14
38 Posts • 80K views
क्रांतिसिंहांच्या विचारावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काम - सुभाष बापू पाटील - सांगली अंनिसची जिल्हा बैठक तासगाव येथे संपन्न प्रतिनिधी - समाजातील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना केली. ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक क्रांतिसिंह नाना पाटील यांनीही आयुष्यभर जातीभेदाविरुद्ध- अंधश्रद्धे विरुद्ध मोठे काम केले. खरे तर अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही क्रांतिसिंह नाना पाटलांचे अंधश्रद्धा निर्मूलनाचे कामच पुढे घेऊन जात आहे असे प्रतिपादन क्रांतिसिंह नाना पाटील यांचे नातू सुभाष बापू पाटील यांनी केले. ते तासगाव येथे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जिल्हा कार्यकारिणी बैठकीमध्ये बोलत होते. सुभाष बापू पाटील पुढे म्हणाले की, अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम हे अवघड वाटेवरचे काम आहे. पण हे अवघड वाट चालणारे कार्यकर्ते डॉ. दाभोलकरांनी महाराष्ट्रभर उभे केले. त्यामुळे डॉ. दाभोलकरांच्या नंतर ही चळवळ त्यांचे कार्यकर्ते चिकाटीने चालवत आहे. प्रमुख पाहुणे आणि तासगाव पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक दिपक पाटील म्हणाले की,अंधश्रद्धेमुळे मानवाची अधोगती होते. यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन आणि चिकित्सक बुद्धी स्वीकारून लोकांनी जीवन जगले पाहिजे. अंधश्रद्धा, अफवा, सोशल मीडियाचा अतिवापर यामुळे आज समाजामध्ये तेड निर्माण होत आहे. सारासार विचार करून, विवेकीदृष्टी वापरून आपण कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवला पाहिजे. माजी जिल्हा परिषद सभापती आणि तासगाव अंनिसच्या अध्यक्षा छायाताई खरमाटे म्हणाल्या की, सध्या समाजात अंधश्रद्धा वाढवण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांनी अधिक जोमाने काम करण्याची गरज आहे‌. यासाठी आपणांस डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी जी विवेकाची वाट दाखवली आहे त्यावरून चालणे गरजेचे आहे. सांगली जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. संजय निटवे म्हणाले की, या डिसेंबर अखेर सांगली जिल्ह्यातून आपण अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पाचशेपेक्षा जास्त सभासद नोंदणी करुन प्रत्येक तालुक्यामध्ये अंनिसच्या शाखा सुरू करू. अंनिसचे राज्य कार्यकारणी सदस्य राहुल थोरात, फारुख गवंडी, सुजाता म्हेत्रे, वाघेश साळुंखे यांनी लातूर येथे झालेल्या राज्य कार्यकारणीच्या निर्णयाची माहिती कार्यकर्त्यांना दिली कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. वासूदेव गुरव, सूत्रसंचालन नूतन परीट यांनी केले. बैठकीस सुनील भिंगे आटपाडी, माणिक कांबळे विटा, इंद्रजित पाटील, कडेगांव, सचिन करगणे, दिगंबर कांबळे कवठेमहांकाळ, क्रा मारुती शिरोडे, हिम्मतराव मलमे,पलुस, आशा धनाले ,त्रिशला शहा मिरज, जगदीश काबरे सांगली, डॉ. सतीश पवार, प्रा रमेश कुंभार, तासगाव उपस्थित होते.‌ कार्यक्रमाचे संयोजन प्रमोद म्हेत्रे, समीर कोळी, हेमलता बागवडे,उत्तम परिट आणि अमर खोत यांनी केले . #14 oct
13 likes
13 shares