
गुरुकृपा वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची
@sanjayji7708
हेचि आम्हा करणे काम । बीज वाढवावे नाम ।रामकृष्णहरी
रामकृष्ण हरी माऊली #🙏आई माझी काळुबाई #🌸संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली🙏 #🙏भक्ती सुविचार📝 #✍ज्ञानेश्वरी📖 #🌻आध्यात्म 🙏
:::::-----::::::-----:::::-----:::::
।।सार्थ श्रीसंत तुकाराम महाराज गाथा पारायण।।
:::::----::::::------:,:::::-----::::
::- अभंग क्र.२४५५ -:
****************************
या अभंगामध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात-
एकदा की माझे व तुझे हे अंतकरणातून निघले की मग मनुष्याच्या देहावरून अभिमानाचे ओझेच उतरले असे समजावे. मग त्याला काहीही घ्यावे दयावे लागत नाही आणि विचार करून पाहिले तर मनुष्यस्वभाव सुद्धा शुध्द आहे. आशा व मोहजाळाने मनुष्याच्या गळ्याला फासा घातला आहे. असे जरी असले तरी मनुष्याने सुख झाले तरी त्याचा अभिमान वाटू देऊ नये आणि दुःख झाले तरी त्याचा शीण वाटू देऊ नये. मनुष्याने असे म्हणावे की सर्वकर्ता नारायणच आहे केवळ एवढेच शब्द जरी उच्चारले तरी कोणत्याही प्रकारचे सुखदुःख मनुष्याला होणार नाही. तसेच मान अपमान आणि लाभ-हानी हे सारखेच आहेत असे समजावे. तुकाराम महाराज म्हणतात याच अवस्थेला सोवळे असे खरे नाव आहे.
::::::::::::::::::::::::::::::::::
आपला दास:-
ह.भ.प श्री संजयजी महाराज ढाकणे
आळंदी देवाची
दि.१७/०५/२०२६
वार-रविवार
:::::---::::::------:::::::-----:::::
::::::::::- -:::::::::::::::: #✍ज्ञानेश्वरी📖 #🌸संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली🙏 #🌻आध्यात्म 🙏 #🙏भक्ती सुविचार📝 #🙏आई माझी काळुबाई
गुरुकृपा वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची शालेय शिक्षणासोबत अध्यात्मिक शिक्षणाची सुवर्णसंधी मो.९५९५०३०९०५ #🙏भक्ती सुविचार📝 #🌸संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली🙏 #🙏आई माझी काळुबाई #🌻आध्यात्म 🙏 #✍ज्ञानेश्वरी📖
:::::-----::::::-----:::::-----:::::
।।सार्थ श्रीसंत तुकाराम महाराज गाथा पारायण।।
:::::----::::::------:,:::::-----::::
::- अभंग क्र.२४५४ -:
****************************
या अभंगामध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात-
सर्व भूमी शुद्ध आहे परंतु मनुष्याची वासना ही अमंगळ असते हे जाणून घ्यावे. त्याप्रमाणे काही जीव असे आहेत की जे विनाकारणच भीतीने घाबरतात एखाद्या जागेचा गुण दोष नसूनदेखील त्या जागेत ते विनाकारण घाबरतात त्याच्या अंगावर कोणत्याही प्रकारचा घाव होत नाही परंतु केवळ भीतीपोटी भूमीचा त्याग करतात. सर्व जीव परमार्थ दृष्टीने देव रूपच आहेत परंतु केवळ मी आणि माझे या खोट्या भ्रमाणेच मनुष्य नागवला जातो. तुकाराम महाराज म्हणतात एकदा की भेद नाहीसा झाला की सर्व सृष्टी, भूमी जीव हे ब्रम्हस्वरूपच आहेत हे तुम्ही जाणताल.
