधील एका डच जोडप्याने त्या बाळाला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. केवळ कायदेशीर जबाबदारी म्हणून नव्हे, तर मनापासून स्वीकारून त्यांनी त्या बाळाला सातासमुद्रापार नेदरलँड्सला नेलं. तिथे फाल्गुनला फक्त एक घर मिळालं नाही, तर प्रेम, सुरक्षितता आणि उज्वल भविष्याची संधी मिळाली. आज, तब्बल ४१-वर्षांनंतर, तोच अनाथाश्रमातील बाळ नेदरलँड्समधील Heemstede या शहराचा "महापौर" म्हणून जबाबदारी सांभाळतो. नाव आहे — Falgun Binnendijk. परदेशात यश, प्रतिष्ठा आणि ओळख मिळवूनही त्यांच्या मनात आपल्या जन्मभूमीची ओढ कायम होती. याच ओढीपोटी फाल्गुन पुन्हा भारतात, आपल्या जीवनकहाणीच्या सुरुवातीच्या ठिकाणी म्हणजेच नागपूर येथे आले. इथला सर्वात भावूक क्षण म्हणजे, ज्या नर्सने त्या तान्हुल्या जीवाला पहिल्यांदा कवेत घेतलं होतं आणि फाल्गुन महिन्यात जन्म झाला म्हणून त्याचं नाव ‘फाल्गुन’ ठेवलं होतं, त्या नर्सची ४१ वर्षांनंतर झालेली भेट. त्या भेटीत वाहणारे आनंदाश्रू, कृतज्ञतेची भावना आणि शांत समाधान… सगळं काही शब्दांच्या पलीकडचं होतं. फाल्गुन यांचा प्रवास इथे थांबत नाही. ते आजही आपल्या 'जन्मदात्री आई'चा शोध घेत आहेत. कोणताही राग नाही, कोणतीही तक्रार नाही. फक्त एकच भावना आहे, ती म्हणजे "कृतज्ञता". त्यांना आपल्या आईला एवढंच सांगायचं आहे की, “तुझा मुलगा सुरक्षित आहे, प्रेमात वाढला आहे, आयुष्यात यशस्वी झाला आहे आणि आनंदी आहे.” या नात्याची पवित्रता जपत त्यांनी आपल्या मुलीचं नावही आपल्या जन्मदात्रीच्या नावावरून ठेवलं आहे. नागपूरच्या एका अनाथाश्रमातील पाळण्यापासून ते नेदरलँड्समधील शहराच्या नेतृत्वापर्यंतचा हा प्रवास आपल्याला एकच गोष्ट शिकवतो, 'तुमची सुरुवात कशी आहे, यावर तुमचं भविष्य ठरत नाही. जर सोबत प्रेम देणारी माणसं असतील आणि मनात जिद्द असेल, तर नियतीवर मात करणं अशक्य नाही'. फाल्गुन बिनेनडिक यांची ही कहाणी प्रत्येकासाठी आशा, मानवता आणि विश्वासाचा जिवंत पुरावा आहे.🙏🏻 🚩🕉️🙏🙏🕉️🚩
#✍🏽 माझ्या लेखणीतून #✍मराठी साहित्य #🎑जीवन प्रवास #🤩जीवनाबद्दल कोट्स 📝 #👍लाईफ कोट्स वाचाल तर वाचाल एक काल्पनिक कथा : पुण्यातील एका मोठ्या स्मशानभूमीत दुपारचे ३ वाजले होते. 'रोहन' (वय ३५), जो अमेरिकेत एका मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीत व्हाईस प्रेसिडेंट होता, नुकताच फ्लाईटवरून उतरून थेट स्मशानभूमीत आला होता. त्याचे वडील, 'सदाशिवराव' (वय ७५), काल रात्री वारले होते. रोहनच्या हातात एक महागडा लॅपटॉप बॅग होता आणि डोळ्यावर रेबॅनचा चष्मा होता. त्याला घाम फुटला होता आणि तो सारखा घड्याळ बघत होता. तिथे 'मोक्ष इव्हेंट मॅनेजमेंट' (अंत्यसंस्कार करणारी एजन्सी) चा माणूस, 'सुमित', उभा