महाराष्ट्राचा इतिहास

63 Posts • 144K views
Vaibhav Mhatre
688 views 22 hours ago
#इतिहास छत्रपतींचा 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #३०_ऑगस्ट_१६५८ शिवरायांनी आपले वकील "सोनोपंत डबीर" यांना दिल्लीच्या औरंगजेबकडे काही प्रश्नांसहीत पत्र घेऊन पाठवले. ३० ऑगस्ट १६५८ ला सोनाजीपंत दिल्लीला जायला निघाले व तिथे पोहोचल्यावर औरंगजेबला शिवाजीराजेंच्याकडून अभिनंदन व शुभेच्छा दिल्या. ह्यावेळी शिवाजी राजेंनी पाठवलेले पत्र आज उपलब्ध नाही पण त्यावर औरंगजेबचे उत्तर उपलब्ध आहे. शिवाजी राजेंनी त्याच्या पत्रात काही सवलती मागितल्या होत्या पण ते पत्र उपलब्ध नसल्याने नेमके काय मागितले होते ते कळत नाही. शिवाजी राजेंनीे मुघल साम्राज्याप्रती निष्ठा दाखवावी अशी औरंगजेबची मागणी होती. तसेच दख्खनचा मुघल सुभेदार शाहिस्तेखानच्या आदेशानुसार त्याला सहय्य करावे. ह्या पत्रात दारा शुकोहला भक्करच्या सीमेवर पकडण्यात आले याचा उल्लेखही आहे. हा सगळा पत्राचा खटाटोप उरकल्यावर सोनाजीपंत बरोबर औरंगजेबने शिवाजी महाराजांसाठी एक खास पोशाख पाठविला. संदर्भग्रंथ✍️ (श्री राजा शिवछत्रपती खंड १, पृष्ट ८४९-८५१) 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #३०_ऑगस्ट_१६५९ रात्रीचा सुमार, औरंगजेबाचा गुलाम नजर बेग आणि त्याच्या साथीदारांनी दाराच्या तुरुंगाला भेट दिली. तेथे त्यांनी दाराच्या मुलाला दूर करून दाराचे जागच्या जागी तुकडे केले. अश्या प्रकारे वारसाहक्काच्या युद्धात औरंगजेबाचा विजय झाला. औरंगजेबाचा मोठा भाऊ दारा शुकोहची औरंगजेबाने मारेकरी घालून हत्या केली. वारसाहक्काच्या या लढाईत औरंगजेबाच्या जागी जर दारा शुकोह बादशाह झाला असता तर पुढील सर्वच इतिहास बदलला असता. ठार केल्यानंतर औरंगजेबाने दाराचे मस्तक कलम केले आणि एका ताटात ठेऊन वडील शहाजहानला "नजराणा" म्हणून पेश केले. दाराचं शव हुमयूनच्या कबरीच्या आवारात पुरण्यात आलं ! गुस्ल नाही , दुवा नाही, दोन आण्याचं कफनही प्रेताला लाभलं नाही फातेहा न पढताच मुर्दा खड्ड्यात लोटण्यात आला व मातीनं बुजवण्यात आला. विषेश म्हणजे, दाराला लढाईत हरवण्यासाठी औरंगजेबाने त्याचा भाऊच असलेल्या शहजादा मुराद बक्षची मदत घेतली आणि त्या मुरादबक्षलाही दोनच वर्षांनी ठार केले. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #जय_जिजाऊ #जय_शिवराय #जय_शंभुराजे 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
22 shares
Vaibhav Mhatre
966 views 3 days ago
#इतिहास छत्रपतींचा 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #२७_ऑगस्ट_१६५६ जावळी प्रांत जिंकून घेऊन महाराजांनी तेथील व्यवस्था लावून घेतली. जावळीहून पळालेला चंद्रराव मोरे रायरीवर जाऊन बसला होता. महाराजानी रायरीला वेढा दिला. एका महिन्याने शिळीमकरांच्या मध्यस्तीने रायरी उर्फ रायगड महाराजांच्या ताब्यात आला. 🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🚩 #२७_ऑगस्ट_१६७९ १६७९ च्या पावसाळ्यात माजगावच्या बंदराचे काही काम सुरु असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने इंग्रजांनी सिद्दीला आरमार सुरतला नांगरण्यास सांगितले व सिद्दी आरमारासह सुरतेस गेला. शिवाजी महाराजांचे हेर या सर्व हालचालींकडे अत्यंत बारीक नजर ठेवून होते आणि या वेळेचा फायदा उठवायचा असे ठरवून महाराजांनी साहित्य, काही दारूगोळा व आपली माणसे चौलच्या ठाण्यात जमवली. इंग्रजांच्या पोर्तुगीज आणि काही हिंदू हेरांकडून ही माहिती इंग्रजांना कळली. हेरांनी स्पष्ट कळवले होते कि जर आज शिवाजीला रोखले नाही तर पुढे हे प्रकरण आवघड होईल त्यामुळे याचा लवकर बंदोबस्त करावा परंतु इंग्रजांनी हे प्रकरण फार मनावर घेतले नाही असे दिसते कारण याच दिवशी इंग्रजांनी मुंबईच्या रक्षणार्थ तैनात असलेली ‘हंटर’ नामक फ्रिगेट मंगळूरच्या एका व्यापाऱ्याला भाडेतत्वावर दिली. दरम्यान पुढच्या ३-४ दिवसातच चौलला असणारा महाराजांचा ताफा सर्व रिसाल्यासह खांदेरीवर उतरला. या दर्यावर्दी मावळ्यांचा प्रमुख होता मायनाक भंडारी. मायनाक सोबत या वेळी सुमारे १५० माणसे व ४ लहान तोफा होत्या हे कळताच इंग्रजांना घाम फुटला आणि त्यांनी सप्टें १६७९ सुरुवातीला ही हकीकत सुरतेला कळवली तसेच नारायण शेणवी नामक वकिलाला शिवाजीराजांच्या चौलच्या ठाणेदाराकडे निषेध नोंदवण्याकरिता रवाना केले. 🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🚩 #२७_ऑगस्ट_१६८३ गोव्याच्या पोर्तुगीज व्होईसरॉय याने जाहीर केले कि, “संभाजीराजे मोठे सैन्य घेऊन गोव्यावर चाल करून येणार आहेत तरी सर्वांनी गोव्याच्या संरक्षणाच्या व्यवस्थेस लागावे”. 🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🚩 #२७_ऑगस्ट_१६८५ उत्तर कोकणातील संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांचा काही प्रदेश व किल्ले काबीज केले होते. त्यातीलच “ किल्ले जीवधन” आजच्या दिवशी पोर्तुगीजांनी मराठ्यांकडून परत मिळवला. 🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🚩 #२७_ऑगस्ट_१६९० किल्ले जिंजीस जुल्फिकार खानाचे वेढे पडले. 🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🚩 #जय_जिजाऊ #जय_शिवराय #जय_शंभुराजे 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
14 shares