::::::::::::::::::::::::::::::::::
आपला दास:-
ह.भ.प श्री संजयजी महाराज ढाकणे
आळंदी देवाची
दि.१६/०५/२०२६
वार-शनिवार
:::::---::::::------:::::::-----:::::
::::::::::- -:::::::::::::::: #🌻आध्यात्म 🙏 #🌸संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली🙏 #✍ज्ञानेश्वरी📖 #🙏आई माझी काळुबाई #🙏भक्ती सुविचार📝
रामकृष्ण हरी माऊली #🙏आई माझी काळुबाई #🌸संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली🙏 #🙏भक्ती सुविचार📝 #✍ज्ञानेश्वरी📖 #🌻आध्यात्म 🙏
:::::-----::::::-----:::::-----:::::
।।सार्थ श्रीसंत तुकाराम महाराज गाथा पारायण।।
:::::----::::::------:,:::::-----::::
::- अभंग क्र.२४५३ -:
****************************
या अभंगामध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात-
आहार आणि निद्रा या गोष्टी तुमच्याजवळ आपोआप येतात त्यासाठी इतर कष्ट करावे लागत नाही. आहार व निद्रेला जास्त महत्त्व देऊ नये तसेच मऱ्यादा सोडून कधीही जास्त बोलू नये तसेच व्यर्थ बोलूं नये त्यामुळे आपल्या शरीराला फार नाही पण थोडे तरी कष्ट होतातच. जो आत्मस्थितीत प्राप्त होतो त्याला होणारे समाधान हे तोच एक जाणत असतो. तुकाराम महाराज म्हणतात जेणेकरून आपल्याला व दुसऱ्याला पीडा होईल असे काहीच करू नये मग तो कोणत्याही स्थितीत राहिला तरी हरकत नाही.
::::::::::::::::::::::::::::::::::
आपला दास:-
ह.भ.प श्री संजयजी महाराज ढाकणे
आळंदी देवाची
दि.१५/०५/२०२६
वार-शुक्रवार
:::::---::::::------:::::::-----:::::
::::::::::- -:::::::::::::::: #✍ज्ञानेश्वरी📖 #🌸संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली🙏 #🌻आध्यात्म 🙏 #🙏भक्ती सुविचार📝 #🙏आई माझी काळुबाई
:::::-----::::::-----:::::-----:::::
।।सार्थ श्रीसंत तुकाराम महाराज गाथा पारायण।।
:::::----::::::------:,:::::-----::::
::- अभंग क्र.२४५२ -:
****************************
या अभंगामध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात-
देवा आम्ही तुझे दास असून देखील पतनाला जावे, हे दिसण्यास विपरीत दिसेल आणि हरीचे दास पतनास जातात अशी नीती तरी कोठे सांगितली आहे काय? देवा तुझे नाम कंठात असून देखील आम्हाला संसाराने आटवावे त्रास द्यावा असे झाले तर? तुकाराम महाराज म्हणतात आणि काळाने आम्हाला स्पर्श करावा आम्हाला विटाळ करावा हे चांगले दिसेल काय ते तुम्ही सांगा.
::::::::::::::::::::::::::::::::::
आपला दास:-
ह.भ.प श्री संजयजी महाराज ढाकणे
आळंदी देवाची
दि.१४/०५/२०२६
वार-गुरुवार
:::::---::::::------:::::::-----:::::
::::::::::- -:::::::::::::::: #🙏भक्ती सुविचार📝 #🌸संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली🙏 #🙏आई माझी काळुबाई #🌻आध्यात्म 🙏 #✍ज्ञानेश्वरी📖
:::::-----::::::-----:::::-----:::::
।।सार्थ श्रीसंत तुकाराम महाराज गाथा पारायण।।
:::::----::::::------:,:::::-----::::
::- अभंग क्र.२४५१ -:
****************************
या अभंगामध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात-
देवा तु माझा उध्दार केला नाहीस आणि पुराने व वेद तर गर्जुन सांगतात की देव भक्तांचा उद्धार करतोच त्यामुळे पुराने देखील आज लज्जित झाले आहेत आणि वेदाला कमीपणा येऊ पाहत आहे. देवा आम्ही तुझे भक्त असून तुझ्या नामाचे धारक असून देखील केविलवाणे व दीन दिसत आहोत. पूर्वी संतांनी जे सांगितले आहे ते बोल म्हणज, देव भक्तांचा नामधारकाचा उध्दार करतो ते बोल आता वाया जात आहे असेच दिसते आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा आता तुझ्या सेवेचा मार्ग फार मोडकळीस आला आहे असे दिसते.