होता. सुमितने सगळी तयारी करून ठेवली होती. लाकडं रचली होती, भटजी बोलावले होते, आणि सदाशिवरावांचा मृतदेह स्वच्छ अंघोळ घालून तयार ठेवला होता. रोहन आला. त्याने वडिलांच्या चेहऱ्याकडे एक नजर टाकली. डोळ्यातून एक-दोन थेंब पाणी आलं. त्याने सुमितला विचारलं: "मिस्टर सुमित, सगळं रेडी आहे ना? मला ६ वाजताची रिटर्न फ्लाईट पकडायची आहे. उद्या माझी महत्त्वाची मीटिंग आहे. प्लीज लवकर उरका." सुमितला आश्चर्य वाटलं. ज्या बापाने या मुलाला लहानाचा मोठा केला, त्या बापाच्या चितेजवळ थांबायला या मुलाकडे ३ तास सुद्धा नव्हते? सुमितने शांतपणे मान डोलावली. विधी पार पडले. रोहनने भडाग्नी दिला. धुराचे लोट आकाशात गेले. रोहनने सुमितला बाजूला घेतलं आणि चेकबुक काढलं. "सुमित, थँक्यू. तुम्ही चांगली व्यवस्था केलीत. तुमचं बिल किती झालं? ५० हजार? १ लाख? अमाऊंट सांगा, मी आताच चेक देतो. मला परत येता येणार नाही, अस्थिविसर्जन तुम्हीच करून टाका." सुमितने रोहनकडे बघितलं. त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र हसू होतं. सुमितने खिशातून एक 'जुनी फाईल' काढली आणि रोहनच्या हातात दिली. "साहेब, बिल द्यायची गरज नाही. तुमचं बिल 'पेड' (Paid) आहे." रोहन गोंधळला. "पेड? कोणी भरले पैसे? माझ्या काकांनी?" सुमित म्हणाला: "नाही साहेब. ५ वर्षांपूर्वी सदाशिवराव (तुमचे वडील) आमच्या ऑफिसमध्ये आले होते. ते खूप आजारी होते. त्यांना चालता येत नव्हतं. त्यांनी मला विचारलं होतं - 'तुमचं पॅकेज काय आहे? मुलाला त्रास नको म्हणून सगळं करून देणार का?' आम्ही त्यांना पॅकेज सांगितलं. त्यांनी त्याच दिवशी ५०,००० रुपये ॲडव्हान्स जमा केला होता. आणि ही 'चिट्ठी' त्यांनी मला दिली होती. त्यांनी सांगितलं होतं की, 'माझा मुलगा आला की त्याला ही चिट्ठी दे. आणि जर तो आलाच नाही, तर तुम्हीच माझं काम करा.'" सुमितने ती चिट्ठी रोहनला दिली. रोहनने थरथरत्या हाताने ती चिट्ठी उघडली. त्यात सदाशिवरावांच्या कापऱ्या अक्षरात लिहिलं होतं: *"प्रिय रोहन, बाळा, मला माहित आहे तू खूप बिझी आहेस. अमेरिकेत तुला श्वास घ्यायला वेळ नसतो. मला माहित आहे की, माझ्या मरणाची बातमी ऐकून तुला टेन्शन येईल. 'सुट्टी मिळेल का? तिकीट मिळेल का? मीटिंगचं काय होईल?' हे प्रश्न तुला पडतील. बाळा, तुझा वेळ आणि तुझं करिअर खूप महत्त्वाचं आहे. मी तुला वाढवलं ते यासाठीच की तू जग जिंकावंस. एका म्हाताऱ्याच्या प्रेतासाठी तू तुझं नुकसान करून घेऊ नकोस. म्हणून मी माझ्या मरणाची सोय आधीच करून ठेवली आहे. एजन्सीला पैसे दिलेत. ते सगळं करतील. तू आलास तर बरंच आहे, नाही आलास तरी मला राग नाही. फक्त एकच विनंती... लहानपणी तुला शाळेत सोडायला जाताना मी तुझा हात कधीच सोडला नव्हता. आज जाताना, अग्नी देताना तुझा हात थरथरू देऊ नकोस. लवकर परत जा. तुझी बायको वाट बघत असेल. तुझाच, बाबा."* चिट्ठी वाचून रोहनच्या हातातला चेकबुक खाली चिखलात पडलं. त्या स्मशानभूमीत, जिथे लाकडं जळण्याचा आवाज येत होता... तिथे आता रोहनचा 'अहंकार' आणि 'करिअरचा गर्व' जळून खाक झाला होता. तो गुडघ्यावर बसला. तो ओरडला, "बाबा...!! माफ करा बाबा!" रोहनने सुमितचे पाय धरले. "सुमित, मला नाही जायचं अमेरिकेला! मला माझ्या बाबांसोबत राहायचंय! मी करोड रुपये कमवले, पण मी भिकारी निघालो! माझ्या बापाने मरताना सुद्धा माझ्या 'मीटिंग'चा विचार केला... आणि मी त्यांच्या शेवटच्या दर्शनाचा 'भाव' करत होतो?" त्या दिवशी रोहन फ्लाईट पकडू शकला नाही. तो तिथेच, त्या जळत्या चितेसमोर रात्रभर बसून राहिला. कारण त्याला समजलं होतं की, 'प्री-पेड' फक्त सिमकार्ड असू शकतं, बापाचं प्रेम नाही. बापाचं प्रेम हे 'अनलिमिटेड' असतं आणि त्याची परतफेड जगातली कोणतीच करन्सी करू शकत नाही. तुम्ही जगात कितीही मोठे व्हा, कितीही पैसे कमवा... पण ज्या आई-वडिलांनी तुमची लंगोट बदलली, त्यांच्या शेवटच्या प्रवासात 'डायपर' बदलायची वेळ आली की नाक मुरडू नका. एजन्सी अंत्यसंस्कार करू शकते, पण 'अश्रू' एजन्सीचे नसतात, ते रक्ताचेच लागतात.
#🤩जीवनाबद्दल कोट्स 📝 #✍🏽 माझ्या लेखणीतून #🎑जीवन प्रवास #✍मराठी साहित्य #👍लाईफ कोट्स वाचाल तर वाचाल *इतिहासातील एक मनोरंजक घटना* #कथाविश्व स्कॉटलंड मध्ये एक अतिशय तुटपुंजी आर्थिक परिस्थिती असलेला एक शेतकरी होता. एके दिवशी नेहमी प्रमाणे त्याच्या शेतीच्या कामात व्यस्त होता तेंव्हा त्याला, एका लहान मुलाच्या किंकाळ ऐकू आल्या. जीवाच्या आकांताने ओरडत असलेल्या त्या हाका ऐकुन त्या शेतकऱ्याने हातातली अवजारे/शेतीच काम सोडून आवाजाच्या दिशेने धाव घेतली. सदर जागी जाऊन पाहतो तर एक चिमुरडा, दलदल मध्ये गळ्यापर्यंत रुतलेला दिसला. काही क्षणांचा विलंब आणि त्या मुलास जिवंत समाधी, अशी स्थिती पाहून त्या शेतकऱ्याने स्वतः चा जीव धोक्यात घालून, प्रचंड अरापिता करीत त्याच्या आजूबाजूचा गाळ काढला, आणि त्या जीवघेण्या संकटातून त्या मुलाची सुटका केली. दुसऱ्या दिवशी लवजम्या सहित एक आलिशान बग्गी त्या शेतकऱ्याच्या घरापाशी येऊन थांबली. त्या बग्गी मधून एक अतिशय धनवान व्यक्ती उतरली आणि त्या शेतकऱ्या च्या घरी गेली. त्या व्यक्तीने शेतकर्यास स्वतःचा परिचय दिला, की काल ज्या मुलाला तुम्ही मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलं, त्या मुलाचा ती व्यक्ती पिता आहे, म्हणून शेतकऱ्याने केलेल्या उपकाराबद्दल धन्यवाद देणे करिता ते आले आहेत. त्यांचा वार्तालाप चालू होता, त्या धनाढ्य व्यक्तीला त्या दरम्यान जाणवलं की हा शेतकरी आर्थकदृष्टया तितका