::::::::::::::::::::::::::::::::::
आपला दास:-
ह.भ.प श्री संजयजी महाराज ढाकणे
आळंदी देवाची
दि.१३/०५/२०२६
वार-बुधवार
:::::---::::::------:::::::-----:::::
::::::::::- -:::::::::::::::: #🌸संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली🙏 #✍ज्ञानेश्वरी📖 #🌻आध्यात्म 🙏 #🙏आई माझी काळुबाई #🙏भक्ती सुविचार📝
:::::-----::::::-----:::::-----:::::
।।सार्थ श्रीसंत तुकाराम महाराज गाथा पारायण।।
:::::----::::::------:,:::::-----::::
::- अभंग क्र.२४५० -:
****************************
या अभंगामध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात-
अरे देवा तू आपली ब्रिदावळी म्हणजे तू भक्तवत्सल आहेस दीनानाथ आहेस पतितपावन आहेस अशी कीर्ती पूर्वी जन माणसांमध्ये वाढविली आणि तू तर इतका कठोर आहेस हे मला समजले आहे मग तू व्यर्थ तू आपली ब्रिदावळी का वाढविली आहेस? देवा एखाद्याला जर एखादी पदवी मिळालेली असेल तर त्या पद्धती प्रमाणे वागणे हे त्याचे कर्तव्य आहे मग हे सर्व तुला माहित असून देखील तू आपल्या ब्रिदापासून माघारी का फिरत आहेस? देवा मी तुझी सर्व माहिती आता संतांना सांगणार आहे मग मी पाहतोच तु आपले श्रीमुख मग संतांना कसे दाखवितो? मी आता तुझ्या नामाचा असा सर्वत्र डांगोरा पिटणार आहे की देव अनाथांचा नाथ नाही. तुकाराम महाराज म्हणतात देवा अहो आम्ही कसेही केले तरी मरणारच आहोत परंतु तुझी कृपा आमच्यावर झाली नाही म्हणूनच तुझा भक्त मेला असा तू ठपका स्वतःवर ओढवून घेण्याचा धनी विनाकारणच का होतोस?
::::::::::::::::::::::::::::::::::
आपला दास:-
ह.भ.प श्री संजयजी महाराज ढाकणे
आळंदी देवाची
दि.१२/०५/२०२६
वार-मंगळवार
:::::---::::::------:::::::-----:::::
::::::::::- -:::::::::::::::: #🙏भक्ती सुविचार📝 #🌸संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली🙏 #🙏आई माझी काळुबाई #✍ज्ञानेश्वरी📖 #🌻आध्यात्म 🙏
:::::-----::::::-----:::::-----:::::
।।सार्थ श्रीसंत तुकाराम महाराज गाथा पारायण।।
:::::----::::::------:,:::::-----::::
::- अभंग क्र.२४४९ -:
****************************
या अभंगामध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात-
देवा तुला माझी आठवण सुद्धा येत नाही हे मला समजले आहे कळले आहे त्यामुळे आता माझा जीव तरी मी कशासाठी सांभाळू. हे अनंता तु तरी आता माझ्या संचिता विषयी काय करशील माझे संचित तसे आहे की तुला माझी आठवण येत नाही त्यामुळे माझ्या जगण्याचा धिक्कार असो. देवा तु पतीत पावन आहेस तुझ्या किर्तीचा ठसा सर्वत्र पसरलेला आहे त्यामुळे तु माझा उध्दार करशील या आशेनेच मी निवांत राहिलो होतो. देवा तुझ्या वाचून दुसरा माझा कोण अंगिकार करणार आहे तुला इतकी हाक मारून देखील तु माझ्याकडे येत नाहीस तुझी भेट देत नाहीस याचा अर्थ असा की तु माझ्या विषयी निष्ठुर झाला आहेस हे मला समजले आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा तु माझ्या जीवाची निराशा केली आहेस त्यामुळे आता मी तुझ्यासाठी माझ्या जीवाचा ही नाश करेल.
::::::::::::::::::::::::::::::::::
आपला दास:-
ह.भ.प श्री संजयजी महाराज ढाकणे
आळंदी देवाची
दि.११/०५/२०२६
वार-सोमवार
:::::---::::::------:::::::-----:::::
::::::::::- -:::::::::::::::: #✍ज्ञानेश्वरी📖 #🌸संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली🙏 #🌻आध्यात्म 🙏 #🙏आई माझी काळुबाई #🙏भक्ती सुविचार📝