सक्षम नाही, तथापि अतिशय स्वाभिमानी आहे, हा कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत घेणार नाही. त्या शेतकऱ्याचा मुलगा, दरवाज्यातून आत येतो. त्या धनाढ्य व्यक्तीने त्या मुलाबद्दल शेतकऱ्याला चौकशी केली की हा कोणत्या शिकत आहे. शेतकऱ्याने त्यास उत्तर दिले की त्याचा मुलगा हा काही विद्यार्जन करत नसून, शेती कामात मदत करतो. यावर त्या धनाढ्य व्यक्तीने शेतकऱ्यास असे सुचविले की, की माझ्या मुलाला तुम्ही जीवनदान दिलं त्या बदल्यात तुमच्या मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी मला घेऊ द्या, जेणेकरून मी तुमच्या मुलास उत्तम भविष्य, देऊ शकेन. यावर त्या शेतकऱ्यानं सहमती दर्शविली. त्या शेतकऱ्याच्या मुलाला इंग्लंड च्या नामांकित शिक्षण संस्थेत प्रवेश दिला गेला आणि त्या मुलाचं शिक्षण सुरू झालं. काही दिवसातच कळाल की हा मुलगा सर्वसामान्य नसून विलक्षण बुद्धिमान आहे, त्या मुलाने शिक्षण क्षेत्रात अतिशय कौशल्य दाखविले, आणि तो उच्चशिक्षण देखील घेऊ लागला. पुढे तो मुलगा संशोधन कार्यात उतरला. ही दोन्ही मुलं त्यांच्या ऐन तारुण्यात असताना, त्या धनाढ्य व्यक्तीचा मुलगा आजारी पडला. आजार वाढतच चालला होता, आर्थिकदृष्ट्या अतिशय बलवान असल्याने त्याच्या पित्याने उपलब्ध असणाऱ्या सर्व वैद्य, औषधोपचार केले, पण तरीही आजार उतरत नव्हता. त्या वेळेला त्या आजारास कोणतेही ठोस आणि खात्रीलायक औषध नव्हते. याच दरम्यान त्या शेतकऱ्याच्या मुलाने, त्याच्या संशोधन कार्यात एक जबरदस्त मजल मारली, आणि एक लस शोधून काढली, आणि नेमकी हीच लस म्हणजे त्या धनिकाच्या मुलाच्या आजारावर रामबाण औषध होती. त्या लसिमुळएच पुन्हा एकदा हा मुलगा मृत्यूच्या तोंडातून परत आला. बालपणी ज्याने जीवदान दिले, त्याच्याच मुलाने तारुण्यात पुन्हा एकप्रकारे त्याच धानिकाच्या मुलाचा जीव वाचविला होता. हा कुठेतरी प्रामाणिक पणाने, कृतज्ञ पणाने स्वतः च्या मुलाला वाचविले ची परतफेड करणे करिता केलेल्या कार्याची ही एक प्रकारे परतफेड होती. *आता ही सर्व पात्रे कोण ते सांगतो,* तो धनिक व्यक्तीचा मुलगा, म्हणजे इंग्लंडचा माजी पंतप्रधान, *विन्स्टन चर्चिल,* तो शेतकऱ्याचा मुलगा म्हणजे, थोर शास्त्रज्ञ *अलेक्झांडर फ्लेमिंग,* आणि त्याने शोधून काढलेली लस म्हणजे, *पेनिसिलीन.* *म्हणून इतरांना मदत करा,नेहमी परतफेड मिळेलच या अपेक्षेने नव्हे तर स्वतःच्या मानसिक समाधानासाठी.आपण या सृष्टीचा अंश आहोत आणि चांगल्या लोकांच्या त्यागातून च नवीन काहीतरी निर्माण होत असते..* 🌹Jai Jai Shri Swami Samarth 🌹 कथाविश्व - गोड कथांचे अनोखे विश्व 🎉
#☘️हर हर महादेव🙏🏼 #🔱महाशिवरात्री स्टेटस🕉️ #😘खर प्रेम #✨रविवार स्पेशल✨ #🙂 शुभेच्छा
☘️हर हर महादेव🙏🏼 - ShareChat